Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

KDMC: चार नगरसेवक अभी भी लापता, नोटिस के साथ पूछताछ की तैयारी

ABATISH BHOIR
Jan 29, 2026 15:31:56
Kalyan, Maharashtra
KDMC शिवसेना उबाठाचे ते 4 नगरसेवक अजूनही बेपत्ता बेपत्ता नगरसेविका स्वप्नाली केने यांच्या घराबाहेर लावले "कारणे दाखवा नोटिस"चे फलक 24 तासात बैठकीस गैरहजर राहिल्याबाबाबत खुलासा करा अन्यथा सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करणार उबाठा गटनेते उमेश बोरगावकर यांचा इशारा. उद्या शिवसेना शिंदे पक्षाचे महापौर पदासाठी अर्ज भरणार आहेत गायब असलेले चार नगरसेवक अर्ज भरताना उद्या उपस्थित राहणार का हे पहावे लागणार आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Jan 29, 2026 14:46:30
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Jan 29, 2026 13:50:12
Dhule, Maharashtra:धुळे शहराला पाणीपुरवठा करणारी तापी नदीवरील जलवाहिनी फुटली. मुंबई अग्रा महामार्गावरील वर्षी फाट्याजवळ तापीची जलवाहिनी फुटल्याने करोडो लिटर पाणी वाया गेले. ही जलवाहिनी फुटल्याने महामार्गावर 50 ते 100 फुटांचे पाण्याचा कारंजा पाहायला मिळाला. करोडो लिटर शुद्ध पाणी महामाग्रवार वाहून गेले. वाहतूकलाही काहीकाळ अडथळा निर्माण झाला होता. शुद्धीकरण केलेलं पिण्याचे पाणी वाया गेले. बाभळे जलशुद्धीकरण केंद्रातून धुळे शहराला पाणीपुरवठा होतो. त्यामुळे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा काही काल विस्कळीत राहणार आहे. दरवर्षी यां जलवाहिनी दुरुस्ती वर लाखो रुपयांचा खर्च करण्यात येतो.
0
comment0
Report
SMSamruddhi M Kolhe
Jan 29, 2026 13:35:30
Neral, Maharashtra:सुरेश टोकरे यांच्या प्रचार वादातून ठिणगी; वादाचं थेट चाकूहल्ल्यात रूपांतर नेरळमध्ये निवडणूक प्रचाराच्या वादातून तरुणावर जीवघेणा चाकूहल्ला. शिंदेसेनेचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या प्रचारावेळी झालेल्या वादामुळेच ठिणगी पडल्याचा आरोप फिर्यादीत. वाद वाढत गेल्यानंतर टोकरे समर्थक कार्यकर्त्यांकडून हल्ला झाल्याचा दावा. ममदापूर येथील रिक्षा चालक विशाल हिसाळके गंभीर जखमी, रायगड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. मध्यरात्री दीडच्या सुमारास नेरळ पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर घटना. तीन आरोपी अटकेत, शस्त्र जप्त; फॉरेन्सिक पथकाचा तपास. फिर्यादीत सुरेश टोकरे यांचे नाव आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ. वादातूनच हल्ला झाला का, की पूर्ववैमनस्य? नेरळ पोलीस तपासात.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Jan 29, 2026 12:57:52
Pune, Maharashtra:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने पुणे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारावरती मोठा परिणाम झालाय,तळेगाव ढमढेरे रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटातील शिवसेना उमेदवार सारिका करपे यांच्या कडून साध्या पद्धतीने घरोघरी जाऊन प्रचार केला जातोय,पवार परिवाराच्या छत्रछायेखाली आम्ही वाढलोय पुणे जिल्ह्याचा महाराष्ट्राचा चेहरा मोहरा या कुटुंबाने बदलण्याचं काम केलंय मात्र आज दादांच्या जाण्याने आम्ही पोरके झालोय, स्थानिक राजकिय कुरघोडीमुळे आम्हाला शिंदे साहेबांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करावा लागला असून या पुढच्या काळात अजित दादा सारखाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे जिल्ह्याचा विकास करतील असा विश्वास जिल्हा परिषदेच्या उमेदवार सारिका करपेंनी व्यक्त केलाय.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 29, 2026 12:45:22
Akola, Maharashtra:अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपने 44 नगरसेवकांची शहर सुधार आघाडी तयार केली आहे. 80 नगरसेवकांची संख्या असलेल्या अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 41 नगरसेवकांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपकडे असलेल्या 44 नगरसेवकांच्या बळावर महापौर आणि उपमहापौर पद भाजपकडे जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे. दरम्यान, काँग्रेसने मात्र आशावाद कायम ठेवत भाजपविरोधी सर्व पक्षांची बैठक शासकीय विश्रामगृहात आयोजित केली.या बैठकीला काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, उबाठा, एमआयएम तसेच अपक्ष नगरसेवक उपस्थित होते. उद्या होणाऱ्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत सत्ता आम्हीच स्थापन करू, असा दावा काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी केला आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Jan 29, 2026 12:32:34
Chandrapur, Maharashtra:मनपा सत्ता संघर्षात राजकीय क्षेत्रातून एक मोठी घडामोड पुढे आली आहे, चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तेसाठी गुंडगिरीचा वापर होताना बघायला मिळालाय. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर नगरसेवकांची ट्रॅव्हलर गाडी अडवून त्यांना पळवून लावण्याचा प्रकार समोर आलाय, यामुळे चंद्रपुरातील सत्ता संघर्षाला धोकादायक वळण लागण्याची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील येळाकेळी टोल नाक्याजवळ सकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास घडलेल्या थरारक घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुंबईवरून चंद्रपूर मनपाच्या काँग्रेसच्या नगरसेवकांना नागपुरात घेऊन जाणारी टेम्पो ट्रॅव्हलर अडवून पाच नगरसेवकांना जबरदस्तीने खाली उतरवून पळवून नेण्याचा प्रकार पुढे आला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या निकालानंतर काँग्रेसमधील 2 गटात सत्ता स्थापनेसाठी तीव्र संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांकडून बहुमताचा दावा केला जात असताना, मुंबईहून चंद्रपूरकडे परतणाऱ्या वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांच्या ट्रॅव्हल्सला चेहरे झाकलेल्या काही 15 अज्ञात व्यक्तींनी टोल नाक्याच्या आधी आपली गाडी लावून अडवले. या प्रकाराने तणाव अधिकच वाढला. घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, सुमारे 10 ते12 आरोपी फरार आहेत. ट्रॅव्हल्स अडवणाऱ्यांविरोधात सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे—हे गुंड नेमके कोणी पाठवले? महानगरपालिकेतील सत्ता हस्तगत करण्यासाठी थेट गुंडांचा वापर करण्यात आला का? हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी नवीन नाही. पक्षाच्या 2 गटातील संघर्ष चर्चेत आहे. मात्र आता महानगरपालिकेच्या सत्तेसाठी समृद्धी महामार्गावर गुंडांचा वापर झाल्याने राजकारणाने अत्यंत धोकादायक वळण घेतले आहे. या घटनेमुळे चंद्रपूरच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली असून, पोलीस तपासातून सत्य समोर येईल का, आणि अखेर महानगरपालिकेची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Jan 29, 2026 12:15:29
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 29, 2026 10:23:52
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : सध्या सर्वच वयोगटात मोबाईल पाहण्याचा प्रमाण वाढलंय मात्र याचा सर्वात मोठा फटका लहानग्यांना बसतोय, मोबाईलच्या अति वापरामुळे त्याच्यावर सातत्याने हलणारी चित्र पाहिल्यामुळे मुलांच्या डोळ्यावर परिणाम होतोय इतकाच नाही तर त्यांच्या मेंदूवर सुद्धा भीषण परिणाम होत असल्याचं आता पुढे आलंय त्यामुळे लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका असंच आवाहन तज्ञांकडून करण्यात येते आहे.. लहानग्यांच्या हातातील मोबाईल टाईम बॉम्ब मोबाईलच्या अतिवापरामुळे 30% मुलांचे डोळे खराब मोबाईलचा वापर मेंदूवर करतोय भीषण परिणाम मोबाईल प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी वस्तू, उगाच वेळ घालवायला उत्तम साधन, त्यामुळे सर्वच वयोगटात तो पहिला जातो, खरं तर अति मोबाईल वापराने सगळ्यांना त्रास होतो मात्र सगळ्यात जास्त फटका बसतोय तो लहानग्यांचा; जेवताना, मूल रडत असेल तर त्याला मोबाईल देण्याचा प्रकार सर्रास दिसतो आणि नेमका याच मूळ मोबाईल पाहण्याची आसक्ती मुलांमध्ये दिसतेय.. मोबाईल दिल्यावर काही प्रमाणात सुरुवातीला मुलांचा हट्ट कमी होतो मात्र नंतर हा वाढतो खास करून दोन ते पाच वर्षांपर्यंत मुलांना मोबाईल वरील हलणारी चित्र पाहायला दिल्याने त्यांच्या डोळ्यावर भीषण परिणाम होतोय, डोळ्यातून पाणी येतंय, डोळे तिरळे होत आहेत मुलांना अकाली चष्मा लागतोय डोळ्याचे स्नायू दुखावताय अशा रुग्णांचे प्रमाण आता डोळ्यांच्या दवाखान्यात वाढलेला आहे.. 2 ते 5 वयोगटात मुलांना ही स्क्रीन अर्धा तास पेक्षा जास्त नको मात्र हे पाळले जात नाही, त्यामुळे लहानगांच्या हातात मोबाईल देऊच नका असं डोळ्यांचे डॉक्टर सांगतात. मोबाईल फक्त डोळ्यांपर्यंतच मर्यादित नाही तर मेंदूवर सुद्धा परिणाम करतोय.. मोबाईलच्या वापरामुळे मुलं चिडचिडे होत आहेत, निद्रानाश होतोय, एकाग्रता राहत नाही, अभ्यासात लक्ष राहत नाही त्यामुळे पालक वेगळ्या आजाराकडे वळतात म्हणून मानसोपचार तज्ञ सुद्धा मोबाईल टाळा म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेने 18 ते 24 महिन्यापेक्षा छोटा बाळाला स्क्रीन टाइम शून्य असावा, 2 वर्षांच्या मुलाला फक्त 20 मिनिटे, 2 ते 5 वर्षापर्यंत आठवड्यात 2 ते 3 तास, 6 ते 12 वयोगटात 2 तासांपेक्षा कमी वेळ, 20 मिनिटांच्या स्क्रीन टाइम नंतर 20 फूट दुरवरील वस्तू किमान 20 सेकंद पाहावी, 20-20-20 नियम लागू. अंधत्व झाले नाही, परंतु नजीक दिसण्याच्या समस्या myopia वाढत आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top