Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421506

बदलापुर में राष्ट्रवादी (AP) उम्मीदवार के पैसे बाँटने के आरोप, शिवसेना ने किया खुलासा

CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 27, 2025 07:51:43
Ambernath, Maharashtra
बदलापुरात राष्ट्रवादी (AP)च्या उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप केलं जात असल्याचा शिंदेसेनेचा आरोप प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (AP)चे कार्यकर्ते भिडले राष्ट्रवादी (AP)च्या महिला कार्यकर्त्यांना पैशांच्या पाकिटांसह रंगेहात पकडलं बदलापुरात राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप शिंदेसेनेनं केलाय. प्रभाग क्रमांक एक मध्ये राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या पैशानं भरलेली पाकीटं वाटत असल्याचे आरोप करत शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी या महिला कार्यकर्त्यांना रंगेहात पकडलय. तसंच निवडणूक अधिकाऱ्यांना तत्काळ माहिती दिली. या पाकिटांमध्ये तीन-तीन हजार रुपये भरण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. सध्या निवडणूक अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Nov 27, 2025 08:03:23
Kalyan, Maharashtra:डोंबिवली उन्नत मार्गावरून 'बॅनर वॉर' पेटले! ​शिंदे विरुद्ध भाजप: श्रेयवादाची लढाई; ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात आमचं काम बोलतंय..फोडाफोडीच्या राजकारणाला छेद' देत..खासदार श्रीकांत शिंदे याचा विकासाकडे कल शिवसेनेची बॅनर बाजी करत नाव न घेता रवींद्र चव्हाण व भाजपला टोला तर कल्याण-डोंबिवलीच्या विकासाचे स्पीडब्रेकर कोण?'..जनतेला उत्तर द्या... तुमच्या विकासाच्या योद्ध्‌याने २०१४ पासून आजपर्यंत हा उन्नत मार्ग का पूर्ण केला नाही? ..आधी व्यवस्थित माहिती घ्यावी नंतर बड्या बाता मारा.. आधी या प्रश्नाचे उत्तर द्या मगच बॅनरबाजी करा ..भाजपचे थेट प्रत्युत्तर देत शिंदेंच्या शिवसेनेला बॅनरच्या माध्यमातून टीका करत सवाल गेले अनेक वर्षापासून रखडलेले उन्नत मार्गासाठी MMRDA ने 36 कोटींची निविदा जाहीर केल्यानंतर हा राजकीय संघर्ष सुरू झाला. डोंबिवलीतील ठाकुरली रेल्वे स्थानकाबाहेर शिवसेना शिंदे गटाकडून दोन दिवसापूर्वी बॅनरबाजी करत भाजपवर निशाणा साधला होता तर आता डोंबिवलीच्या ठाकुर्ली चोळी गाव परिसरात भाजपकडून बॅनर बाजी करत शिंदे गटाला प्रतिउत्तर देण्यात आले आहे
0
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 27, 2025 07:36:08
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग निलेश राणे ऑन मालवण धडक रविंद्र चव्हाण जिल्ह्यात आल्यावर काय करतात याचा पुरावा तुम्हाला काल मिळालाय मालवण मधील सभा हे निमित्त होत. सभेनंतर ते काय करणार ह्याचा साधारण अंदाज मला होता. सगळ शोधून काढलं त्यानंतर सगळ माझ्या हाती लागलं. तुम्ही हे सगळ कशासाठी करता ? मी गेल्यावर केनवडेकर यांच्या घरी गेल्यावर ते पदाधिकारी घाबरले. त्या घरात एक डायरी आहे आणि एकच बॅग असेल अस मला वाटत नाही. रोज त्या घरातून पन्नास लाख ते एक कोटी रुपये वाटप सुरू आहे. रवींद्र चव्हाण आले आणि हे झालं. रवींद्र चव्हाण येतात तेव्हाच जिल्ह्यात काही पैशाचा जोर कसा वाढतो हे नगरसेवक निवडून गेले तर नगरपालिका लुटणार मालवण मधील सात ते आठ घरांची तपासणी व्हावी एका मतासाठी 10 ते 15 हजार पर्यंत रक्कम दिली जातेय आमच्या कडून वाटप होतेय अस समजल तर 25 हजार पण वाटतील. जिल्ह्यात काय संस्कृती तयार करत आहोत जिल्हा बिघडला तरी चालेल पण निवडणुका जिंकल्या पाहिजेत आणि एकच माणूस करतोय हे आल्या पासून सुरू झालंय. रवी चव्हाण साहेबांच्या माणसांचा मी पाठलाग सुरू ठेवणार. ऑन रवींद्र चव्हाण (फेक नेरेटिव्ह) माझ्या पायाखालची वाळू सरकली असती तर तुम्ही एवढे पैसे वाटले असते का कोणाच्या पायाखालची जमीन सरकते हे स्पष्ट होतय जनता तुमच्या सोबत नाही हे लक्षात आल्यावर जनतेला विकत घ्यायला निघालात? तुम्ही मैदानात लढा मी आजही रवींद्र चव्हाण यांचा आदर करतो पण निवडणूक लढविण्याची ही पद्धत नाही तुम्ही मोठे आहात तुम्ही का अडकता उमेदवाराचे जातप्रमाणपत्र चुकीच देता मतदार यादीत घोळ आहे आणि आता पैसे वाटप करताना तुम्हाला पकडलं तुमच्या कडून ही अपेक्षा नहोती मी पाठलाग सुरू ठेवणार हे प्रकार थांबले नाहीत तर जिल्ह्याची काय अवस्था होईल या भीतीने मी हे केलं. रवींद्र चव्हाण देखील राणे साहेबांच नाव घेता तुम्ही देखील राणे साहेबांचा आदर्श बाळगावा आम्ही त्यांच्याच आदर्श वर चालतो तुम्ही कोणाचा आदर्श बाळगता महायुती जिंकावी म्हणून आम्ही प्रयत्न केले तेव्हा महायुती आठवली नाही आज आठवली आज आदर्श काढताय. आता तुम्हाला पुरावा द्यावा लागेल माझ्या लफड्यात पडू नका मी राणे साहेबांच्या पायाला हात लावून निवडणुकीत उतरलोय माझ्या हातात रोज पुरावे लागतील तर मी मैदानात उतरणार ते कोणाचा आदर्श पळतात ह्याच आत्मचिंतन कराव. युती झाली असती तर चांगलच होत जे होतंय ते चुकीच होतंय त्याला वेगळ वळण देण्याचा प्रयत्न करताय ते चुकतंय मैदानात सम समान लढुया हा बाजार नाही लोकांना तुम्ही बिघडवताय माझा वैकल्पिक वाकड नाही मी निवडणूक पारदर्शक व्हावी हा माझा प्रयत्न आहे ऑन जिल्हाध्यक्ष सावंत कालचा शेवटचा पुरावा नाही हे रोज होत आणि रवींद्र चव्हाण आले की अधिक होत रवींद्र चव्हाण यांचे सख्खे बंधू मालवण मध्ये बसून आहेत ते का बसून आहेत ही निवडणूक गरिबांची आहे हे इकडेच थांबव म्हणून सगळ अंगावर घ्याव लागतलं काय कारवाई झाली आणि पुढे काय करणार ते मी अधिकाऱ्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन बघणार ऑन बावनकुळे आम्ही कोणाच्या घरात थेट गेलो नाही पुराव्यानिशी गेलो मी बावनकुळे साहेबांचा आदर करतो साहेब समजून घ्या हा विषय गंभीर आहे काही लोक लोकांचा मी पाठलाग करत गेलो ते घर कोणच आहे ते बघितलं नाही रवींद्र चव्हाण साहेब येऊन गेले म्हणून आम्ही पाठलाग केला ऑन व्यवसाय पैसा निवडणुक आयोगाकडे दाखवाव लागेल काय काय विकल कोणी पैसे दिले तो माणूस समोर आला पाहिजे त्याचा पुरावा द्यावा अजून सात ते आठ घर आहेत नीतिमत्ता आहे की नाही निलेश राणेंना हरविण्यासाठी तुम्ही बाहेर बसून काही करणार का ज्याच्या कडून पैसे आले त्याच नाव सांगा भाजपा हा माझा परिवार आहे फडणवीस साहेबांना मी मनापासून मानतो चव्हाण साहेब इकडून त्यांना काय सांगतात ते माहीत नाही ह्यात फडणवीस साहेबांचा रोल नाही चव्हाण साहेबांनी हे करू नये म्हणून आम्ही हे करतोय 25 हजार एका मताला आम्ही काय करणार आहोत मी फडणवीस साहेबांना भेटणार आहे मालवण मध्ये हे होतय तर पुढे काय काय होईल गरिबांनी निवडणूक लढवायचीच नाही का गरिबांची निवडणूक आहे लोक आपले दागिने गाड्या संपत्ती विकत आहेत आणि निवडणूक लढवत आहेत ते जिंकतील का ऑल वैभव नाईक तुमच्यासाठी पैसे वाटले मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही ते आता नॉन एन टी टी झालेत त्यांच्या गरज राजकारणातून संपलेली आहे त्यांनी आता व्यवसाय करावा वैभव नाईक सारख्या माणसाला मी उत्तर देणं योग्य नाही आमचे प्रवक्ते बोलतील
84
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 27, 2025 07:35:13
Nanded, Maharashtra:नांदेड जिल्ह्यातील कंधार नगर परिषदेच्या निवडणुकीत पाणीपुरवठ्याचा मुद्दा एरनीवर आलाय. शहराला लागून जंगतुंग तलाव आणि जवळच लिंबोटी धरण असताना नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे पाणीपुरवठा विस्कळीत आहे. कसेबसे लिंबोटी धारणातून पाईपलाईन टाकण्यात आली पण शुद्धीकारण यंत्रणा बंद आहे. केवळ ब्लिचिंग पावडर टाकून पाणीपुरवठा केला जात असल्याने अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यात फिडर वारंवार नादुरुस्त होत असल्याane पाच पाच दिवस आड पाणीपुरवठा होतोय. पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने यंदा कंधारच्या निवडणुकीत हाच मुद्दा एरनिवर आहे. इच्छुक उमेदवार आपणच पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देत आहेत. कंधारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपामध्ये प्रमुख लढत होत आहे. नाहराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून स्वप्नील पाटील लुंगारे, भाजपाकडून गंगाप्रसाद यन्नावार, काँग्रेकडून शहाजी नळगे निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गावातील ही निवडणूक असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मागच्या टर्ममध्ये सत्ता एका पक्षाची तर नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा त्यामुळे विकासाकामाना खिळ बसला होता. आता कंधारकर कुणाला साथ देणार हे पाहावे लागणार आहे.
115
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 27, 2025 07:17:58
146
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 27, 2025 07:00:52
Nagpur, Maharashtra:नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादी मध्ये 45 हजार मतदारांची नावे दोन वेळा (दुबार) असल्याचे नमूद करण्यात आले आहे... दुबार नाव असलेल्या मतदारांच्या समोर "डबल स्टार" असे चिन्ह देण्यात आले आहे.. या मतदारांकडून मतदानापूर्वी हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे आणि त्याद्वारे त्यांनी ते दोन ठिकाणांपैकी कुठे मतदान करणार आहे हे सांगायचे आहे. नागपूर महानगरपालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत 20 लाख 93 हजार 392 मतदारसंघ होती... यंदाच्या प्रारूप मतदार यादीत मतदारसंघ 24 लाख 82 हजार 475 झाली आहे... म्हणजेच 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत 3 लाख 90 हजार 83 मतदारांची वाढ झाली आहे... मतदार यादीत दुबार नाव असलेल्या मतदारांनी पुढे घेऊन हमीपत्र लिहून द्यावे असे आवाहन महापालिकेतील निवडणूक विभागाने केले आहे...
153
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 27, 2025 06:52:20
112
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 27, 2025 06:51:49
136
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 27, 2025 06:46:42
Baramati, Maharashtra:बारामती_ *शरद पवार बाईट पॉइंटर* *ऑन_अतिवृष्टी कर्ज वसुली स्थगिती* अतिवृष्टी आणि पूर याच्यामुळे काही जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले आहे. नुकसान दोन प्रकारचे आहे काही ठिकाणी जमीन वाहून गेली आहे काही ठिकाणी फक्त साधना वाहून गेल्या आहेत. आमच्या अपेक्षा अशी होती ज्यांची जमीन वाहून गेली आहे किंवा साधन वाहून गेले आहेत त्यांना काही ना काही आर्थिक मदत पुन्हा उभा राहण्यासाठी करण्याची आवश्यकता होती. आता राज्य सरकारने जे धोरण ठरवलं त्याच्या पाठीमागच्या कर्जाच्या वसुलीला एक वर्षाच्या साठी स्थगिती दिली आहे. एक वर्षाचा हा वसुली थांबवण्याचा निर्णय कुर्ता उपयोगी पडेल पण त्याची गरज भागणार नाही. याच्यामध्ये शेतकऱ्यांचे जे आर्थिक नुकसान झालं आहे ते पाहिल्यानंतर त्याची काही रक्कम सरकारने द्यायला हवी होती. काही रकमेसाठी व्याजमाप करून विविध हप्ते दिले असते तर शेतकऱ्यांना त्याची आर्थिक मदत झाली असती. आज ती पुरेशी आहे असं मला वाटत नाही. *ऑन_अर्थ खात आमच्याकडे निवडणूक प्रचारात चढाओढ* जी काय चढावूड चालली आहे ती पैसे किती द्यायचे. मत मागताना कामाला मागायचं नाही मी पैसे दिलेत, मी निधी दिला आहे.ही काय गोष्ट चांगली नाही. अर्थकारणातून निवडणुका जिंकायच्या हा दृष्टिकोन असेल तर त्यावर भाष्य न केलेलं बरं *ऑन_आरक्षणाची मर्यादा ओलांडली अंतिम सुनावणी* सांगता येत नाही कारण सुप्रीम कोर्टाचा अप्रोच फार स्ट्रॉंग दिसतोय त्याचा अंतिम निर्णय या दोन-तीन दिवसात काय होईल ते सांगता येत नाही *ऑन_स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती* या स्थानिक निवडणुका असतात. या निवडणुकीत फारसं राजकारण आणू नये असे एक भूमिका घेतली होती, त्यामुळे या निवडणुकंित मला पहिल्यांदाच असं दिसतंय की ठिकठिकाणी गट झाले आहेत एक पक्ष दुसऱ्या पक्षाबरोबर जात आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे इथे एक वाक्यता नाही. पण ठीक आहे लोकांना हवं तो योग्य निकाल मतदान देतील. त्यामध्ये अधिक लक्ष द्यायचं कारण नाही माझ्यासारखे जे लोक आहेत याच्या आधीही कधी आणि आताही यात पडले नाहीत आता दोन-चार दिवस राहिले आहेत काय होतंय बघूया
179
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 27, 2025 06:46:22
Dhule, Maharashtra:धुळे जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने शहरातील एसपी मैदानामध्ये विद्यार्थिनींना स्व सरक्षणाचे धड्यासह सायबर सुरक्षा, मुलींचे कायदेशीर हक्क तसेच लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा यावर मार्गदर्शन करणार आले. धुळे जिल्ह्यातील शाळा मधील विद्यार्थिनींची सुरक्षा व सुरक्षितेची क्षमता वृद्धीगत करण्यासाठी ग्रँड मास्टर शिफुजी शौर्य भारद्वाज यांच्या उपस्थितीमध्ये तीन दिवसीय मिशन प्रहार कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील एस आर पी एफ मैदानावर जिल्ह्यातील दहा हजार विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रँडमास्टर शिफुजी शौर्य भारद्वाज यांनी स्वतः विद्यार्थिनींना सौरक्षणाचे धड्यासह सायबर सुरक्षा, मुलींचे कायदेशीर हक्क तसेच लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा यावर मार्गदर्शन करणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचा आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे.
114
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 27, 2025 06:46:04
Baramati, Maharashtra:इंदापूर प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार भरत शहांचा आक्रमक.... भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळत — *एक रुपयाचाही भ्रष्टाचार सिद्ध झाला तर उद्या निवडणुकीतून माघार घेईन....* माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांच्यावर निशाणा... इंदापूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांनी आज आक्रमक भाषण करत प्रतिस्पर्ध्यांवर जोरदार पलटवार केला... सभेत बोलताना ते म्हणाले कुणी काहीही म्हणू दे… व्याज लावलं म्हणून माझं उत्पन्न वाढलं घनकचऱ्यातून वाढलं… *अरे माझं उत्पन्न मोजायला गेलात तर तुमच्या दोन पिढ्या पुरणार नाहीत...* आम्ही आमच्या कष्टाने कमावतो नगरपालिकेच्या पैशातून एक रुपयाही घेतलेला नाही… हे ठणकावून सांगतो. असा प्रत्युत्तर देताना भरत शहा म्हणाले ज्यांना वाटत असेल की नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झालााय त्यांनी माहितीचा अधिकार टाका आणि तपासून पहा. या भरत शहाने एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला असेल तर मी उद्या निवडणुकीतून माघार घेईन… हेही स्पष्ट सांगतो. या वेळी त्यांनी कृष्णा-भीमा विकास आघाडीचे नेते प्रदीप गारटकर, हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांच्यावर साधला निशाणा...
128
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 27, 2025 06:40:53
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत राय टाऊन सोसायटीमध्ये डीजे च्या आवाजावरून दोन गटात लाथा बुक्क्यांनी हाणामाण झाली, याचा व्हिडिओ व्हायरल झाला. ही घटना सोमवारी रात्रीच्या दरम्यान घडली. पोलिसांनी दोन्ही गटाकडून दिलेल्या तक्रारीवरून परस्पर विरोधी दोन्ही गटांविरोधात एनसी दाखल केली. पोलीस शिपाई वृषभ भातुकुलकर आणि डिगडोह नगर परिषदेतील भाजप उमेदवार अनिल शर्मा हे वाद झालेल्यांचे नाव आहेत. ऋषभ भातकुलकर यांना मारहाणीची ही घटना व्हायरल झाली. वृषभ भातकुलकर राय टाऊन सोसायटीमध्ये राहतात आणि नागपूर शहर पोलीस दलात शिपाई पदावर आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचा वाढदिवस कार्यक्रम होता; त्यांनी डीजे साउंड सिस्टем लावली होती. त्या दिवशी रात्री दहा वाजताच्या सुमारास अभय दास या गाळेधारक सोसायटीचे सचिव तिथे गेले आणि वृषभला डीजे चा आवाज कमी करून बंद करण्यास सांगितले. त्या दिवशी वृषभने साउंड सिस्टेम बंद केली. सोमवारी या सोसायटीमध्ये मुलीच्या लग्नाअगोदर मेहंदीचा कार्यक्रम होता; तिथे सुद्धा डीजे साउंड लावण्यात आला होता. आवाज जोरात येत असल्याने वृषभने सचिव अभय दास यांना आज रात्री दहा वाजता डीजे चा आवाज बंद करण्यासाठी फोन केला. फोनवरच दोन्हांची बाचाबाची झाली. त्यानंतर तिथे सोसायटीचे अध्यक्ष अनिल शर्माही आले. वृषभ सुद्धा पोहचला; त्याच्यात पुन्हा वाद होऊन लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण केली. या व्हिडिओत वृषभ यांना मारहाण होत असल्याचं दृश्य आहे. शेवटी हा विषय एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेला; तिथे वृषभ भातकुलकर आणि अनिल शर्मा या दोघांनी एकमेकविरोधात दिलेल्या तक्रारी नोंदवल्या.
131
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 27, 2025 06:36:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:साखर कारखान्याविरुद्ध शेतकरी स्वाभिमानी संघटना, शेतकऱ्यांचे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांचा सहभाग पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्या उसाला इतर कारखान्याप्रमाणे ऊस दर जाहीर करावा, कथित बिल लवकरात लवकर जमा करावे, या मागणीसाठी साखर कारखान्याविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुळमेश्वर गूळ कारखाण्यावर आंदोलन सुरू केले आहे. ऊस उत्पादकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे पुकारलेले आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी गुळमेश्वर गूळ कारखाना कारखाना बंद करून या ठिकाणी आंदोलन सुरू केले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झालेले आहे.
105
comment0
Report
Advertisement
Back to top