Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

CIDCO वेबसाइट बंद: Navi Mumbai में 4508 घरों की लॉटरी से लोग परेशान

SNSWATI NAIK
Nov 23, 2025 07:06:33
Navi Mumbai, Maharashtra
सिडको ची वेबसाईट बंद ,ग्राहकांची गैरसोय CIDCO वेबसाइट बंद होने से Navi Mumbai परिसरात तळोजा, खारघर, घणसोली, द्रोणागिरी आणि कळंबोली येथील 4 हजार 508 घरांची लॉटरी जाहीर केली होती. लॉटरी जाहीर होताच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सिडकोच्या वेबसाईट वर हजेरी लावत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्याच दिवशी सिडकोची वेबसाईट बंद पडल्याचे समोर आलेय. वेबसाईट बंद असल्याने नागरिकांना घरांची माहिती घेण्यास अडचण निर्माण होत असून ही तांत्रिक अडचण कधी दूर होईल असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय.
174
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Nov 23, 2025 08:01:27
Baramati, Maharashtra:इंदापुरात कृषिमंत्री भरणेची हर्षवर्धन पाटलांसह प्रवीण मानेंवर सडकून टीका.... विकासाच्या मागे राहायचं की बच्चनगिरी भाषण करणाऱ्यांच्या याचा विचार करा..... मंत्री भरणे यांचं इंदापूरच्या जनतेला आवाहन.... Anchor_पुण्याच्या इंदापूर मध्ये नगरपरिषद निवडणुकीसाठी दोन्ही बाजूने प्रचार सभांचा आता धडाका सुरू झाला झालाय. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही इंदापूर मध्ये दोन प्रचार सभा घेतल्यात. या सभेतून दत्तात्रय भरणे यांनी कट्टर राजकीय विरोधक माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांसह प्रवीण माने यांच्यावरती सडकून टीका केली आहे. नीट विचार करा एका बाजूला विकास करणार आहे, गोरगरिबांच्या सुखाच्या दुःखाच्या काळामध्ये आमची ही सर्व टीम धावून येणारी आहे तर दुसऱ्या बाजूला बच्चन गिरी भाषणात करणारे आहेत. त्यामुळे कोणाच्या पाठीमागे उभे रहायचं याचा शांत डोक्याने विचार करा असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे.... साउंड बाईट _ दत्तात्रय भरणे कृषिमंत्री
26
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 23, 2025 07:36:12
51
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 23, 2025 07:32:59
89
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 23, 2025 06:32:15
164
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 23, 2025 06:00:37
Jalna, Maharashtra:जालना :एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असणारे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि परतुरचे आमदार बबनराव लोणीकरांची दिलजमाई बबनराव तुमचं आठवेळा बाळंतपण झालं पण तुम्हांला एकही टाका बसला नाही आता राहुलला पुढे करा-रावसाहेब दानवे अँकर :एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असणारे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि परतूरचे आमदार बबनराव लोणीकरांची दिलजमाई झाली आहे.याआधी दोघांमधील होणारे कोल्ड वार जालना जिल्ह्यात नेहमी चर्चेचा विषय सर्वांना माहीत आहे.परतूर नगर परिषदेच्या निवडणूकीमुळे दिलजमाई झाल्याचं पहायला मिळाल. दोन नेत्यांचे भांडण मिटवण्यासाठी दुसरा कोणीतरी दलाल मध्ये असतो, परंतु आमच्यातले भांडण मिटवायला कोणी नव्हतं,आम्ही दोघे बसून चर्चा करून हा वाद मिटवला आहे.आम्ही दोघे एकत्र आल्याने मला मनातून खूप आनंद झाला आहे, असं रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं आहे. परतुर येथे झालेल्या एका कार्यक्रमात दोघांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळत जिल्हास्तरीय राजकीय निर्णय एकत्र घेणार असल्याचा संकल्प बोलून दाखवला आहे, दानवे लोणीकरांच्या दिलजमाई मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.. दरम्यान, बबनराव तुमची वेळ आली आहे आता तुम्ही मागे व्हा आणि राहुल लोणीकरला पुढे करा .तुम्ही आठ विधानसभेच्या निवडणुका लढल्या असून, आठ वेळा तुमचं बाळंतपण झालं पण एक टाका सुद्धा पडला नाही तुम्हाला. त्यामुळे तुम्ही आता मागे व्हा आणि राहुल लोणीकर ला पुढे करा .मी तुमच्या पाठीशी आहे, आणि जे नाही त्यांना सोबत घेऊन पार्टीला सांगू बबनरावने घोषणा केली विधानसभा लढणार नाही, त्यांना परभणी लोकसभेची जागा सोडा .हरिभाऊ बागडे यांनी निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केल्यानंतर पार्टीने त्याला राज्यपाल केलं, बबनराव तुम्हाला जर राज्यपाल केलं तर आमचं ध्यान ठेवा बाबा, पार्टीचं काही सांगता येत नाही..असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी परतूरमध्ये जाऊन चांगलीच टोलेबाजी करत स्वतःच्या पक्षातील आमदारालाच चिमटे घेतलेत. साऊंड बाईट - रावसाहेब दानवे साऊंड बाईट - रावसाहेब दानवे
276
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 23, 2025 05:19:50
Washim, Maharashtra:वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे जिल्हा परिषद शाळेमागील वार्ड क्रमांक १ मध्ये सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.ग्रामपंचायतने सांडपाण्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे दूषित पाणी थेट नागरिकांच्या घरासमोर साचत असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.दुर्गंधीयुक्त व जंतुयुक्त पाणी रस्त्यावर पसरल्याने शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.या अस्वच्छ परिस्थितीमुळे रोगराई पसरण्याचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.स्थानिकांनी तातडीने स्वच्छता करून सांडपाणी व्यवस्थापनाची योग्य उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
167
comment0
Report
Advertisement
Back to top