Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421506

अंबरनाथ के सर्वोदय नगर प्रचार के कारण भाजपा कार्यकर्ता सत्यम तेलंगे पर कोयते से हमला

CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 27, 2025 01:32:40
Ambernath, Maharashtra
प्रचाराच्या कारणावरुन भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला शिंदे गटाचा कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा आरोप भाजपच्या प्रचाराला जावू नको म्हणून केला हल्ला अंबरनाथ सर्वोदय नगर परिसरातील घटना हल्ले की घटना अंबरनाथ सर्वोदय नगर परिसरात घडली आहे , भाजप उमेदवाराचा प्रचार करू नको असे सांगत शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता साहिल वडनेरे याने हा हल्ला केल्याचा आरोप सत्यम तेलंगे याने केलाय , या हल्ल्यात भाजप कार्यकर्ता सत्यम तेलंगे यांच्या हाताला गंभीर दुखापत झालीये , या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे , मात्र साहील हा शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता नसून आम्हाला बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याच स्थानिक शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शैलेश भोईर यांनी सांगितले आहे , पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Nov 27, 2025 02:01:02
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या लाखनी ओवर ब्रिजवरील ड्रेनेज पाईप कोसळले..... थोडक्यात बचावला ईसमाचा जीव..... भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथे स्थानिकांना वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता उड्डाण पुलाची निर्मिती करण्यात आली मात्र तयार झाला तेव्हापासून हा उड्डाणपूल वादग्रस्त ठरताना पाहायला मिळत आहे. उड्डानपुलाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे पहावयास मिळत असून उद्घाटनानंतर तीन महिने दुरुपत्तीनावाखाली पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. बऱ्याच काळानंतर पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र पुलावरील कठळे तुटून ट्रक खाली पडणे, पावसाळ्यात पुलाखाली झऱ्याचे स्वरूप प्राप्त होणे, किरकोळ अपघात घडणे अशा अनेक घटना घडताना दिसतात. अशातच पुलावरील मोठे ड्रेनेज पाईप तुटून खाली कोसळले दरम्यान सुदैवाने जीवितहानी तळली असली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पुलाच्या निकृष्ट बांधकामावर प्रश्नचिन्ह उद्भवू लागलेले आहे. पुन्हा अशा घटना घडतील की काय अशी भीती नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 27, 2025 02:00:25
Chendhare, Alibag, Maharashtra:रोहा शहरात शिवसेना शिंदे गटाला धक्का मयुरा मोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश मोरे यांच्या घरवापसीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बळ रोहा नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर रोहा शहरात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय. शिवसेना रोहा शहर प्रमुख ॲड. मयुरा मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी त्यांचं स्वागत केलं. मयुरा मोरे यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्यावर महिला शहर प्रमुख पदाची जबाबदारी टाकण्यात आली होती. त्यांच्या घरवापसीमुळे रोहा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळालंय.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 27, 2025 01:34:51
115
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 27, 2025 01:34:38
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या उरूण-ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकी दरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे, तर विरोधकांना पराभव दिसत असल्याने खोटा आरोप केल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान तर याप्रकरणी दोन्ही गटाच्या तक्रारी दाखल करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। सांगलीच्या ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवारचे आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि इतर विरोधक एकत्र येत निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे अत्यंत चुरशीने ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या प्रचार दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात उमेदवारांमध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शकील सय्यद आणि गीता बेलवलकर यांच्याकडून प्रभाग क्रमांक तीन मध्ये प्रचार सुरू असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार खंडेराव जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचार थांबवत, जातिवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक शकील सय्यद यांनी केलाय. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार खंडेराव जाधव यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांचे आरोप फेटाळून लावत,जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे आक्षेप घेतल्यावर हा प्रकार घडला,मात्र याला महायुतीकडून जातीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला,सदर प्रकरणी निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार दाखल केल्याचं खंडेराव जाधव यांनी स्पष्ट केलंय. निवडणुकीचा प्रचार दरम्यान घडलेल्या या वादाच्या प्रकारामुळे ऊरुण ईश्वरपूर मध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
171
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 27, 2025 01:32:17
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... सहकार मंत्री बाबासाहेब पाटील विरूद्ध भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वादात आता काँग्रेसच्या अमित देशमुखांची एन्ट्री... महायुतीतील कलहावर काँग्रेसचा घणाघात.. अहमदपूर राजकारण तापलं.... गद्दारीचा मुद्दा चर्चेत.... सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या गद्दारीच्या आरोप–प्रत्यारोपांवर आता काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनीही थेट भाष्य केलं आहे। भर सभेत बोलताना अमित देशमुख यांनी “सैयारा तू तो बदला नहीं है… मौसम जरा सा रूठा हुआ है” अशा उपरोधिक शैलीत महायुतीतील गोंधळावर टोलाही लगावला। महायुतीतील भाजपा और राष्ट्रवादी चे नेते एकमेकांना गद्दार म्हणत सन्मान करत असताना अहमदपूरकरांनी त्यांच्या मागे ka जावं ? असा सरळ प्रश्न त्यांनी उपस्थित केला।
176
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 27, 2025 01:30:59
160
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 26, 2025 15:32:09
Dhule, Maharashtra:महाराष्ट्रातली रिचार्ज वाली ताई पुन्हा एकदा ऍक्टिव्ह करण्यात आली असल्याच आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी अंजली दमानिया यांच्यावर केला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्याला उत्तर देताना सुरज चव्हाण यांनी टीका केली आहे. अजित पवारांच्या राजीनामासाठी त्या डोनाल्ड ट्रम्पला देखील जाऊन भेटतील इतका मोठा त्यांचा रिचार्ज झाला असल्याचा आरोप सुरज चव्हाण यांनी केला आहे. अमित भाईंची भेट झाली नाही तर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घ्यावी. आणि त्यांनी अमित भाईांचा देखील राजीनामा मागावा असा टोलाही यावेळी सुरज चव्हाण यांनी अंजली दमानिया यांना लगावला आहे. तर अंजली दमानिया यांचं नाव न घेता यांचा बोलवता धनी वेगळा असून राष्ट्रवादी तसेच अजित पवारांना बदनाम करण्यासाठीच त्यांचा रिचार्ज करण्यात आला असल्याचा आरोप ही चव्हाण यांनी यावेळी केला आहे. त्यांनी विचार केला तर त्यांनी सिद्ध करावे असा आव्हान देत आम्ही देखील लवकरच त्यांचे घोटाळे बाहेर काढू असा इशारा सुरज चव्हाण यांनी दिला आहे.
136
comment0
Report
Advertisement
Back to top