icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
410210
SNSWATI NAIK7 Feb 2026, 01:16 pm

तुर्भे में कचरे से बिजली बनाने की योजना को मंजूरी मिली

Navi Mumbai, Maharashtra:बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने नवी मुंबईतील तुर्भे येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या मागणीला शासन मान्यता मिळालेय. नवी मुंबईतील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारा घरगुती व औद्योगिक कचऱ्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर तुर्भे येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सार्वजनिक-खाजगी-लोकसहभागातून सुरु केला जाणार आहे. सदर प्रकल्प उभारण्याकरिता साधारण 1800 ते 2000 कोटी रुपये खर्च येणार असून नवी मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि स्मार्ट सिटीच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा ठरणार असल्याची प्रतिक्रिया आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केलेय.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

परतवाड़ा केस: आरोपी अयान ने सड़क पर केक काटा, पुलिस ने शुभकामनाएं दी

Amravati, Maharashtra:परतवाडा प्रकरणात नवीन ट्विस्ट; मुख्य आरोपी अयानला पोलिसांनी दिल्या होत्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अयान अहमदने बॉस नावाचा उल्लेख असलेल्या टी शर्ट घालून पोलिसांच्या उपस्थितीत भर रस्त्यात फटाके फोडून वाढदिवसाचा केक कापल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुख्य आरोपी अयानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलीस आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी थेट आरोपी अयान याच्या तोंडात केक भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे परतवाडा प्रकरणांमध्ये सुरुवातीला पोलिसांनी हयगय केल्याचा आरोप झाला असतानाच दुसरीकडे चक्क पोलिसांनी मुख्य आरोपीला केक भरवल्याचा व्हिडिओच आता समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ज्या दिवशी आरोपी अयानने भर रस्त्यात केक कापला त्या दिवशी पोलिसांनी त्याला का थांबवलं नाही उलट पोलिसांनीच का त्याला शुभेच्छा दिल्या असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला जातो. वाढदिवसाच्या दिवशी आरोपी अयानच्या अंगात असलेल्या टी-शर्टवर बॉस असा उल्लेख असून भर रस्त्यात अयानला केक भरवणाऱ्या आणि वाढदिवसात सहभागी होणाऱ्या पोलिसांवर काही कारवाई होणार का याकडे लक्ष सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

लाखनी नगर पंचायत के सफाई कर्मचारियों ने वेतन रोक के विरोध में प्रदर्शन

Bhandara, Maharashtra:स्वच्छता कामगार कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे वेतन थकीत... कामगारांचा कंत्राटदारावर आक्रोश. भंडारा जिल्ह्यातील लाखनी नगरपंचायत स्वच्छता कामगार कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने कामगारामध्ये कंत्राटदाराविरुद्ध नाराजी निर्माण झाले होतें. तसेच ह्या कामगारांचे सुरक्षा संदर्भात कुठलाही विमा पॉलिसी नाही हा कामगावर अन्याय होत असून शासनाने 1 एप्रिल पासून कामगारांना 600 रुपये वाढीव मजुरी मंजूर केली आहे. त्या नियमानुसार वेतन देण्यात यावे अशी मागणी करत स्वछता कामगार कर्मचारी लाखनी नगर पंचायत मधील कंत्राटदारावर आक्रोश व्यक्त करीत आंदोलन केला आहे.
0
0
Report
Advertisement

यवतमाळ जलसंकट के लिये मंत्री समीक्षा: टैंकर पानी और विहिर अधिग्रहण पर मुआवरा तय

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारनार्थ उपाययोजनांबाबत पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकासमंत्री अशोक ऊईके यांनी आढावा घेतला. ग्रामीण व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा योजना तसेच नळपाणी पुरवठा योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. सद्यस्थितीत चार गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच आवश्यक तेथे खाजगी विहिरी अधिग्रहित करुन नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. त्यानुसार ज्या दिवशी ग्रामसभेत विहिर अधिग्रहणाचा ठराव होईल, त्या दिवसापासून विहिर अधिग्रहण मोबदला दिला जाईल, असा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला.
0
0
Report
Advertisement

ग्राम रोजगार सेवकों ने मानधन बढ़ाने की मांग पर आंदोलन जारी

Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांनी मानधनाच्या मुद्द्यावरून कामबंद आंदोलन सुरू केले असून गेल्या पंधरा दिवसांपासून हे आंदोलन तीव्र होत चालले आहे. शासनाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ग्राम रोजगार सेवकांना दरमहा 8 हजार रुपये मानधन आणि 2 हजार रुपये प्रवासी भत्ता देण्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात गेल्या 18 महिन्यांपासून कोणतेही मानधन मिळाले नसल्याने या ग्राम रोजगार सेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे प्रशासनाने अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत, अशी नाराजी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
0
0
Report

एसटी बस की धड़के से बाइक सवार युवक की मौत, CCTV में कैद भयावह हादसा

Sangli, Maharashtra:स्लग - एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार,अपघाताची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद.. सांगलीच्या जत तालुक्यातल्या डफळापूर येथे एसटी बसच्या धडके दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. डफळापूर येथील पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून रस्ता पार करत असताना, भरधाव एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक बसली,यामध्ये सुमारे पंधरा ते वीस फूट लांब पर्यंत दुचाकी फरफटत गेली, यामध्ये शिरीष जाधव जागीच ठार झाला. पेट्रोल पंपावरून रस्ता ओलांडताना बस दुचाकीच्या या भीषण अपघाताची घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
0
0
Report
Advertisement

जालना में प्रेम के जाल में फँसाकर छात्रा से बलात्कार; गिरफ्तार आरोपी को न्यायिक हिरासत

Jalna, Maharashtra:जालना |प्रेमाच्या जाळ्यात अडकवून महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार जालना कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाशिकनंतर जालन्यातही धक्कादायक प्रकार उघड अँकर- नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या धक्कादायक प्रकरणानुसार राज्यभरात संतापाची लाट असताना, आता जालना शहरातही तशाच पद्धतीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रेमाच्या नावाखाली तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय आणि तिला बुरखा घालण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या पीडित तरुणीशी आरोपी साहिल जावेद अन्सारी याने ओळख वाढवली. सुरुवातीपासूनच त्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने नकार दिल्यानंतर आरोपीने आत्महत्येची धमकी देत मानसिक दबाव निर्माण केला. या दबावाला बळी पडत तरुणीने त्याच्याशी मैत्री ठेवली. यानंतर आरोपीने तिच्यावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. शहरातील विविध ठिकाणी फिरताना त्याने तिला बुरखा घालण्यास भाग पाडले. पुढे, “घरी कोणी नाही” असे सांगत आरोपीने तिला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकारानंतर मानसिक धक्क्यात असलेल्या पीडितेने अखेर धाडस दाखवत ही बाब आपल्या आईला सांगितली. त्यानंतर आईसह पीडितेने कदीम जालना पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कारासह जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या घटनेमागे आणखी काही धागेदोरे आहेत का याचाही तपास केला जात आहे.
0
0
Report
Advertisement

पांझण नदी के बिजली पंप चालू करने गए दो किसान मृत

Malegaon, Maharashtra:नांदगाव (नाशिक): विजेचा शॉक लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू... साकोरा येथील दुर्दैवी घटना.. पांझण नदीवरील वीजपंप दुरुस्ती करतेवेळी घडली घटना... शिरीष भगवान पठाडे (वय ४२) व जगदिश तुकाराम खैरनार अशी मयत शेतकऱ्यांची नावे.. पांझण नदीपात्रातील विजपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या दोघा शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे घडली.. पांझण नदीपात्रात गेल्या काही वर्षांपासून पन्नास ते साठ शेटकर्यांचे विजपंप कार्यरत आहेत. आज साकोरा येथील शिरीष भगवान पठाडे(४२) व जगदिश तुकाराम खैरनार (३६) हे दोघे तरूण शेतकरी पांझण नदिवर विज पंप सुरू करण्यासाठी गेले. मात्र विजपंप पाण्याहार असल्याने तो पाण्यात खेचण्याच्या प्रयत्नात पाण्यात अचानक विजपुरवठा सुरू झाल्याने दोघा शेतकऱ्यांना विजेचा तीव्र झटका बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.
0
0
Report

शिरूर थाने के बाहर दो गुटों का हिंसक टकराव, पुलिस ने लाठीचार्ज किया

Shirur, Maharashtra:ब्रेकिंग न्यूज़ शिरूर पुणे... शिरूरला पोलिस ठाण्यात धुमश्चक्री दोन गट एकमेकांना भिडले; अखेर पोलيسांच्या लाठीमारानंतर जमाव पांगला. पुणे जिल्ह्याच्या शिरूर पोलिस स्टेशनच्या आवारात मध्यरात्री दोन गटात धूम चक्री दगडफेक शिवीगाळ, धमक्यांसह तुफान राडा झालाय, जमाव काबूत येत नसल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवीले. या राड्यात दोन जखमी झाले असून, याप्रकरणी सार्वजनिक ठिकाणी बेकायदा जमाव जमवून सामाजिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोन्ही गटांतील 35 ते 40 जणांविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून यात सराईत गुन्हेगारांसह प्रतिष्ठीत मंडळींचाही समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात राडा होऊन ही पोलिसांनी अद्याप एका ही आरोपीला अटक केली नसून या राड्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.
0
0
Report

नवी मुंबई के झोपड़पट्टों में क्लस्टर योजना पर भाजपा-शिंदे गट کی نئی जंग

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील झोपडपट्टी धारकांना क्लस्टरच्या माध्यमातून अधिकृत मोठी घरे देण्याची मागणी शिवसेना शिंदे गटातर्फे करण्यात आलेय. एमआयडीसी मधील झोपडपट्टी धारकांना 300 चौरस फुटाची घरे देण्यासाठी टेंडर काढण्यात आले होते ही सकारात्मक बाब असली तरी ठाण्याच्या धरतीवर नवी मुंबईत देखिल क्लस्टर योजना रबविण्याची मागणी करण्यात आलेय. गणेश नाईकांनी एमआयडीसीच्या टेंडर प्रक्रियेला विरोध केला असून माजी आमदार संदीप नाईकांनी थेट मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय. यावरून नाईकांच्या मनात असतं तर आतापर्यंत झोपडपट्टी धारकांना घरे मिळाली असती आणि संदीप नाईक मोर्चा काढणार असतील तर आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढू असा थेट इशारा शिवसेना उपनेते विजय चौगुले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिलाय.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top