Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

करमाळा पंचायत समिति के सभापति पूजा ढेरे और उपसभापति अजित पवार गट के अजित विघ्ने निर्विरोध चुने गए

SKSACHIN KASABE
Mar 12, 2026 13:05:47
Pandharpur, Maharashtra
Anchor - करमाळा पंचायत समितीच्या सभापती पदी भाजपच्या पूजा ढेरे आणि उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अजित विघ्ने यांची बिनविरोध निवडण्यात आली आहे. करमाळा तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती करून या निवडणुका लढवल्या होत्या त्यामुळे दोन्ही पक्षांचे मिळून या ठिकाणी बहुमत झाले आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Mar 12, 2026 14:38:53
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर: एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल पत्रकार परिषद इम्तियाज जलील पॉइंटर रमाई आवास योजनेत राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावे घरकुल घोटाळा ​माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पुराव्यांसह छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सुरू असलेल्या कोट्यवधींच्या 'रमाई घरकुल' घोटाळ्याचा पर्दाफाश केला. ​योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्य देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बनावट फाईल्स तयार करण्यात आल्या. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस (राहणार राहुलनगर) यांच्या नावाने बनावट टॅक्स पावती, वार्षिक ९० हजार रुपयांचे उत्पन्न प्रमाणपत्र, 'महार' जातीचा दाखला आणि आधार कार्ड तयार करण्यात आले. ​एकनाथ संभाजी शिंदे (राहणार आंबेडकर नगर) यांच्या नावाने बनावट टॅक्स पावती, उत्पन्न प्रमाणपत्र, 'महार' जातीचा दाखला आणि पिवळे रेशन कार्ड तयार करण्यात आले ​रेशन कार्डमध्ये शिंदे यांच्या कुटुुंबातील सदस्यांची (लता, श्रीकांत, वृषाली आणि रुद्राक्ष) नावेही समाविष्ट केली गेली आहेत. एकूण १७५ कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचा प्राथमिक अंदाज. ​कागदोपत्री ज्या घरांसाठी पैसे उचलले गेले, त्यापैकी सुमारे ३० हजार घरं प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीत. ​एका कुटुंबातील व्यक्तींनी वेगवेगळ्या नावांनी प्रत्येकी अडीच लाख रुपये लाटल्याचा आरोप. महेंद्र सोनवणे (भाजप माजी नगरसेवक) ७०० हून अधिक बनावट फाईल्स तयार केल्याचा आरोप. त्यांच्या मुलाच्या नावे ३१ बँक खाती असून त्यात मोठी उलाढाल झाली आहे. ​अरुण बोर्डे: ३०० फाईल्स (सुमारे ७५ कोटी रुपये). ​अमित भुईगळ: १५० फाईल्स. ​याशिवाय रुपचंद वाघमारे, राहुल सोनवणे, जितेंद्र सोनवणे आणि भाजप नेते जालिंदर शेंडगे यांच्या नावांचाही जलील यांनी उल्लेख केला. ३१ मार्चपूर्वी बिले काढण्यासाठी महापालिका आयुक्तांवर मंत्र्यांचा (अतुल सावे यांच्या नावाचा उल्लेख) दबाव असल्याचा आरोप. ​२३ कोटी रुपयांच्या फाईलवर आयुक्तांनी स्वाक्षरी केली असून, विभागप्रमुखांवरही दबाव टाकला जात आहे. ​महापालिकेने ४० कोटींची मागणी केली, मात्र हे पैसे नक्की कोणाला दिले जाणार याचे उत्तर समाजकल्याण आयुक्तांकडे नाही. ​हे सर्व पुरावे घेऊन न्यायालयात जाणार महापालिका आयुक्तांना 'दिलेल्या पैशातून किमान १० टक्के घरं तरी शोधून दाखवा' असे आव्हान दिले आहे. ​जर कारवाई झाली नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 12, 2026 14:20:23
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा सांगोला पंचायत समितीवर पहिल्यांदाच भाजपचा सभापती झाला आहे . निवडणुकांमध्ये आणि नंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या राजकीय डावपेचांना यश आले आहे.सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एसपी, शिवसेना उबाठा ग्रामीण सत्तेच्या केंद्रातून हद्दपार झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींच्या निवडी आज पार पडल्या यामध्ये 10 पंचायत समितीवर भाजपच्या सभापतींची निवड झाली आहे तर माळशिरस मध्ये शिवसेना शिंदे गटाला सभापतीपद देण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार खासदारांना आली आहे. अक्कलकोट,दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ, मंगळवेढा, करमाळा, माढा ,सांगोला, पंढरपूर पंचायत समितीमध्ये भाजपचे सभापती झाले आहेत. तर करमाळा आणि पंढरपूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला उपसभापती ची संधी मिळाली आहे. माळशिरस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बहुमत असतानाही शिवसेना शिंदे गटाच्या पंचायत समिती सदस्याला सभापती पदाची लॉटरी लागली आहे तर उपसभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मनीषा पाटील يांची निवड झाली आहे सत्तेच्या जवळ जाण्यासाठी खासदार मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांनी ही खेळी केल्याचं चर्चा आहे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार पुरे यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच भाजपचे 10 पंचायत समिती सभापती आणि 7 उपसभापती पदी संधी मिळाली आहे. यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हे पंचायत समितीच्या ग्रामीण भागाशी केंद्रित असणाऱ्या सत्तेतून हद्दपार झाल्याचं पाहायला मिळालं
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 12, 2026 14:17:46
Chandrapur, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित भेंडाळा एमआयडीसीला ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा प्रखर विरोध , 14 गावातील शेतकरी होणार आहेत भूमिहीन. अँकर: गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित भेंडाळा एमआयडीसीला ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केलाय. 14 गावातील शेतकरी या स्टील उद्योगाने भूमिहीन होणार आहेत. जे एस डब्ल्यू प्रकल्पासाठी या जमिनीचे अधिग्रहण केले जात आहे. अधिग्रहणाविरोधात गावकरी एकवटले असून आज मुंडन आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा देत आंदोलनाच्या विरोधाची धार वाढविली. कुठल्याही परिस्थितीत सुपीक जमीन सरकारला न देण्याचा निर्धार शेतकरी आणि ग्रामस्थांनी केलाय. गावागावातून शेतकरी यासाठी आंदोलन स्थळी दाखल झाले आणि एकजूट दर्शविली.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Mar 12, 2026 14:17:05
Ranbambuli, Maharashtra:सिंधुदुर्ग- राजू शेट्टी बाईट ऑन मोर्चा- आमच्या मागण्या पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला कळवल्या आहेत। आंबा कलमाला ५,००० रुपये प्रति झाड याे किंवा हेक्टरी ५ लाख रुपये नुकसान भरपाई। काजू पिकाला हेक्टरी ३ लाख रुपये नुकसान भरपाई। मिळावी। विम्याची मुदत ३० मे पर्यंत वाढवण्यात यावी। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे। सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे धोरणात्मक निर्णय सभागृहाबाहेर घेता येत नाही। त्यामुळे आम्ही संयमाची भूमिका घेऊन २३ मार्चपर्यंत (१० दिवस) सरकारची वाट बघण्याचे ठरवले आहे। अगर १० दिवसांत सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर २३ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून 'मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग' बेमुदत रोखून धरला जाईल, असा इशारा आम्ही सरकारला दिला आहे। कोकणातील शेतकरी संयमी आहे, पण आताची लढाई आरपारची आणि निर्णायक असेल।बाजारात निकृष्ट दर्जाची कीटकनाशके आणि औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत। कृषी विभागाने बोगस कंपन्यांवर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला कायदा हातात घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा लागेल。 बाईट- राजू शेट्टी शेतकरी नेते
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 12, 2026 13:15:19
Dhule, Maharashtra:धुळे शहरातील बहुचर्चित पिता पुत्र दुहेरी हत्याकांड प्रकरण. निकाल आला आहे. एकूण 13 आरोपीपैकी अकरा आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर एका आरोपीला पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठवण्यात आली असून, पूर्ववैमनस्य व खुन्नस देण्यावरून हे दोन खून झाले होते. 8 जून 2018 रोजी रावसाहेब पाटील व त्यांचा मुलगा वैभव पाटील यांची हत्या करण्यात आली होती. तलवार तसेच धारधार शस्त्रांनी हे दुहेरी निर्घृण हत्याकांड झाले होते. यां हत्याकांड प्रकरणी माजी नगरअध्यक्ष बाजीराव पवार सह 13 जनावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकूण 13 आरोपींपैकी 11 जणांना दुहेरी जन्मठेप तर एका आरोपीला पाच वर्ष सत्ता मजुरीचे शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती जयश्री पुलाटे यांनी ही शिक्षा ठोठावली असून, मायाताच्या नातेवाईकांनी यां निकालाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 12, 2026 13:09:12
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 12, 2026 13:07:17
Ambernath, Maharashtra:महापौरांनी उल्हासनगर मधील उद्यानांना भेट दिली. उद्यानांमध्ये दारू पिण्याचे आढळले. उल्हासनगर कॅम्प ५ येथील राजीव गांधी उद्यानात महापौर अश्विनी निकम यांनी अचानक पाहणी दौरा केला. या पाहणीदरम्यान उद्यानामध्ये काही गर्दुल्ले बसून दारू पित असल्याचे आढळून आले. महापौर गार्डनमध्ये पोहोचताच संबंधित व्यक्तींमध्ये खळबळ उडाली. महापौर आल्याचे लक्षात येताच ते दारूच्या बाटल्या आणि साहित्य तिथेच टाकून धूम ठोकून पळाले. राजीव गांधी उद्यान नागरिक, महिलाआणि लहान मुलांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण असताना अशा प्रकारे उद्यानात दारू पिण्याच्या घटना घडत असल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या वेळी महापौर अश्विनी निकम यांनी उद्यानाच्या सुरक्षेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच उद्यान स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी लवकरच आवश्यक पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले. चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 12, 2026 13:04:03
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर : कमर्शियल गैस पुरवठा बंद,हॉटेल व्यवसाय संकटात,रिअँलिटी चेक(पॅकेज) युद्धामुळे आखाती देशातून होणारा गैस और क्रूड ऑइल पुरवठा बंद झाला. त्यामुळे केंद्र सरकारने कमर्शियल गैस पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन दिवसांत सुमारे २८०० उद्योग आणि सुमारे ९२० हॉटेल्स बंद पडणार असल्याची माहिती सीएमआयएने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये हॉटेल आणि उद्योग व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.याच पार्श्वभूमीवर झी-२४ तास छत्रपती संभाजीनगर शहरातील हॉटेल व्यवसायाचा रिलँनलिटी चेक करत वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. व्हिओ:१:युध्दामुळे कंपन्या आणि हॉटेल व्यवसायाला होणारा कमर्शियल गॅसपुरवठा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.याचा परिणाम छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसून येतोय.छत्रपती संभाजीनगर मधील ज्योती नगर भागात ग्राहकांची सतत वर्दळ असणाऱ्या बालाजी रेस्टॉरंटला गॅसचा साठा संपल्यानं थेट कुलूप ठोकावं लागलंय.हॉटेलचं शटर बंद करून मालक घरी गेलेत. व्हाक थ्रू+121 विथ हॉटेल मालक संदीप कांबळे व्हिओ:२:अशीच अवस्था याच ज्योतीनगर भागातील दुसऱ्या साऊथ इंडियन नाश्ता सेंटरची झालीय.या नाश्ता सेंटरमध्ये कधीही ग्राहकांची वर्दळच पाहायला मिळते.पण हॉटेलमध्ये असलेला गॅसचा साठा संपला आणि मालकावर रिकाम्या हाताने नाष्ता सेंटरमध्ये उभं राहण्याची वेळ आलीय.एकही गॅसची टाकी उपलब्ध बसल्यानं या मालकाला दररोज थेट ४० हजारांच्या नुकसानीला सामोरं जावं लागतंय. वाक थ्रू +121 विथ हॉटेल मालक संदीप कांबळे व्हिओ:३:छत्रपती संभाजीनगर भागातील एमजीएम कॅम्पस परीसरात असलेल्या कैलाशा हॉटेलमध्ये आम्ही गॅसचा साठा किती उरलाय हे चेक करण्यासाठी हॉटेलमध्ये पोहचलो. सध्या हॉटेल सुरू आहे मात्र दोन दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा शिल्लक असल्यानं सरकारनं शक्य तेवढी मदत करावी अशी मागणी हॉटेल मालकांनी केलीय.जास्तीचा गॅस लागू नये म्हणून हॉटेलच्या मेनूत बदल करण्यात आलाय.जे पदार्थ शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो ते पदार्थ मेनूतून वगळण्यात आल्या‍ची माहिती हॉटेल मालकांनी दिलीय.गॅसचा साठा संपल्यास हॉटेल सुरू ठेवण्यासाठी बाकी उपाययोजना काय करता येईल याची पडताळणी करत असल्याचं या हॉटेलच्या मालकांनी सांगितलं. वाक थ्रू +121 विथ किशोर शेट्टी,मालक हॉटेल कैलाशा (किचनमध्ये केलेला वाक थ्रू--या वाक थ्रू मधील सुरळीत सुरू आहे हे माझ्याकडून आलेलं वाक्य काढून टाकण्यात यावे ही विनंती) व्हिओ:४: दरम्यान शहरातील हॉटेल आणि कंपन्या कमर्शिअल गैस पुरवठा बंद झाल्यानं अडचणीत आल्यानं आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत उद्योजक, हॉटेल मालक यांची बैठक होणार असून या बैठकीत काही तोडगा निघेल अशी अपेक्षा हॉटेल व्यावसायिक आणि उद्योजक बाळगून आहेत. चौपाल विथ सीएमआयए उत्सव मछार,अध्यक्ष मिहीर सौंदलगीकर,पदाधिकारी,सीएमआयए अर्थर्वेश नंदावत,उपाध्यक्ष,सीएमआयए व्हिओ: कमर्शिल गैस अभावी शहरातील उद्योग संकटात सापडलेत.सीएमआयएने दावा केलेले 2900 उद्योग आणि 920 हॉटेल बंद झाल्यास लाखो कामगारांच्या रोजी रोटीचा प्रश्न उभा राहण्याची शक्यता आहे
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 12, 2026 13:02:44
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ MIDC आग के प्रकरण पर पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन। विधायक ज्ञानेश्वर म्हात्रे ने सभा में आवाज उठाई। मंत्री उदय सामंत ने पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन का उत्तर दिया। अंबरनाथ के आनंदनगर MIDC में गणेश केमिकल से लगी आग के बारे में शिक्षक विधायक ज्ञानेश्वर म्हात्रे ने सभा में पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन के माध्यम से आवाज उठाई। आग और विस्फोट से नागरिकों में भय पैदा हुआ; बदलापुर के शिरगाव में कंपनियों से होने वाले प्रदूषण तथा गैस सिलेंडर के टूटने से होटल व्यवसायियों के सामने पैदा हुई गंभीर स्थिति पर भी ध्यान दिया गया। उद्योग मंत्री उदय सामंत ने अंबरनाथ MIDC में कंपनियों के सुरक्षा ऑडिट का हाल मांगा है और जो कंपनियाँ सुरक्षा के बारे में लापरवाही करेंगी उनके खिलाफ कार्रवाई का संकेत दिया गया है।
0
comment0
Report
Advertisement
Back to top