Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

खैर के दुर्लभ पेड़ वनहद्री में काटे, वन विभाग की कार्यपद्धति पर सवाल उठे

TTTUSHAR TAPASE
Oct 28, 2025 07:30:30
Satara, Maharashtra
सातारा - साताऱ्यातील जावळी तालुक्यात कुसुंबी परिसरात चक्क वनहद्दीतच खैर या दुर्मिळ वृक्षाची तोड झाली आहे. दुर्दैवी बाब म्हणजे झालेली तोड वन विभागालाच माहीत नव्हती. वन विभागाने पाच दिवसानंतर प्रत्यक्ष स्थळी जाऊन पंचनामा केला असला तरी अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण होते आहे.यात गंभीर बाब ही की याच जावली तालुक्यातील आसनी गावात मार्चमध्ये बेसुमार खैर झाडांची तोड करण्यात आली होती.त्याचा पंचनामा देखील वनविभागाने केला होता मात्र पंचनामा केलेली ही खैरांची लाकडे त्या ठिकाणावरून गायब झाली. कुसुंबी परिसरात चक्क वनविभागाच्या हद्दीतच अज्ञाताने दुर्मिळ खैर वृक्षांची तोड केली आहे. एरव्ही वन हद्दीत घुसण्याचे धाडस कोणाचं होत नसताना चक्क वन हद्दीतघुसून ही दुर्मिळ खैरवृक्षाची तोड केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.या ठिकाणचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKShubham Koli
Oct 28, 2025 10:00:55
Thane, Maharashtra:ठाण्यात ठाकरे कुटुंबाचं स्वप्न साकार! मनसेच्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण मनसेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्य घराच्या हाके भर अंतरावर नितीन कंपनी चौकात लावण्यात आलेला एक बॅनर सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिघांना एकत्र आणत 'महारાષ્ટ્રाचं स्वप्न साकार' झाल्याचं भाकीत करत आहे. विशेष म्हणजे या बॅनर वर तिघांच्या फोटो मागे महाराष्ट्राचा नकाशा काढत मोठ्या संख्येने कार्यकर्ते जल्लोष करताना दाखवण्यात आले आहे. एक तारखेला मनसेचा मोर्चा आधी मनसेकडून लावलेल्या या बॅनरची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. या बॅनरमुळे आगामी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये ही मोठा जल्लोष दिसून येत आहे. नेमकं या कार्यकर्त्यांची काय भावना आहे हे जाणून घेण्यासाठी या बॅनरचा आढावा घेत या कार्यकर्त्यांशी संवाद साधल आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 28, 2025 09:57:22
Washim, Maharashtra:वाशिम: दिवाळीच्या दहा दिवसांच्या सुट्टीनंतर आज वाशिमच्या शेलुबाजार उप कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी गर्दी पाहायला मिळाली. शेतकऱ्यांचं रब्बीच्या बी-बियाणं व खत खरेदी साठी पेरणीसाठी आर्थिक नियोजन सुरु असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आवक केली असून बाजार समितीसमोर सोयाबीनने भरलेल्या ट्रॅक्टर आणि छोट्या वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. सकाळपासूनच वजन व विक्री प्रक्रिया सुरू असून व्यापाऱ्यांमध्ये खरेदीसाठी उत्सुकता दिसून येत आहे. त्यामुळे सुट्टीनंतर बाजार समिती परिसर पुन्हा एकदा शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या उपस्थितीने गजबजून गेला आहे.
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Oct 28, 2025 09:56:31
Mumbai, Maharashtra:जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड वर गेल्या तीन महिन्यात खराब रस्त्याने तिसरा बळी घेतला आहे. राहुल विश्वकर्मा छटपूजेवरून घरी परतत असताना पवई प्लाझा जवळ खराब रस्त्यात दुचाकी स्लिप होऊन मागून आलेल्या बस खाली चिरडला गेला. यामुळे आज संतप्त होत शिवसेना आमदार दिलीप लांडे संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन या रस्त्यावर उतरले. ७२ तासात हा रस्ता पूर्ण दुरुस्त झाला नाही तर सगळ्या अधिकाऱ्यांच्या कानशीलात लगावेन अशी धमकीच त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. तसेच तत्काळ हे खड्डे बुजवण्यास स्वतः उभे राहून सुरुवात ही केली. आम्हा बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत स्वतः ची सत्ता असली तरी जनतेसाठी रस्त्यावर उतरण्याची शिकवण आहे, जर हा रस्ता बनला नाहीतर नक्कीच अधिकारी , ठेकेदार यांच्या कानशिलात लावू अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार दिलीप लांडे यांनी दिली
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 28, 2025 09:31:27
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पंचायत समितीत शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी गोठा बांधकाम अनुदानाच्या फाईली मागील बारा महिन्यांपासून प्रलंबित आहेत. सामान्य शेतकऱ्यांच्या फाईली मंजूर न होता, दलालांमार्फत आलेल्या फाईलींना तात्काळ मंजुरी दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समितीसमोर पैसे फेकून आंदोलन केले. शेतकऱ्यांना गोठा अनुदानासाठी अधिकाऱ्यांना पाच-पाच हजार रुपये द्यावे लागत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. या आंदोलनात शिवसेना उबाठाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Oct 28, 2025 08:49:27
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई के तलोजा पुलिस स्टेशन की सीमा में धानसरगाव स्थित रायंस फार्महाउस में एक चौंकाने वाला मामला उजागर हुआ। उसी फार्महाउस में पिकनिक पर गई परिवार की महिलाओं के बाथरूम में स्पाय कैमरे के जरिए अश्लील वीडियो बनाये जाने की सूचना मिली। परिवार ने संकेत मिलते ही जाँच शुरू की और स्पाय कैमरे के जरिये रिकॉर्डिंग होने की पुष्टि हुई। इस मामले में फार्महाउस के मैनेजर मनोज चौधरी के विरुद्ध तलोजा पुलिस स्टेशन में मामला दर्ज कर उसे तुरंत गिरफ्तार किया गया। संदिग्ध की गिरफ्तारी के साथ यह भी संकेत मिले हैं कि उसने अन्य लोगों का भी अश्लील चित्रीकरण किया हो सकता है; तलोजा पुलिस अधिक जांच कर रही है। बाइट: विक्रम कदम (सहाय्यक पुलिस आयुक्त)
2
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 28, 2025 08:37:37
Nanded, Maharashtra:गोरगरीबों के घरकुल के हफ्ते मंजूर कराने के लिए लाच लेने के आरोप में 9 इंजिनियर और 3 कंप्यूटर ऑपरेटर ने सभी के सामने कबूल किया। नायगाव जिले के नायगाव विधानसभा क्षेत्र के भाजपा विधायक राजेश पवार ने इन भ्रष्ट कर्मचाऱ्यांची शाळा भरवत उनका भ्रष्टाचार उजागर किया और कहा कि अब ये लोग लाच नहीं लेंगे ऐसी शपथ भी इन कर्मचारियों को दिलवाई गई। नायगाव मतदार संघ में लगभग 20 हजार घरकुल मंजूर हो चुके हैं। सरकार के आधार पर गरीब अपने घर का सपना पूरे करते हैं, पर इस मामले में गरीबों के हिस्से में भी डल्ला मारा गया। आए शिकायतें तहसीलदार और गटविकास अधिकारी की अनुपस्थिति के कारण समय-सारिणी में देरी हुई, पर बाद में सभी आरोपितों को उनके सामने जवाबदेही के तौर पर लाच लेने और न लेने की शपथ दिलवाई गई। इस पूरी प्रकरण पर मुख्यमंत्री और ग्रामविकास मंत्री से शिकायत करने की भी बात कही गई।
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 28, 2025 08:16:33
0
comment0
Report
SKShubham Koli
Oct 28, 2025 07:57:59
Thane, Maharashtra:आनंद परांजपे पॉइंटर संयाज राऊत यांच्यावर टीका: कुबड्या टाका: हिंदुत्वाचा आणि स्वाभिमानाचा विचार जिवंत असेल, तर संजय राऊतांनी (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) त्वरित काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या 'कुबड्या' टाकून द्याव्यात. बाळासाहेबांचे विचार: 'ज्या दिवशी माझी शिवसेना काँग्रेस होईल, त्या दिवशी दुकान बंद करेन,' हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार राऊतांनी आठवावेत. आत्मपरीक्षण करा: 'भांडुपच्या भोंग्यांनी' (राऊत) दुसऱ्यांना फुकटचे सल्ले देण्यापूर्वी शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व आणि मराठी माणसाचा स्वाभिमान यावर आत्मचिंतन करावे. रोहित पवार यांच्यावर टीका: अति घाई: रोहित पवार हे 'नेतृत्व बनायची अती घाई' असलेले व्यक्तिमत्त्व आहे. पक्षाकडे लक्ष द्या: त्यांनी दुसऱ्यांवर बोलण्याऐवजी स्वतःच्या पक्षाची पडझड आणि पक्षातून बाहेर चाललेली लोक यावर लक्ष द्यावे, ते हिताचे ठरेल. ज्योतिषी आहे का? संग्राम जगताप हे अजित पवार यांचे नेतृत्व मानणारे आमदार आहेत. त्यांची काळजी रोहित पवारांनी करू नये; ते काय ज्योतिषी आहेत का? समजूत: अजित पवार आणि तटकरे यांनी संग्राम जगताप यांना जी समज द्यायची होती, ती दिलेली आहे. मतदार याद्या आणि बोगस मतदारांवर आरोप: आदित्य ठाकरेंना प्रश्न: आदित्य ठाकरेंना वरळीत १९,००० बोगस मतं असल्याचं आता आठवलं, पण जेव्हा अरविंद सावंत दक्षिण मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढले, तेव्हा ही १९,००० मतं बोगस आहेत हे आठवलं नाही का? संभ्रम: लोकसभेच्या विजयानंतर मतदार याद्या योग्य वाटतात आणि विधानसभेतील दारुण पराभवानंतर त्यांत घोळ वाटतो, अशा प्रकारे विरोधी पक्षांकडून सातत्याने संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. On जितेंद्र आव्हाडांवर निशाणा जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी-शरद पवार गट) कळवा-मुंब्रामध्ये दुबार नावांवर बोलत असतात, पण त्यांच्याच मतदारसंघात (विधानसभेत) १९,००० दुबार नावं आहेत. मुंब्रा-कळवा आणि कल्याण ग्रामीणमध्ये १४,००० दुबार नावं आहेत. याबद्दल त्यांनी कधी आवाज उठवला नाही. धक्कादायक आरोप: आव्हाड यांच्या मतदारसंघातही बोगस मतदारांचा सहभाग आहे, हे त्यांनी मान्य करावे. साखर संस्था (VSI) चौकशी आणि मुख्यमंत्री: चौकशी योग्य: মুখ्यमंत्र्यांनी शासनाकडून अनुदानाचा (Grant) योग्य वापर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (VSI) होतो की नाही, याची चौकशी लावली आहे. अधिकार: मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली यात काही गैर नाही; तो त्यांचा अधिकार आहे. घाबरू नका: तक्रारी आल्या असतील म्हणूनच चौकशी लावली असेल. 'ज्याला कर नाही, त्याला डर कशाला?' जर काही गडबड नसेल, तर इन्स्टिट्यूटने चौकशीला सामोरे जावे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर (दुसऱ्यांदा) टीका: नकलाकार: जितेंद्र आव्हाड हे 'नोटंकीकार' आहेत. आधी स्वपक्ष पाहा: आव्हाड म्हणतात 'आमच्या पक्षाचे बारा वाजले', पण त्यांनी त्यांच्या शहरात त्यांच्या पक्षाचे बारा वाजले आहेत का, हे पाहावे. जागरूक व्हा: त्यांचा जिल्हाध्यक्ष, युवक अध्यक्ष, आणि जळगावमधील नऊपैकी सात नगरसेवक सोडून जातात, मग आमच्या पक्षाचे बारा वाजले की तुमच्या शहरात तुमचे बारा वाजले हे नकलाकार जितेंद्र आव्हाड यांनी पाहावं. खंबीर नेतृत्व: अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खंबीर उभी आहे. लाडकी बहीण योजना: महायुती सरकारने आणलेली ही योजना निरंतर चालू राहील. मोर्चा: लोकशाहीत सगळ्या पक्षांना मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. ठाण्यात युती: ठाण्यामध्ये युतीबाबतचे अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत.. निवडणूक धोरण: महायुती म्हणून जिथे शक्य होईल तिकडे लढावं, ही मानसिकता आहे. काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढत होऊ शकते, मात्र एकमेकांवर टीका करू नये या मूलमंत्रांनी निवडणुका लढल्या जातील. जागावाटप: महापौर पदाचे आरक्षण आणि प्रभागाचे आरक्षण निघाल्यावर पालिका निवडणुकीसाठी योग्य निर्णय नेते घेतील.
3
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 28, 2025 07:52:22
Akola, Maharashtra:राज्य शासनाच्या कृषी विभागाने बियाणे विक्रीसाठी ‘साथी पोर्टल-२’चा अनिवार्य वापर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या पोर्टलच्या वापरामुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व कृषी निविष्टा विक्रेते संघटनांनी आज एकदिवसीय आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन विक्रीबंद आंदोलन पुकारले आहे.देशातील 32 राज्यामध्ये ही ऍप सुरू करण्यात आली असून केवळ महाराष्ट्र सरकारनेच हे सक्तीचे केले असल्याचा आरोप विक्रेत्यांनी केलाय.प्रत्येक बियाण्याच्या पाकिटाचे लेवल नंबर वेगवेगळे असल्याने ही प्रक्रिया खूप किचकट होत असल्याचाही विक्रेत्यांनी म्हंटलंय.विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, ‘साथी पोर्टल-२’वरील प्रक्रिया गुंतागुंतीची असून व्यवहार करताना अनेक अडचणी येणे तसेच ग्राहकांना बियाणे विक्री करताना विलंब होणे अशा अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या पोर्टलच्या अंमलबजावणीस विरोध दर्शवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यभरातील कृषी व्यवसायिकांनी एक दिवसाचा व्यापार बंद ठेवत आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 28, 2025 07:51:08
Chendhare, Alibag, Maharashtra:सुनील तटकरे यांचा मंत्री भरत गोगावले यांना मोठा धक्का ..... उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे राष्ट्रवादीत जाणार ..... आज मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश ....... शेकडो सहकाऱ्यांसह रमेश मोरे मुंबईकडे रवाना ....... राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांना मोठा धक्का दिलाय. भरत गोगावले यांच्या मतदार संघातील शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा होतोय. रमेश मोरे यांच्यासह त्यांचे अनेक सहकारी, पदाधिकारी देखील राष्ट्रवादीत डेरेदाखल होत आहेत. या प्रवेश सोहळ्यासाठी रमेश मोरे आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचा फटका शिवसेनेला बसणार आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 28, 2025 07:34:02
Nagpur, Maharashtra:नागपूर अनिल देशमुख, माजी गृहमंत्री, नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष (on बचू कडू आंदोलन) --बच्चू कडू यांच आंदोलन होत आहे, शेतकरी अडचणीत आहे, यात निवडणुकी दरम्यान प्रचारात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते, सरकार आल्यास सातबारा कोरा करू असे ठासून सांगितले होते... आज भाजपचे सरकार है, मुख्यमंत्री है, आत कर्जमाफी करावे सोयाबीन सरकारी भाव आहे तो आहे 5 हजार रुपये सरकारी भाव असतांना 3200 चे भावाने खरेदी करत आहे, हमीभाव पेक्षा 2 हजाराचा तोटा आहे, यात कापूस बाजारात येत आहे, यात चुकीच्या धोरणाने कापूस परदेशातून भारतात येत आहे, आयात करत 11 टक्के वरून 0 टक्के केला... त्यामुळे भारतात भाव पडणार, धनाची परिस्थिती तशीच आहे, सरकारचे लक्ष नाही, शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे, आकडे फुगवण्यात आले आहे, शेतकरी मागण्यासाठी मच्छीमार असो, किंवा मेंढपाळ असो On वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चौकशी लागली कीं नाही, याबद्दल संपूर्ण माहिती होऊ द्या...
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 28, 2025 07:31:27
Nala Sopara, Maharashtra:नालासोपारा ड्रग्स कारखाना प्रकरण: वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांचे निलंबन; पोलिस आयुक्त नीकेत कौशिक यांनी कारवाई केली. नालासोपारा पूर्व पेल्हार हद्दीत मुंबई पोलिसांनी उध्वस्त केलेल्या MD ड्रग्स कारखाना प्रकरणात स्थानिक पेळ्हार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या तडकाफडकी निलंबन झाले. त्यामुळे मीरा भाईंदर वसई विरार पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलिस दलाचे आयुक्त नीकेत कौशिक यांनी ही कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांना सापडलेला कारखाना हा पोलिस ठाण्यापासून ३०० मीटर अंतरावर होता. मुंबई पोलिसांनी छापा टाकून उघडकीस आणलेल्या ड्रग्सच्या फॅक्टरी बाबत आपल्याला नसल्याचे सांगत पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी चौकशीत अनभिज्ञता व्यक्त केली होती. मात्र, ठाण्याच्या इतकी जवळ अवैध ड्रग्स निर्मिती सुरू असताना पोलिस अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे. शिवाय पोलिस ठाण्यातील पोलिसांकडून गस्त करून घेणे, गोपनीय माहिती मिळविणे, अवैध व्यवसायांवर कारवाई करणे या कामात सक्षम हलगर्जीपना केल्याचा ठपका ठेवत पोलिस आयुक्तांनी हे निलंबन केले आहे. निलंबन काळात त्यांना नियंत्रण कक्षात हजेरी द्यावी असे आदेश देण्यात आले आहेत.
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top