Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

सातारा के रामेश्वर मंदिर त्रिपुरारी पौर्णिमे पर लाखों दीपों से जगमगा उठा

TTTUSHAR TAPASE
Nov 06, 2025 03:02:21
Satara, Maharashtra
सातारा- साताऱ्यातील क्षेत्र माहुली येथील प्रसिद्ध असे श्री रामेश्वर मंदिर आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अडीच हजार दिव्यांनी उजळले. हे मंदिर क्षेत्रमाहूलीत 353 वर्षा पूर्वी बांधण्यात आले असून कृष्णा-वेण्णा नदीच्या संगमावरील या मंदिरात श्री रामेश्वर जीर्णोद्धार मंडळ यांच्या तर्फे मागील सात वर्षांपासून दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील 2500 दिव्यांचा भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मंदिराचा परिसर दिव्यांनी उजळुन निघाला विशेष म्हणजे या परिसरात प्रथमच सामाजिक कार्यकर्ते कामेश कांबळे मित्र समूहाच्या वतीने करण्यात आलेली आकर्षक अशी आकाशातील फटाक्यांची आतिषबाजी ही डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली. याबरोबरच या श्री रामेश्वर मंदिरावर आकर्षक असा लेझर शो हा देखील लक्षवेधक ठरला यावेळी श्री रामेश्वर मंदिरातही आकर्षक सजावट करण्यात आली होती हा नयनरम्य नजारा पाहण्यासाठी सातारा शहरातून कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर मोठ्या संख्येने सातारकर उपस्थित होते...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Nov 06, 2025 05:08:58
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:उस दरासाठी स्वाभिमानी आक्रमक, भिलवडी येथे ऊस वाहतूक करणारी वाहने रोखली. ऊस दर आंदोलनाची तीव्रता आता सांगली जिल्ह्यात वाढू लागली आहे, एफआरपी जाहीर केल्याशिवाय ऊस वाहतूक होऊ देणार नाही,अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आता ऊस वाहतूक रोखण्यात येत आहे. पलूस तालुक्यातल्या भिलवडी या ठिकाणी आक्रमक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवून धरले होते. ऊसाला पहिली उचल 3 हजार 751 रुपये तसेच गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला दोनशे रुपये मिळालेच,पाहिजे त्याशिवाय वाहने सोडणार नाही,अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी घेतली होता.यामध्ये हुतात्मा कारखाना,क्रांती कारखाना,सोनहिरा व दत्त इंडिया सांगली कारखाना यां कारखान्याची वाहने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्याने अडवली.त्यामुळे काही काळ याठिकाणी दरवाजा निर्माण झाला होता अखेर पोलीस बंदोबस्त ही वाहने रवाना झाली.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Nov 06, 2025 05:08:34
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 06, 2025 05:02:33
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 06, 2025 04:54:00
Dhule, Maharashtra:बोगस मतदारांच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांच्या राजकीय स्टंट आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केला आहे. राहुल गांधी चित्रीकरण मीडिया ला का दाखवतात, निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक विषयासाठी तारखा दिले होत्या पण त्यावेळेस तुमच्या कार्यकर्ते झोपले होते का? अशा प्रश्न हे कोकाटे यांनी उपस्थित केलेला आहे. यावेळी माणिकराव कोकाटे यांनी सुप्रिया सुळे वर देखील निशाणा साधला आहे, गेले अनेक वर्षापासून निवडणुका झालेल्या नाहीत, त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुका घ्यावा लागणार आहेत, ज्या ज्या तारखा दिला आहे. त्याप्रमाणे निवडणुका होणार आहेत, असं सांगत, उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा हा राजकीय स्टंट आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नसेल पंचनामे झाले नसतील त्यांना शासन नियमाप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. स्वातंत्र्य निवडणूक लढावी असा काही निर्णय झालेला नाही आहे, त्या त्या मतदारसंघातील आमदारांनी खासदारांना युती करायची असेल त्यांना मुभा दिली आहे, असं कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे. निवडणुकीच्या बैठका सुरू होतील त्यानंतर निर्णय कोण कोणाशी युती किंवा आघाडी करणार ते ठरणार.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Nov 06, 2025 04:53:40
Dharashiv, Maharashtra:उद्धव ठाकरे के पदाधिकाऱ्यांना सक्त सूचना – शिंदे गटाशी कुठेही युती नको! धाराशिव – निवडणुकीत किंवा निकालानंतर कुठेही शिंदे शिवसेनेशी युती होणार नाहीयाची काटेकोर खबरदारी घेावी, अशा सक्त सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचा आजचा दिवस शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात गेला, तर रात्री उशिरा धाराशिवच्या पुष्पक हॉटेलमध्ये राजकीय खलबत रंगली. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत निवडणूक रणनीतीवर चर्चा करण्यात आली. धाराशिवमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढण्याची तयारी असली, तरी जास्तीत जास्त नगराध्यक्ष पदे आपल्या पक्षाकडे ठेवण्याचा पक्षाचा कल असल्याची माहिती मिळते. बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीच्या सूत्राखालीच निवडणूक लढविण्याची विनंती केली. तर लातूरमधील कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी ठाकरेंनी भाजपचा दाखला दिला — “लातूर काँग्रेसचा गड असूनही भाजप जिंकली, आपणही ताकदीने आणि विश्वासाने लढा,” असा संदेश ठाकरेंनी दिला. पक्षवाढीच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी युवा कार्ड खेळण्याचे संकेत दिले असून, आगामी निवडणुकीत तरुण चेहऱ्यांना अधिकाधिक संधी देण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 06, 2025 04:36:53
Dhule, Maharashtra:नंदुरबार राष्ट्रवादीच्या शेतकरी मेळाव्यात इतर पक्षाच्या सरपंच उपसरपंच आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्ष प्रवेश केला मंत्री माणिकराव कोकाटे आणि जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांच्या उपस्थितीत सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या तरुण माळी येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्ष प्रवेश केला परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्ष प्रवेश केल्याने निवडणुकीत याचा मोठा फायदा होणार आहे तोरणमाळ हा गट राष्ट्रवादीच्या बाल किल्ला होणार असल्याने मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेश केल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत याचा मोठा फायदा होणार आहे तर ज्या पक्षातून आलेले ही कार्यकर्ते होते त्या पक्षांना मोठा फटका बसला आहे त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपलेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास देखील मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसापासून होत असलेली इनकमिंग जिल्हा देखील याच्या परिणाम होणार असून राष्ट्रवादीचे चांगले दिवस येतील असा देखील विश्वास मंत्री कोकाटे यांनी व्यक्त केला,
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 06, 2025 04:35:31
Dhule, Maharashtra:नंदुरबार राष्ट्रवादीच्या वतीने तोरणमाळ येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा घेण्यात आला असून शेतकऱ्यांवरील येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कटिबद्ध असून शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना राबवत असून शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून नुकसान भरपाई देखील दिली जाणार आहे येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्यामुळे अनेक लोक येऊन तुम्हाला खोटे आश्वासन देऊन जातील मात्र जनतेच्या खरा विकास फक्त राष्ट्रवादीच करणार आहे त्यामुळे कोणाच्या खोट्या बोलतांना पडू नका योग्य उमेदवारांनाच मत देऊन निवडून द्या असं मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तसा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्या मेळाव्यातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तर मोठ्या संख्येने शेतकरी बांधव देखील उपस्थित होते
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 06, 2025 04:34:55
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचे प्रभारी पदी नियुक्ती केलेले आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात प्रमुख पदी विजय चौधरी यांना नियुक्त करण्यात आले आहे. एकीकडे रक्षा खडसे यांचे डॉक्टर हिना गावित यांच्याशी चांगले संबंध असताना, दुसरीकडे विजय चौधरीशी गावित कुटुंबासोबत त्यांचा फारसं सौख्य नाही. त्यामुळे गावित परिवाराला या नियुक्त्यांमध्ये संधी न मिळाल्यामुळे उलट उलट चर्चा सुरू झालेल्या आहेत. गावित कुटुंबाचे जिल्ह्यात वेगळं स्थान असतांना पक्षाने त्यांचा प्रभारी किंवा निवडणूक प्रमुख म्हणून विचार केला नाही, त्यामुळे भाजपामध्ये गावित कुटुंब ऐवजी आता रक्षा खडसेंना प्रभारी पदी नियुक्त करून पक्षाने गावित कुटुंबाला योग्य तो संदेश दिल्याचे बोलला जात आहे. विजय चौधरींचे मात्र राजकीय वजन या नियुक्तीमुळे जिल्ह्यात वाढणार आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 06, 2025 04:24:54
Nagpur, Maharashtra:नागपूर त्रिपुरी पौर्णिमेला रात्री बारा वाजता रामटेक गड मंदिराच्या कळसावर त्रिपुर जाळण्यात आला. यावेळी हजारो भक्तगणांनी सर्वत्र जय श्रीराम चा जयघोष केला... शरद पौर्णिमेपासून सुरू झालेल्या या उत्सवाची त्रिपुर पेटवून सांगता करण्यात आली. हा उत्सव पाहण्याकरता केवळ नागपूर जिल्ह्यातूनच नव्हे तर शेजारील छत्तीसगड आणि मध्य प्रदेश येथूनही हजारो भक्त रामटेक गड मंदिर परिसरात पोहोचले होते.. टिपूर पेटवल्यानंतर फटाक्यांची मोठी आतिषबाजी रामटेक शहरात करण्यात आली.. शेकडो वर्षांपासून रामटेक गड मंदिरावर हे टिपूर जाण्याची परंपरा आहे... भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला होता त्या दिवसाचे स्मरण म्हणून ही यात्रा भरवण्यात येते... यावेळी मंदिर परिसरात आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 06, 2025 04:17:55
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:अँकर - सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नांनाने सांगलीच्या इस्लामपूरचे उरुण-ईश्वरपूर झाले. त्यामुळे मित्र पक्ष व रयत क्रांती संघटनेच्या वतीने फटाके,पेढे,वाद्यांच्या गजरात, फुलांची उधळण करत सदाभाऊ खोत यांचे ईश्वरपूरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. आमदार सदाभाऊ खोतांनी विधान परिषदेत इस्लामपुरचे नाव बदलुन ईश्वरपूर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर नामांतरानाच्या प्रक्रियेला वेग आला होता. आमदार गोपीचंद पडळकर व आ.सदाभाऊ खोत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर इस्लामपुरचे उरुण ईश्वरपूर असे नाव झाले आहे. त्यामुळे रयत क्रांती संघटना व मित्र पक्षाचे कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या नामांतरण झाल्यानंतर उरुण-ईश्वरपूर मध्ये दाखल झालेल्या आमदार सदाभाऊ खोत यांचे जल्लोशात स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 06, 2025 04:17:18
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात वाघाचा हल्ला पुन्हा; शंकरपूर परिसरात आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू. गेल्या दीड महिन्यात शंकरपूरच्या दोन किलोमीटर परिसरात तीन शेतकऱ्यांचा जीव वाघाच्या हल्ल्यात गेला आहे. काल दुपारी ५२ वर्षीय ईश्वर भरडे हा शंकरपूर-आंबोली रोडवरील ठाणा रिठ परिसरात त्यांच्या शेतात पिकाची पाहणीसाठी गेले होते. मात्र संध्याकाळपर्यंत ते परत न आल्याने गावकऱ्यांनी वनविभागाच्या मदतीने शोध घेतला आणि शेतातच त्यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त ग्रामस्थांनी शंकरपूर-भिसी मार्गावर आंबोली गावाजवळ रस्त्याच्या मधोमध ट्रॅक्टरवर मृतदेह ठेवत रात्री रास्ता रोको केला. अखेर प्रशासनाने मृतकाच्या कुटुंबाला वनविभागात नोकरी देण्याचं आणि वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आणि मृतदेह चिमूर येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला
0
comment0
Report
Advertisement
Back to top