Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501
उद्धव ठाकरे ने पदाधिकारियों को शिंदे गुट से युति न करने की सख्त हिदायत दी
DPdnyaneshwar patange
Nov 06, 2025 04:53:40
Dharashiv, Maharashtra
उद्धव ठाकरे के पदाधिकाऱ्यांना सक्त सूचना – शिंदे गटाशी कुठेही युती नको! धाराशिव – निवडणुकीत किंवा निकालानंतर कुठेही शिंदे शिवसेनेशी युती होणार नाहीयाची काटेकोर खबरदारी घेावी, अशा सक्त सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचा आजचा दिवस शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात गेला, तर रात्री उशिरा धाराशिवच्या पुष्पक हॉटेलमध्ये राजकीय खलबत रंगली. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत निवडणूक रणनीतीवर चर्चा करण्यात आली. धाराशिवमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढण्याची तयारी असली, तरी जास्तीत जास्त नगराध्यक्ष पदे आपल्या पक्षाकडे ठेवण्याचा पक्षाचा कल असल्याची माहिती मिळते. बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीच्या सूत्राखालीच निवडणूक लढविण्याची विनंती केली. तर लातूरमधील कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी ठाकरेंनी भाजपचा दाखला दिला — “लातूर काँग्रेसचा गड असूनही भाजप जिंकली, आपणही ताकदीने आणि विश्वासाने लढा,” असा संदेश ठाकरेंनी दिला. पक्षवाढीच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी युवा कार्ड खेळण्याचे संकेत दिले असून, आगामी निवडणुकीत तरुण चेहऱ्यांना अधिकाधिक संधी देण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Nov 06, 2025 07:38:03
Shirdi, Maharashtra:Anc - विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्या लोकांपासून सावध रहा असा सल्ला माजी खासदार सुजय विखे यांनी वडील राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलाय.. तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सुजय यांच्या सल्ल्यावर प्रतिक्रिया दिलीये.. मी सहसा गाडीत कुणाला घेत नाही, मात्र कार्यकर्ते ज्यावेळी गाडीत बसतात त्यावेळी आपले कान पक्के ठेवले पाहिजे असं त्यांनी म्हटलंय.. त्यामुळे विखे पिता पुत्राच्या जुगलबंदीची चांगलीच चर्चा होत आहे.. - मुलाने दिलेल्या सल्ल्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.. मी सहसा गाडीत कुणाला घेत नाही, मात्र कार्यकर्ते ज्यावेळी गाडीत बसतात त्यावेळी आपले कान पक्के ठेवले पाहिजे.. गाडीत बसणाऱ्या कार्यकर्त्यांचे किती ऐकायचे आणि किती सोडून द्यायचे हे आपण ठरवायचे.. मात्र सुजयने दिलेला सल्ला सर्वांसाठीच महत्वाचा असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय.. - अक्षय कर्डिले यांना राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विधानसभेची उमेदवारी मिळाली यासाठी पर्डिले समर्थक आग्रही आहेत.. शिवाजी कर्डिले यांच्या अचानक निधनाने सर्वांनाच वेदना झाल्या आहेत.. अक्षयच्या बाबतीत कार्यकर्त्यांचा आग्रह आहे त्यामुळे पक्ष श्रेष्ठींकडे आम्ही त्याबाबतीत आग्रह धरू अशी प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे...
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Nov 06, 2025 07:33:12
Buldhana, Maharashtra:थरार! बुलढाण्यात 'नेचरोपॅथी' डॉक्टरच्या घरात जिल्हा शल्य चिकित्सकांची धाड; अवैध गर्भलिंग निदान करताना रंगेहाथ पकडले. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाच्या पथकाने डॉ. गवई याच्या सुंदरखेड येथील घरी छापा टाकला . या छाप्यादरम्यान अवैध गर्भलिंग निदान होत असल्याचे सिद्ध होताच, तातडीने कठोर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपी डॉ. कैलास गवई याला ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. एका डॉक्टरने घरातच असे कृत्य चालवल्याने, आरोग्य क्षेत्रातील नियमांचे उल्लंघन आणि कायद्याचा भंग केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 06, 2025 07:18:28
Shirdi, Maharashtra:शिर्डीत ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून खासदार संजय राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी महामृत्युंजय यज्ञ करण्यात आला...शिर्डी शहराचे ग्रामदैवत हनुमान मंदिरासमोर हा यज्ञ पार पडला असुन यावेळी खा.राऊत यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली..ठाकरे गटाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.महामृत्युंजय यज्ञ पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी साईबाबांच्या मध्यान्ह आरतीत सहभागी होत साईबाबांच्या चरणी देखील साकडं घातलं...संजय राऊत हे स्वतः साईभक्त असून अनेकदा शिर्डीत साईदर्शनासाठी येतात. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांशी त्यांचं भावनिक नातं घट्ट झालं आहे...संजय राऊत यांना लवकरात लवकर उत्तम आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना यावेळी सर्व शिवसैनिकांनी Hindu अणि साईचरणी केलीय.या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 06, 2025 06:49:20
Beed, Maharashtra:बीड:बँकेला बनावट सोने देणाऱ्या बीडच्या सोनाराला पुण्यातून अटक; अडीच कोटींची फसवणूक बनावट सोने चांदी बँकेत गहाण ठेवून बँकेची फसवणूक करणाऱ्या सोनाराला अखेर बीड पोलिसांनी पुण्यातून अटक केली. आरोपीने अवघ्या दोन महिन्यात तब्बल अडीच कोटी रुपयांचे घबाड जमा केले होते. विलास उदावंत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो बीडमध्ये विलास ज्वेलर्स नावाने दुकान चालवत होता. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने स्वतः 16 बनावट ग्राहक तयार केले. या ग्राहकांना बनावट सोने देऊन त्याने ते बँक ऑफ बडोदा बँकेत गहाण ठेवले. सोन्याचे परीक्षण करणारा म्हणून त्याने हे बनावट सोने खरे असल्याचे भासवून बँकेची फसवणूक केली. याबरोबरच सामान्य लोकांना जास्त सोन्याचे अमिष दाखवून त्यांची ही फसवणूक केली. असे सर्व मिळून अडीच कोटी रुपये जमा करून तो बीड मधील प्रॉपर्टी विकून पसार झाला होता. या प्रकरणात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीच्या मागावर होते. गुप्त मिळालेल्या माहितीनुसार तो पुण्यातील देहू गाव येथे व्यंकटेश ज्वेलर्स नावाने दुकान चालवत असल्याचे समजले. मोबाईल लोकेशन वरून पोलिसांनी त्याचा शोध घेतला. आणि पुण्यातून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या ताब्यातून 18 किलो सोने-चांदी जप्त करण्यात आली आहे.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 06, 2025 06:47:50
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 06, 2025 06:36:52
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - लँडिंग करताना विमानाच्या पंखात अडकला पतंगाचा मांजा, सोलापूर विमानतळवरील धक्कादायक घटना पायलटने सतर्कता दाखवत सुरक्षितपणे विमान लँड केला त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली व विमानतळ परिसरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विरोधात गुन्हा नोंदण्यात आलंय बिलाल इब्राहिम शेख असे मांजा विक्री केल्याने गुन्हा दाखल झालेल्या आरोपी व्यक्तीचे नाव आहे काल दुपारी दोनच्या सुमारास मुंबईहुन सोलापूरला विमान आले, यामध्ये एकूण 34 प्रवासी प्रवास करत होते सोलापूर विमानतळाच्या रनवेवर लँड करत असताना विमानाच्या पंखात मांजा अडकल्याचे पायलटच्या लक्षात आलं पायलटने सतर्कता दाखवत सुरक्षितपणे विमान लँड केला त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आज सकाळी देखील दोन अल्पवयीन मुलं सुरक्षा भिंतीवरून उडी मारून विमानतळ परिसरात शिरले या दोघांना ही सुरक्षा रक्षकांनी तात्काळ ताब्यात घेत समज दिलीय
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 06, 2025 06:36:12
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले समुद्रकिनारी एक धक्कादायक घटना घडली आहे. पर्यटकाने स्टंटबाजी करताना आपली गाडी थेट समुद्रात नेल्याने गाडीला अखेर जलसमाधी मिळाली. ग्रामस्थांच्या माहितीनुसार हा पर्यटक मद्यधुंद अवस्थेत होता. या घटनेनंतर ग्रामस्थांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला पण गाडी पाण्यात बुडाली. दरम्यान, समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी आणि भरधाव वेगात वाहन चालवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. समुद्रकिनाऱ्यावर वाहन नेण्यास बंदी असतानाही नियमांचा सर्रास भंग केला जात आहे, त्यामुळे पर्यटनासोबतच नागरिकांच्या सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 06, 2025 06:27:22
Solapur, Maharashtra:सολापुर ब्रेकिंग - शरद पवारांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 70 टक्के नव्या चेहऱ्यांना देण्यात येणार संधी - खा. धैर्यशील मोहिते- पाटील - राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मोहोळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीत स्वबळावरची तयारी - जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या निवडीचा फॉर्मुला तयार - शरद पवार यांच्याकडून स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी 70 टक्के नव्या चेहऱ्यांना देण्यात येणार संधी - काहीच नसताना शरद पवार यांच्यासोबत संकटाच्या वेळी पक्षासोबत राहणाऱ्या कार्यकर्त्यांना यावेळेस मिळणार संधी - राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकी संदर्भातील भूमिका केली स्पष्ट - आमचा एकही पदाधिकारी निवडून नाही आला तरी चालेल तरीपण आम्ही लढा देणार आणि नवीन संधी देणार - राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष, आजी माजी आमदार यांची मिळून एक कमिटी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या उमेदवाऱ्या फायनल करणार आहे - येत्या दिवसात जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर कोर कमिटी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या उमेदवारांना बाबतीत निर्णय घेणार - आमची अट असणार, विद्यमान सरकार विरोधात काम करायचे त्यांनीच आमच्या सोबत यावं - खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी तालुका आणि पदाधिकाऱ्यांना आपली भाण्डणं बंद खोलीत करु, तिथे एकमेकांची कॉलर पकडू मात्र बाहेर येताना एकिनेच बाहेर येण्याचा दिला सल्ला - ज्यांना काम करायची तळमळ आहे अशांनाच पदे मिळणार
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 06, 2025 06:20:29
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 06, 2025 06:19:36
Dhule, Maharashtra:झेंडूच्या फुलांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्याला आपल्या एक एकरावरील झेंडू शेतीवर नांगरणी फिरवण्याची वेळ आली आहे. धुळे जिल्ह्यातील शिंगावे येथील युवा शेतकरी मुकुल पाटील दरवर्षी झेंडूचे उत्पादन घेत असतात या वर्षी देखील एक एकरात दोन हजार झेंडूच्या फुलांची लागवड केली होती. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे झेंडू फुलांवर मोठा परिणाम बघायला मिळाला होता सोबतच दिवाळी सारख्या सणाला देखील योग्य भाव मिळाला नसल्याने शेतकरी मुकुल पाटील यांना आर्थिक फटका सहन करावा लागला. भाव वाढत नसल्याने मुकुंद पाटील यांना आपल्या झेंडू फुलांच्या उभ्या शेतीवर नागरणी फिरवण्याची वेळ आली आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 06, 2025 06:00:46
Yeola, Maharashtra:द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यावर संकटाचे सावट गडद होत आहे. मॉसमी व बेमोसमी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर झाला असून आत्महत्यांच्या घटना, बागा नष्ट करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. याची खास ग्राउंड रिपोर्ट निफाड, येवला, चांदवड परिसरात केला गेला. निफाड तालुक्यातील उगाव गावातील कैलास पानगव्हाणे यांनी द्राक्ष वेलींना गर्भधारणा न झाल्याने उत्पादन मिळणार नाही, तसेच कर्जाचे वाढते ओझे… या चिंतेतून दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. येवला तालुक्यातील सोमनाथ घोरपडे या शेतकऱ्याने तर दोन एकर द्राक्ष बागांवर स्वतः कुऱ्हाड चालवून संताप व्यक्त केला. शेतकरी बाईट. तालुका कृषी अधिकारी येवला शुभम बेरड. सरकारने हवामानामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
0
comment0
Report
SKShubham Koli
Nov 06, 2025 05:46:01
Thane, Maharashtra:* कातकरी मुलींची खरेदी विक्री थांबवण्यासाठी.. * वन जमिनीची वा गावठाणच्या हक्कासाठी... * गुलामी नष्ट करण्यासाठी... * आदिवासी कातकरी या आदिम जमातीचे अस्तित्व टिकवण्यासाठी... * जल जीवन मिशन योजने अंमलबजावणी करण्यासाठी अशा विविध मागण्यांना अनुषंगाणे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर विविध जिल्ह्यातून आदिवासी बांधव आत्मकләш आंदोलन करत आहेत... तर काही वेळातच एक भला मोठा मोर्चा देखील या आदिवासी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एक भला मोठा मंच देखील या आत्मकләш आंदोलनाकरिता उभारण्यात आला आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी..
0
comment0
Report
Advertisement
Back to top