Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415639

रत्नागिरी जिला पूर्ति विभाग आठ नए गोदामों को मंजूरी; पाँच गोदामों के लिए निधि जारी

RMRavindra Manohar Kokate
Mar 30, 2026 03:18:04
Ratnagiri, Maharashtra
रत्नागिरी जिला पूर्ति विभाग आठ नव्या गोदामांना मंजुरी. ५ गोदामांच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात प्रशासनाकडे निधी. जिल्हा पुरवठा विभागाच्या २४ कोटी २५ लाख ३५ हजार ९९० रुपये खर्चाच्या आठ नवीन गोदाम बांधकाम प्रस्तावांपैकी ५ गोदामच्या बांधकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून पहिल्या टप्प्यात सव्वा कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. राजापूर आणि संगमेश्वरसाठीच्या गोदामांना अजून मान्यता मिळणे बाकी आहे. तर दापोलीतील गोदामाच्या प्रस्तावात त्रुटी असल्याने त्याच्या पूर्ततेसाठी प्रस्ताव परत आला आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या अख्यारितीतील जिल्ह्यात सध्या १३ गोदामे कार्यरत आहेत. मात्र त्यांची क्षमता अपुरी पडू लागल्याने आठ नव्या गोदामांसाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आले होते.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Mar 30, 2026 04:05:02
Amravati, Maharashtra:श्रद्धा कॉलनी–नवसारी परिसरात जनावरे चोरणारी टोळी सक्रिय; नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न हाणून पाडला, सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद शहरातील श्रद्धा कॉलनी आणि नवसारी परिसरात रात्रीच्या वेळी मोकाट जनावरे चोरून नेणारी टोळी सक्रिय झाल्याची घटना समोर आली आहे. या टोळीने मध्यरात्रीनंतर दोन ते तीनच्या दरम्यान परिसरातील मोकळ्या मैदानात बसलेल्या जनावरांना लक्ष्य केल्याचे उघड झाले आहे. संपूर्ण प्रकार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही अज्ञात व्यक्ती वाहनासह परिसरात येऊन जनावरांना पकडून गाडीत कोंबण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी काही जागरूक नागरिकांना संशय आल्याने त्यांनी आपल्या घरातील लाईट्स लावताच या चोरट्याने तेथून पळ काढल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पस्ट दिसत आहे त्यामुळे जनावरे पळवून नेण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. घटनेनंतर परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित टोळीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणीही पुढे येत आहे. दरम्यान नागरिकांनीही सतर्क राहून संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
979
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 30, 2026 04:01:47
Latur, Maharashtra:लातूर जिल्हा परिषदेत आज चार विषय समिती सभापतींची निवड....महायुतीत भाजप-राष्ट्रवादीचा २-२ सभापतींचा फॉर्म्युला निश्चित?...समित्यांवरून दोन्ही पक्षांत अंतर्गत रस्सीखेच वाढली...बांधकाम खात्यावरून महायुतीत तणावाची चर्चा....इच्छुकांची जोरदार फिल्डिंग... लातूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष और उपाध्यक्ष निवडीनंतर आता आज होणार्या सभापती पदांच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे… चार समित्यांसाठी होणाऱ्या या निवडीत महायुतीमध्ये दोन-दोन सभापतींचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे… मात्र कोणती समिती कोणाकडे जाणार यावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत रस्सीखेच सुरू आहे… विशेषतः बांधकाम खात्यावरून दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढल्याची चर्चा आहे…दरम्यान, इच्छुक उमेदवारांकडून जोरदार हालचाली सुरू असून नेते आणि आमदारांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत… आज होणाऱ्या विशेष सभेत सकाळी नामनिर्देशन प्रक्रिया पार पडणार असून दुपारी सभापतींची अंतिम निवड होणार आहे…या निवडीत कोणत्या पक्षाला कोणती समिती मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे…
866
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 30, 2026 03:47:16
Latur, Maharashtra:निलंगा तालुक्यातील हाडगा गावात शॉर्टसर्किटमुळे २५ लाखांचे शेतीसाहित्य भस्मसात......शेतकरी गंभीर जखमी. एका शेळीचा होरपळून मृत्यू.....निलंगा तालुक्यातील हाडगा येथे रात्री एका शेतातील गोडाऊनला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या अग्नितांडवात साठवून ठेवलेले सोयाबीन, गहू, ज्वारी आणि शेती उपयोगी साहित्यासह सुमारे २० ते २५ लाखांचे नुकसान झाले आहे. आगीतून जनावरांना वाचवताना शेतकरी सर्जेराव मोरे हे जखमी झाले असून, एका शेळीचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनला योग्य भाव नसल्यामुळे विक्री न करता ते गोडाऊनमध्ये साठवून ठेवले होते. अचानक शॉर्ट सर्किटमुळे हि आग लागली आणि त्यात गोडाऊनने पेट घेतला. आगीने अवघ्या काही मिनिटांत रौद्ररूप धारण केले, ज्यामुळे साठवलेले धान्य आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
911
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 30, 2026 03:46:15
Varasoli, Maharashtra:महावीर जयंती निमित्त मांस मच्छीची दुकाने बंद रोहा नगर पालिकेच्या निर्णयाविरोधात संताप मासळीची दुकाने बंद ठेवण्यास स्थानिक व्यावसायिकांचा विरोध मराठी अभ्यास केंद्राचीही वादात उडी जैन धर्मीयांच्या मागणीवरून महावीर जयंती निमित्त रोह्यातील चिकन मटणाची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय रोहा नगर पालिकेने घेतला आहे. मात्र त्याला जोरदार विरोध होताना दिसतो आहे. मराठी अभ्यास केंद्र आणि मराठी एकता संघानेही यात लक्ष घातल्याने या विषयावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महावीर जयंती निमित्त शहरातील मांस मच्छीची दुकाने बंद ठेवावीत असा निर्णय रोहा नगर पालिकेने घेतला मात्र स्थानिक मच्छीमार आणि मासळी विक्रेत्यांनी याला जोरदार विरोध केला. सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. अखेर नगर पालिकेने यावर तोडगा काढत केवळ चिकन मटणाची दुकाने काही काळासाठी बंद ठेवावीत असा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
1070
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 30, 2026 03:45:52
938
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 30, 2026 03:30:11
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा मंदिर परिसरात पुजाऱ्यांकडून भक्तांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर वातावरण अजूनही तापलेलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज करवीर तालुक्यातील परिते गावातील ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर न्याय मोर्चा काढला जाणार आहे. “पुजारी हटाव, जोतिबा बचाव” हे ب्रीدवाक्य घेऊन हा मोर्चा काढला जाणार आहे. 1 एप्रिलला जोतिबाची चैत्र यात्रा आहे, या पार्श्वभूमीवर परिते ग्रामस्थ आक्रमक झाल्याने प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे. काही दिवसांपूर्वी जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी आलेल्या भक्तांना सुमारे 15 पुजाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर कोडोली पोलीस ठाण्यात जोतिबा पुजारी आणि परिते ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पण प्रशासनाकडून गुंड प्रवृत्तीने मारहाण केलेल्या पुजाऱ्यांवर कारवाई केली नाही, त्यामुळे पुजारी आणि भक्तांमधील वाद अजूनही धुमसत असल्याचं चित्र आहे. परिते गावातील ग्रामस्थ या संदर्भात संतप्त झाले असून संबंधित पुजाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. इतकंच नाही तर गुंड प्रवृत्तीने मारहाण केलेल्या पुजाऱ्यांची नेमणूक रद्द करून मंदिरात कायमस्वरुपी शासकीय पुजाऱ्यांची नियुक्ती करावी अशी आक्रमक मागणी केली आहे.
1064
comment0
Report
Advertisement
Back to top