Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Raigad402201

अलिबाग- वडखळ मार्ग पर किसान मजदूर पक्ष के रास्तारोको से यातायात ठप, नागरिक परेशान

PPPRAFULLA PAWAR
Oct 07, 2025 05:21:10
Chendhare, Alibag, Maharashtra
अलिबाग - वडखळ मार्गावर शेकापचा रास्तारोको. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक, प्रवाशांचे हाल. शेतकरी कामगार पक्षाकडून रास्तारोको आंदोलन. पेझारी चेक नाक्यावर रास्तारोको. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प. अँकर - जिल्ह्याचे मुख्यालय व पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अलिबाग शहराकडे येणार्‍या जवळपास सर्व रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अलिबाग - वडखळ मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे तर या मार्गाची अक्षरशः चालण झाली असून यासाठी विविध संघटनांनी वारंवार पत्रव्यवहार व निदर्शने करूनही संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झालाय. आज मंगळवारी शेतकरी कामगार पक्षाने चित्रलेखा पाटील तसेच मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पेझारी चेकनाका येथे रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे ज्यामुळे मुख्यालयाकडे येणाऱ्या प्रवाशांना आंदोलनाचा फटका बसला आहे. वाहतूक ठप्प झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Oct 07, 2025 07:36:59
Parbhani, Maharashtra:परभणी जिल्ह्यात अतिमूसळधार पावसाने सर्वच्या सर्व महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झालीय, त्यातच वेगवेगळ्या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदी काठची पीक अक्षरशहा मातीमोल झालीयेत, हजारो रुपये टाकून कष्टाने लाखो रुपयांचे पिकवलेलं पीक डोळ्या देखत सडून गेलंय, यामुळे शेतकरी हवालदिलं झालीयेत. पूर ओसरल्या नंतर गोदावरी पट्यात पिकांची झालेली दयनीय अवस्था झी २४ तास ड्रोनच्या माध्यमातून सरकार समोर मांडत आहे,किमान ही दृश्य बघून तरी सरकाला शेतकर्यांबद्दल पाझर फुटेल आणि आज होऊ घातलेल्या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय होईल असे म्हणण्यास हरकत उरणार नाही. शेतकर्यांची दुःख जाणून घेतलीयेत आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी...
1
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 07, 2025 07:36:21
Chendhare, Alibag, Maharashtra:बांधकाम विभागाकडून दिवाळीपूर्वी रस्ते सुस्थितीत करण्याचे लेखी आश्वासन..... आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा... आंदोलकामुळे अलिबाग वडखळ मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प ....... अँकर - अलिबाग शहराकडे येणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने आज शेतकरी कामगार पक्षाने राज्याच्या महिला आघाडी प्रमुख मानसी म्हात्रे व राज्यप्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग वडखळ मार्गावरील पेझारी चेकपोस्ट येथे रास्तारोको आंदोलन केले. संबंधित प्रशासन जो पर्यंत योग्य दखल घेत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी आक्रमक भूमिका शेकाप ने घेतल्याने हे आंदोलन तब्बल दोन तास सुरू राहिले परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. नॅशनल हायवेच्या अधिकार्‍यांनी अखेर आंदोलन स्थळी भेट देऊन दिवाळी पूर्वी रस्ता सुस्थितीत करण्याचे लेखी आश्वासन दिलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र प्रत्यक्ष कृती झाली नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 07, 2025 07:35:48
Akola, Maharashtra:मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात सेवानिवृत्त होत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक भेट दिले. मात्र हे पुस्तक काही महिला कर्मचाऱ्यांनी फेकून देत या कर्मचाऱ्याला माफी मागायला भाग पाडलं. तर पुस्तक फेकणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिवसेना (UBT) चे नेते अरविंद सावंत चांगलेच संतापले आहेत. 'बुद्धी गहाणी ठेवली असेल तर आणून हे पुस्तक वाचा' असा खोचक सल्ला त्यांनी दिलाय. सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्याचं स्वागत व्हायला हवं होतं, पण त्यांच्या sन्मानचिन्ह असलेलं पुस्तक न वाचता फेकून देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवर शिवसेना चे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी जोरदार टीका केली आहे. तसंच मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना शिस्त शिकवून मेमो द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी सावंत यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला. आमदारांना निधी मिळत नाही, हा सगळ्यात मोठा विनोद आहे असं ते म्हणाले. सत्ताधारी आमदारांनाच निधी मिळत नसेल, तर विरोधी पक्षातील आमदारांची काय अवस्था असेल?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या चिन्हाबाबत उद्या होणाऱ्या निर्णयावर भाष्य करताना त्यांनी शिवसेना न्यायासाठी तडफडत आहे, पण न्यायालयाने संविधानाच हसू उडवली असायची टीका त्यांनी केली आहे. तसंच खासदार नवनीत राणा यांना उद्देशून सावंत यांनी प्रतिक्रिया देत अनेक वर्ष प्रकरणे न्यायप्रविष्ट ठेवून सत्तेचा उपभोग घेणाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधला. घाणेरडा माणूस है, अशा नालायक लोकांबद्दल काय बोलावं?” याचबरोबर, बापाचं नाव पुसणारी ही माणसं आहेत, असं म्हणत त्यांनी शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांच्यावरही हल्लाबोल केला.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 07, 2025 07:35:12
Chendhare, Alibag, Maharashtra:शेकाप की चित्रलेखा पाटील ने आमदार महेंद्र दळवी यांच्यावर जोरदार टीका की. दळवी यांना महेंद्र फेल्युअर दळवी म्हणण्यात आले. अलिबाग वडखळ रस्त्याच्या दुरवस्थेचे खापर त्यांनी महेंद्र दळवी यांच्या माथी फोडले. दळवी यांना चिखलात लोळायला आवडतं, त्यामुळे त्यांना खड्डा खोल करायचा आहे. अँकर- पेझारी नाका इथं झालेल्या रास्तारोको आंदोलनादरम्यान शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर जोरदार टीका केली. दळवी यांचा उल्लेख त्यांनी महेंद्र फेल्युअर दळवी असा केला. अलिबाग वडखळ रस्त्याच्या दुरवस्थेचे खापर त्यांनी महेंद्र दळवी यांच्यावर फोडले. दळवी यांना चिखलात लोळायला आवडतं. त्यामुळे त्यांना खड्डा आणखी खोल करायचा आहे, असा चिमटा त्यांनी काढला.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 07, 2025 06:48:10
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 07, 2025 06:47:50
Vasai-Virar, Maharashtra:विरार में अंडर कंस्ट्रक्शन इमारत के १८ व्या मंजिल से दो विद्यार्थ्यांनी उडी घेत आत्महत्या केली. विरार पश्चिम बोळींज परिसरातील घटना. तरुणांचा मृत्यू संशयास्पद. पोलिसांच्या तपास सुरू. अँकर विरारमध्ये अंडर कन्स्ट्रक्शन असणाऱ्या इमारतीवरून दोन विद्यार्थ्यांनी काल सोमवारी रात्री च्यासुमारास उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणांची ओळख पटली असून श्याम सनद घोरई २०, व आदित्य रामसिंग २१ अशी त्यांची नावे असून ते नालासोपारा परिसरात राहणारे आहेत. विरारच्या बोळींज येथील सुपर होम या अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र दोन्हाचा मृत्यू हा संशयास्पद वाटत असल्याचे नागरिकाचे म्हणणे आहे. हे दोन्ही विद्यार्थी कॉलेजमध्ये शिकणारे असून ते नालासोपारा येथे राहणारे असल्याचे सांगितले जात आहे. नालासोपारा येथून विरार येथे या इमारतीमध्ये का आले असावे? त्यांना कोणी बोलावलं होतं? की कोणी त्यांना ढकलून दिलं की त्यांनी स्वतः उडी मारली याचा तपास अर्नाळा पोलीस करत आहेत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 07, 2025 06:47:40
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर... ऑन शेतकरी EKYC - शेतकऱ्यांचा 2200 कोटी रुपयाचा नुकसान झाला होता, 2200 कोटी दिले होते. आता e kyc मुळे पैशे पोहोचले नसावेत. - शेतकऱ्यानं हे साडेआठ हजार नको, हेक्टरी पन्नास हजार रूपये पाहिजे. सरकारने ते द्यावेत. - इ केवायसी बाबत मुख्यमंत्री फडणवीस बँकांना सांगताता मात्र बँकांचे अधिकारी ई केवायसी केल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण करत नाहीत. यामुळे बँका मुख्यमंत्री यांचा ऐकत नाही असेच म्हणावे लागेल. ऑन लाडकी बहीण योजना - लाडक्या बहिणीचा वापर सत्तेत येण्यासाठी केलेला आहे. लाखो लाडक्या बहिणीचे नाव निवडणूक झाल्यानंतर बघण्यात आली आहे. अशी बरीच आश्वासने त्यांच्या नेत्यांनी दिले. मात्र सत्तेत आल्यानंतर अनेक योजना बंद केली जात आहे. - एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणली म्हणून बंद करायची असेल... - *लाडकी बहीण ही योजना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर बंद केली जाईल.* ऑन वैदिक अभ्यासक्रम - प्रोफेशनल कोर्सेसना वाव दिले पाहिजे. आपण वैदिक अभ्यासाकडे अडकून बसलो आहे. ज्यांना शिकायचे आहे. त्यांना शिकू दे आमचा विरोध नाही. - हळूहळू ते मनुवादकडे जाणार आहे. या देशामध्ये मनुवाद यायला पाहिजे अशी प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठात आर एस एस विचाराचे प्रतिनिधी दिले जातात. - सामान्य लोकांना जातीवादमधे अडकवले जाते. मात्र लोकांच्या हातात चार पैशे येतील कसे याचा विचार केला जात नाही.. ऑन शिवसेना - मनसे एकत्र मुंबई निवडणूक. - महाविकास आघाडी निर्माण झाली तेंव्हा शिवसेना सोबत न्हवती, जेव्हा शिवसेना आमच्यासोबत आली तेव्हा कॉमन मिनिमम प्रोग्राम केला गेला. तो कागदावर देखील घेतला गेला. राज ठाकरे - उद्धव ठाकरे एकत्र आले तर ते देखील कॉमनमिनिमम प्रोग्राम बनवतील मात्र, हा आजचा विषय नाही हा विषय आलाच तर वरिष्ठ नेते याबतचा निर्णय घेतील. ऑन मंत्रिमंडळ बैठक - थातूरमातूर उत्तरे देऊ नका, कर्जमाफी झाली पाहिजे. मदत झाली पाहिजे. शेती हेक्टरची मर्यादाही वाढवली गेली पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर होत नसेल तर त्यात जे निकष आहे. त्यानुसार त्या नुकसानग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची ट्युशन फी माफ झाली पाहिजे. - ज्या मजुरांना काम नाही. त्या मजुराच्या एका कुटुंबाला पंचवीस हजार रुपय मदत दिली पाहिजे. ऑन दोन समजतील वाढता तेढ - दोन समाजामधील तेढ कमी करण्यासाठी सरकार कुठेही प्रयत्न करणार नाही. मनुवादी सरकार म्हणावं लागेल. जाती- जातीतमध्ये तेढ निर्माण केल्याशिवाय मनुवाद येऊ शकत नाही. शेतकरी मजूर अडचणीत आहेत. - भाजपचे नेते स्वतः स्वच्छ बोलतात. मात्र बहुजन नेत्यांना पुढे करून ते कसे बदनाम होतील हे पाहतात. ऑन भाजप षडयंत्र. - अजित दादांची, एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद कमी व्हावी, यासाठी भाजप षडयंत्र आणत आहे. एकनाथ शिंदे यांच्या काही नेत्यांना देखील भाजपने जवळ केले आहे. - आम्ही जेव्हा अजित दादा, एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांच्या करप्शन वर बोलतो तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्यांना जवळ करून चर्चा करतात अभय देतात, कुठल्याही नेत्यावर आत्तापर्यंत कारवाई झालेली नाही. - मुख्यमंत्र्यांकडे पूर्ण ताकद आहे फायनान्सची कुठलीही फाईल मुख्यमंत्र्यांकडून जात असते. - मुख्यमंत्री फक्त वाद लावतात आणि त्या नंतर दोन्ही पक्षाचे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि मुख्यमंत्री त्यांची नाराजी दूर करतात.. असे चालले आहे.. पुढे कदाचित भाजपची असू शकते. ऑन मराठवाडा शेतकरी आत्महत्या. - शेतकरी आत्महत्यावर ठोस उपाय केलागेला पाहिजे. भावांतर योजना योग्य पद्धतीने लागू करणे गरजेचे. - या राज्यात आज आठ शेतकरी रोज आत्महत्या करतात. ऑन उर्दू भाषा - ज्याला कुणाला उर्दू भाषा शिकायची आहे0त्यांनी शिकावी. उगाच कन्फ्युजन करू नये. ज्याला कुणाला तिसरी चौथी भाषा शिकायची तेथे वेगळे क्लासेस घ्यावे आणि त्या क्लासेस ना सरकारने अनुदान द्यावं. ऑन जरांगे शेतकरी आंदोलन - आम्ही आमच्या पक्षाबद्दल बोलू शकतो. सामाजिक संघटने, सामाजिक नेत्याबद्दल बोलू शकत नाही. आम्ही आमच्या पक्षाचा विचार शिव,शाहू, फुलेंचा आहे. तो पुढे घेऊन चाललो आहे. ऑन चिन्ह निर्णय - धनुष्यबान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ शकतो, घड्याळ आमच्याकडे येऊ शकते. अशा परिस्थितीत यांना भाजपमध्ये विलीन व्हाव लागेल, दुसरा ऑप्शन आहे पुन्हा निवडणुका सामोरे जायाच आणि तिसरा ऑप्शन आहे काही आमदार आमच्याकडे यायचं. उद्यासाठी सर्वजण वाट बघूया, उद्याचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. लोकशाही टिकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट नक्कीच योग्य निर्णय देईल. ऑन बावनकुळे वक्तव्यं - काही छोटी मोठी घटना घडल्यास यांचे नेते लगेच सोशल मीडिया वर व्यक्त होतात. मात्र हल्ला झाल्यानंतर सहा आठ तासाने सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. जर यांचे नेते लगेच व्यक्त झाले असते तर हे मनुवादाला समोरून धन करत नसल्याचं समजलं गेले असते. ऑन मुंबई प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तक फेकली. - जी घटना घडली ती योग्य नाही. हे लोकशाहीला घातक आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 07, 2025 06:47:24
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 07, 2025 06:04:31
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव: शेतकरी कर्जमाफीसाठी धाराशिव मध्ये शेतकरी उपोषण सुरू भूम आणि धाराशिव मध्ये शेतकऱ्यांचे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा दिवसांपासून शेतकरी संघटनेचे उपोषण तर भूम येथील उपविभागीय कार्यालयासमोरही शेतकरी कर्जमाफीसाठी उपोषण Anc: महापुराच्या संकटानंतर धाराशिव मध्ये शेतकरी कर्जामाफीची मागणी जोर धरत आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी धाराशिव चा भूम आणि धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन स्वतंत्र उपोषण सुरू आहेत. भूम येथे हरिभक्त पारायण सतीश महाराज कदम यांच्याकडून उपोषण सुरू असून त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनहित शेतकरी संघटनेचा सहा दिवसांपासून अमरन उपोषण सुरू आहे. शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा ही प्रमुख मागणी या उपोषणकर्त्यांची आहे. महापुराच्या संकटानंतर अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी ही मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 07, 2025 06:00:37
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... औसा तालुक्यात बँकेकडून शेतकऱ्याला नोटिसा... बँक नोटीस प्रकरणावर मनसे आक्रमक.... मुख्यमंत्री म्हणाले नोटीस नाही. तरीही बँकांचा तगादा सुरूच.... नोटीस प्रकरणात मनसेची थेट बँकेत एंट्री.... मि नवीन आहे असं म्हणत बँक अधीकार्याकडून टाळाटाळ ... अधिकाऱ्यांनी काढला पण.... संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.... लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. कोणत्याही शेतकऱ्याला नोटीस दिल्या जाणार नाहीत असं विधान राज्याचे मुख्यमंत्री स्वतः अनेक वेळा केलं असतानाही, बँकांकडून नोटीस देण्याचा सपाटा सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील काही शेतकऱ्यांना देखील अशा नोटिसा दिल्याचे समोर आले आहे. औसा तालुक्यातील विशाल करंडे या शेतकऱ्याला एका बँकेने नोटीस पाठवल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली. मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांनी थेट बँकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला. त्यावर अधिकाऱ्याने “मी नवीनच आलो आहे” असं सांगत जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी आणि मनसे कार्यकर्त्यांनी घेराव घालताच अधिकारी तिथून पळ काढताना दिसला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 07, 2025 05:31:26
0
comment0
Report
Advertisement
Back to top