Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412210

उत्तर पुणे में बिबटों के बढ़ते हमलों के बीच वन विभाग ने जागरूकता शुरू की

HCHEMANT CHAPUDE
Nov 10, 2025 07:32:07
Shirur, Maharashtra
उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याचे वाढते हल्ले हि गंभीर बाब बनली असून नागरिकांचे भरदिवसा घराबाहेर पडणं अवघड झालंय त्यामुळे बिबट्या पासून संरक्षणासाठी जनजागृती व्हावी यासाठी वन विभागाकडून गावागावात चौका चौकात जनजागृती पर बॅनर लावण्यात आले असून खबरदारी संदर्भातला व्हिडिओ हि सोशल मीडिया वरती प्रसारित करण्यात आलाय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Mar 14, 2026 07:46:43
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 14, 2026 07:15:26
Shirdi, Maharashtra:मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस तणझाईची झळ आता धार्मिक स्थळांनाही… राज्यात गॅस तंåचाईचे संकट गडद होत असताना शिर्डीतील साई संस्थानचा मोठा निर्णय… गॅस बचतीसाठी साई संस्थान प्रशासनाने केला लाडू प्रसाद वितरणात बदलाव.. आता दर्शनानंतर प्रत्येक साई भक्ताला दिलं जाणार फक्त एकच लाडू पाकीट... पूर्वी भाविकांना एकापेक्षा अधिक मिळत होती लाडू पाकिटे , मात्र परिस्थिती पाहता साई संस्थानचा निर्णय… साई संस्थानकडे सध्या सुमारे २० दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक… मंदिर परिसरातील सर्व लाडू काउंटरवर प्रशासनाने लावले सूचना फलक... गॅस वापर कमी करून लाडू निर्मिती प्रक्रिया सुरळीत ठेवण्याचा संस्थानचा प्रयत्न… राज्यात वाढत्या गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक संस्थांनकडूनही उचलली जाताय गॅस बचतीची पाऊले... सूचनाफलक लावलेल्या लाडू काउंटरवरून आढावा घेत भाविकांशी बातचीत केलिए आमचे प्रतिनिधी कुंNAL JAMDADE यांनी...
205
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 14, 2026 06:47:18
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर: आयटी पार्क मधील सामुदायिक स्वयंपाकघरात गॅसची अडचण नसल्यामुळे 40 हजार विद्यार्थ्यांसाठी सोलारवर खिचडी शिजवली जाते. वाफेच्या यंत्रणा, सौरऊर्जेच्या मदतीने खिचडी शिजवली जाते. एलपीजी गॅस सिलिंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर, या स्वयंपाकघरात वाफेवर चालणारी यंत्रणा आणि सौरऊर्जेचा वापर करून प्रभावी पर्याय तयार झाला आहे. या प्रणालीमुळे दररोज सुमारे 35 ते 40 हजार विद्यार्थ्यांसाठी पोषणमूल्ये जपून अन्न शिजवले जाते, तसेच एलपीजीवर अवलंबून न राहता सौरऊर्जेचा वापर केला जातो. चिकलठाणा औद्योगिक परिसरातील आयटी पार्क येथे त्यांच्या वतीने सामुदायिक स्वयंपाकघर चालविले जाते. आज जिल्ह्यातील दररोज 40 हजार शालेय विद्यार्थ्यांपर्यंत शालेय पोषण आहार तयार करून पोहचविण्याचे काम केले जाते. शहरी भागातील सुमारे 168 शाळा आणि त्यातील 38 हजार विद्यार्थी तसेच 80 बालवाड्यांमधील 3500 बालकांपर्यंत हा आहार पोहोचवला जातो. शासकीय कर्करोग रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी दररोज जेवण देण्यात येत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या IT पार्क मध्ये गॅस सिलिंडरची झंझट नसल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
153
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 14, 2026 06:35:07
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - राजकारणात 'पुष्पा' स्टाईलची गरज नाही, आम्ही जन्मापासूनच झुकत नाही - मंत्री उदय सामंत. अँकर - राजकारणात 'पुष्पा' स्टाईलची गरज नाही, आम्ही जन्मापासूनच झुकत नाही,अशी फटकेबाजी शिवसेना शिंदे गटाचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिवसेना म्हणजे संघर्ष, शिवसेना म्हणजे आक्रमकता, सध्या सगळीकडे 'पुष्पा' चित्रपटाची चर्चा असते, पण आम्हाला चित्रपटातल्या सारखं 'झुकेगा नही' म्हणण्याची गरज नाही. कारण आम्ही जन्मापासूनच कोणासमोर झुकलेलो नाही, अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना टोला लगावला.शिवसेना सांगली जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीच्या वाळवा येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
150
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 14, 2026 06:33:54
Manchar, Maharashtra:सध्या देशभरात घरगुती गॅसचा तुटवडा जाणवत असून अनेक ठिकाणी गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागात काही शेतकरी बायोगॅस प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण झाल्याचे सकारात्मक चित्र समोर येत आहे. ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून सुरू असलेले बायोगॅस अर्थात गोबर गॅस प्रकल्प आजच्या इंधन तुटवड्याच्या काळात अत्यंत उपयोगी ठरत असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांकडे गाई-म्हशींचे गोठे असल्याने त्यातून मिळणाऱ्या शेणापासून बायोगॅस तयार केला जातो. या गॅसचा वापर घरगुती स्वयंपाकासाठी केला जातो. विशेष म्हणजे केवळ दोन गाई असल्या तरीही छोट्या स्वरूपात बायोगॅस प्रकल्प उभारता येतो. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी या प्रकल्पाचा लाभ घेतला असून सध्याच्या गॅस तुटवड्याच्या परिस्थितीतही त्यांचे घर स्वयंपूर्णपणे चालत असल्याचे दिसून येतंय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
135
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 14, 2026 06:17:02
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेदरम्यान झालेल्या गैरप्रकारांप्रकरणी प्रशासनाने कठोर कारवाई करत आतापर्यंत एकूण ५१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.शिक्षण आयुक्तांनी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी परीक्षा काळातील गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार जिल्ह्यात गुन्हे नोंद असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्यात आली.यापूर्वी ५ मार्च रोजी २२ जणांना निलंबित करण्यात आले होते, तर त्यानंतर आणखी २९ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यासंदर्भातील आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी दिले असून या कारवाईमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
164
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 14, 2026 06:01:13
179
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 14, 2026 05:47:22
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग: सोलापूर जिल्ह्यातील एक्स्पोर्ट दर्जाचे द्राक्षे दुबई ऐवजी युरोपला पाठवण्याच्या निर्णय. सोलापुरातील द्राक्ष उत्पादकांच्या मालाला युके आणि यूएस मध्ये चांगली मागणी. सोलापूरातील द्राक्षे आता आखाती देशाऐवजी युरोपमध्ये निर्यात केला जात आहे. आखाती देशापेक्षा यूएस मध्ये द्राक्ष मालाला चांगला भाव मिळत आहे. युद्धामुळे आखाती देशात जाणार माल थांबला होता. मात्र युरोप मध्ये हा माल निर्यात केला जात आहे. विशेष म्हणजे युरोप मार्केटमध्ये भारतातील माल दुप्पट दराने खरेदी मिळत आहे. आम्ही आखाती देशात माल पाठवत होतो मात्र आता तो माल युरोपला पाठवतोय. पूर्वी युरोप मध्ये 80 रुपये दर मिळत होता मात्र आता 160 ते 165 रुपये दर मिळतोय. त्यामुळे आम्हाला समाधानकारक दर मिळत आहे.
181
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 14, 2026 05:16:06
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरात गेल्या 10 दिवसांपासून अन्नत्याग सत्याग्रह करणारे पर्यावरण अभ्यासक बंडू धोत्रे यांचे आंदोलन अखेर मागे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज होणाऱ्या चंद्रपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारला बंडू धोत्रे यांच्या आंदोलनाची सांगता करण्यात यश आले. शासनाने धोत्रे यांना अपेक्षित आश्वासन दिले. अँकर: गेल्या 10 दिवसांपासून चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह करणारे पर्यावरण अभ्यासक बंडू धोत्रे यांच्या आंदोलनाची सांगता करण्यात आली. लोहारडोंगरी येथील प्रस्तावित लोहखाणीला राज्य सरकारने काल स्थगिती दिली होती. परंतु वन्यजीव मंडळाने लोहारडोंगरी येथील खाणीला दिलेली परवानगी रद्द केली, त्यानंतर उपोषण मागे घेण्याची अट होती. सरकारने सुधारित आदेश काढला आणि वन्यजीव मंडळाने दिलेली मंजुरी पुढील बैठकीत रद्द केली जाईल अशी आश्वासन देण्यात आले. यानंतर बंडू धोत्रे यांनी उपोषण अखेर दहाव्या दिवशी मागे घेतले. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी बंडू धोत्रे यांना सरकार तर्फे पत्र दिलं, त्यानंतर धोत्रे यांनी आपलं उपोषण संपविले.
173
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 14, 2026 05:15:40
Shirdi, Maharashtra:एकीकडे आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकार करत असताना दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातून सहकाराच्या माध्यमातून उभारलेल्या प्रकल्पातून दररोज 10 ते 12 टन CNG गॅसचे उत्पादन सुरू असून ऑईल कंपन्याच्या माध्यमातून त ग्राहकांपर्यंत देखील पोहचवला जातोय. काही महिन्यापूर्वी देशाचे सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या देशातील पहिल्या सहकारी कारखान्याचा माध्यमातून उभारलेल्या CNG प्लांट मधून आता उत्पादन सुरू झाले असून शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या या प्रकल्पातून दररोज CNG गॅस ग्राहकापर्यंत पोहचवला जातोय. राज्य व देशातील सहकार क्षेत्राने असे प्रकल्प कार्यान्वित केले तर अन्नदाता हा ऊर्जादाता तर होईलच मात्र आत्मनिर्भर भारत हे स्वप्न देखील पूर्ण होईल यात शंका नाही..
133
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 14, 2026 05:15:16
Washim, Maharashtra:धरण व लघु प्रकल्पांतील जलसाठा झपाट्याने कमी होत असून सध्या केवळ ३२.१४ टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात एकबुर्जी आणि सोनल हे दोन मध्यम प्रकल्प असून उर्वरित ७५ लघुप्रकल्पांमध्येही पाणीपातळी घटत आहे. एकबुर्जी प्रकल्पात ३३.०८ टक्के, तर सोनल प्रकल्पात ३१.६२ टक्के जलसाठा आहे. लघु प्रकल्पांमध्येही पाणी कमी झाले असून वाशिम तालुक्यात ३३.६९ टक्के, मालेगावमध्ये१९.८१ टक्के आणि रिसोडमध्ये १७.५१ टक्के जलसाठा आहे. वाढत्या तापमानामुळे पाणीसाठा घटत असल्याने उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याचे नियोजन प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे
146
comment0
Report
Advertisement
Back to top