410509
जमीन के विवाद में एक भाई ने दूसरे की गेहूं फसल ट्रैक्टर से रौंद दी
Ambegaon, Maharashtra:आंबेगाव/पुणे – आंबेगाव तालुक्यातील देवगांव येथे जमीनविरोधात होणाऱ्या वादामुळे एका भावाने दुसऱ्या भावाचे काढणीला असलेले गव्हाचे पिक ट्रॅक्टरने रोटरून टाकले, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गणेश धुमाळ असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. तक्रार केल्यानंतरही न्याय मिळाला नाही असे शेतकऱ्याने म्हटले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सोलापुर जिला परिषद में कुलदीप जंगम का स्थानांतरण, कुशल जैन बने नए सीईओ
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - जिल्हा परिषदेचे साईओ कुलदीप जंगम यांची बदली तर कुशल जैन नवे सीईओ म्हणून घेणार पदभार - सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची बदली - तर कुशल जैन हे सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून घेणार पदभार - कुलदीप जंगम यांची पिंपरी चिंचवड येथे अप्पर आयुक्तपदी बदली - कुशील जैन हे युवा तसेच तांत्रिक दृष्टikोन असलेले अधिकारी असून त्याचा जिल्ह्याला नक्कीच फायदा होणार आहे0
0
Report
जालना में 20-25 एकड़ मक्का जलकर खाक, किसानों को बड़ा नुकसान
Jalna, Maharashtra:जालना : 20 ते 25 एकरावरील मका जळून खाक, बरंजळा साबळे येथील घटना. जालन्यात सोंगणीला आलेल्या मका पिकाला आग लागून 20 ते 25 एकर मका पीक जळून खाक झालं आहे. भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे येथे ही घटना घडलीय. उभ्या असलेल्या मकाच्या पिकाला आग नेमकी कशी लागली याचं कारण कळू शकलेलं नाही. दरम्यान या आगीत 20 ते 25 एकर मका पीक जळून खाक झालं्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. ही आग लागताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. मात्र तोपर्यंत 20 ते 25 एकरावरील मका पीक जळून खाक झालं होतं.0
0
Report
पुणे-इंदौर महामार्ग पर ट्रक-आयशर टेम्पो का भीषण हादसा, एक व्यक्ति घायल
Yeola, Maharashtra:पुणे–इंदोर महामार्गावरील येवला तालुक्यातील बाभुळगाव येथे ट्रक आणि आयशर टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून आयशर टेम्पो पलटी झाला. अपघातानंतर ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला स्थानिक नागरिकांनी बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.0
0
Report
Advertisement
रायगढ़ किले के प्री-वेडिंग शूट पर कार्रवाई, तीन के खिलाफ मामला दर्ज
Chendhare, Maharashtra:स्लग - किल्ले रायगडावरील प्री वेडिंग शूट प्रकरण ...... अखेर पुरातत्व विभागाने उगारला कारवाईचा बडगा ...... एका तरुणीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल ....... अँकर - किल्ले रायगडावरील प्री वेडिंग शूट प्रकरणी अखेर पुरातत्व विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यात एका तरुणीसह दोघांविरोधात महाड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. हे बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पुरातत्त्व विभागाची कुठलीही परवानगी न घेता चित्रीकरण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. रायगडावर शिवसमाधी परिसरात प्री वेडिंग शूट झाल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. झी २४ तासने याबाबतचे वृत्त दाखवल्यानंतर कारवाईची मागणी सर्व स्तरातून होत होती.0
0
Report
नागपुर महापालिका सदस्यता नामांकन पर कांग्रेस में नाराज़गी
Nagpur, Maharashtra:नागपुरात महापालिका स्वीकृत सदस्यत्व पदावरून वरून काँग्रेसमध्येही नाराजी नाट्य रंगले आहे. काँग्रेसचे प्रदेश महासचिव अतुल कोटेच्या व आमदार विकास ठाकरे यांचे पुत्र केतन ठाकरे यांनी स्वीकृत सदस्यापदासाठी काँग्रेस आयुक्तांकडे अर्ज दाखल केले आहे. मात्र त्यांच्या नावाची घोषणा होताच काँग्रेस मधील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केलीय0
0
Report
कोंडवाडे में डमी कार्रवाई: पिंजरे में कुत्तों से राजनेतिक आरोप
Bhandara, Maharashtra:कोंडवाड्यात ‘डमी’ कारवाई ? पिंजऱ्यात कैद श्वान, फोटोसाठी रंगरंगोटी.... प्राणीप्रेमींचा पत्रकार परिषदेतून आरोप.... केवळ फोटो-लाईव्ह व्हिडिओसाठी श्वान आणल्याचा दावा, सखोल चौकशीची मागणी.... नगर परिषदेने सर्व आरोप फेटाळले.... नगरपरिषदेच्या नसबंदीच्या नावावर काही मोजक्या आणि खाजगी कुत्र्यांना आणून शासनासमोर केवळ कारवाईचा दाखवा करण्यात आल्याचा आरोप शक्ती अँड पॉस संस्थेच्या अध्यक्ष सुरेखा माहुले यांनी केला आहे. सुरेखा माहुले यांनी पत्रकार परिषदेतून नगरपरिषदेवर शासनाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप केला. नगरपरिषदेच्या उदासीन धोरणामुळे निर्बिजीकरणाचे उद्दिष्ट साध्य होत नसून, उलट शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. 10 एप्रिल, शुक्रवारला शहरातील कोंडवाड्यात काही श्वानांना पिंजऱ्यात ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच प्राणीप्रेमींनी घटनास्थळी भेट दिली. मात्र, तेथील परिस्थिती संशयास्पद असल्याचे दिसून आले. कोंडवाड्यात केवळ पाच कुत्र्यांना पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते, तर कोंडवाड्यातील दोन खोल्यांच्या भिंतींवर घाईघाईने सफेदीचे काम सुरू होते. यावेळी चुन्याचे डाग कुत्र्यांवरही पडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या संदर्भात उपस्थित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, “आज एका दिवसासाठीच कुत्रे आणले असून, त्यांचे फोटो व लाईव्ह व्हिडिओ काढून केंद्राला पाठवायचे आहेत,” असे उत्तर मिळाल्याचा दावा त्यांनी केला. आणि हेच कारण त्यांनी त्या पाळीव कुत्र्याच्या मालकाला सांगितले होते. प्राणीप्रेमींचा आरोप आहे की, नगरपरिषदेकडून केंद्र शासनाला दिशाभूल करणारी माहिती, तसेच फोटो-व्हिडिओ सादर करून भटक्या कुत्र्यांसाठी काम केल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला जातो. यामागे आर्थिक लाभ मिळवण्याचा हेतू असू शकतो, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी प्राणीप्रेमींनी केली आहे. हे सर्व आरोप नगर परिषदेने फेटाळले असून कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे....0
0
Report
Advertisement
बीड़ बायपास पर हाईकोर्ट वकील की हत्या; अज्ञात हमलावर की तलाश शुरू
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील बीड बायपास रोडवर गांधेली फाट्याच्या जवळ हायकोर्टातील एका वकिलाचा मृतदेह आढळून आला आहे. मिथुन भास्कर असे मृत वकिलाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. अज्ञात व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले, त्या वेळी मिथुन भास्कर मांडीजवळ रक्तस्त्राव झालेल्या दिसला. पोलिसांनी तत्काळ त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.0
0
Report
छत्रपति संभाजीनगर में मोबाइल चोरी के विरोध में युवक पर चाकू से हमला; तीन नाबालिग गिरफ्तार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANC : छत्रपती संभाजीनगर शहरातील एपीआय कॉर्नर परिसरात मोबाईल चोरीला विरोध केल्यामुळे एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करण राधाकिसन जाधव असे जखमी तरुणाचे नाव असून, आरोपींनी त्याच्या पोटात चाकू खुपसला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेचा CCTV फुटेज समोर आला आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
छत्रपति संभाजीनगर के सभी स्कूलों में PAT परीक्षा के समय कड़ी जाँच, विभाग ने दी जानकारी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शाळांची बुधवारी पटपडताळणी झाल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली. शालेय शिक्षण विभागाने पॅट परीक्षेच्या दिवशीच परीक्षेला उपस्थित विद्यार्थी संख्येच्या आधारे ११ एप्रिलला जिल्ह्यातील ९६४ शाळांची पटपडताळणी करण्यात आली. त्यानंतर पॅटच्या दुसऱ्या पेपरच्या दिवशी १४३३ शाळांची पटपडताळणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यात तपासणी करताना गोंधळ उडाला होता. मात्र, दुसऱ्या टप्प्यात नियोजन करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित इंग्रजी माध्यमांच्याबशाळांचा समावेश आहे. ज्या शाळांनी पटपडताळणीसाठी सहकार्य केलेले नाही, त्या शाळांची नोंद करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेय..0
0
Report
Advertisement
धर्मांतरण मामले में बहुराष्ट्रीय कंपनी में 160 कर्मचारियों पर चौकशी शुरू
Nashik, Maharashtra:ब्रेकिंग धर्मांतरण प्रकरणी मोठी घडामोड बहुराष्ट्रीय कंपनीत आता सर्व कर्मचारी वर्क फ्रॉम होम मंगळवारपासून 160 कर्मचाऱ्यांना संपूर्ण चौकशी होईल तोपर्यंत कार्यालयात न येण्याचे आदेश दिल्लीतील हेड ऑफिस एच आर टीमकडून दोन दिवसापासून सुरू आहे झाडाझडती संपूर्ण चौकशी पर्यंत कुठलीही नवीन नेमणूक होणार नसल्याचे आदेश0
0
Report
यवतमाळ धामणगाव मार्ग पर ट्रक में भीषण आग, चालक और क्लीनर सुरक्षित बाहर निकलے
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या धामणगाव मार्गावरील टाकळी फाट्याजवळ कुटार घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली. भर रस्त्यावर बर्निंग ट्रकचा हा थरार अनुभवायला मिळाला. आग लागल्याचे समजतात ट्रक चालक व क्लिनर सुरक्षित बाहेर पडले. यवतमाळ मध्ये उष्णतेची प्रचंड लाट आली असून, तापमानाचा पारा 42.8 अंश सेल्सिअस वर पोहोचला आहे. त्यामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कुटार भरलेल्या या धावत्या ट्रकला आग लागताच घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली, त्यानंतर अग्निशम दलाच्या वाहनाने पाण्याचा मारा करून आगीच महिन्यात आली.0
0
Report
जालना में तरबूज के दाम अचानक टूटे, किसानों को बड़ा नुकसान
Jalna, Maharashtra:जालना : टरबूजाचे दर 10 ते 15 रुपयांवर, शेतकरी अडचणीत अँकर :बंपर उत्पादन, अवकाळी पावसाचा फटका आणि आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जालना जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात sпапडले आहेत. काही दिवसांपूर्वी 30 ते 40 रुपये किलो दराने विक्री होणारे कलिंगड आता थेट 10 ते 15 रुपयांवर घसरले आहे.दरातील या मोठ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. राजूर येथील बाजारात सध्या टरबूज अवघ्या १० रुपये किलो दराने विकले जात असून खरेदीदारांचा प्रतिसादही अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. परिणामी विक्रीअभावी शेतकऱ्यांना कलिंगड फेकून देण्याची वेळ आली.दरम्यान आता अनेक व्यापारी देखील टरबूज खरेदीला विरोध करत आहे.0
0
Report
Advertisement
वर्धा में 43–45°C तापमान के कारण 16 अप्रैल को सभी स्कूल-आंगनवाड़ी बंद
Wardha, Maharashtra:वर्ध्यात उष्णलाटेच्या पार्श्वभूमीवर आज अंगणवाडी व शाळांना सुट्टी जाहिर केली गेली आहे. जिल्हाधिकारी यांनी आदेश निर्गमित केले. अँकर- भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार 16 एप्रिल रोजी जिल्ह्यात तापमान 43 ते 45 अंश सेल्सीअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ही स्थिती विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर अपायकारक ठरू शकते. यासाठी जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांना एप्रिल महिन्यात सुट्टी जाहिर केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या पुर्वसूचनेनुसार जिल्ह्यात 15 एप्रिल रोजी Yellow Alert देण्यात आला असून वर्धा जिल्ह्यात उष्मालाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मागील दोन दिवसापासून वर्धा जिल्ह्यातील अनेक भागात उन्हाची तिव्रता वाढली असून भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार 16 एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्याचे तापमान 43 ते 45 अंश सेल्सीअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकते. उष्मालाटेमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, याकरीता जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळामधील विद्यार्थ्यांना 16 एप्रिल रोजी सुट्टी जाहिर करण्यात आली.0
0
Report
अकोला महापालिका के स्थायी समिति विवाद ने पुलिस मोड़ ले लिया, भाजपा-शिंदे गुट टकराव तेज
Akola, Maharashtra:अकोला महापालिका के स्थायी समिति विवाद ने पुलिस मोड़ ले लिया, भाजपा-शिंदे गुट टकराव तेज0
0
Report
औंढ़ा नागनाथ परभणी पिकअप ने मोटरसाइकिल को टक्कर दी; दो युवकों की मौत
Hingoli, Maharashtra:हिंगोलींच्या औंढा नागनाथ परभणी रोडवर पिकप व मोटरसायकलचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. औंढा नागनाथ शिवारात खंडेश्वरी मंदिराजवळ औंढा नागनाथ कडून येणाऱ्या पिकअप वाहनाने मोटार सायकलला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात मोटरसायकल वरील दोघांचा मृत्यू झाला आहे तर पिकप चालक गंभीर जखमी झाला आहे. सुरज उबाळे गजानन कदम अस अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी येथील हे दोघे तरुण मोटरसायकलने परभणी कडून येत असताना हा अपघात झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात मोटर सायकलच्या अपघातात वाढ झाली आहे...0
0
Report
Advertisement
