Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410401

हॉर्टीकनेक्ट इंडिया 2025: मावळ के गुलाब कृषक मुकुंद ठाकर को विशिष्ट सम्मान

CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 07, 2025 03:50:07
Pune, Maharashtra
नुकताच बंगळुरू येथे पार पडलेल्या हॉर्टीकनेक्ट इंडिया 2025 या आंतरराष्ट्रीय फुल उत्पादकांच्या भव्य प्रदर्शनात, महाराष्ट्राच्या मावळातील गुलाब उत्पादक शेतकरी मुकुंद ठाकर यांचा कर्नाटकी पगडी घालून विशेष सन्मान करण्यात आला. डच गुलाबांच्या टॉप ग्राफ्टिंग नर्सरीचे मालक म्हणून मुकुंद ठाकर यांनी जागतिक दर्जाच्या गुलाबांचे उत्पादन करून, केवळ महाराष्ट्रात नव्हे तर परदेशातील फुल उत्पादकांच्या समोर देखील आदर्श निर्माण केला आहे. हॉर्टीकनेक्ट कमिटीने गौरव करताना मुकुंद ठाकर यांचा प्रवास हा दूरदृष्टी, चिकाटी आणि उत्कृष्टतेचं प्रतिक आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय फुलोद्योग जगाच्या नकाशावर झळकत आहे. या प्रदर्शनात देशभरातील शेकडो शेतकरी, संशोधक आणि निर्यातदार सहभागी झाले होते.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Oct 07, 2025 06:48:10
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 07, 2025 06:47:50
Vasai-Virar, Maharashtra:विरार में अंडर कंस्ट्रक्शन इमारत के १८ व्या मंजिल से दो विद्यार्थ्यांनी उडी घेत आत्महत्या केली. विरार पश्चिम बोळींज परिसरातील घटना. तरुणांचा मृत्यू संशयास्पद. पोलिसांच्या तपास सुरू. अँकर विरारमध्ये अंडर कन्स्ट्रक्शन असणाऱ्या इमारतीवरून दोन विद्यार्थ्यांनी काल सोमवारी रात्री च्यासुमारास उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणांची ओळख पटली असून श्याम सनद घोरई २०, व आदित्य रामसिंग २१ अशी त्यांची नावे असून ते नालासोपारा परिसरात राहणारे आहेत. विरारच्या बोळींज येथील सुपर होम या अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र दोन्हाचा मृत्यू हा संशयास्पद वाटत असल्याचे नागरिकाचे म्हणणे आहे. हे दोन्ही विद्यार्थी कॉलेजमध्ये शिकणारे असून ते नालासोपारा येथे राहणारे असल्याचे सांगितले जात आहे. नालासोपारा येथून विरार येथे या इमारतीमध्ये का आले असावे? त्यांना कोणी बोलावलं होतं? की कोणी त्यांना ढकलून दिलं की त्यांनी स्वतः उडी मारली याचा तपास अर्नाळा पोलीस करत आहेत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 07, 2025 06:47:40
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर... ऑन शेतकरी EKYC - शेतकऱ्यांचा 2200 कोटी रुपयाचा नुकसान झाला होता, 2200 कोटी दिले होते. आता e kyc मुळे पैशे पोहोचले नसावेत. - शेतकऱ्यानं हे साडेआठ हजार नको, हेक्टरी पन्नास हजार रूपये पाहिजे. सरकारने ते द्यावेत. - इ केवायसी बाबत मुख्यमंत्री फडणवीस बँकांना सांगताता मात्र बँकांचे अधिकारी ई केवायसी केल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण करत नाहीत. यामुळे बँका मुख्यमंत्री यांचा ऐकत नाही असेच म्हणावे लागेल. ऑन लाडकी बहीण योजना - लाडक्या बहिणीचा वापर सत्तेत येण्यासाठी केलेला आहे. लाखो लाडक्या बहिणीचे नाव निवडणूक झाल्यानंतर बघण्यात आली आहे. अशी बरीच आश्वासने त्यांच्या नेत्यांनी दिले. मात्र सत्तेत आल्यानंतर अनेक योजना बंद केली जात आहे. - एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणली म्हणून बंद करायची असेल... - *लाडकी बहीण ही योजना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर बंद केली जाईल.* ऑन वैदिक अभ्यासक्रम - प्रोफेशनल कोर्सेसना वाव दिले पाहिजे. आपण वैदिक अभ्यासाकडे अडकून बसलो आहे. ज्यांना शिकायचे आहे. त्यांना शिकू दे आमचा विरोध नाही. - हळूहळू ते मनुवादकडे जाणार आहे. या देशामध्ये मनुवाद यायला पाहिजे अशी प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठात आर एस एस विचाराचे प्रतिनिधी दिले जातात. - सामान्य लोकांना जातीवादमधे अडकवले जाते. मात्र लोकांच्या हातात चार पैशे येतील कसे याचा विचार केला जात नाही.. ऑन शिवसेना - मनसे एकत्र मुंबई निवडणूक. - महाविकास आघाडी निर्माण झाली तेंव्हा शिवसेना सोबत न्हवती, जेव्हा शिवसेना आमच्यासोबत आली तेव्हा कॉमन मिनिमम प्रोग्राम केला गेला. तो कागदावर देखील घेतला गेला. राज ठाकरे - उद्धव ठाकरे एकत्र आले तर ते देखील कॉमनमिनिमम प्रोग्राम बनवतील मात्र, हा आजचा विषय नाही हा विषय आलाच तर वरिष्ठ नेते याबतचा निर्णय घेतील. ऑन मंत्रिमंडळ बैठक - थातूरमातूर उत्तरे देऊ नका, कर्जमाफी झाली पाहिजे. मदत झाली पाहिजे. शेती हेक्टरची मर्यादाही वाढवली गेली पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर होत नसेल तर त्यात जे निकष आहे. त्यानुसार त्या नुकसानग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची ट्युशन फी माफ झाली पाहिजे. - ज्या मजुरांना काम नाही. त्या मजुराच्या एका कुटुंबाला पंचवीस हजार रुपय मदत दिली पाहिजे. ऑन दोन समजतील वाढता तेढ - दोन समाजामधील तेढ कमी करण्यासाठी सरकार कुठेही प्रयत्न करणार नाही. मनुवादी सरकार म्हणावं लागेल. जाती- जातीतमध्ये तेढ निर्माण केल्याशिवाय मनुवाद येऊ शकत नाही. शेतकरी मजूर अडचणीत आहेत. - भाजपचे नेते स्वतः स्वच्छ बोलतात. मात्र बहुजन नेत्यांना पुढे करून ते कसे बदनाम होतील हे पाहतात. ऑन भाजप षडयंत्र. - अजित दादांची, एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद कमी व्हावी, यासाठी भाजप षडयंत्र आणत आहे. एकनाथ शिंदे यांच्या काही नेत्यांना देखील भाजपने जवळ केले आहे. - आम्ही जेव्हा अजित दादा, एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांच्या करप्शन वर बोलतो तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्यांना जवळ करून चर्चा करतात अभय देतात, कुठल्याही नेत्यावर आत्तापर्यंत कारवाई झालेली नाही. - मुख्यमंत्र्यांकडे पूर्ण ताकद आहे फायनान्सची कुठलीही फाईल मुख्यमंत्र्यांकडून जात असते. - मुख्यमंत्री फक्त वाद लावतात आणि त्या नंतर दोन्ही पक्षाचे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि मुख्यमंत्री त्यांची नाराजी दूर करतात.. असे चालले आहे.. पुढे कदाचित भाजपची असू शकते. ऑन मराठवाडा शेतकरी आत्महत्या. - शेतकरी आत्महत्यावर ठोस उपाय केलागेला पाहिजे. भावांतर योजना योग्य पद्धतीने लागू करणे गरजेचे. - या राज्यात आज आठ शेतकरी रोज आत्महत्या करतात. ऑन उर्दू भाषा - ज्याला कुणाला उर्दू भाषा शिकायची आहे0त्यांनी शिकावी. उगाच कन्फ्युजन करू नये. ज्याला कुणाला तिसरी चौथी भाषा शिकायची तेथे वेगळे क्लासेस घ्यावे आणि त्या क्लासेस ना सरकारने अनुदान द्यावं. ऑन जरांगे शेतकरी आंदोलन - आम्ही आमच्या पक्षाबद्दल बोलू शकतो. सामाजिक संघटने, सामाजिक नेत्याबद्दल बोलू शकत नाही. आम्ही आमच्या पक्षाचा विचार शिव,शाहू, फुलेंचा आहे. तो पुढे घेऊन चाललो आहे. ऑन चिन्ह निर्णय - धनुष्यबान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ शकतो, घड्याळ आमच्याकडे येऊ शकते. अशा परिस्थितीत यांना भाजपमध्ये विलीन व्हाव लागेल, दुसरा ऑप्शन आहे पुन्हा निवडणुका सामोरे जायाच आणि तिसरा ऑप्शन आहे काही आमदार आमच्याकडे यायचं. उद्यासाठी सर्वजण वाट बघूया, उद्याचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. लोकशाही टिकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट नक्कीच योग्य निर्णय देईल. ऑन बावनकुळे वक्तव्यं - काही छोटी मोठी घटना घडल्यास यांचे नेते लगेच सोशल मीडिया वर व्यक्त होतात. मात्र हल्ला झाल्यानंतर सहा आठ तासाने सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. जर यांचे नेते लगेच व्यक्त झाले असते तर हे मनुवादाला समोरून धन करत नसल्याचं समजलं गेले असते. ऑन मुंबई प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तक फेकली. - जी घटना घडली ती योग्य नाही. हे लोकशाहीला घातक आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 07, 2025 06:47:24
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 07, 2025 06:04:31
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव: शेतकरी कर्जमाफीसाठी धाराशिव मध्ये शेतकरी उपोषण सुरू भूम आणि धाराशिव मध्ये शेतकऱ्यांचे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा दिवसांपासून शेतकरी संघटनेचे उपोषण तर भूम येथील उपविभागीय कार्यालयासमोरही शेतकरी कर्जमाफीसाठी उपोषण Anc: महापुराच्या संकटानंतर धाराशिव मध्ये शेतकरी कर्जामाफीची मागणी जोर धरत आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी धाराशिव चा भूम आणि धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन स्वतंत्र उपोषण सुरू आहेत. भूम येथे हरिभक्त पारायण सतीश महाराज कदम यांच्याकडून उपोषण सुरू असून त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनहित शेतकरी संघटनेचा सहा दिवसांपासून अमरन उपोषण सुरू आहे. शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा ही प्रमुख मागणी या उपोषणकर्त्यांची आहे. महापुराच्या संकटानंतर अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी ही मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 07, 2025 06:00:37
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... औसा तालुक्यात बँकेकडून शेतकऱ्याला नोटिसा... बँक नोटीस प्रकरणावर मनसे आक्रमक.... मुख्यमंत्री म्हणाले नोटीस नाही. तरीही बँकांचा तगादा सुरूच.... नोटीस प्रकरणात मनसेची थेट बँकेत एंट्री.... मि नवीन आहे असं म्हणत बँक अधीकार्याकडून टाळाटाळ ... अधिकाऱ्यांनी काढला पण.... संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.... लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. कोणत्याही शेतकऱ्याला नोटीस दिल्या जाणार नाहीत असं विधान राज्याचे मुख्यमंत्री स्वतः अनेक वेळा केलं असतानाही, बँकांकडून नोटीस देण्याचा सपाटा सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील काही शेतकऱ्यांना देखील अशा नोटिसा दिल्याचे समोर आले आहे. औसा तालुक्यातील विशाल करंडे या शेतकऱ्याला एका बँकेने नोटीस पाठवल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली. मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांनी थेट बँकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला. त्यावर अधिकाऱ्याने “मी नवीनच आलो आहे” असं सांगत जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी आणि मनसे कार्यकर्त्यांनी घेराव घालताच अधिकारी तिथून पळ काढताना दिसला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 07, 2025 05:31:26
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 07, 2025 05:21:10
Chendhare, Alibag, Maharashtra:अलिबाग - वडखळ मार्गावर शेकापचा रास्तारोको. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक, प्रवाशांचे हाल. शेतकरी कामगार पक्षाकडून रास्तारोको आंदोलन. पेझारी चेक नाक्यावर रास्तारोको. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प. अँकर - जिल्ह्याचे मुख्यालय व पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अलिबाग शहराकडे येणार्‍या जवळपास सर्व रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अलिबाग - वडखळ मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे तर या मार्गाची अक्षरशः चालण झाली असून यासाठी विविध संघटनांनी वारंवार पत्रव्यवहार व निदर्शने करूनही संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झालाय. आज मंगळवारी शेतकरी कामगार पक्षाने चित्रलेखा पाटील तसेच मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पेझारी चेकनाका येथे रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे ज्यामुळे मुख्यालयाकडे येणाऱ्या प्रवाशांना आंदोलनाचा फटका बसला आहे. वाहतूक ठप्प झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 07, 2025 05:18:30
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 07, 2025 05:03:38
Jalna, Maharashtra:जालना | कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे दोन कंटेनर गोरक्षकांनी पकडले दोन कंटेनरमधील 40 ते 50 जनावरांची सुटका तालुका पोलिसात गुन्हा दाखल जालन्यातील रोहनवाडी-ईस्लामवाडी रोडवर ही कारवाई करण्यात आली.सिल्लोडकडून उदगीरकडे जनावरे घेऊन जात असल्याची माहिती काही गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्रीच्यावेळी इंदेवाडी येथील नागरिकांनी कंटेनर अडवून पाहणी केली असता दोन कंटेनरमध्ये दाटीवाटीने जनावरं कोंबल्याचं आढळून आलं.. यावेळी गोरक्षकांनी तालुका पोलिसांना याची माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी जात कंटेनर ताब्यात घेतले.यावेळी कंटेनरमधील 40 ते 50 जनावरांची सुटका केली असून त्यांना जवळील गौ-शाळेत सोडण्यात आलं आहे..या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Oct 07, 2025 04:47:41
Oros, Maharashtra:आगामी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत रंगत वाढताना दिसत आहे. या निवडणुकीत शिवसेनेने नगराध्यक्ष पदावर ठाम दावा केला असून, “आमचा नगराध्यक्ष असावा” अशी भूमिका माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केली आहे. “सावंतवाडी ही एकमेव नगरपरिषद आहे, जिथे आरक्षण नसतानाही महिला नगराध्यक्षा राहिल्या आहेत. शिवसेनेत अनेक सक्षम, कार्यक्षम व लोकप्रिय चेहरे आहेत. गेली अनेक वर्षे सावंतवाडी शहराचा पाठिंबा आम्हाला लाभला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पद महायुतीतून शिवसेनेकडेच सोडण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.” महायुतीच्या बैठकीत या विषयावर अधिकृतरीत्या चर्चा होणार असून, पदवाटपात सेनेला न्याय द्यावा, अशी मागणी ते करणार आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top