Back
बारामती में पानी संकट पर CID जांच तेज, शरद पवार समर्थकों ने उठाई आवाज
JMJAVED MULANI
Mar 05, 2026 08:34:27
Baramati, Maharashtra
सीआयडीच्या तपासाला एक महिना होऊन गेला. खूप अगोदर चौकशीसाठी त्यांना बोलवायला पाहिजे होतं. जे पुरावे आमच्या समोर येत आहेत आम्ही ते पुरावे तुमच्या सर्वांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आम्हाला यश मिळेल असं वाटतं. ही चौकशी खूप अगोदर व्हायला पाहिजे होती असं वाटतं. फक्त लेयर जेट नको तर त्यांची सर्वच विमान ग्राउंड झाली पाहिजेत. त्या कंपनीच्या मालकावर आणि कंपनीच्या संचालकांवर कारवाई झाली पाहिजे. चौकशी लवकरात लवकर पार पाडली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे. सर्वात जास्त अनुभव शरद पवार यांकडे आहे. साठ वर्ष आता त्यांची राजकारणात पूर्ण झाली आहेत. आपल्या देशाला अशा एका नेतृत्वाची गरज आहे. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानतो त्यांनाही त्यांची जाणीव झाली आहे. सर्वांनी पवार साहेबांना पाठिंबा दिला आहे. देश हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पवार साहेबांना राज्यसभेला पाठवला आहे. मी घटनास्थळी सुरुवातीला पोहोचलो होतो. ज्या ठिकाणी विमानतळ आहे तो भाग दुष्काळी पडतो, तिथे पाण्याचा प्रश्न आहे. तुम्ही आज जरी त्या ठिकाणी गेला तरी तुम्हाला मोठी जाडी दिसणार नाही जी आहे ती अगदी छोटीशी लहान झुडुप आहेत. सर्व प्रश्न आम्ही लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आम्ही लढत आहोत. प्राथमिक हा जो त्यांचा अहवाल होता त्याचं स्वागत असेल पण खूप काही गोष्टी आहेत खूप काही प्रश्न आमचे राहिले आहेत ज्याला उत्तर मिळालं नाही. लवकरात लवकर या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळावी. लोकांच्या मनात संभ्रम आहे संशय आहे नक्की काय झालं महाराष्ट्राच्या जनतेला याचे उत्तर मिळावं. आता उन्हाळा सुरू झाला आहे बारामती तालुक्यात उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. 32 गावात जिथे व्यवस्थित पाणी मिळत नाही. त्यामुळे मार्च महिन्यापासूनच पाण्याचे नियोजन करायचा प्रयत्न करत आहोत. पूर्वी बारामतीच्या हक्काचं पाणी आपल्याला मिळत होतं दादा तिथे पालकमंत्री होते त्यांना तालुक्याची माहिती होती. कुठून पाणी आणि कसं आणायचं होतं हे दादांना तिथे माहिती होतं. आता आपला सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल. बारामती तालुक्याचा जो जिराईत भाग आहे त्या भागाला या उन्हाळ्यात पाणी कमी पडू दिले नाही पाहिजे. चाऱ्याचा प्रश्न सोडवावा लागेल. शरद पवार यांनी आमदार असताना मुख्यमंत्री असताना जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना या ठिकाणी आणली होती. शिरसाई भागाची पाहणी करून त्या योजनेची आज मी माहिती घेणार आहे पाहणी करणार आहोत. या उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाण्याची किती आवश्यकता जाणवत आहे ते आपण समजून घेणार आहे त्यांच्यासाठी पुन्हा काम करणार आहे. पुढील आठवड्यात जाणाईची पाहणी असेल किंवा पुरंदर उपसा योजने ची पाहणी असेल ती करेल. नाझरे धरणा मधून देखील खूप पाणी बारामती तालुक्यात येत होतं हे सर्व पाणी आता येत राहिले पाहिजे. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच आपण याचा आढावा घेणार आहोत. आता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. बारामतीच्या हक्कासाठी या जिल्ह्यासाठी लढत राहिला पाहिजे. दादांसारखी दूरदृष्टीचे नेते आज आपल्यात राहिले नाहीत. बारामतीच्या हक्काचं सर्व पाणी आणण्याची जबाबदारी आता आपली सर्वसामान्य नागरिकांची आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 05, 2026 10:08:170
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 10:07:310
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 05, 2026 09:49:180
Report
ABATISH BHOIR
FollowMar 05, 2026 09:48:120
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 09:31:030
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 05, 2026 09:30:480
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 05, 2026 09:25:380
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 09:15:300
Report
KJKunal Jamdade
FollowMar 05, 2026 09:07:110
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 05, 2026 08:36:360
Report
JMJAVED MULANI
FollowMar 05, 2026 08:30:530
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 05, 2026 08:17:520
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 05, 2026 08:03:510
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 05, 2026 07:52:080
Report