Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूर जिला परिषद अध्यक्ष पद के चयन की प्रक्रिया आज दोपहर, पूनम मुक्ता प्रमुख दावेदार

VBVAIBHAV BALKUNDE
Mar 16, 2026 06:03:07
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज. आज ठरणार जिल्हा परिषदेचा अध्यक्ष... पूनम मुक्ता यांचे नाव चर्चेत... लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदांची निवड आज दुपारी होणार असून, ही माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदासाठी 'महायुती च्या पूनम मुक्ता यांचे नाव काही दिवसांपासून चर्चेत आहे. याबाबतची अधिकृत घोषणा दुपारी दोनला होणार आहे. जिल्हा परिषदेची विशेष सभा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होईल, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकांसाठी सकाळी दहा ते दुपारी १२ या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर दुपारी दोनला अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा वेळ दिला जाईल, त्यानंतर प्रत्यक्ष मतदानप्रक्रियेस सुरवात होईल. मात्र, अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड बिनविरोधच होण्याची शक्यता आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Mar 16, 2026 07:07:01
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील महापे येथे टेक्नोसिटी या आलिशान इमारतीत डीजी शेअर मार्केट रिसर्चच्या नावाने सुरू असलेली मोठी फसवणूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली आहे. सायबर पोलिस आणि इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटने संयुक्त छापा टाकून हायटेक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर यात सहभागी असलेल्या इतरांचा शोध सुरू आहे. ही टोळी शेअर मार्केट, इंट्राडे ट्रेडिंग आणि इक्विटी स्टॉकमध्ये गुंतवणूक करून काही दिवसांत दुप्पट नफा कमावण्याचे आमिष दाखवत नागरिकांना फसवत होते. या कॉल सेंटरमध्ये 22 तरुण-तरुणी संगणक आणि व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून देशभरातील लोकांना टार्गेट करुन एक्स-लाइट डायल पॅड वापरून लोकांना कॉल करायचे आणि नंतर 18 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पडून त्यांची फसवणूक करायचे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात 1 कोटी 2 लाख 58 हजार 818 रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आलेय. पोलिसांनी घटनास्थळावरून 12 मोबाईल फोन, 19 सिमकार्ड, लॅपटॉप आणि एक सिम बॉक्स अशी तांत्रिक उपकरणे जप्त केली आहेत.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 16, 2026 07:05:27
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर शहरातील इस्कॉन चे अन्नछत्र बंद होण्याच्या मार्गावर गॅस सिलेंडरचा तुटवडा चुलीवर स्वयंपाक करायला लाकडांची ही कमतरता पंढरपूर शहरात चंद्रभागा नदीच्या पूर्व काठावर इस्कॉन संस्थेचे राधा पंढरीनाथाचे मोठे मंदिर आहे. या ठिकाणी राज्यभरातून भावიკ दर्शनासाठी येत असतात. इस्कॉन संस्थेकडून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना मोफत अन्नछत्र सुरू असते. सकाळी आणि सायंकाळच्या वेळेमध्ये भाविकांना अन्नदान केले जाते. मागील काही दिवसांपासून या संस्थेला आवश्यक असणारे या सिलेंडर मिळत नाहीत. त्यामुळे अन्नछत्र बंद करण्याची वेळ येत्या काही दिवसात येऊ शकते. चुलीवर स्वयंपाक करायचा तर त्यासाठी लाकडांचा पुरवठा सुद्धा होत नाही.तसेच लाकडे तोडून स्वयंपाक करणे हे इस्कॉनच्या विचारात बसत नाहीत त्यामुळे जर आवश्यक गॅस सिलेंडरचा पुरवठा झाला नाही तर अन्नछत्र बंद ठेवावे लागेल
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 16, 2026 07:04:59
Akola, Maharashtra:अकोला शहरातील जुने शहर परिसरातील राजेश्वर गॅस एजन्सीसमोर सध्या नागरिकांचा प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गॅस सिलेंडरचे बुकिंग करूनही ग्राहकांना एजन्सीच्या वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. गॅस मिळत नसल्याने नागरिकांना तासन्तास लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. विशेष म्हणजे एजन्सीवर येणाऱ्या वृद्ध नागरिकांसाठी बसण्याची किंवा पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे उन्हात उभे राहून नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. गॅस मिळत नसल्यामुळे अनेक कुटुंंबांचे स्वयंपाकाचे नियोजन विस्कळीत झाले आहे. परिस्‍थिती इतकी बिकट झाली आहे की काही कुटुंंबांनी पर्याय म्हणून पुन्हा घरगुती चुलीचा वापर सुरू केला आहे. दरम्यान, काही ग्राहकांनी गंभीर आरोप करत एजन्सीकडून बुकिंग असतानाही सिलेंडर इतर ग्राहकांना जास्त दराने विकले जात असल्याचा आरोप केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात असले तरी नागरिकांनी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून गॅस सिलेंडरची टंचाई दूर करावी आणि सर्वसामान्यांना घरगुती गॅस उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 16, 2026 07:03:48
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील सानपाडा परिसरातील पाम बीच रोडवर भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात डोके धडापासून वेगळे होऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली होती. मात्र आता या अपघातात मृत्यू झालेल्या प्रशांत जमदाडे यांच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केलाय. आरोपींनी आमच्या मुलाचा खून केला आहे त्याला मारल आहे, मात्र पोलिसांनी फक्त गुन्हा दाखल करून आरोपींना सोडून दिले. आरोपी बिल्डरच्या घरातील असल्यामुळे पोलीस प्रशासन आरोपींना पाठीशी घालत आहेत. असे आरोप जमदाडे कुटुंबीयांनी केले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही हिट अँड रन ची घटना नाही. तसंच वाहन चालकांनी मद्य प्राशन देखील केलं नव्हतं त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून नोटीस देण्यात आली आहे. तीन मार्चला अपघात झाला होता आणि आरोपींना पोलिसांनी पाच मार्चला अटक केली. त्यानंतर त्यांची टेस्ट केली तर त्यामध्ये मद्यप्राशन केलं असल्याचं आढळलं नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जात आहेत. बाईट- विजय जमदाडे, मृत तरुणचे वडील बाईट - आई, मृत तरुणाची
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 16, 2026 07:01:47
0
comment0
Report
GMGajanan MAchindar
Mar 16, 2026 06:46:55
Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोली जिल्ह्यांमध्ये वाढत असलेल्या तापमानामुळे जिल्ह्यातील शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेला आहे सकाळी आठ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत शाळा भरवल्या जाणार असून वाढत्या तापमानाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी तसे आदेश काढले आहेत आजपासून सकाळी आठ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत शाळा भरवल्या जाणार असून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अशा पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये शाळा भरली जात आहे
116
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 16, 2026 06:15:10
240
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 16, 2026 06:02:05
180
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 16, 2026 05:46:40
171
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 16, 2026 05:32:57
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील अत्यंत संतापजनक भोंगळ कारभार चव्हाट्यावर.. भायंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार घेत असलेल्या 89 वर्षीय महिलेला रात्री उंदाने हाताला कुरतडण्याचे काम केले आहे.. सुहासिनी माठेकर वय 89 वर्ष आहे.. त्यांना 12 मार्च ला रुग्णालयात भरती करून उपचार सुरू आहेत.. त्यांना रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवले आहे.. रुग्णालयाचा एव्हढा हलगर्जीपणा आहे की आयसीयू सारख्या विभागात सामान्य माणसांना प्रवेश नाही मात्र उदरांनी उच्छाद मांडला आहे.. सकाळी 6 वाजता घरचे नातेवाईक त्यांना बघायला गेलं असता हात कुरतडनारा उंदीर पळून गेला मात्र कर्त्यव्यावरील डॉक्टर किंवा नर्सेस यांनी त्यांनी रात्री बघितले नाही.. सकाळी घरचे लोक गेले तेंव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला
153
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 16, 2026 05:22:12
Beed, Maharashtra:बीड: केजजवळ ट्रॅव्हल्स पलटी होवून भडकली आग; २५ प्रवासी जखमी, प्रवाशांचे सर्वच साहित्य जळून खाक... सुदैवाने जीवितहानी नाही..! केज जिल्ह्यातील केज, मांजरसुंबा रोडवर सांगवी ते पिंपळगाव फाट्याजवळ पहाटे सुमारे 2.45 वाजता जळगावहून लातूरकडे जाणारी एसी ट्रावेल्स पलटी झाली. या अपघातात किमान २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर ट्रावेल्सला भीषण आग लागल्याने प्रवाशांचे सामान जळून खाक झाले. स्थानिक पोलिस, रुग्णवाहिका आणि प्रशासनाच्या मदतीने जखमी प्रवाशांना बाहेर काढून केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य केले. दरम्यान, काही प्रवाशांनी चालक वेगात गाडी चालवत असल्याचा आरोप केला असून अपघाताचे नेमके कारण तपासले जात आहे. वेळेत मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
87
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 16, 2026 05:05:56
129
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 16, 2026 05:03:55
Shirdi, Maharashtra:आखाती देशांमध्ये सुरू झालेल्या युद्धाच्या परिणाम भारतात देखील दिसून येत आहेत.. घरगुती गॅस अद्यापही पुरेशा प्रमाणात उपलब्ध असला तरी व्यवसाय व उद्योगांसाठी लागणारा व्यावसायिक गॅसचा तुटवडा अनेक ठिकाणी समोर आलाय .. यावर पर्याय काढत काहींनी चुली देखील मांडल्यात.. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील संजीवनी उद्योग समूह व शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने एक अनोख संशोधन केले आहे.. व्यावसायिक गॅसला पर्याय म्हणून इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे संशोधन पुणे येथील संस्थेच्या मदतीने केले आहे... कोपरगाव तालुक्यातील शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांना सीएनजी प्लांट उभारून सीएनजी गॅस उत्पादन देखील सुरू केले... आणि आता याच साखर कारखाना व संजीवनी उद्योग समूह यांनी संयुक्त विद्यमान व्यावसायिक गॅसला पर्याय काढत अनोख संशोधन केला आहे.. देशभरात इथेनॉल निर्मिती वाढली असून याच इथेनॉल वर आधारित एका स्टोव्हचे संशोधन पुणे येथील संस्थेच्या माध्यमातून झालं आहे.. विशेष म्हणजे व्यावसायिक गॅसच्या खर्चाच्या तुलनेत याचा खर्च परवडणारा आहे..
132
comment0
Report
Advertisement
Back to top