Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना के धनगर नेता दीपक बो-हाडे का उपवास स्थगित, सरकार से जवाब मांगते

NMNITESH MAHAJAN
Oct 02, 2025 12:51:51
Jalna, Maharashtra
जालना ब्रेकिंग: जालन्यात सुरु असलेलं धनगर समाजाच्या दिपक बो-हाडे यांचं उपोषण स्थगित मुलीच्या हस्ते ज्युस पिऊन सोडलं उपोषण धनगर समाजाच्या बैठकीनंतर बो-हाडे यांचा निर्णय काही वेळ सरकारला दिला पाहिजे- बो-हाडे आम्ही आशावादी आहोत, सरकार शब्द पाळेल लढा टिकला पाहिजे म्हणून हे उपोषण थांबवत आहे उपोषण सोडल्यानंतर राज्यभरात फिरणार आहे मुंबईत प्रश्न सुटला नाही तर दिल्लीला जावू उपोषण सोडण्याआधी बो-हाडे यांनी त्यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली. आणि बैठकीत उपोषण सोडण्यासाठीचा निर्णय झाला.. सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे. हा लढा टिकला पाहिजे, सरकारकडून आम्ही आशावादी आहोत.. उपोषण सोडल्यानंतर राज्यभरात दौरा करणार असून गाव खेड्यातला धनगर एकत्र आणणार आहे.. त्यामुळं मुंबईत प्रश्न सुटला नाही तर दिल्लीला जाऊ. असा इशारा यावेळी दिपक बो-हाडे यांनी सरकारला दिलाय..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Oct 02, 2025 15:15:15
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात परदीच्या पावसाने प्रचंड मोठं नुकसान केलेला आहे. पापई केळी या फळबागांचा मोठ्या नुकसान झालेला आहे. त्यात आता पपई उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झालं आहे तर या पावसामुळे पपई पिकावर व्हायरस आला असून, पान पिवळे पळून गळत असल्याने याच्या परिणाम पपई फळावर होत आहे एकट्या शहादा तालुक्यात १०० हेक्टरवर व्हायरसच्या प्रादुर्भाव झालेला आहे. परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झालं आहे त्यातच पपई पिकावर आलेल्या व्हायरसमुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला असून या व्हायरसमुळे पपईच्या उत्पादनात मोठा परिणाम होऊ शकतो त्यामुळे पपई पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांकडून धडपड केली जात आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 02, 2025 15:03:00
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर होणार आहे १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत जाहीर होणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली असून आरक्षण सोडत नंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुकीचे गणित पूर्णपणे स्पष्ट होणार आहे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीची रंगीत तालीम सुरू होईल अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मुदत जानेवारीपासून संपली आहे त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवाराकडून निवडणुकीची प्रतीक्षा केली जात आहे. मात्र १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत जाहीर होणार असल्याने लवकरात निवडणुका लागतील अशी अपेक्षा इच्छुक उमेदवार आणि सर्वच पक्षांकडून व्यक्त केले जाणारे होते.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 02, 2025 13:58:05
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 02, 2025 13:57:40
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी, जी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखली जाते, येथे यंदा प्रथमच दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी पुढील आंदोलनाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. तसेच, दरवर्षी अशाच प्रकारे दसरा मेळावा आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारमधील मंत्री, आमदार, खासदार यांनी सहकार्य करीत आहेत मात्र त्यांना काही मर्यादा असल्याचे पोहरादेवी येथील मंहत सुनील महाराज यांनी सांगितले. बंजारा समाजातील महंत, धर्मगुरू तसेच राज्यभरातील बंजारा समाजातील जाणकार या गोर बंजारा दसरा मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 02, 2025 13:53:39
Pandharpur, Maharashtra:आज विजयादशमीच्या सणानिमित्त विठ्ठल आणि रुक्मिणीला नखशिकांत सोनेरी दागिन्यांनी सजवलेला आहे. विठुरायाला सोन्याची पगडी हातात चांदीची काठी आणि खांद्यावर घोंगडी तर रुक्मिणी मातेला विजयालक्ष्मी रूपामध्ये पोशाख परिधान करण्यात आला आहे. श्री विठ्ठलास सोन्याची पगडी, नामनिळाचा, कौस्तुभ मणी, दंड पेठया जोड, कंगन जोड, हिऱ्याचा मोत्याचा तुरा, शिरपेच लहान, मोत्याची कंटी दोन पदरी, मोठ्याची कंठी एक पदरी, बाजीराव कंठा, पुतळ्यांची माळ, मोहरांची माळ, तुळशीची माळ एक पदरी मोठी, बोरमाळ तीन पदरी, हिऱ्यांचे पैंजण, नवरत्नांचा हार, सोन्याचे घोंगडे, चांदीची कंठी, सोन्याचे पितांबर, सोन्याचे तोडे जोड, लॉकेट इ. अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत. रुक्मिणी मातेस जडावाचा मुकुट, तन्माणी मोठा, खड्यांच्या पाटल्या जोड, मोठी नथ, कर्णफुले जोड, सूर्य, चंद्र, जडावाचे तारवाड जोड, चिंचपेटी हिरवी, हातसर जोड, खड्यांची वेणी, जडावाचा हार, तन्माणी लहान, मोत्याचा कंठा लहान, पाचूची गरसोळी, बाजीराव गरसोळी, खड्याची बिंदी, जाडावाचे बाजूबंद जोड, रूळ जोड, पैंजण जोड, सोन्याचा करंडा, मस्त्य जोड, तारामंडळ, तोडे जोड, सोनाचे बाजूबंद जोड, दशावतारी हार, मद्रासी कंठा, शिन्देहार ३ पदरी, मास पट्टा, सोने साडी, छत्रछामार इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत。
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 02, 2025 13:21:39
Satara, Maharashtra:सातारा - विधान परिषद माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर और माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांनी मनोमिलनाचे संकेत दिले आहेत. काही दिवसांपासून तुम्हा दोघांमध्ये मनोमिलन होणार अशी चर्चा सुरू असल्या बाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना विकासाचे राजकारण करायचे असेल तर मनोमिलन होईल मात्र सत्तेचे राजकारण होणार असेल तर जसं चाललं आहे तसं चालेल. या बाबत वरिष्ठ लक्ष घालतील. मनोमिलन हे दोन मनांचे होते मग रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देखील विचारा अशी टिप्पणी देखील रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे. बाईट - माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 02, 2025 11:50:04
Kalyan, Maharashtra:मी आलोय... आता तरी रस्ते बनवा !! "सण संपले... रस्ते अजूनही खड्ड्यातच! विद्यार्थ्यांची गांधीगिरीतून संतापजनक हाक – कल्याण डोंबिवली परिसरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत संताप व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबला. महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित या अनोख्या रॅलीत विद्यार्थ्यांनी हातात महात्मा गांधींचे फोटो घेत ,मी आलोय ..आता तरी रस्ते बनवण्याची मागणी केली.मांडण्यात आला. या रॅलीत महेश गायकवाड यांनी  सहभाग घेतला . त्यांनी सांगितले की, "गणपती गेले, नवरात्री संपली आणि आता दिवाळी आली... तरीसुद्धा रस्त्यांचे काम सुरू झालेले नाही, शहरातील ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, चिखल आणि धोकादायक रस्त्यांमुळे नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, सणवार सगळे संपले तरी रस्ते अजूनही खड्ड्यात आहेत. प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा लवकरच मोठे जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा दिला .गांधी जयंतीच्या दिवशी गांधीगिरीतून विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेला संताप प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार आहे. आता या आंदोलनामुळे महापालिका प्रशासन रस्त्यांच्या कामाला गती देतं का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे
3
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 02, 2025 11:49:18
Kalyan, Maharashtra:कल्याण मधून ढोल ताशाच्या gजlord शिवसेनिक nSिघाले शिवाजी park ला.. कल्याण मधून शिवाजी park शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यासाठी कल्याण मधून शेकडो शिवसैनिक शिवाजी पार्कलावर ढोल ताशाच्या गजरात घोषणा देत रवाना झाले आहेत दर वर्षी दसरा मेळाव्याला संपूर्ण राज्यातून शिवसेनिक मुंबई च्या शिवाजी पार्कवर विचारच सोन लुटायला येत असतात आज देखील कल्याण मधून शकडो शिवसैनिक रवाना झाले आहेत ठाकरे कुटुंब एक झाल्याने विरोधकांना धडकी भरली ठाकरे कुटुंब एकत्र येणे ही महाराष्ट्राची गरज येत्या महापालिका निवडणुका एकत्र लढल्या पाहिजेत मात्र उद्धव ठाकरे जो आदेश देतील त्या आदेशाचे आम्ही पालन करणार असल्याचे शहर प्रमुख बाळा परब
3
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Oct 02, 2025 11:36:28
Palghar, Maharashtra:मुंबईतील गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी सध्या पालघर मधील शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे रवाना होऊ लागले आहेत . पालघरच्या मनोर आणि ढेकळे येथे हजारो शिवसैनिक जमा झाले असून ते येथून पुढे मुंबईकडे रवाना होतील . 500 पेक्षा अधिक गाड्यांमधून हे शिवसेनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईत दाखल होणार असून हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी आम्ही दसरा मेळाव्याला जात असून एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांसाठी 25 हजार रुपयांचं किट वाटप करण्याचा निर्णय घेतल्याच यावेळी जिल्हाप्रमुखांकडून कुंदन संखे यांच्या कडून सांगण्यात आलं .
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top