Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

छत्रपति संभाजी नगर में नगरपालिका चुनाव के लिए 8000 कर्मी नियुक्त, 2016 ने प्रशिक्षण छोड़ा

VKVISHAL KAROLE
Dec 29, 2025 02:32:36
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगर शहरात मनपा निवडणुकीसाठी ८ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आली आहे. या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण रविवारी घेण्यात आले. या प्रशिक्षणाला तब्बल २,०१६ अधिकाऱ्यांनी दांडी मारली. त्यांना नोटीस बजवावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश मनपा आयुक्त, मुख्य निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले. निवडणुकीसाठी १,२६४ मतदान केंद्रे आहेत. कर्मचाऱ्यांना त्यांनानिवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी ४ ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणाकडे ६८९ मतदान केंद्राध्यक्षांनी पाठ फिरवली, तर तब्बल १,३२७ मतदान अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाला गैरहजर होते。
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Dec 29, 2025 04:04:57
Nashik, Maharashtra:जादा नफ्याचे आमिष दाखवून ८० लाखांची ऑनलाईन फसवणूक.... अँकर शेअर मार्केट ट्रेडिंगमधून जादा नफा मिळवून देण्यासाठीचे आमिष दाखवून अज्ञात व्यक्तींनी तब्बल ८० लाख १० हजार ६५० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. विविध व्हॉट्सअप व टेलिग्राम क्रमांकांवरून अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला. स्वतःला शेअर मार्केट ब्रोकर असल्याचे भासवत त्यांनी ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. विश्वास संपादन करून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ऑनलाईन ट्रान्स्फरद्वारे एकूण ८० लाख १० हजार ६५० रुपये जमा करण्यास भाग पाडले. मात्र, पैसे घेतल्यानंतर कोणताही परतावा न देता आरोपींनी त्यांची आर्थिक फसवणूक केली.या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 29, 2025 04:03:41
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात सीसीआयमार्फत शेतकऱ्यांचा कापूस हमीभावाने खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र ‘कपास किसान’ मोबाईल अ‍ॅपद्वारे करावी लागणारी नोंदणी आणि अत्यल्प वेळेत होणारे स्लॉट बुकिंग यामुळे अनेक शेतकरी कापूस विक्रीपासून वंचित राहत लागतं आहे. मानोरा तालुक्यात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र मंजूर झाले असले तरी कापूस विक्रीसाठी अ‍ॅपवर नोंदणी बंधनकारक आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसणे किंवा अ‍ॅप वापरण्याचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे नोंदणी करताना अडचणी येत आहेत. त्यातच दर शनिवारी केवळ पाच मिनिटांसाठीच स्लॉट बुकिंग उपलब्ध करून दिले जात असल्याने अनेक शेतकरी स्लॉट मिळवू शकत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून असून,सीसीआयकडून खरेदी न झाल्यास हमीभाव व भाव फरकाच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जातअसल्यामुळे स्लॉट बुकिंगसाठी दिलेला वेळ वाढवावा आणि प्रक्रिया अधिक सुलभ करावी,अशी मागणी कापूस शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Dec 29, 2025 04:03:17
Buldhana, Maharashtra:केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या गाडीला अपघात... केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला काल रात्री समृद्धी महामार्गावर वाशीम जिल्ह्यातील मालेगाव नजीक भीषण अपघात झाला. या कार मध्ये प्रवास करत असलेले मंत्री प्रतาปराव जाधव यांचे अंगरक्षक, त्यांचे सहकारी व कारचालक असे तिघे गंभीर जखमी झाले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना नागपूर विमानतळावर पोहोचविल्यानंतर हे तिघे मेहकर कडे परत येत असताना रात्री उशिरा हा अपघात झाला. गंभीर जखमींना वाशीम येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे व त्यांच्यावर उपचार सुरू आहे. रात्री उशिरा अपघात घडल्याने याबद्दलची माहिती मंत्री प्रतापराव जाधव यांना देण्यात आली.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 29, 2025 04:03:09
Amravati, Maharashtra:3 जनवरीला बच्चू कडू यांचा चंद्रपूर येथे भव्य आक्रोश मोर्चा; शेतकऱ्याच्या किडनीचा हिशोब घेण्यासाठी बच्चू कडू आक्रमक चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला आहे. आता या प्रकरणी बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले असून येत्या 3 जनवरीला बच्चू कडू चंद्रपूर येथे भव्य आक्रोश मोर्शा काढणार आहे. कर्जापाई किडनी विकणाऱ्या रोशनच्या घरापासून हा मोर्चा निघणार आहे. मानवी अवयवाची तस्करी झाली आहे यावर संशोधन झाले पाहिजे अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्यात एक समिती असले पाहिजे रोशन ला जे 74 लाखाणे लुटल्या गेलं त्याला ते 74 लाख परत मिळायला पाहिजे. मुख्यमंत्र्याच्या विदर्भात जर असं होत असेल तर मग इथले भय संपत का नाही? ह्या सगळ्या घटना थांबत का नाही? हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही लाँग मार्च आक्रोश मोर्चा काढत आहे जोपर्यंत निर्णय होत नाही व पैसे मिळत परत मिळत नाही तोपर्यंत त्या आक्रोश मोर्चाची धग कायम राहील असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला है. बाईट :- बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 29, 2025 04:02:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. निवडणुकीच्या काळात पैशांचा गैरवापर, अमली पदार्थांची तस्करी आणि मतदारांना प्रलोभने देण्याचे प्रकार रोखण्यासाठी निवडणूक प्रशासनाने कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून शहराच्या विविध भागांत आणि प्रवेशद्वारांवर 'स्थिर पथके' तैनात करण्यात आली आहे. ही पथके चोवीस तास कार्यरत राहून संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत. ​स्थिर पथक हे प्रामुख्याने चेक पोस्टवर तैनात असते. या पथकामध्ये एका कार्यकारी दंडाधिकाऱ्यासह तीन ते चार पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. या पथकाची मुख्य जबाबदारी म्हणजे बेकायदेशीर रोकड, दारू, शस्त्रे आणि मतदारांना वाटण्यासाठी आणले जाणारे भेटवस्तू रोखणे. प्रत्येक तपासणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे या पथकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. शहराच्या सीमावर्ती भागातील नाक्यांवर ही पथके तैनात करण्यात आली असून, प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 29, 2025 03:50:59
Washim, Maharashtra:अँकर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत सुमारे तीन लाख महिला लाभार्थी असून, त्यापैकी अजूनही ३५ ते ४० हजार महिलांची ई-केवायसी प्रक्रिया प्रलंबित आहे. तांत्रिक अडचणी, आवश्यक कागदपत्रांची कमतरता तसेच माहितीअभावी अनेक महिलांना अद्याप ई-केवायसी करता आलेली नाही. मुदत संपल्यास या महिलांना दरमहा मिळणाऱ्या १,५०० रुपयांच्या आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी ई-केवायसीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी लाभार्थी महिलांकडून केली जात आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 29, 2025 03:30:29
Akola, Maharashtra:Anchor : महायुती तसेच महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप अंतिम न झाल्याने कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांनी आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत. जागा वाटपाचा ठोस फार्मूला निश्चित न झाल्यामुळे कोणत्याही पक्षाकडून उमेदवारांची अधिकृत यादीही जाहीर करण्यात आलीली नाही. दरम्यान, अकोल्यात वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असून सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली होती आणि आपल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली होती.आज महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या जागा वाटपाचा फार्मूला निश्चित झाल्यानंतरच दोन्ही आघाड्यांकडून उमेदवारांची नावे जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर एबी फॉर्मचे वाटप करण्यात येणार असून त्यानंतर नामांकन अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नामांकन अर्ज भरण्याचे शेवटचे केवळ दोन दिवस शिल्लक असताना अद्यापही कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने अर्ज दाखल न केल्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 29, 2025 03:15:51
Kolhapur, Maharashtra:इचलकरंजी महानगरपालिकेसाठी भाजपाच्या उमेदवार यादीत दोन नवे बदल करण्यात आले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, निश्चित झालेल्या उमेदवारांना आज एबी फॉर्मचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे काही दिवसापासून इचलकरंजी भाजपामध्ये उमेदवार यादी वरून सुरू असलेला घोळ अखेर संपला आहे. असं असलं तरी इचलकरंजी शहरात भाजपा मध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी भाजपने तयार केलेल्या यादीत अनेकांना संधी न मिळाल्याने मोठा गोंधळ झाला होता, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला स्थगिती दिली. त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांनी नव्या यादीत फारसा बदल न करता उमेदवारी यादी अंतिम केली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top