Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

चंद्रपुर में 515 एकड़ टाइगर सफारी बनकर पर्यटकों के लिए खुलेगी

AAASHISH AMBADE
Nov 10, 2025 06:02:39
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपुरात वनविभाग करणार हमखास व्याघ्रदर्शनाची सोय , 515 एकर परिसरात साकारणार चंद्रपूर टायगर सफारी, वन्यजीव शुश्रूषा केंद्रासह साकारणार अमेरिकन, आफ्रिकन सफारी अँकर:--चंद्रपूरात वनविभाग हमखास व्याघ्रदर्शनाची सोय करणार आहे. चंद्रपूर शहराच्या सीमेवर 515 एकर परिसरात चंद्रपूर टायगर सफारी साकारणार आहे. यात वन्यजीव शुश्रूषा केंद्रासह अमेरिकन, आफ्रिकन सफारी उभारली जाणार आहे. चंद्रपूर वाघांचा जिल्हा आहे. गेली 40 वर्षे उत्तम वने आणि वन्यजीव व्यवस्थापनामुळे जिल्ह्यात वाघांची संख्या वाढली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे यात नियोजनबद्धता आली आहे. अशातच प्रादेशिक वनांत सहज वावरणाऱ्या वाघ आणि इतर वन्यजीवांशी मानवाशी होणारा संघर्ष ग्रामस्थांच्या जीवावर उठला आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी वाघांचे स्थलांतर केले जात आहे. मात्र एकीकडे समस्याग्रस्त वाघ- बिबटे यांना पकडून त्यांना या टायगर सफारीत सोडत पर्यटकांना पिंजरा असलेल्या वाहनातून फिरवत सफारी घडविण्यासाठी वनविभागाने पावले उचलली आहेत. यासाठी वनविकास महामंडळाला जबाबदारी देण्यात आली आहे. याच ठिकाणी एक मोठे वन्यजीव शुश्रूषा केंद्र देखील उभारले जाणार असून देश-विदेशातील पर्यटकांना उत्तम विरंगुळा केंद्र म्हणून चंद्रपूर टायगर सफारी विकसित केली जाणार आहे.
11
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Nov 10, 2025 08:03:37
Pune, Maharashtra:स्लग:- राधाकृष्ण विखे पाटील समर्थक ऑन बच्चू कडू माजी मंत्री बच्चू कडू यांनी विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल होत. या आव्हानाला प्रति आव्हान देत विखे पाटील समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना काळे फासणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. विखे समर्थक आणि भाजपचे ओबीसी जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांना थेट इशारा दिला आहे यापुढे जपून न बोलल्यास, अहिल्यानगर जिल्ह्यात पाय ठेवणे मुश्किल होईल, असा थेट इशारा देखील दादासाहेब सोनमाळी यांनी दिला आहे. यामुळे दोन्ही नेत्यांमधील आणि त्यांच्या समर्थकांमधील हा संघर्ष होताना पाहायला मिळत आहे. बाईट:- दादासाहेब सोनमाळी, जिल्हाध्यक्ष, भाजप ओबीसी, अहिल्यानगर
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 10, 2025 07:58:39
Shirdi, Maharashtra:माजी खासदार सुजय विखे बाईट मुद्दे -\n\nया संपूर्ण प्रकाराबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी उत्तर दिलेलं आहे... \nवडिलांच्या वक्तव्याचा विपर्यास करून दाखवलं गेलं...\nकडू साहेबांनी जी वाक्यरचना केली त्याबाबत मी बोलणार नाही , ते जेष्ठ नेते... चिथवणीखोर वाक्य बोलून चर्चेत येणे हे योग्य नाही...\nआम्ही अतिशय संयमी राजकारणी आहोत , आम्ही कधीही कुठलाहि कायदा हातात घेतला नाही... \nआमच्या कार्यकर्त्यांनी कडू साहेबांना फोन लावला ही क्लिप माझ्याकडे आली...\n मला असं वाटतं हा वाद वाढण्यापेक्षा थांबला पाहिजे..वाद वाढवून शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही...\nविखे साहेबांनी हा वाद सोडून दिलेला आहे , त्यांनी भूमिका मांडलेली आहे..\nमी आमच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विनंती करेल , संयमाने घ्या...\nआपल्याला शेतकऱ्यांसाठी लढायचे आहे...\nदुर्दैवाने काही झालं तर पडसाद उमटतील...\n जे लोक कारखान्यावर बोलतात त्यांच्याबाबत माझं असं मत की बंद पडलेला कारखाना चालवायला घेऊन जा...\n मी राहुरीच्या सभासदांच्या वतीने शब्द देतो उद्धवजी आणि संजय राऊत जी राहुरीचा कारखाना चालवायला घेऊन टाका... \nमोबाईलच्या माध्यमातून ट्वीट करणे सोपे आहे मात्र शेतकऱ्यांसोबत बसून शेती कसने अवघड...\nजी लोकं कधी घराबाहेर आणि मुंबई बाहेर पडली नाही त्यांनी हे ज्ञान आम्हाला सांगायचं हे मला हास्यस्पद वाटतं..\nसुजय विखेंची उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया...
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 10, 2025 07:57:54
Pune, Maharashtra:जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्याला एक लाखाचा बक्षीस बच्चू कडू यांनी जाहीर केल्यानंतर राज्यात खबर उडाली आहे मात्र यावर विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना तो विषय माझ्यासाठी संपला आहे असं सांगत बच्चू कडू माझे मित्र आहेत त्यांना भेटून बोलेल असं म्हटलं आहे तर अहिल्यानगर जिल्ह्यातील विखे समर्थकांनी बच्चू कडू यांच्या आव्हानाला प्रतिस्वाहन देत बच्चू काडू यांची यांची गाडी फोडणाऱ्यांना बक्षीस जाहीर केला आहे यावर बोलताना देखील विखे पाटील यांनी आपल्या नेत्याबद्दल कोणी काही बोललं तर अशी प्रतिक्रिया येणं सहाजिक आहे मात्र असं कोणत्याही कार्यकर्त्यांनी करू नये असं आवाहन केलं असल्याचं म्हटलं आहे
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 10, 2025 07:32:55
Washim, Maharashtra:वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सोयाबीनला विक्रमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी बाजार समितीत ‘बीजवाई (उन्नती)’ या वाणाला तब्बल ८,५३० रुपये प्रति क्विंटलचा उच्चांकी दर मिळाला होता. या दरवाढीमुळे वाशिमसह हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्रीसाठी वाशिमकडे धाव घेतली आहे. काल सायंकाळपासून बाजार समितीत ३५ ते ४० हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली असून, परिसराबात ट्रॅक्टर आणि मालवाहू वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्या बाजारात दरात चढ-उतार सुरू आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना नेमका किती दर मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाशिम बाजार समितीतील ही विक्रमी आवक आणि वाढता दर पाहता, आगामी दिवसांत सोयाबीन बाजाराचा कल काय राहतो, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. याचाच वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी…
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 10, 2025 07:15:50
Kolhapur, Maharashtra:राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धरतीवर कोल्हापुरात बांधलेल्या खासबाग कुस्ती मैदानाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. याचा निषेध म्हणून आज कोल्हापुरातील अनेक पैलवान आणि सजग कोल्हापूरकरानी एकत्र येत आंदोलन केलं. शाहू खासबाग मैदानात शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून निषेध नोंदविला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना वारंवार खासबाग कुस्त्यांचं मैदान दुरुस्त करून खेळाडूंना उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळेच आज अनेक पैलवानांनी शाहू खासबाग कुस्त्याच्या मैदानाकडे धाव घेऊन अभिनव आंदोलन केलं. यावेळी कुस्तीपटू आणि कुस्ती प्रेमींनी कोल्हापूर महानगरपालिकेला दोन दिवसात मैदान सुस्थितीत करून द्यावे अशी मागणी केलीय.. अन्यथा महाराष्ट्रातील पैलवानांना एकत्र आणून मोठा लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला.
1
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 10, 2025 07:03:25
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मंत्री संजय शिरसाट पत्रकार परिषद ऑन शरद पवार मूळ ओबीसी प्राधान्य.. शरद पवार यांनी केलेला वक्तव्य सहज सहजी केलं निर्णय नाही. यामुळे इतर समाजामध्ये संभ्रम निर्माण केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा निर्णयाने जातीवादाला खतपाणी मिळेल. कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका सर्व पक्षाची असावी. - मात्र संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न,त्यांना सांगायचं दुसरे असते. अशा वक्तव्यामुळे चर्चा सुरू होते. ही त्यांच्या पक्षाची भूमिका... - कोणताही टॅग निघत नसतो, जाणीवपूर्वक केलेलं विधान आहे.. ऑन सामना लेख.. - संजय राऊत यांची ताब्यात चांगली नाही. उपचार घ्या. आजार पणात मी शांत बसत नाही हे दाखवण्याचे प्रयत्न आहे. प्रकरणाच्या चौकश्या सुरू आहेत. ऑन मुंबई भाजप निवडणूक... - सर्वच पक्ष निवडणुकिच्या तयारीला लागले आहे. - युती करताना कोणत्या जागा ठेवायच्या कोणत्या द्यायचा अजून ठरले नाही. मात्र आमचे प्रयत्न महायुती असणार आहे. - प्रत्येकाने आपापली ताकद आजमावले आहे. स्थानिक नेत्यांचे मते विचारात घेऊन ठरवणार असे भाजप म्हणाले तीच भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे. अंतिम निर्णय पक्षाचे नेते घेतील. ओन वडेट्टीवार स्वबळ - वड्डेटीवर, भाई जगताप यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. यांचं तळ्यात मळ्यात चालू आहे. अनेक पक्षात अशी प्रकार घडतील. लोकशाही अपेक्षित निवडणुका होतील. ओन मोहन भागवत - मोहन भागवत यांनी केलेलं वक्तव्यात गैर काहीही नाही, त्याचा स्वागत केले पाहिजे. कटुता कमी होण्याचे संकेत होतात. ओन राज ठाकरे सुरक्षा - एखाद्या नेत्याला सुरक्षा देताना समिती ठरवत असते सुरक्षा वाढवली जाते. जाणीवपूर्क असे होत नाही. गुप्त माहितीच्या आधारावर होत असते. On कडू - बच्चू कडू लोकप्रतिनिधी राहिलेले आहे. त्यांनी असे वक्तव्य करणे, त्यांच्याकडून असे वक्तव्य अपेक्षित नाही. त्यामुळे कार्यकर्त्यात चुकीचा संदेश जातो, असे वक्तव्य थांबवले पाहिजे. ओन पणन मंत्री सुनावणी - या संदर्भात मला कल्पना नाही. जे जे खाते पक्षाकडे आहे. त्यांनी तो निर्णय घ्यायचा असे आतापर्यंत आहे.. ओन पुणे लँड - अजित दादा यांनी वारंवार खुलासे केले आहे. जे प्रश्न आहेत. ते गांभीर्याने घेतले पाहिजे. यंत्रणेने आतापर्यंत काय काय केले हे आज स्पष्ट होईल. ऑन हर्षवर्धन सपकाळ. - सपकाळ यांची बालबुद्धी आहे. मोहन भागवत काय करू शकतात, त्यांच्या नेत्यांना पण समजणार नाही. त्याचं स्थान देशात अढळ आहे. ऑन सत्तार अडचण. - अब्दुल सत्तार यांनी काय दिले मला माहिती नाही, कोर्टाचे आदेश पाहून पुढील सांगता येईल. ऑन मातोश्री... - ड्रोन चे वावडे उठवणे योग्य नाही. त्यावर पडदा पाडा, तो सर्व्हे सुरू होत.
3
comment0
Report
KPKAILAS PURI
Nov 10, 2025 06:48:47
Pimpri-Chinchwad, Maharashtra:शीतल तेजवानीच्या अटकेसाठी बावधन पोलिसांची दिरंगाई केली जात आहे. बावधन परिसरातील अमेडिया कंपनीशी संबंधित जमीन व्यवहार प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. शीतल तेजवानीला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून पोलिसांकडून अटकेसाठी दिरंगाई केली जाते, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या प्रकरणात बावधन पोलिसांकडे वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाचा तपास चालू असल्याचं लक्षात येतं. त्या वेळी अजित पवारांचे पदाधिकारी आणि वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे व सुशील हगवणेला अटकेसाठी टाळाटाळ केली गेली. त्यावेळी पोलिसांवर राजकीय दबाव होता, अशाच दबावाचा आत्ता देखील संभव आहे. म्हणून शीतल तेजवानीला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अटकेची दिरंगाई केली जाते, हा प्रश्न उपस्थित केला जातो.
5
comment0
Report
UJUmesh Jadhav
Nov 10, 2025 05:52:10
11
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 10, 2025 05:51:54
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी कचरा दिसून येतो. त्यामुळे सजग कोल्हापूरकर हैरान झालेत. काही महाशयांनी रंकाळा चौपाटीवरच कचऱ्याचे ढीग मांडले. त्यामुळे हैरान झालेल्या काही लोकांनी या कचराच्या ढीगाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. ज्या रंकाळा चौपाटीवर या कचऱ्याचा ढीग होता त्याच ठिकाणी कचऱ्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. कोल्हापूर महानगरपालिका कचरा न उचलल्यामुळे अशा अनोख्या पद्धतीने हा निषेध व्यक्त करण्यात आला. कचऱ्याची प्रतीकात्मक तिरडी सजवून त्यावर 'मला येथून कायमचा उचला' असा मजकूर देखील लिहिला. किमान या मस्कराचा विचार करून कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन आता तरी शहरातील कचरा योग्य नियोजन लावून उचलते का ? याकडे कोल्हापूर शहरातील नागरिकांचे लक्ष आहे.
10
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 10, 2025 05:51:41
Nanded, Maharashtra:Anchor - नांदेड शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या वडेपुरी गावाजवळ काल रात्री बिबट्या आढळला. प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या रत्नेश्वरी देवीच्या मंदिराच्या पायाथ्याशी बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली. काल रात्री साडेसातच्या सुमरास एक व्यापारी कुटुंबं आपल्या कारामधून वडेपुरी भागातून जात असताना त्यांना अचानक बिबट्या दिसला. कर थांबवून त्यांनी या बिबट्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. माहिती मिळताच वन विभागाची टीम ya ठिकाणी पोहोचली. बिबट्याच्या पायाचे ठसे या भागात वनविभागाला आढळले. त्यामुळे बिबट्या या परिसरात आल्याचे स्पष्ट झाले. या भागातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बिबत्याला शोधण्यासाठी वन विभागाची टीम प्रयत्न करत आहे.
5
comment0
Report
Advertisement
Back to top