Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Buldhana443001

चिखली सीट की चर्चा: संजय गायकवाड़ ने next लोकसभा उम्मीदवार पर उठाए सवाल

MNMAYUR NIKAM
Mar 24, 2026 09:18:17
Buldhana, Maharashtra
Bulddhana में आगे कौन लोकसभा लड़ेगा? शिवसेना विधायक संजय गायकवाड का सवाल। विद्यमान शिवसेना सांसद प्रतापराव जाधव की आगे की उमेदवारी पर यह प्रश्नचिन्ह है। साथ ही मित्र पक्ष भाजपा को चुनौती देते हुए आमदार संजय गायकवाड की जीभ घिसरी। आमदार के कार्यालय में चिखली विधानसभा मतदारसंघ के विभिन्न गांवों और विभिन्न पक्षों के कार्यकर्ताओं का शिंदें की शिवसेना में प्रवेश कार्यक्रम पार पड़ा। इस आयोजन में आमदार ने कहा कि मित्र पक्ष से अन्याय होता है तो हमे साथ आने वाले समय में क्या-क्या धोखे होते हैं, यह सभी जानते हैं। चिखली मतदारसंघ में यह चित्र हमने देखा, पर हमने मित्र पक्ष के तौर पर दुर्लक्ष किया। आगे भाषण होंगे, कार्यकर्ताओं पर कितने अत्याचार होते हैं, यह सब अब मेरे पास है। चिखली निर्वाचन क्षेत्र में पार्टी की ताकत बढ़ानी है, अगले लोकसभा कौन लड़ेगा यह सब स्पष्ट है। फिलहाल शिवसेना का सांसद वहां मौजूद है, इसलिए उसे चिंता नहीं। पार्टी के तौर पर चिखली निर्वाचन क्षेत्र मेरा है। दिये गए बयानों से जिले के राजनीतिक गलियारों में हलचल मच गई है क्योंकि संजय गायकवाड ने अगले लोकसभा चुनाव में शिवसेना से किसे लड़ाने पर सवाल उठाए हैं। मित्र पक्ष भाजपा ने भी चिखली में मौजूदा विधायक आश्वेता महाले को चुनौती दी है। इससे महायुती और शिवसेना दोनों में आंतरिक कलह की चर्चा है।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KPKAILAS PURI
Mar 24, 2026 10:21:37
739
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 24, 2026 09:48:25
Shirdi, Maharashtra:दोना दिवसीपूर्वी खरातच्या फार्म हाऊसवरच्या कर्मचाऱ्यांची झाली होती चौकशी... खरातच्या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली पहिली प्रतिक्रिया.. SIT चौकशीनंतर कर्मचाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर... मला याबाबत काहीच कल्पना नव्हती... मी सहा महिन्यापासून फॉर्म हाऊसवर काम करतो... शेती बघणे, झाडांना पाणी घालणं, गार्डन बघणं, बंगल्याची साफ सफाई करणे हे काम करतो.. 17 जहां एकरात उभारलाय फार्म हाऊस.. महिन्यातून 3 ते 4 वेळेस खरात हे बंगल्यावर यायचे, कधी फॅमिलीसोबत यायचे... कधी एकटे यायचे.. चार दोन पाहुणे खरात साहेबांना भेटायला यायचे आणि काही वेळाने निघून जायचे... आम्ही नवरा बायको इथे काम करतो.. आता जे प्रकार त्यांच्याबाबत समोर आला आहे त्याबाबत मला काहीही कल्पना नव्हती... मला कधी याबाबत शंका आली नाही.. खरातच्या बंगल्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया... दोन तीन दिवसांपूर्वी मला SIT ने चौकशीला बोलावलं होतं...
934
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 24, 2026 09:47:41
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीमध्ये प्रहार मूकबधिर दिव्यांग संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे. महापालिका कार्यालयासमोर विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुकबधिर दिव्यांग तरणांकडून निदर्शने करण्यात आली आहेत. शहरांमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम या ठिकाणी जिल्ह्यातील दिव्यांग मूकबधिर तरुणांना कार्यालय मिळावे, तसेच राज्य शासनाच्या वेगवेगळ्या सुविधांचा लाभ मिळावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. सांगलीचे आमदार सुरेश गाडगीळ यांच्याकडून कार्यालय उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका प्रशासनाकडे शिफारस करण्यात आली आहे, मात्र गेल्या दोन वर्षांपासून मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संतप्त मूकबधिर दिव्यांग तरुणांनी पालिकेच्या दारात शिट्टी वाजवत आंदोलन केलं आहे।
954
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 24, 2026 09:36:39
965
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 24, 2026 09:17:34
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री इथं बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरण उघडकीस आलं असून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. श्रद्धा हॉस्पिटलवर टाकलेल्या छाप्यात डॉक्टर युवराज पाटील आणि एजंटला रंगेहात पकडण्यात आलं आहे. या कारवाईनंतर बेकायदेशीर गर्भपाताच्या अनेक सेंटर्सचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे गर्भधारणेनंतर गर्भाचं लिंग जाणून घेणं हे कायद्याने गुन्हा आहे. तरीही मुलाच्या हव्यासापोटी अनेकजण गर्भलिंग निदान करून घेत असल्याचं वास्तव समोर येत आहे. बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांबरोबच त्यासाठी पुढाकार घेणारे पालकही तितकेच जबाबदार आहेत. प्रशासन यंत्रणा अपेक्षेप्रमाणे सतर्क नसल्यामुळे अशा प्रकरणांची व्याप्ती वाढत असल्याचं दिसत आहे. विशेषतः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात अशा प्रकारच्या रॅकेटचं जाळं वाढत चाललं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि इस्फुर्ली पोलिसांनी संयुक्त सापळा रचला. पोलिसांनी एका महिलेला बनावट ग्राहक म्हणून पाठवलं. यावेळी एजंट संभाजी शिंदे याने त्या महिलेकडून २२ हजार रुपये घेतले. त्यानंतर डॉक्टर युवराज पाटील यांनी गर्भलिंग निदान सुरू केलं. याचवेळी पोलिसांनी छापा टाकत डॉक्टर युवराज पाटील आणि एजंट संभाजी शिंदे यांना रंगेहात अटक केली. घटनास्थळावरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठीच्या गोळ्या आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. 2022 साली मुरगुड पोलीस ठाण्यात अवैध वैद्यकीय व्यवसाय प्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदण्यात आला होता. त्या वेळी जिल्हा आरोग्य विभागाच्या छाप्यात रुग्ण नोंदणीशिवाय प्रसूती, गर्भपात आणि शस्त्रक्रिया केल्याचं उघड झालं होतं. मात्र त्याने बेकायदेशीर कृत्य सुरूच ठेवलं. सुरुवातीला ५० हजार रुपये सांगून नंतर तडजोडीअंती २२ हजार रुपयांमध्ये गर्भलिंग निदान झालं असल्याचंही उघड झालं आहे. गर्भलिंग निदानानंतर गर्भपात कुठे करायचा याबाबतही संबंधित डॉक्टर महिलांना मार्गदर्शन करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोल्हापूर, कराड आणि सीमावर्ती भागातील काही हॉस्पिटल्स यासाठी सुचवली जात असल्याचं संशय आहे. या प्रकरणात पुढील तपासातून मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात गर्भलिंग निदानाची यंत्रणा सक्रिय असल्याचं संशय व्यक्त होत आहे. याच माध्यमातून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि औषधांचा पुरवठा केला जात असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. राज्यात PCPNDT सारखा कडक कायदा अस्तित्वात असतानाही आरोग्य विभागामार्फत या कायद्याचा योग्य वापर केला जात नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांची आहे.. त्यामुळे PCPNDT कायद्यातील त्रुटी दूर करून आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पाठबळ देऊनच या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवता येणार आहे. नाहीतर आईच्या पोटातच मुलींचा जीव घेतला जाणार.
1037
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 24, 2026 09:05:27
Solapur, Maharashtra:आखाती देशातील युद्धामुळे खाद्य तेलाचा उडाला भडका - आयात घटल्याने खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ - युद्ध आखातात पण त्याची झळ स्वयंपाक घरात - वाढत्या खाद्यतेलाच्या किमतीमुळे गृहिणी चांगल्याच वैतागल्या - संध्याकाळी देशातील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळित झाले असून त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर होतोय. *सध्याचे खाद्यतेलाचे प्रतिकिलो दर* सोयाबीन तेल - 155 ते 165 रुपये पामतेल - 145 ते 155 रुपये शेंगातेल - 180 ते 200 रुपये करडी तेल - 315 ते 325 सोलापुरात सोयाबीन, सूर्यफूल, पाम आणि शेंगा तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ झालीय. एकीकडे गॅस तुटवण्याचा सामना गृहिणींना करावा लागत असताना आता दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूं�ंची किमती वाढत असल्याने अक्षरशः कंबरड मोडण्याची वेळ आलीय. आखाती देशात युद्ध सुरू झाल्यापासून सतत तेलाच्या किमती वाढत आहेत. खाद्यतेलाच्या किमती वाढत असल्यामुळे आता गृहिणींनी सुद्धा बचतीला सुरुवात केलीय. महिन्याला पाच किलो खाद्यतेल लागत असेल तर त्याचा वापर कमी करून हातात ते अडीच किलो वर आणण्यात आले आहे. मात्र आखाती देशातील सुरू असलेल्या या युद्धाला भारतातील गृहिणी देखील चांगल्याच वैतागल्या आहेत. स्वयंपाकात महत्त्वाच्या असणाऱ्या खाद्यतेलाच्या किमतीतच भरमसाठ वाढ होत असल्याने स्वयंपाक कसा करावा या चिंतेत गृहिणी आहेत. खाद्यतेला सोबतच इतर देखील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पुरुषांनी देखील काटकसरीला सुरुवात केलीय. यात सोबत लवकरात लवकर हे युद्ध बंद व्हावे आणि परिस्थिती नियंत्रणात यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलीय.
1059
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 24, 2026 09:04:07
Nanded, Maharashtra:गॅस सिलेंडर मिळत नसल्याने एका संतप्त ग्राहकाने गॅस सिलेंडरची टाकी रस्त्यावर आदळून रोष व्यक्त केला. सध्या घरगुती सिलेंडर ची उपलब्धता कमी आहे. शहरात प्रत्येक गॅस एजन्सी समोर ग्राहकांच्या रांगा बघायला मिळत आहेत. ग्रामीण भागात गॅस त्यांचाइची तीव्रता अधिक आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद मध्येही गॅस सिलेंडर मिळत नसल्याची परिस्थिती आहे. एजंसी वर चकरा मारूनही गॅस सिलेंडर मिळत नसल्याने एकजन हतबल झाला. त्यानंतर त्याने रागाच्या भरात रिकाम्या सिलेंडर ची टाकी रस्त्यावर आदळआपट करायला सुरुवात केली. बघ्यांनीही या कृतीला अप्रत्यक्ष समर्थन दिले. त्याची हतबलता सर्वांच्याच लक्षात येत होती. एकाने हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला.
1063
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 24, 2026 09:00:55
1083
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 24, 2026 08:10:21
Akola, Maharashtra:अकोला महापालिकेच्या निवडणुकांत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सहा जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर सत्ता स्थापनेच्या वेळी मतांचे विभाजन होऊ नये म्हणून सहाही नगरसेवकांचा एक गट तयार करण्यात आला होता. मात्र नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासात्मक कामांना गती देण्यासाठी सहापैकी चार नगरसेवकांनी उबाठा गटाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काही दिवसांपूर्वी प्रवेश केला. या घडामोडीमुळे अकोला शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता सहा पैकी चार नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेत शिंदे गटाशी जवळीक वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर या चारही नगरसेवकांनी आज सहाही नगरसेवकांची एकत्रित बैठक बोलावली होती. या बैठकीत जुन्या गटनेत्याला पायउतार करून नवीन गटनेता निवडण्याची प्रक्रिया करण्यात आली. आजच्या बैठकीत नगरसेवक विजय इंगळे आणि अशोक खुमकर हे अनुपस्थित होते. दुसरीकडे उबाठा गटाकडून आक्रमक भूमिका घेतली जात असून गटनेते विजय इंगळे यांनी अमरावती विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्रात नगरसेविका सुरेखा काळे, मनोज पाटील, सोनाली सरोदे आणि सागर भारुका यांनी मूळ राजकीय पक्षातून इतर राजकीय पक्षात बेकायदेशीर विलीनीकरण केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, आज सहापैकी चार नगरसेवक उपस्थित असल्याने एकमताने सागर भारुका यांची नव्या गटनेत्यापदी निवड करण्यात आली आहे. आता बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि उबाठा गटाकडून पुढे कोणती भूमिका घेतली जाते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
975
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 24, 2026 08:09:54
1098
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 24, 2026 08:09:41
1037
comment0
Report
Advertisement
Back to top