Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

लाखांदूर में आयुर्वेद अस्पताल में दबंगों का प्राणघाती हमला, पांच गिरफ्तार

PTPRAVIN TANDEKAR
Dec 04, 2025 02:00:22
Bhandara, Maharashtra
भंडारा जिले की लाखांदूर शहर की साकोली रोड पर कथित आयुर्वेदिक अस्पताल में पांच जणों ने घुसकर दो युवकों पर सीमेंट के पत्थर और बेसबॉल स्टिक से प्राणघातक हमला किया। घटना से शहर में दहशत फैल गई। घटना का वीडियो नागरिकों ने रिकॉर्ड किया और सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। घायल अमृतपाल सिंह हैं, जबकि अन्य नाम Dipak Amarpal Singh, Lavli Rajvir Kumar, Suresh Premchand Kumar, Aman Balwan Singh, Abhishek Risipal हैं; ये सभी हरियाणा के निवासी बताए गए हैं। हमले के समय दीपक सिंह और लवली राजवीर कुमार पर हमला किया गया और इन दोनों को पकड़कर पुलिस के हवाले कर दिया गया। बाकी आरोपी मौके से फरार हो गए थे। इसके बाद पुलिस ने इन आरोपियों के विरुद्ध मामला दर्ज किया है।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Dec 04, 2025 02:36:08
Kolhapur, Maharashtra:राज्यपाल नियुक्त आमदारा विरोधातील याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये सुनावणी होणार आहे. तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकालातील राज्यपाल नियुक्त आमदार विरोधक कोल्हापुरातील ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी याचिका दाखल केली आहे. राज्यात 2019 मध्ये अनपेक्षित पणे महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यावेळी तात्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे बारा राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी पाठवली होती. या यादीवर कोश्यारी यांनी कोणताच निर्णय घेतला नाही. त्यानंतर सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर शिंदे यांनी राज्यपाल नियुक्त सात आमदारांची नावे पाठवली. याला राज्यपालांनी तात्काळ मंजुरी दिली. या विरोधात ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर फेब्रुवारी 2025 मध्ये न्यायालयाने राज्यपाल नियुक्त सात आमदारांना प्रतिवादी करण्याचे आदेश दिले होते. यानंतर मोदी हे स्वतः कोल्हापूरचे रहिवासी असल्याने, ही याचिका कोल्हापूर सर्किट बेंच कडे वर्ग करण्याची विनंती कोर्टाकडे केली होती, ही विनंती मान्य झाल्यानंतर आता या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 04, 2025 02:35:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्यातील सन २०१३ पूर्वी नियुक्त झालेलेल्या संस्थेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये, १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समितीने शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी जिल्हाभरातील शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. २७ संघटनांचा सहभाग असलेल्या समन्वय समितीने आंदोलनाची घोषणा केली तर राज्य सरकारने ही बाब कडक भूमिका घेतली असून 1 दिवसाचे आंदोलन असेल तर शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार कापा असे आदेश दिले आहेत त्यामुळं शिक्षक आणि राज्य सरकार संघर्ष चिघळेल असे चित्र आहे....
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 04, 2025 02:32:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn exam issue av Feed attached राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी रोजी व दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहे. परीक्षा २ महिन्यांवर आली असताना अद्याप केंद्रांची निश्चितीच झालेली नाही. गेल्या वर्षी गैरप्रकार झालेल्या केंद्रांची मान्यता रद्द करण्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु, यासंदर्भातील निर्णय आणि पर्यायी व्यवस्था याबद्दल वरिष्ठ पातळीवरून निर्णय होत नसल्याने राज्यातील न nine विभागांमधील परीक्षेच्या नियोजनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्येच सुरू आहे. याअनुषंगाने नुकतीच तदर्थ समितीची बैठक घेण्यात आली. तातडीने परीक्षा घेणार अंतिम केले नाही तर पुढे अडचणी वाढतील असं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले...
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 04, 2025 02:30:23
Jalna, Maharashtra:जालना : महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये गोंधळात गोंधळ,वडील मुलासह, सासू, सुनांची मतदान करण्यासाठी जाताना होणार ताटातूट, 1 हजार 969 आक्षेप आणि हरकती दाखल जालना महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. काही प्रभागांतील हजारो मतदार गायब आहेत, तर काही ठिकाणी दुसऱ्या प्रभागातील नावे घुसवली गेली आहेत. काही प्रभागांत एकाच कुटुंम्बातील व्यक्तींच्या नावांची फोडाफोड होऊन ती नावे दुसऱ्या प्रभागांत गेली आहेत. यामुळे वडील-मुलाची आणि सासू-सुनांची मतदान करायला जाण्यासाठी ताटातूट झाली आहे. आलेल्या आक्षेपांनुसार जवळपास 4 हजार मतदारांच्या नावांचा हा गोंधळ उडाला आहे. राहायला एका प्रभागात असूनही नाव 4 किलोमीटर अंतरावरील प्रभागांत आले आहे. सामाजिक कार्यकत्यांसह जवळपास सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून यावर आक्षेप दाखल झाले आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने 16 प्रभागांतील प्रारूप मतदार याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. परंतु, या याद्यांमध्ये एकाच कुटुंबातील मतदारांचीही ताटातूट झाली आहे. दरम्यान, 3 डिसेंबरपर्यंत हरकती, आक्षेप नोंदवण्याची अंतिम मुदत होती. यामुळे आतापर्यंत आक्षेप, हरकती प्राप्त झाल्या आहेत. यात सर्वाधिक प्रमाण हे प्रभाग बदलल्याचे आहेत. काही आक्षेपांमध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे इतर प्रभागांत गेली आहेत.घरी बसूनच मतदार याद्या केल्याने हा गोंधळ उडाल्याचा आरोप आहे. मतदार याद्यांची सीमांनुसार फोड करणे, प्रभागांच्या सीमा निश्चितीनुसार मतदारांची नावे टाकणे, काढणे हे काम पारदर्शक झाले नाही, अनेक कर्मचाऱ्यांनी घरी बसूनच ही कामे केल्याने गोंधळ उडाला आहे. याबाबत आयुक्तांकडे लेखी तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. आज प्रत्यंत 1 हजार 969 हरकती प्राप्त झाले आहेत. 10 डिसेंबर पूर्वी सर्व हरकतीची पडताळणी करून यादी 10 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 04, 2025 02:16:37
144
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 04, 2025 02:15:42
Jalna, Maharashtra:जालना : भोकरदन मधील गर्भलिंगनिदान प्रकरण, गर्भलिंगनिदानासाठी मध्यप्रदेशातून औषधी पुरवठा जालना जिले भोकरदन तालुक्यातील गवळीवाडी नांजा येथे अवैध गर्भलिंगनिदान प्रकरणात पाच आरोपींना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. बुधवारी त्यांच्या पोलिस कोठडी संपली. न्यायालयात हजर केल्यानंतर सर्वांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. तपासासाठी पोलिस पुन्हा कोठडी घेऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात अवैध गर्भलिंगनिदानासाठी लागणारी औषधे मध्य प्रदेशातून येत असल्याचे समोर आल्याचे आह. गुन्ह्यात शेतमालक, डॉक्टर, गोळ्या पुरवणारा, एजंट अशा 5 जणांचा समावेश आहे. आरोपींमध्ये सतीश सोनवणे, केशव गावंडे, बुलडाण्यातील मेडिकलचालक योगेश चांदा, अनंता चोबे, गोठामालक समाधान सोरमारे यांचा समावेश आहे. योगेश चांदा हा अवैध गर्भलिंगनिदानासाठी गोळ्या पुरवत होता. त्याची फोनपे हिस्ट्री पोलिसांनी तपासली. त्याचे धागेदोरे मध्यप्रदेशपर्यंत गेले आहेत.3 वर्षांपूर्वीची लिंक उघड, त्याच गुन्हेगारांची चौकशी अवैध गर्भलिंगनिदान प्रकरणात वापरी जाणारी औषधे मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांमधून येत होती. मध्यप्रदेशातील काही मेडिकल व्यावसायिक आणि एजंट यात सक्रिय आहेत. ही लिंक स्थानिक गुन्हे शाखेनेतीन वर्षांपूर्वी उघड केली होती. आता या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी सुरु केली आहे.
95
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 03, 2025 14:31:35
Ambernath, Maharashtra:बदलापुरात एक युवकाने अल्पवयीन मुलीला पळवून नेलं मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर तरुणाला अटक फैजल शेख असं या तरुणाचं नाव आहे. त्याने आपल्या ओळखीतल्याच एका 13 वर्षांच्या मुलीसोबत मैत्री केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तरुणाने तिला आपलं नाव तेजस असं सांगितलं. त्यानंतर फूस लावून तो तिला मुंबईला फिरायला घेऊन गेला. मुलीच्या वडिलांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला फोन लावत बदलापूरला बोलावून घेतलं आणि अटक केली. फैजल शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या प्रकाराने बदलापुरात पुन्हा एकदा खळबळ उडालीय。
128
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 03, 2025 14:16:45
160
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 03, 2025 13:46:42
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील ट्वेंटीवन शुगर हा काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांचा साखर कारखाना आहे. या कारखान्याने मागच्या वर्षी उसाला पंचवीसशे रुपये प्रति मॅट्रिक टनाचा दर दिला होता,जो शेतकऱ्यांना परवडला नाही,त्यामुळे उसाला 3 हजार रुपयांची पहिली उचल द्यावी यಾಮागणीसाठी शेतकऱ्यांनी मागील 60 तासापासून ऐन थंडीत कुडकुडत ठिय्या आंदोलन सुरू केलंय, पण तीन दिवस उलटत असतांना ही याकडे अमित देशमुखांनी सपशेल दुर्लक्ष केल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. आता शेतकऱ्यांच्या बाजू भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी घेत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केलीय. शेतकरी ऊस दर वाढिसाठी थंडीत कुडकूडतोय, काँग्रेसचा आणि राहुल गांधी यांचा शेतकरी कळवळा खोटा असल्याचे उपाध्याय म्हणाले,
105
comment0
Report
Advertisement
Back to top