Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

भंडारा के जलशुद्धीकरण केंद्र से दूषित पानी, प्रशासन तात्कालिक कार्रवाई की मांग

PTPRAVIN TANDEKAR
Mar 08, 2026 02:15:41
Bhandara, Maharashtra
भंडारा शहरात मागील १५ दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शहरातील नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असल्याने दसरा मैदान येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी खासदार प्रशांत पडोळे यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान पाणी साठवण टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण, माती, लोखंडाचे कण तसेच मृतावस्थेत पडलेले सरडे आढळून आल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली. याशिवाय केंद्रातील मशिनरीमधून पाणी गळती होत असून त्यामध्ये ऑईल व ग्रीस मिसळलेले असल्याचेही निदर्शनास आले. हेच दूषित पाणी शहरात पुरवठा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार प्रशांत पडोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जलशुद्धीकरण केंद्राची तात्काळ स्वच्छता, यंत्रणेची तांत्रिक तपासणी तसेच संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील प्रशासनाला दिला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Mar 08, 2026 03:32:05
Ahilyanagar, Maharashtra: 'नारी तू नारायणी' महिला म्हणजे स्वतः एक शक्ती आहे तुम्ही ठरवलं तर ती कुठलीही दिव्य काम करू शकते, मनामध्ये आत्मविश्वास असल्यास तिच्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही हेच पाहायला मिळाला आहे अहिल्यानगर येथील रूपाली खिच्ची यांच्यामध्ये शारीरिक व्यंगावर मात करून स्वावलंबी होण्याच्या जिद्दीतून शहराजवळ असलेल्या केडगाव येथील रुपाली खिच्ची यांनी मेहंदी कलेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रूपाली यांना जन्मापासूनच एक हात नाही असं असलं तरी त्या घरातील सगळी कामे स्वतः करतात स्वयंपाकापासून ते घरातील छोट्या-मोठ्या कामांसाठी त्या कोणाचीही मदत घेत नाहीत स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी आपल्याकडे असलेल्या एकाच हाताने आपण काहीतरी करण्याची जिद्द मनात कायम होती. 1998 मध्ये मेहंदी शिकण्याचा विचार केला मात्र मेहंदी क्लास मध्ये देखील सुरुवातीला प्रवेश मिळाला नाही मग स्वतः एका हाताने मेहंदी काढण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र खचून न जाता त्यांनी या कलेत नैपुण्य मिळवल. आता 25 वर्षांहून अधिक काळापासून त्या अतिशय सुंदर मेहंदी काढतात त्यांनी काढलेल्या मेंदीची चर्चा केवळ गावातच नाही तर दूर दूर हाऊ लागली. जिद्दीने सुरू केलेल्या व्यवसायातून चांगलं उत्पन्नही मिळू लागलं यातून त्यांनी बहिणीचे लग्न देखील केले. हा व्यवसाय त्यांनी अनेक गरजू मुलींना देखील शिकवला त्यांना स्वावलंबी केलं आता केडगावच नाही तर नगर शहर आणि दूर दूर वरून त्यांच्याकडे मेंदी काढण्यासाठी नववधू आणि हौशी महिला येतात रूपाली यांनी आपल्या जिद्दीने स्वतःची ओळख निर्माण केली आणि स्वावलंबी झाल्या आहेत त्यांच्या जिद्दीला सलाम
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 08, 2026 03:31:04
Washim, Maharashtra:आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या कौटुंबिक मतभेदांमुळे अनेक वृद्ध आई-वडील आपल्या मुलांकडून दुर्लक्षित होत आहेत. काहीजण तर अक्षरशःरस्त्यावर येतात. पण याच समाजात काही अशी माणसं आहेत जी परक्यांनाही आपल्या आई-वडिलांप्रमाणे जपतात. अशीच एक संवेदनशील कथा आहे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील प्रांजली पाध्ये यांची. ह्या आहेत प्रांजली पाध्ये यांनी चक्क 50 निराधार वृद्धांना आपल्या मायेच्या छत्राखाली आश्रय दिला आहे. त्यांनी वाशिम च्या मालेगाव येथे सुरू केलेल्या “माऊली वृद्धाश्रमात” आज अनेक वृद्धांना घर, माया आणि आपलेपण मिळाले आहे. पण या समाजसेवेच्या मागे त्यांचं स्वतःचंही एक वेदनादायी वास्तव आहे. कोरोना काळात प्रांजली यांच्या दोन्ही किडन्यांना गंभीर दुर्धर आजार झालं होता. डॉक्टरांनी त्यांना काही दिवसच आयुष्य उरल्याचं सांगितलं होतं. आयुष्याचा शेवट जवळ आला आहे असं वाटत असतानाही त्यांनी हार मानली नाही. नियतीने मात्र त्यांच्या हातून काहीतरी मोठं कार्य घडवायचं ठरवलं होतं. आपल्या समाजसेवेच्या जिद्दीमुळे त्यांनी या आजारावर मात केली आणि नव्या आयुष्याची सुरुवात केली. त्या दिवसापासून प्रांजली यांनी एक ठाम निर्णय घेतला “हे आयुष्य समाजाने दिलं आहे, ते समाजासाठीच खर्च करायचं.” याच विचारातून त्यांनी एका छोट्याशा जागेत माऊली वृद्धाश्रमाची स्थापना केली. बाईट: प्रांजली पाध्ये, संचलिका माऊली अनाथ वृद्धाश्रम मालेगाव. सुरुवातीला एक-दोन वृद्धांना आश्रय देणाऱ्या प्रांजली आज 50 निराधार वृद्धांची लेक बनल्या आहेत. त्या सर्व वृद्धांची सेवा त्या आपल्या आई-वडिलांप्रमाणे करतात. महत्त्वाची बाब म्हणजे इतकं मोठं कार्य करत असतानाही शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. तरीही प्रांजली यांची सेवा अखंड सुरू आहे. आश्रमातील वृद्धही सांगतात की प्रांजली आमच्यासाठी लेकीसारख्या आहेत. आम्हाला इथे आई-वडिलांसारखी माया मिळते. आमचा शेवटही इथेच व्हावा अशी आमची इच्छा आहे. एन्ड व्हिओ : आजच्या स्वार्थी होत चाललेल्या जगात परक्यांच्या अश्रूंना माया देणारी ही महिला खऱ्या अर्थाने ‘सावित्रीची लेक’ ठरते. या महिलांना गरज आहे ती दांशुरांनी समोर येऊन मदतीचा हाथ देऊन बळ देण्याची. या महिला दिनानिमित्त अशा वृद्धांचे आधार बनलेल्या प्रांजली पाध्ये यांच्या कार्याला सलाम.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 08, 2026 03:30:35
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 08, 2026 03:19:00
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या तिजोरीत यंदा मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून चांगली रक्कम जमा झाली आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच करवसुलीने २०० कोटींचा आकडा पार केला आहे. १ एप्रिल ते २ मार्च या कालावधीत एकूण २०८ कोटी ६४ लाख १० हजार २३ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. आयुक्त जी. श्रीकांत यांनी मार्चअखेरपर्यंत आणखी २०० कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मनपाने राबवलेल्या 'शास्ती से आझादी' आणि 'शास्ती से मुक्ती' या योजनांमुळे वसुलीचा टक्का वाढण्यास मदत झाली. या योजनांतर्गत मालमत्ता कराच्या थकबाकीवरील दंडव्याजात अनुक्रमे ९५ टक्के आणि ७५ टक्के इतकी मोठी सूट देण्यात आली होती. झोन पाचअंतर्गत सिडको आणि हडको परिसरातील मालमत्तांची संख्या मोठी आहे. तेथील मालमत्ताधारकांनी 'शास्ती से मुक्ती' योजनेचा सर्वाधिक लाभ घेतला
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 08, 2026 03:18:01
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, १८ जानेवारीला छत्रपती  संभाजी नगरात अध्यक्षपदासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाने आपला अध्यक्ष स्वबळावर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या भाजपचे संख्याबळ २६ वर पोहोचले आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला ३२ चा आकडा गाठण्यासाठी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या काही सदस्यांशी गुप्त चर्चा सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. २०१७ मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येत त्यांना सत्तेपासून दूर ठेवले होते, त्या इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपने आता सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषेदच्या ६३ जागांपैकी भाजपचे २३ उमेदवार निवडून आले आहेत. २ भाजप पुरस्कृत जिंकले आहेत. २ दिवसांपूर्वी काँग्रेसच्या एका सदस्याने भाजपमध्ये प्रवेश केल्याने हे संख्याबळ आता २६ झाले आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी ६ सदस्यांची गरज आहे. हे संख्याबळ जुळवण्यासाठी भाजपने महाविकास आघाडीच्या गोटात शिरकाव करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विशेषतः राष्ट्रवादी आणि उबाठा गटातील काही असंतुष्ट सदस्यांना खेचण्यासाठी भाजपकडून विविध स्तरांवर चर्चा केली जात आहे. २०१७ मध्ये शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन केली होती. मात्र, घोडेबाजार आणि फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता लक्षात घेता, आगामी काही दिवस जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे ठरणार आहेत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 08, 2026 03:16:44
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपति संभाजी नगर शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला वेग आला आहे. येत्या १९ मार्च २०२६ पासून जॅкवेलमधून पाणी उपसा सुरू होईल, अशी ग्वाही कंत्राटदार कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दिली, गेल्या सुनावणीत न्यायालयाने या योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला. संबंधित  दुरुस्तीची कामे पुढील १० दिवसांत पूर्ण केली जातील. तसेच १९ मार्चपासून जॅकवेल कार्यान्वित होऊन प्रत्यक्ष पाणी उपसा सुरू केला जाईल. उच्च न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन १६ मार्च रोजी सकाळी ७ ते १२ या वेळेत जॅकवेल आणि इतर कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 08, 2026 03:01:15
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचंसह खासगी आणि अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या परीक्षा 20 एप्रिल ते 26 एप्रिलदरम्यान पार पडणार असून, त्यानंतर 30 एप्रिलपर्यंत संकलित मूल्यमापन चाचणी घेतली जाणार आहे. यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची एकूण 44 दिवसांची सुटी मिळणार आहे. वाढत्या उन्हामुळे परीक्षा लवकर घेण्याची मागणी दरवर्षी समग्र शिक्षा आणि एससीईआरटीकडून एप्रिलमध्ये गणित व भाषा विषयांची मूल्यमापन चाचणी घेतली जाते. यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा 15 दिवस आधीच सुरू झाल्याने त्या मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात संपणार आहेत. वाढता उन्हाचा तडाखा लक्षात घेता, पहिली ते नववीच्या परीक्षाही लवकर घ्याव्यात, अशी मागणी शिक्षकांकडून होत होती. मात्र, एससीईआरटीने एप्रिलमध्येच चाचण्या घेण्याचे निश्चित केल्याने शाळा 30 एप्रिलपर्यंत भरणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सीबीएसई पॅटर्नच्या शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होत आहे. या शाळांच्या वार्षिक परीक्षा मार्चमध्येच आटोपणार असून, विद्यार्थ्यांना 1 मे ते 14 जूनदरम्यान सुट्टी असेल, तर राज्य मंडळाच्या शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होईल.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 08, 2026 02:48:48
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते जलप्रदूषण आणि प्रदूषित पाणी पुरवठा याविषयी नागरिकांच्या वाढलेल्या तक्रारींवर उपाययोजना म्हणून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाण्याच्या पडताळणीसाठी 'त्रयस्थ संस्थे'ची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. पिण्याच्या आणि नद्यांच्या पाण्याची पडताळणी करण्यासाठी एका प्रयोगशाळेची नियुक्ती केली जाणार आहे...! तसा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे...! लवकरच या बाबत निर्णय घेतला जाणार आहे...! निगडी, चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रांत प्रक्रिया करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांत गढूळ, प्रदूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने पाण्याच्या पडताळणीसाठी एका संस्थेची निवड करण्यात आलीय...
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 08, 2026 02:47:49
Chendhare, Maharashtra:स्‍लग – आखाती युदधाचे कारण पुढे करून आंब्‍याचे दर पाडण्‍याचा घाट कोकणातील हापूस आंबा उत्‍पादन बागायतदारांना भीती यंदा प्रतिकूल परिस्‍थीतीमुळे आंब्‍याचा हंगाम लांबणीवर मार्च अखेरीस आंब्‍याची आवक वाढणार तोपर्यंत युदध सुरू राहिल्‍यास आखातातील निर्यातीवर परीणाम अँकर – कोकणात यंदा हापूस आंब्‍याचे उत्‍पादन कमी आणि उशिरा असतानाच निर्यात बाजारावर आखाती युद्धाचे ढग जमा झालेत. जर या महिनाभरात युदध थांबले नाही तर आखातात होणारया आंब्‍याच्‍या निर्‍यातीवर थोडाफार परीणाम होवू शकतो. मुळात शेवटचा मोहोर देखील करपल्‍याने हापूसच्‍या उत्‍पादनावर मोठा परीणाम झाला आहे. त्‍यामुळे यंदाचा हापूस देशात विकला तरी पुरेसा है. असे असताना काही दलाल मंडळी आखाती युदधाचे कारण पुढे करून आंब्‍याचे दर पाडण्याचा प्रयत्‍न करीत असल्‍याची भीती आंबा उत्‍पादन शेतकरी व्‍यक्‍त करीत आहेत. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात हापूस आंबा बाजारात येतो मात्र प्रतिकूल परिस्थितीमुळे उशिरा म्हणजे मार्च अखेरीस आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात येईल त्‍यावेळी जर युद्धजन्य परीस्थिती कायम राहिली तर आंब्‍याचे दर घसरण्याची शक्यता आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 08, 2026 02:31:47
Ahilyanagar, Maharashtra:मुंबईच्या आझाद मैदानावर 12 मार्चपासून राज्यातील विविध कला-क्रिडा शिक्षक संघटनांकडून एल्गार आंदोलन केलं जाणार आहे...जवळपास 2009 पासून राज्यात कला शिक्षक भरती झालेली नाही त्याच सोबतच कला शिक्षक भरतीसाठी जाचक अटी घालण्यात आल्या आहेत ज्यात विद्यार्थी संख्येची अट घालण्यात आलीये...सोबतच विशेष शिक्षकांच्या भरती संदर्भात अद्यापही शिक्षण विभागाला सरकारकडून निर्देश दिलेले नाहीत किंवा त्यांची स्वतंत्र बिंदू नामावली करण्यात आलेली नाही...याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रतिक्रिया दिली असून याबाबत मी संबंधित अधिकाऱ्यांशी लवकरच बोलेल...शिक्षण विभागाचे अनेक प्रश्न सध्या समोर येत आहेत...मग त्यात शिक्षकांना TET परीक्षा बंधनकारक करण्याचा विषय असो किंवा विशेष शिक्षक भरतीचा विषय असो सरकार याबाबत लक्ष घालत आहे असं राधाकृष्ण विखे म्हणाले.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 08, 2026 02:31:36
Nashik, Maharashtra:एका राष्ट्रीयकृत बँकेचे क्रेडिट कार्ड घेण्यासाठी बँकेच्या नावाने लिंक पाठवत ३ खातेदाराचे बँक खाते हॅक करून खात्यातील ३१ लाख ४२ हजाराची रक्कम ऑनलाइन काढून घेत फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. व्यावसायिकाने अॅप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर अनोळखी मोबाईलहून कॉल आला. त्या व्यक्तीने बँकेकडून क्रेडिट कार्ड करिता ऑनलाइन एप्लीकेशन करा, असे सांगितले. बँक लाईफसर्टिफिकेट नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. अॅप डाउनलोड केल्यानंतर त्याच्या मोबाईलसह खात्याचा ताबा घेत ९ लाख ५० हजारांची रक्कम ऑनलाइन काढून घेतली. अन्य दोन तक्रारदारांची अशाच प्रकारे फसवणूक झाली.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 08, 2026 02:16:54
Bhandara, Maharashtra:पवनीतील सावकार दांपत्याची दादागिरी, दोघांकडून केली बळजबरीने व्याजाची वसुली..... अवैध सावकारीचा प्रकार उघड .... पती पत्नीवर गुन्हे दाखल.... पवनी येथील रामपुरी वॉर्डमधील रहिवासी तक्रारदार विशाखा नागपुरे (४४) यांनी पाच वर्षांपूर्वी रेखा खोब्रागडे यांच्याकडून ३ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. १० टक्के व्याजदराने हा व्यवहार ठरला होता. नागपुरे यांनी आतापर्यंत व्याजासह एकूण १३ लाख ८० हजार रुपये परत केले. तरीही, रेखा खोब्रागडे यांनी नागपुरे यांच्या घरी जाऊन तिला शिवीगाळ केली आणि तिच्यावर घरातील वस्तू फेकून मारल्या. पवनी पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२ आणि ३५१ (२) आणि महाराष्ट्र सावकारी कायदा २०१४ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
0
comment0
Report
Advertisement
Back to top