Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

भंडारा जिले में 165 अनुकंपा धारक उम्मीदवारों को नियुक्ति पत्र वितरित

PTPRAVIN TANDEKAR
Oct 05, 2025 03:46:25
Bhandara, Maharashtra
भंडारा जिले में 165 अनुकंपा धारक उम्मीदवारों को नियुक्ति पत्र वितरित. नियुक्ति मिलने वाले उम्मीदवारों में आनंद का माहौल बना हुआ है. शासन की अनुकंपा नियुक्ति योजना के तहत पात्र वारसों को शासकीय सेवाओं में शामिल करने की प्रक्रिया पूरी हो चुकी है और भंडारा जिले में 165 अनुकंपा धारक समेत जिला परिषद के सीधे सेवा से नियुक्त उम्मीदवारों को नियुक्ति पत्र वितरित किए गए. इस कार्यक्रम का आयोजन पुलिस मुख्यालय के पुलिस बहु Zweck सभागृह में बड़ा आयोजन में किया गया. इस कार्यक्रम में आमदार नरेंद्र भोंडेकर, जिलाधिकारी सावन कुमार, पुलिस अधीक्षक नुरूल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे, उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव तथा निवासी उपजिल्हाधिकारी लिना फलके (ढेंगे) आदि वरिष्ठ अधिकारी मौजूद थे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Oct 05, 2025 07:06:30
Shirdi, Maharashtra:अमित शाह के साईमंदिरात दाखल... साईदर्शनाने अहिल्यानगर जिल्हा दौऱ्याची होणार सुरूवात.. शिर्डी माझे पंढरपूर ही आरती करत अमित शहा यांनी घेतलं साईबाबांच्या समाधीचे दर्शन... साईदर्शनानंतर विविध विकास कामांचे लोकार्पण.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मंत्री अमित शाह यांच्यासोबत साईदर्शनाला... साईदर्शनानंतर प्रवरानगर येथे प्रवरा साखर कारखान्याच्या विस्तारित कामाचे उद्घाटन, पद्मश्री विखे पाटील यांच्या पुतळ्याचे होणार लोकार्पण... कोपरगाव येथे कोल्हे साखर कारखान्याच्या सिएनजी प्रकल्पाचे करणार उद्घाटन... अमित शहा यांच्या साईदर्शनाच्या पार्श्वभुमीवर भाविकांचे दर्शन अर्धा तास राहणार बंद... सुरक्षा कारणास्तव बंद ... अमित शहा यांनी भाविकांशी केले हस्तांदोलन... मुख्यमंत्री फडणविस , शिंदे , अजित पवार , पालकमंत्री विखे पाटील सोबत..
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Oct 05, 2025 07:06:20
Yeola, Maharashtra:नगर- मनमाड महामार्ग हा मृत्यूचा सापळा होतोय की کا..?हा सवाल निर्माण झाला आहे परवा आज पाच तारीख आहे दिनांक 3 ऑक्टोबर रोजी रात्री दुचाकीला धडक दिल्यामुळे एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता दिनांक 4 ऑक्टोबर रोजी रात्री धानोरे येथील मोठा मारुती जवळ पायी चालणाऱ्या एका तरुणाला वाहनाने धडक दिली आहे त्यात गणेश घीरे वय 31 या तरुणाचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी फत्तेबुरुज नाका भागात दुसरा अपघात झाला. यात दुचाकीवरून जात असलेले देविदास शेळके व 55 व त्यांची नात जयश्री शेळके वय 6 यांना एका पेट्रोल टॅंकरनं धडक दिली यात जयश्री शेळके चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला आजोबा देविदास शेळके हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातांसंदर्भात घटनास्थळावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 05, 2025 07:06:08
Chandrapur, Maharashtra:2 सप्टेंबरच्या शासननिर्णयाविरोधात 10 ऑक्टोबरला नागपूरात सकल ओबीसी महामोर्चा काढला जाणार आहे. महामोर्चाची सुरुवात यशवंत स्टेडियमपासून संविधान चौकापर्यंत तीन किलोमीटर अंतरावर होणार आहे. महामोर्चाच्या नियोजनासाठी चंद्रपूर येथील धनोजे कुणबी समाज मंदिरात बैठक घेण्यात आली. बैठकीत उपस्थित सदस्यांनी आगामी मोर्चाच्या तयारीसंदर्भात आपली मते मांडली. मोर्चासाठी प्रचारात्मक पोस्टर्स आणि बॅनर्स तयार करणे, मिडिया समन्वय साधणे, तसेच वार्डनिहाय नागरिकांची यादी तयार करून जबाबदाऱ्या निश्चित करण्याचा नियोजन या बैठकीत करण्यात आले. बाईट १) श्रीधरराव मालेकर, अध्यक्ष, धनोजे कुणबी समाज, चंद्रपूर बाईट २) संजय ढवस, उपाध्यक्ष, धनोजे कुणबी समाज, चंद्रपूर
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 05, 2025 06:32:32
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 05, 2025 06:05:23
Washim, Maharashtra:अँकर: वाशिम जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता नगराध्यक्षपदासाठी आरक्षण ठरविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अनुषंगाने ६ऑक्टोबर रोजी मंत्रालयात नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित करण्यात येणार असून,यात वाशिम जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचाही समावेश आहे. कोणत्या ठिकाणी कोणते आरक्षण लागू होणार, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. या सोडतीनंतर शहरी भागातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवर इच्छुक उमेदवार,विविध राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांच्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आरक्षणाचे गणित जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी आगामी निवडणुकांच्या रणनीतीला वेग येईल आणि संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरू होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 05, 2025 06:01:37
0
comment0
Report
UPUmesh Parab
Oct 05, 2025 05:31:42
Oros, Maharashtra:एखादा आरोपी वाँटेड असल्याचं आपण नेहमीच ऐकतो... पण एखादा प्राणी वाँटेड आहे अस आपण कधी ऐकलंय का... आणि ते खर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या वास्तव्यास असणारा ओंकार नावाचा हत्ती तीन राज्यात वाँटेड आहे. जंगली हत्ती आणि सिंधुदुर्ग हे समीकरण फार जून आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग भागात नेहमीच या जंगली हत्तींचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. मात्र या जंगली हत्तींचा काळपापासून वेगळा झालेला ओंकार हत्ती सर्वांचीच डोके दुखी ठरतोय. हा हत्ती केवळ जंगलातच नाही तर चक्क मानव वस्तीत येऊन धुडगूस घालतोय. एका वृद्धाला चिरडून मारणारा हाच ओंकार हत्ती. काही काळ दोडामार्ग भागात वास्तव्य केलेल्या ओंकार हत्तीने गोवा आणि त्यानंतर कर्नाटक राज्यातील बेळगावमध्ये दहशद माजवून पुन्हा सिंधुदुर्गाकडे आपला मोर्चा वळविलाय. शेती सोबत बागायतींचे नुकसान करणारा ओंकार हत्ती सर्वांचीच डोकेदुखी ठरतोय.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 05, 2025 05:03:00
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत हंगामातील नव्या सोयाबीनची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या नव्या सोयाबीनला शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३८०० इतका दर मिळत आहे. तर जुन्या सोयाबीनला ३८०० ते ४४०० असा दर मिळत आहे. मात्र हा दर हमीभावापेक्षा कमी असून, उत्पादन खर्चाच्या तुलनेत समाधानकारक नाही. त्यामुळे अनेक शेतकरी निराश आहेत. गेल्या दोन महिन्यांतील मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने शेंगा काळ्या पडल्या, दाण्यांचा आकार लहान राहिला, तर काही ठिकाणी अंकुर फुटल्याने मालाचा दर्जा खालावला. या प्रतिकूल हवामानाचा परिणाम बाजारभावावर झाला असून, सोयाबीनचे दर घसरले आहेत. अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामात तोटा सहन करावा लागत आहे.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Oct 05, 2025 04:48:54
Oros, Maharashtra:कुडाळ तालुक्यातील घावनळे (वायगंणवाडी) येथील दोन ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय दीक्षा तिमाजी बागवे या अल्पवयीन मुलीचा घातपात करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी कुणाल कृष्णा कुंभार याला कुडाळ तालुका न्यायालयाने सहा ऑक्टोबरपर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तब्बल दोन महिन्यानंतर दीक्षा बागवे यांच्या बेपत्ता प्रकरणाचा छडा अखेर कुडाळ पोलिसांनी आज लावला आहे. या निर्घृण खूनामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र पोलिस प्रशासनाने या घटनेबद्दल कमालीची गुप्तता बाळगून ही कारवाई केली आहे. घावनळे गावातील ही मुलगी दोन ऑगस्टला कॉलेजला जायला निघाली ती बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून कुडाळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. दोन महिन्यापासून पोलीस आणि नातेवाईक तिचा शोध घेत होते. मात्र, तब्बल दोन महिन्यानंतर पोलिसांच्या तपासात या मुलीचा खून कुणाल कुंभार याने केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणातील संशयित कुणाल कुंभार कडून अजून काय काय माहिती येते यावर याखूनाची व्याप्ती अवलंबून असणार आहे. माणगाव खोऱ्यातील गोठोस गावातील जंगलातील एका मांगरात नेऊन गळा दाबून या अल्पवयीन मुलीचा खून कुणालने केल्याची कबूली दिली आहे. प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे. आरोपी कुणाल कृष्णा कुंभार याला सहा ऑक्टोबरपर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलीसांनी पत्रकार परिषदेत दिली.
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top