Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

बीड़ में खुले विद्युत रोहित्र से 15 वर्षीय की मौत; परिजन हाईवे पर प्रदर्शन

MMMahendrakumar Mudholkar
Feb 16, 2026 07:49:32
Beed, Maharashtra
बीड शहरातील गोरे वस्ती भागात उघड्या असलेल्या विद्युत रोहित्राला चिकटून एका पंधरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेख अवेज शेख परवेज असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून गोरे वस्ती परिसरात खेळत असताना ही घटना घडली. दरम्यान संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक झाले असून जिल्हा रुग्णालय परिसरात मोठा जमाव आहे. शहरातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या देत नातेवाईकांकडून आंदोलन केले जात आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Feb 16, 2026 09:52:48
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग स्लग - सांगली पालिकेच्या अतिक्रमण कारवाईवरून दुकानदार व प्रशासनामध्ये संघर्ष,मनसे आणि प्रशासनाच्या मध्ये वादावादीचा प्रकार. अँकर - सांगली महापालिकेकडून शहरातल्या अतिक्रमण विरोधातली मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे. शहरातील विश्रामबाग येथील मिरज रोडवरील खोक्यांचे अतिक्रमण काढण्यात येत आहे. नशेखोरीचा ठपका ठपका ठेवत आयुक्त सत्यम गांधींकडून ही कारवाई करण्यात येत आहे. मात्र याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि दुकानदारांकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. बुलडोजर घेऊन सुरू करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात खोकेधारकांनी थेट दुकानांवर व जेसीबीवर चढून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला, यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत आणि प्रशासनाच्या मध्ये जोरदार वादावादी चा प्रकारदेखील घडला आहे, कोणत्याही प्रकारच्या नशेखोरीचा प्रकार नसताना,आणि रेल्वे प्रशासनाची जागा असताना,केवळ बिल्डर लॉबीसाठी, अतिक्रमण कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्याकडून करण्यात आला आहे बाईट - सत्यम गांधी - आयुक्त - महापालिका, सांगली. बाईट - तानाजी सावंत - जिल्हाध्यक्ष, मनसे,सांगली.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 16, 2026 09:49:48
Ahilyanagar, Maharashtra:फकराबाद तालुक्यात अहिल्यानगर के खाद्य एवं औषध प्रशासन और स्थानीय अपराध शाखा की टीम ने दूध में भेसळ कराने वाले रैकेट का पर्दाफाश किया है। जामखेड तालुक्यातील फकराबाद के एक किसान की गोठ में भेसळयुक्त दूध तैयार कर उसे अच्छे दूध में मिलाने की जानकारी मिलते ही विभाग ने गोठे पर छापा मारा। भेसळ करने वाले किसानों के साथ भेसळ के सामान भी जेरबंद किया गया है। गिरफ्तारPeople: रामदास उबाळे, समीर शेख, आफताब सेफ। इनके पास दूध बनाने के लिए 1200 लीटर लिक्विड पेराफिन और अन्य रसायन भी जब्त किए गए हैं। संदर्भ अधिकारी का कहना है कि कृत्रिम दूध बनाने में लिक्विड पेराफिन का बड़े पैमाने पर उपयोग होता है, और इन रसायनों के अलावा अन्य रसायन भी मिलाकर दूध को असली दूध की तरह दिखाने की कोशिश की जा रही थी. इन रसायनों के दुष्परिणाम के कारण स्वास्थ्य पर गहरा खतरा है, कैंसर जैसे रोग भी हो सकते हैं। हमारी टीम ने आगे की जाँच के लिए नमूने भेजे हैं, ताकि भेसळ के पीछे के नेटवर्क का पता लगाया जा सके।
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 16, 2026 09:32:37
Dharashiv, Maharashtra:पक्षाचा आदेश आल्यावर अर्चना पाटील यांच्या अध्यक्षपदाला पाठिंबा. अध्यक्षपदाच्या वादावर सावंत समर्थकांची नरमाई. आमदार तानाजी सावंत यांची बदनामी थांबवा अन्यथा जशास तसे उत्तर देऊ. सावंत समर्थकांचा भाजपला इशारा भाजपला इशारा. धाराशिव - जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीवरून सुरू झालेला भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद आता हळूहळू निवळू लागला आहे. भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या अध्यक्षपदाला विरोध करणाऱ्या सावंत समर्थक कार्यकर्त्यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. पक्षाने आदेश दिल्यावर अर्चना पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा असेल अशी भूमिका शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सावंत समर्थक दत्ता साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. आमदार तानाजी सावंत यांची बदनामी थांबवा अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही साळुंखे यांनी भाजपला दिला आहे. सावंत समर्थकांनी नरमाईची भूमिका घेतल्यामुळे धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चना पाटील यांच्या निवडीचा मार्ग सोपा झाला आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 16, 2026 09:31:53
Amravati, Maharashtra:देशात धार्मिक भावना जपल्या जातात मात्र सेवाभाव जपला जात नाही; 38 विभागांची माहिती दळवल्याने बच्चू कडूंची टीका अणि ... (मुख्य बातमी: 40 पैकी 38 विभागाने अपंगांची माहिती दडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार देशात धार्मिक भावना जपत आहे मात्र सेवाभाव जपत नसल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं आणि मुंडे हे सचिव झाल्यानंतर ते मंत्रालय वेगवान चालेल असे वाटलं होतं पण ते त्यांच्या तोऱ्यात आहे. दिव्यांग मंत्रालयाकडे सचिवांचा पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक नाही. देशात धार्मिक भावना जपल्या जात मात्र दिव्यांगांच्या सदभावना सेवाभाव जपल्या जात नाही त्यामुळे त्या विभागावर कारवाई झाली पाहिजे नाहीतर आम्ही पुन्हा मंत्रालयात जाऊन आंदोलन करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.)
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 16, 2026 09:15:55
Latur, Maharashtra:लातूरसह राज्यात सोयाबीन दरात मोठी घसरण…सहा हजारांवरून दर पाच हजारांच्या खाली. लातूरसह राज्यातील बाजारपेठेत सोयाबीनचे दर सहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र मागील चार दिवसांपासून दरात सातत्याने घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अतिरिक्त पुरवठा, ब्राझीलमधील विक्रमी उत्पादन आणि भारतात आयात होणाऱ्या स्वस्त सोयातेलाचा परिणाम म्हणून ही घसरण होत असल्याचे सांगितले जात आहे. ब्राझील आणि अर्जेंटिनाकडून मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत असल्याने जागतिक बाजारपेठेत मागणी कमी झाली आहे. अमेरिकेच्या नवीन व्यापार धोरणांचाही परिणाम दरावर दिसून येत असून, सध्या सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याची स्थिती आहे. खरीप हंगामात चांगले उत्पादन मिळेल या अपेचेनेमागील अनेक वर्षांपासून शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. लातूर जिल्हा सोयाबीनचा ‘ग्रीन बेल्ट’ म्हणून ओळखला जातो. मात्र कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटांना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभावाचीही खात्री उरलेली नाही. पारंपरिक पीक पद्धती शेतकऱ्यांसाठी कशी अडचणीची ठरत आहे, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सोयाबीन. ना उत्पादनाची हमी, ना दराची हमी — अशीच परिस्थिती वर्षभर बाजारात पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील लातूर जिल्हासह जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. भारत-Amerिका करार होण्यापूर्वी प्रतिक्विंटल 5700 ते 5800 रुपये दर मिळत होता. मात्र सध्या तो दर घसरून 4900 ते 5200 रुपयांपर्यंत खाली आला आहे. या करारामुळेच दर घसरल्याची चर्चा शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये रंगली आहे. करारापूर्वी बाजार समितीत दररोज सुमारे 40 हजार कट्ट्यांची आवक होत होती. मात्र सध्या ती केवळ 5 हजार कट्ट्यांवर आली आहे. कमी दर परवडत नसल्याने शेतकरी माल बाजारात आणण्यास टाळाटाळ करत आहेत. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून आधीप्रमाणे दर मिळवून द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अंबादास बनकर, शेतकरी (पांढरा शर्ट); रामेश्वर बोडखे, शेतकरी (भगवा शर्ट); नितीतन तोष्णीवाल, व्यापारी (ग्रे शर्ट). सोयाबीनचे दर आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असуваат. ब्राझील आणि अमेरिकेत विक्रमी उत्पादन झाल्यामुळे जागतिक स्तरावर उपलब्धता वाढली आहे. त्यातच भारत सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे परदेशातून स्वस्त सोयातेल मोठ्या प्रमाणावर आयात होत आहे. त्यामुळे देशांतर्गत तेल गिरण्यांची मागणी घटली आहे. जगातील सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या चीनची मागणीही कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारावर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे. बाजारात आवक नगण्य असतानाही दरातील घसरण थांबत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याची ओरड सुरू झाली आहे. लातूर हुन वैभव बालकुंदे रिपोर्टर; जालना हुन नितिश महाजन रिपोर्टर
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 16, 2026 09:03:28
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 16, 2026 08:48:36
Akola, Maharashtra:अकोला शहरातील वर्दळीच्या संतोषी माता चौक परिसरात भरधाव स्कार्पिओने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले असून ७ ते ८ नागरिक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संतोषी माता चौकातून भरधाव वेगाने जाणारी स्कार्पिओ कार अचानक अनियंत्रित झाली. चालकाचा ताबा सुटल्याने या वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन दुचाकी, दोन चारचाकी आणि एका ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या अपघातात रस्त्यावरून पायी चालणारे ७ ते ८ नागरिक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत अपघातग्रस्त स्कार्पिओ वाहन आणि चालकाला ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी पुढील तपास रामदास पेठ पोलीस करत आहेत.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 16, 2026 08:47:49
Amravati, Maharashtra:बंगालमें बाबरी मशीद बांधण्याची भाषा करणाऱ्यांना कबर खोदण्यासाठीही हिंदुस्थानमध्ये जागा मिळणार नाही; भाजप नेत्या नवनीत राणा यांचे खळबळजनक वक्तव्य. नवनीत राणा यांच्या वक्तव्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी केवळ धार्मिक मुद्द्यांवरच नव्हे तर पश्चिम बंगालमधील बाबরি मशिदीच्या संदर्भातही अत्यंत तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. जे लोक पश्चिम बंगालमध्ये बाबरी मशीद बांधण्याची भाषा करत आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी: तुमची कबर खोदण्यासाठीही हिंदुस्थानमध्ये जागा मिळणार नाही असे खळबळजनक वक्तव्य नवनीत राणा यांनी केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या: तुम्ही फक्त सुरुवात करून दाखवा आमच्यासारखे सनातनी तिथे येतील आणि तुम्हाला हिंदुस्थानची खरी ताकद काय आहे ते दाखवून देतील. असेही राणा म्हणाल्या आहेत. नवनीत राणा यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. बाइट: नवनीत राणा, भाजप नेत्या
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Feb 16, 2026 08:35:01
Dhule, Maharashtra:काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेलेल्या वक्तव्याच्या विरोधात धुळ्यात भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचा पाहायला मिळालं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची टिपू सुलतानशी केलेल्या तुलनेच्या निषेधार्थ धुळ्यात भाजपा धुळे महानगराच्या मधील आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत भाजपा कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला. अशा पद्धतीने वक्तव्य करणाऱ्यांची ही देशद्रोही वृत्ती आहे. त्यांना जर टिपू सुलतान बद्दल एवढं प्रेम असेल तर त्यांनी मैसूर ला जावं व तिथे जाऊन टिपू सुलतान चा जयजयकार करावा. मात्र आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जर कोणी टिपू सुलतानशी करत असेल तर ते अजिबात सहन केलं जाणार नाही असा इशारा यावेळी आमदार अनुबराव यांनी दिला आहे. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 16, 2026 08:34:41
Akola, Maharashtra:गोंधळ आणि राडा ही अकोला महापालिकेची ओळख आजही कायम असल्याचे चित्र पहिल्याच सभेत पाहायला मिळाले. महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर आज पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विषय समित्यांसह स्थायी समिती सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली. मात्र त्यानंतर शहरातील चार झोनच्या रचनेचा विषय सभागृहात मांडण्यात आला आणि यावरून वातावरण तापले. काही प्रभागांची रचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप करत काँग्रेससह वंचित बहुजन आघाडी व शिवसेना (ठाकरे गट) सदस्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. झोन रचनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला.या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. काही सदस्यांनी सभागृहाच्या मध्यभागी येत घोषणाबाजी केली, त्यामुळे काही काळासाठी कामकाज ठप्प झाले. अध्यक्षांनी वारंवार शांततेचे आवाहन केले, मात्र गोंधळ सुरूच राहिला. अखेर झोन रचनेसंदर्भातील ठरावावर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. बहुमताने झोनची निर्मिती मंजूर करण्यात आली.मात्र मतदानानंतरही सभागृहातील वातावरण तणावपूर्णच राहिले आणि पुन्हा एकदा गोंधळाचे दृश्य पाहायला मिळाले. महापालिकेच्या पहिल्याच सभेत झालेल्या या गोंधळामुळे आगामी काळातही राजकीय संघर्ष तीव्र राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top