Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

हिंदी: अकोला से बड़ी राजनीतिक खबर: विजय अग्रवाल ने नामांकन दाखल किया

JJJAYESH JAGAD
Dec 29, 2025 09:43:44
Akola, Maharashtra
अकोल्यातून मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. अकोल्याचे माजी महापौर तथा भाजपचे ज्येष्ठ नेते विजय अग्रवाल यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीतील जागावाटपावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच भाजपचे महानगराध्यक्ष असलेले विजय अग्रवाल यांनी भाजपकडून सर्वप्रथम अधिकृतरित्या नामनिर्देशन अर्ज सादर केला आहे.विशेष म्हणजे, अकोल्यात भाजपने अद्याप अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नसतानाही आतापर्यंत भाजपच्या एकूण सहा उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे नामांकन प्रक्रियेत भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Dec 29, 2025 11:00:34
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच वर्षात वाघ हल्ल्यात अबतक 47 झाल्यानंतरही वनविभाग मात्र निष्काळजीच, बांबू तोडीसाठी आलेल्या बालाघाटच्या मजुरांना थेट जंगलात राहू द्या उभारून करू दिले जात आहे वास्तव्य, गेल्या पंधरा दिवसात वाघाच्या हल्ल्यात झाला आहे तीन मजुरांचा मृत्यू , ठेकेदार- वनविभाग यांच्या निष्काळाचीपणाने जात आहेत मजुरांचे जीव, वन्यजीव अभ्यासकांनी यावर तातडीने बंदी घालण्याची केली मागणी चंद्रपूर जिल्ह्यात सध्या विविध जंगलांमध्ये बांबू तोडणीचा हंगाम सुरू आहे. वनविभागाने यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वाघांच्या हल्ल्यामध्ये एकाच वर्षात 47 ग्रामस्थ व नागरिकांचे जीव गेले आहेत. असे असले तरी वनविभाग मात्र निष्काळजीच असून बांबू तोडणीसाठी जुनोना- चिचपल्ली मार्गावर थेट जंगलातच बालाघाटी मजुरांच्या झोपड्या थाटण्यात आल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसात यापैकी दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या हल्ल्यात 3 बालाघाटी मजुरांचा मृत्यू झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी 31 मजुरांची वस्ती असलेल्या या ठिकाणी वाघाची डरकाळी ऐकू आल्याने इथले मजूर देखील धास्तावले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच जंगलात आता वाघांचे वास्तव्य आहे. अशा स्थितीत पाणवठ्याच्या शेजारी व वाघांचे वास्तव्य असलेल्या भागात थेट मजुरांच्या राहुट्या उभारणे टाळावे अशी मागणी वन्यजीव अभ्यासकांनी केली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून वनविभाग मात्र सुस्त असल्याची टीका वन्यजीव अभ्यासकांनी केली आहे.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Dec 29, 2025 10:53:32
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग --- मंत्री नितेश राणे --- ऑन बैठका --- Shirodyaला होणारा ताज प्रकल्प बाबत आज बैठक घेऊन चर्चा केली. लोकांच्या मनातील प्रश्न आणि शंका आम्ही सोडवल्या. ऑन वाळू व्यावसायिक --- निलेश साहेबांनी प्रश्न उपस्थित केल्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू व्यवसायिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत चर्चा केली. त्यांना व्यवस्थित व्यवसाय करता यावा म्हणून आज आम्ही प्रशासन म्हणून मार्ग काढला आहे ऑन ऑल मातोश्री तिकीट वाटप --- मुंबई महापालिकेबाबत सर्व विषयांवर मुंबईत गेल्यावर बोलू ऑन स्टार प्रचारक --- मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे. हा आम्ही सर्वांनी निर्धार केला आहे त्यानुसार आमचा प्रचार आणि प्रसार होईल.. ऑन हिंदुत्व विचार ,--- हिंदुत्व विचाराचे सर्व उमेदवार निवडून यावेत अशी आमची इच्छा आहे विधानसभेला सुद्धा जनतेने आम्हाला निवडून देऊन हिंदुत्व विचारांचे राज्य बसवले आहे तेच पॅटर्न येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत दिसेल ऑन नारायण राणे/ मुख्यमंत्री भेट --- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून राणेसाहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली अशा त्यांच्या भेटी होतच असतात ऑन बांगलादेश ( हिंदी ) ---- बांगलादेश मे हिंदू पर जो अत्याचार किया जा रहा है हम सब हिंदू के साथ खडे है. *किसी के ऊपर अत्याचार करना किसी को जलाना ये अच्छी बात नही है उनके भी नागरिक हमारे देश मे रहते है. उसी तरिका जवाब अगर हम ने देना चालू किया तो उनको अच्छा लगेगा क्या* इस सबका हमको निषेध करना ही चाहिये Byte --- मंत्री नितेश राणे
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 29, 2025 09:54:29
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 29, 2025 09:52:38
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:युती बाबत अजून औपचारिक घोषणा नाही मात्र शिंदेच्या शिवसैनिकांनी आता अर्ज भरायला सुरुवात केलेली आहे , आमदार प्रदीप जयस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश जैस्वाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, आईचा फोटो हातात घेऊन त्यांना उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, युती बाबत स्पष्टता झाली नाही त्यामुळे संजय शिरसाठ यांनी रात्रीच इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याचे आदेश दिले होते त्यानुसार अर्ज भरायला सुरुवात झाली आहे आणि नेत्यांचे पुत्रांनी अर्ज भरायला सुरुवात केली आहे असं म्हणता येईल ,दरम्यान याच प्राभागातनं माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी मुलाला किंवा भावाला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती मात्र ऋषी जयस्वाल यांनी अर्ज भरल्याने किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली असल्याचे माहिती आहे...
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 29, 2025 09:49:54
Pune, Maharashtra:महापालिका निवडणुकीतील महत्वाचे मुद्दे व शहरातील मुख्य समस्या अहिल्यानगर शहर छत्रपती संभाजी नगर नाशिक आणि पुणे महानगरपालिका मध्ये आहे शहराची लोकसंख्या सहा लाखाच्या आसपास असली तरी शहराच्या बाहेरील भागात सध्या लोकवस्ती वाढत आहे शहरातील पाणीपुरवठा रस्ते घनकचरा पथदिवे या समस्या काही प्रमाणात सुटले असल्या तरी वाढलेल्या शहरांमध्ये या समस्या निर्माण झाल्या आहेत यासोबतच शहरांमध्ये प्रशस्त उद्याने आणि मुलांच्या खेळण्यासाठी मैदानांची कमतरता आहे शहरात महानगरपालिकेचे रुग्णालय आहेत मात्र ते प्रभावीपणे चालण्यासाठी महानगरपालिकेकडून कुठल्याही हालचाली होताना दिसत नाहीत...
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 29, 2025 09:17:30
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 29, 2025 09:17:11
Chendhare, Alibag, Maharashtra:विकास गोगावले यांच्यावर तडीपारीची कारवाई करा ...... राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना UBT च्या शिष्टमंडळाची मागणी ...... पोलिस अधीक्षक कार्यालयात दिले निवेदन ...... विकास गोगावले यांच्यावर अनेक गुन्हे दाखल ...... गोगावले यांची महाड परिसरात दहशत ...... जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाईची मागणी ........ आठ दिवसांत कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात जाणार ............ दोन पक्षांनी अलिबाग येथे निवेदन देऊन ही मागणी केली आहे. महाड नगरपालिका निवडणुकीत मतदानाच्या वेळी झालेल्या राड्यात विकास गोगावले हे आरोपी आहेत. ते फरार आहेत. सध्या त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. महाड परिसरात दहशत आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाडमधील वातावरण बिघडू शकते हे लक्षात घेऊन निवडणुकांची प्रक्रिया पार पडेपर्यंत विकास गोगावले आणि त्यांच्या साथीदारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. आठ दिवसात कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Dec 29, 2025 09:08:04
Pune, Maharashtra:Headline : मावळ में चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार व निर्घृण हत्येच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको Anchor: आज मावळ बंदची हाक देण्यात आली असून, मावळ तालुक्यातील पाच वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार व निर्घृण हत्येच्या निषेधार्थ अखंड मराठा समाज आणि उर्से ग्रामस्थ यांच्या वतीने जुना पुणे–मुंबई महामार्गावरील तळेगाव–चाकण चौकात निषेध सभा सुरू झाली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस दल यांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, संपूर्ण परिसराला जणू पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.या निषेध रॅलीत विद्यार्थी, उर्से ग्रामस्थ तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची ठाम मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. पोलीसांनी तळेगांव चाकण चौकात श्रद्धांजली सभा करू दिली नाही म्हणून आंदोलक महिला आक्रमक झाल्या आणि जुना पुणे मुंबई महामार्गावरील बसून चक्का जाम केला त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले परंतु मावळ तहसील प्रशासन तसेच पोलीसांच्या विनंतीवरून आंदोलक यांनी महामार्ग मोकळा केला, मात्र यावेळी वाहनांची मोठ्या रांगा लागल्या होत्या. बाईट : मुलीची आई, चेहरा ब्लर करावा (file no.05)
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 29, 2025 09:07:41
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 29, 2025 09:03:03
Chendhare, Alibag, Maharashtra:मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. माणगांव इदापुर बाजार पेठेत वाहनाच्या मोठ्या रांगा. पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांका. कोंडी फोडण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्न सुरू. वाहतूक कोंडीने पर्यटक त्रस्त. अँकर - मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालीय. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ही वाहतूक कोंडी होते आहे. माणगांव इंदापूर येथे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. माणगांव बाजारपेठ ते खरवली फाट्यापर्यत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या कोंडीमुळे वाहन चालक आणि पर्यटक देखील त्रस्त आहेत. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिस प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. परंतु बेशिस्त वाहन चालकांमुळे त्याला यश येत नाही.
0
comment0
Report
Advertisement
Back to top