Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

कोपरगाव में बिबटिये के हमले से महिला की मौत, लोगों ने किया रास्ता रोको

KJKunal Jamdade
Nov 10, 2025 10:27:28
Shirdi, Maharashtra
बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू... कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील घटना... शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याने केला हल्ला... शांताबाई निकोले वय 60 अस मयत महिलेच नाव... आज सकाळची घटना... महिलेच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक... तीन तासांपासून नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको करत केला संताप व्यक्त... आठवडयातील दुसरी घटना , तर घटना घडल्यानंतर सुरेगाव येथील महिलेवर बिबट्याचा पुन्हा हल्ला ; महिलेवर उपचार सुरू... माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा वनमंत्री गणेश नाईक यांना तर आमदार आशुतोष काळे यांचा अजीत पवारांना फोन... वनविभागाची बघ्याची भूमिका असल्याने नागरिक संतप्त... नागरिकांनी केलेल्या रस्ता रोकोच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Mar 14, 2026 17:16:30
Shirur, Maharashtra:भीमाशंकर मंदिर दुरुस्तीच्या कामामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी गेल्या अडीच महिन्यांपासून मंदिर बंद ठेवण्यात आले होते। तथापि भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांना मंदिर खुले करून व्हीआयपी दर्शन देण्यात आल्याचा आरोप होत आहे। डॉ. निशिकांत दुबे हे झारखंड च्या गोड्डा मतदार संघातून चार वेळा भापकडून निवडून आलेले खासदार आहेत। सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी ९ जानेवारी २०२६ पासून तीन महिन्यांसाठी भीमाशंकर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे हजारो किलोमीटर पायी व सायकल वारी करून येणाऱ्या भाविकांनाही दर्शन न घेता परत जावे लागत आहे। अशातच हेलिकॉप्टरने आलेल्या खासदार डॉ. निशिकांत दुबे यांना विशेष परवानगी देऊन मंदिरात दर्शन घडवण्यात आल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। राजकीय नेत्यांसाठी मंदिर खुले आणि सर्वसामान्यांसाठी बंद का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। महादेवाच्या मंदिरात दुजाभाव का? प्रशासनावर भाविकांचा संताप व्यक्त होत आहे
192
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 14, 2026 17:02:50
Chandrapur, Maharashtra:व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवड्याने केली पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांची चंद्रपुरात भोजन गैरसोय, सामाजिक कार्यकर्ते जयदीप रोडे यांनी मित्र परिवाराकडून सिलेंडर एकत्र करत उमेदवारांची केली सोय अँकर: आखातातील युद्धामुळे व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवडा निर्माण झालाय. यामुळे पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांची चंद्रपुरात भोजन गैरसोय झाली. सामाजिक कार्यकर्ते जयदीप रोडे यांनी मित्र परिवाराकडून सिलेंडर एकत्र करत उमेदवारांची सोय केली. 15 मार्च अर्थात रविवारी चंद्रपुरात पोलीस भरतीसाठीची लेखी परीक्षा आहे. त्यासाठी हजारो-युवक युवती चंद्रपुरात दाखल झाले आहेत. याआधी शारीरिक चाचणी दरम्यानही सलग पंधरा दिवस जयदीप रोडे यांनी निःशुल्क निवास आणि भोजन व्यवस्था राबविली होती. मात्र ताज्या गॅस सिलेंडर तुटवड्याने अचानक आलेल्या संकटाचा रोडे यांनी मित्र परिवाराच्या साथीने मुकाबला केला. राज्यभरातून आलेल्या 400 वर विद्यार्थ्यांनी मात्र यासाठी रोडे यांचे आभार मानले आहेत.
214
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Mar 14, 2026 17:02:18
Buldhana, Maharashtra:बुलढणा. डॉ बाळासाहेब आंबेडकर पत्रकार परिषद. 23 तारखेला नागपूर में RSS कार्यालयावर आंदोलन करणार आहे. एपस्टीन फाईल में नरेंद्र मोदी सह केंद्रीय मंत्र्यांची नाव आहेत. त्यामुळे भारताचे नाक कापले असून प्रतिमा मलिन झाली आहे. एपस्टीन फाईल मध्ये जे वर्णन केलेलं आहे, ते मोदी संदर्भात घडलेले आहे का. फाईल मध्ये अधिकचे वर्णन आहे. त्यांना ब्लॅकमेल केले जास्त असून असा पंतप्रधान नको आहे, तो देशाला घातक आहे. 23 तारखेला आम्ही विचारणार आहे. पंतप्रधानाचे चारित्र्य बसते का. कारवाई का केली नाही. याचा जाब विचारणार आहे. मध्यम वर्गीयांना आवाहन आहे. आतापर्यंत भारतात अशी परिस्थिती बघितली नाही. खोटे स्वप्न मध्यम वर्गीयांना दाखवण्यात आलेले आहे. कुटुंब सुरक्षित नाही, याची जाण ठेवी पाहिजे. पंतप्रधान सुरक्षित नाही. पंतप्रधान चे चारित्र्य सुद्धा योग्य नसेल तर मध्यम वर्गीयांनी यावा. मोहन भागवत यांना विचारणार आहे की तुम्ही संस्कृत शिकवता राष्ट्रप्रेम शिकवता मग मोदी वर कारवाई कधी करणार. इलेक्शन मध्ये RSS चे कार्यकर्ता जास्त दिसतो पण BJP चे कमी दिसते. मोहन भागवत यांनी आमच्या आंदोलनात उतरावे , आम्ही त्यांचे स्वागत करु. आमच्यात आणि RSS मध्ये वैचारिक मतभेट मात्र दुष्मानी नाही. आंदोलनात काँग्रेस , आप, डावे पक्ष, 22 संघटना उपस्थित राहता. मोहन भागवत यांना आम्ही आग्रह धरणार आहे की पंतप्रधान बदला. बाई ट डॉ बाळासाहेब आंबेडकर, वंचित नेते.
161
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 14, 2026 16:32:38
Satara, Maharashtra:सातारा - पाटणमध्ये शहीद जवानाला अभिवादन करून पालकमंत्री शंभूराज देसाई साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भरतगाव रस्त्यावर दुचाकीचा अपघात झालेला त्यांच्या नजरेस पडला. अपघात पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवला आणि थेट जखमी दुचाकीस्वाराकडे धाव घेतली. जखमी व्यक्तीची त्यांनी आपुलकीने विचारपूस करत “तब्येत ठीक आहे का?” अशी चौकशी केली आणि त्याला धीर दिला. यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या त्या दुचाकीस्वाराला तात्काळ आपल्या ताफ्यातील गाडीत बसवून उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात पाठवण्याच्या सूचना दिल्या. राजकारणाच्या धावपळीतही दाखवलेली ही माणुसकी आणि तत्परता पाहून परिसरातील नागरिकही भावूक झाले. अपघातग्रस्ताला दिलेल्या या तात्काळ मदतीमुळे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक केले जाते
179
comment0
Report
YKYOGESH KHARE
Mar 14, 2026 16:02:36
Nashik, Maharashtra:मद्यप्रेमींची चिंता वाढणार! युद्धामुळे मद्याच्या कॅन-बाटल्याांचा साठा फक्त १५ दिवसांचा इराण, इस्त्रायल येथे भडकलेल्या युद्धाचा परिणाम आता जिल्ह्यातील मद्यनिर्मितीवर होण्याची दाट शक्यता आहे. मद्यासाठी लागणाऱ्या कॅन, बाटल्यांचा साठा केवळ पंधराच दिवसांचा उरला असून, जिल्ह्यावर २०० कोटींपेक्षा अधिक नुकसानीचे दाट सावट पसरले युद्ध थांबल्यानंतरही परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे याचा जिल्ह्यातील मद्यनिर्मितीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. जिल्ह्यातील मद्यनिर्मितीतून राज्याला हजारो कोटींचा महसूल प्राप्त होतो. जगभरात प्रसिद्ध असलेल्या अनेक नामांकित व्हिस्की तसेच बियर कंपन्यांचे उत्पादन वाळूज व चिकलठाणा औद्योगिक वसाहतींमध्ये होते. मध्यपूर्व देशांमध्ये एबीडी, रॅडिको कंपनीच्या साधारण ५० कंटेनरद्वारे मद्यपुरवठा होतो. युद्धामुळे मात्र, यापैकी जवळपास ४० कंटेनरचा पुरवठा थांबवण्याबाबत कंपन्यांना सांगण्यात आले आहे. यापैकी आधीच जेएनपीटी बंदरावर पोहोचलेले पाच ते सहा कंटेनर तेथेच अडकून पडले आहेत. १७ फेब्रुवारी रोजी निघालेले दोन कंटेनर मात्र सुरक्षितरीत्या पोहोचल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कशी होती निर्मिती जिल्ह्यात ६ व्हिस्की तर ६ बियर उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत. २०२५ अखेर जिल्ह्यातून जवळपास ४८३२.८३ कोटींचे मद्य उत्पादन झाले होते. यात विदेशी दारूचे सुमारे १.२६ कोटी लीटर तर बियरचे सुमारे १.४० कोटी लीटर उत्पादनाची नोंद झाली होती. गॅस शॉर्टेजचा कॅन, बॉटल निर्मितीवर परिणाम मद्यनिर्मितीमध्ये काचेच्या बाटल्या व ॲल्युमिनियम कॅन निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गॅसचा वापर होतो. प्रत्येक कंपन्यांचा आकार हा वेगळा असतो. हा आकार देण्यासाठी जो हायफ्लेम गॅस लागतो, त्याचा तुटवडा झाल्यास मद्यनिर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे. गॅसच्या तुटवड्याचा थेट परिणाम या बॉटल, कॅन निर्मितीवर होणार. सध्यस्थितीत जिल्ह्यातील मद्य कंपन्यांकडे १५ दिवसांचा साठा आहे. १५ दिवसांनंतर जवळपास प्रती महिना २०० कोटींच्या आसपास नुकसान सुरू होईल. पंधरा दिवसांत अंदाजे दीड लाख केसेसची निर्मिती होऊ शकते. १ केसमध्ये २४ कॅन तर बारा बॉटल असतात.
189
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 14, 2026 14:49:20
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर रामानंदाचार्य नरेंद्रचार्या महाराज पत्रकार परिषद पॉइंटर ऑन लव्ह जिहाद & धर्मपरिवर्तन. - ईसाई शांत पाने तर मुस्लिम आक्रमक पने हिंदूना धर्म परिवर्तन करून संपविते आहे. - हिंदूंच्या मुली फसविण्यासाठी त्यांच्या कम्युनिटीकडून पैसे दिले जातात, लग्न करून हिंदू मुली विकून टाकतात.. - हिंदू मुलीने ख्रिश्चन किंवा मुस्लिम मुलाशी लग्न केल्यानंतर त्या मुलीचे व त्या मुलीला होणारे मुलांचे देखील धर्म बदलू नये. असे झाल्यास धर्म परिवर्तन रोखण्यास मदत होईल. हा कायदा करण्यात यावा ऑन भारत विश्वगुरु. - भारत देश विश्वगुरु म्हणून पुढे येणार. भारतीय संस्कृती जगाला भावते. - कुठलाहि पक्ष धर्माला संघटित करू शकत नाही. हिंदू धर्मगुरू हिंदूंना एकत्र संघटित करण्याचे काम करता. ऑन मोहन भागवत वक्त्व समर्थन. - मुस्लिमाना कितीही मुल झाली की, अल्लाहकी देणं आहे म्हणतात आणि आमच्यात कुटुম্ব नियोजन नाही असे मुस्लिम म्हणतात. मग हिंदू धर्मात कुठे कुटुंब नियोजन आहे मात्र हिंदूंनी देशासाठी दोन आपत्त्यावर थांबले आहेत मात्र मोहन भागवत म्हणतात तीन अपत्य ते योग्यच आहे मी त्या व्यक्तिवाचा समर्थन करतो. - हिंदू मध्ये पूर्वी आशीर्वाद देताना अष्टपुत्र भव म्हणायचे. - फक्त महात्मा गांधी यांच्या मूळ देश स्वातंत्र्य झाला नाही तर आगरकर टिळक या सर्वांमुळे झाला आहे जहाल मवाळ दोन्ही देशासाठी आवश्यक होते. - मोहन भागवत यांचे मी समर्थन करतो. - कायदा आणून मुस्लिमाची लोक संख्या थांबवली पाहिजे. असलेल्या कायद्याची अंमलबजाणी केली पाहिजे. - वर्ण व्यवस्था कमी झाली.. म्हणून अनेक कुटुंब हिंदू धर्मात पुन्हा आले. ऑन वेद विद्वान शाळेला ग्रँडची मागणी. - शाळेत महाविद्यालयात मुस्लिम आणि ख्रिचन यांचा इतिहास शिकवला जातो म्हणून धर्म परिवर्तन होत आहे.शाळा महाविद्यालयात हिंदूंचा इतिहास शिकवा... - मदरसा आणि ख्रिश्चन शाळांना ग्रँड दिले जाते वेद विद्वान माध्यमाला ग्रँड द्या... - हिंदुत्ववादी सरकार का करत नाही, हिंदू फक्त वोट बँक पाहिजे का? - संस्कार वर्ग सुरू झाली पाहिजे... धार्मिक नेते धार्मिक संतांनी धर्मासाठी पुढे यायला पाहिजे... - अज्ञान हे देखील धर्मांतराचे सर्वात मोठे कारण आहे. आर्थिक परिस्थितीचा फायदा उचलला जातोय... ऑन अंधश्रद्धा निर्मूलन समिती टीका - अंधश्रद्वं निर्मूलन समितीकुठे? त्या मिशनरीला विकले गेले , त्यांच्या पैशावर समिती चालते का? - माझा मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माला विरोध नाही मी प्रवृत्तीच्या विरोधात आहे. ऑन इराण इस्रायल युद्ध. - आम्ही मोठे आहोत हे अमेरिकेला दाखवायचं आहे. रशियाच्या जीवावर इराण युद्ध लढतोय.
153
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 14, 2026 13:00:40
Navi Mumbai, Maharashtra:इरान और इस्राइल के युद्ध के प्रभाव ने आम जिंदगी पर असर डाला है। मुंबई की कृषि उत्पन्न market समिति (AMPC) में रोज सब्जी के 550 ट्रक और टेम्पो दाखिल हो रहे हैं, लेकिन मुंबई और Navi Mumbai के क्षेत्रों के होटल और रेस्टोरेंट गैस सिलिंडर की कमी के कारण बंद पड़े हैं, जिससे सब्जे मंडई पर असर पड़ा है। मार्केट में सब्जी ग्राहकों की कमी के कारण दाम गिर रहे हैं; सब्ज़ी के दाम 20 से 30 प्रतिशत तक नीचे गए हैं। रिटेल मार्केट में भी सामान्यत: सब्जी के दाम ज्यादा नहीं बढ़ रहे हैं, बल्कि गिरावट ही दिख रही है। सब्जीें 30 रुपये से लेकर 50 रुपये तक के किराने में बेची जा रही हैं, जिससे आम ग्राहक संतुष्ट नहीं दिख रहा।
208
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 14, 2026 12:16:50
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या मनपूर वर्तुळात रान तुळस असलेल्या जंगलात पेटलेला वनवा विझवीताना वनपालाचा होरफळून मृत्यू झाला आहे. विजय शिंगनजुडे असे मृत वनपालाचे नाव आहे. जंगलात वनवा पेटल्याचे समजतात ते वरिष्ठांच्या आदेशावरून पथकासमवेत जंगलात पोहोचले, आग विझवित असताना ते चारही बाजूने आगीच्या विळख्यात सापडले. त्यामुळे बचावासाठी त्यांनी झाडावर आश्रय घेतला. आगीच्या ज्वाला उंच भडकल्याने ते खाली कोसळले आणि ६० टक्के भाजले गेले. गंभीर जखमी वनपाल शिंगनजुडे यांचे वर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते, दरम्यान त्यांचा आज दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने वनवर्तुळात खळबळ उडाली आहे. वनपाल वनरक्षकांना वनवनवा हाताळताना कुठल्याही सुविधा मिळत नाही, त्यांना प्रशिक्षण देखील दिले जात नाही, त्यामुळे वारंवार अशा घटना घडत असून आता तरी प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटने ने उपस्थित केला आहे. बाईट : डॉ अजय पाटील : अध्यक्ष
203
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 14, 2026 12:15:39
304
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 14, 2026 12:07:52
Pandharpur, Maharashtra:आखाती देशातील युद्धाचा रिक्षा चालकांना मोठा फटका बसला आहे. गॅस पुरवठा कमी प्रमाणात होतो आणि गॅस दरवाढ झाली आहे. रिक्षा प्रवाशांनाही दरवाढीची झळ बसण्याची शक्यता आहे. आखाती देशात सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम आता गॅस संबंधित नागरिकांना बसतोय. घरगुती गॅस मध्ये दरवाढ झाली आहे. तुटवडा होण्याची भीती सुद्धा व्यक्त होत आहे. एलपीजी गॅस दरवाढीने ऑटो रिक्षाचालकही अडचणीत आले आहेत. एलपीजी गॅसच्या किंमतीत प्रति लिटर मोठी वाढ झाल्याने त्यांना फटका बसला आहे. तर दुसरीकडे एलपीजी गॅसवरील रिक्षाचे भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. शहरातंर्गत प्रवास आता महागणार आहे. अशातच रिक्षासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसचा पुरवठा आहे पहिल्या प्रमाणे सुरळीत होत नाहीये पंढरपूर शहरांमध्ये असणाऱ्या दोन पंपांपैकी अलटून-पालटून एखादा पंप बंद असतो त्यामुळे एलपीजी भरून रिक्षा वाहतूक करणाऱ्या चालकांना याचा त्रास होत आहे.
159
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 14, 2026 12:01:31
Kalyan, Maharashtra:मी बायकोला मारून आलोय! नवऱ्याच्या कबुलीजबाबाने पोलिसही हादरले कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ९ वर्षांच्या मुलासमोरच घडला थरार कल्याणमधील उंबर्डे परिसरात पत्नीची हत्या करून नाशिकला जाऊन स्वतःहून पोलिसांसमोर हजर झालेल्या पतीच्या कबुलीजबाबामुळे खळबळ उडाली आहे. अर्चना विशाल भुतकर असे मृत महिलेचे नाव असून तिचा pती विशाल भुतकर याने हा खून केल्याचा आरोप आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य गेल्या दीड वर्षांपासून कौटुंबिक वादामुळे वेगवेगळे राहत होते. विशाल हा मोठ्या मुलासह नाशिकमध्ये राहत होता, तर अर्चना कल्याणमधील उंबर्डे गावातील केडीएमसी गार्डनजवळील कैलास कारभारी यांच्या चाळीत राहून घरकाम करून आपल्या पाच वर्षांच्या मुलीचे संगोपन करत होती.दरम्यान, ११ मार्च रोजी विशाल नाशिकहून कल्याणमध्ये पत्नीला भेटण्यासाठी आला होता. पुन्हा एकत्र राहून संसार सुरू करण्यासाठी त्याने अर्चनाला विनंती केली. मात्र अर्चनाने त्यास नकार दिल्याने दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या विशालने पत्नीवर चाकूने हल्ला करून तिची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.हत्या केल्यानंतर विशाल नाशिकला पळून गेला आणि तेथील पोलीस ठाण्यात जाऊन “मी माझ्या बायकोला मारून आलो आहे” अशी कबुली दिली. यानंतर नाशिक पोलिसांनी कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.खडकपाडा पोलिसांचे पथक उंबर्डे परिसरातील घटनास्थळी पोहोचले असता अर्चना भुतकर हिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. मयताच्या नातेवाईकांनी तिची ओळख पटवली. या प्रकरणी मयताचा मामेभाऊ राजू सुभाष ढाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशानुसार तपास पथक नाशिकला रवाना करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी विशाल भुतकर याला अटक केली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू, मोटारसायकल आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असला आहे.या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, नऊ वर्षांचा मुलगा हा या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचे तपासात समोर आले आहे.
187
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 14, 2026 12:00:29
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर | गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा, घरघुती गॅसची टंचाई नसल्याचा प्रशासनाचा दावा फोल?(पॅकेज) मराठवाड्यात घरघुती गॅस सिलेंडरचा व्यवसायिक वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर छापेमारी, गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी मराठवाड्यात 88 पथकं स्थापन,5 जिल्ह्यातून आतापर्यंत 170 गॅस सिलेंडर जप्त अँकर : छत्रपती संभाजीनगरसह जालना,नांदेड जिल्ह्यात घरघुती गॅस मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरीकांना रांगा लावूनही तासंतास गॅस सिलेंडर मिळत नाहीय.तर दुसरीकडे मराठवाडयातील 5 जिल्ह्यातून व्यवसायासाठी वापरले जाणारे 170 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेत. एका बाजूला प्रशासन घरगुती गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा करत असताना दुसऱ्या बाजूला नागरीकांना रांगा लावूनही गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं प्रशासनाचा मुबलक गॅस साठा असल्याचा दावा फोल ठरताना दिसून येतोय.बघूया मराठवाड्यातील गॅस टंचाई वरचा हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ:१: एक गॅस सिलेंडर आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील हे चित्र पहा.महिला,पुरुष सकाळी 7 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत भर उन्हात उभे आहेत.गॅस एजन्सीने आणलेला गॅसचा साथ संपवून जाईल या भीतीने हे नागरीक नाश्ता जेवण न करताच सकाळी घरातून बाहेर पडले पण दुपारपर्यंत रणरणत्या उन्हात उभे राहूनही त्यांच्या नशिबात गॅस सिलेंडर पडत नाहीय.यामुळे नागरीक हतबल तर झालेच पण भावनिक देखील झालेत.हे चित्र नुसतं छत्रपती संभाजीनगर शहरात नाहीय.जालना,बिड,नांदेड शहरात देखील अशाच रांगा गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लागल्या आहेत.त्यामुळे घरघुती गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचा प्रशासनाचा दावा फोल ठरल्यात जमा आहे. वाक थ्रू +चौपाल नितेश महाजन विथ नागरीक बाईट : नागरीक(नांदेडच्या फिडमध्ये हे बाईट आहेत) व्हिओ:०२: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका गॅसच्या टाकी साठी नागरिकांची सुरू असल्याची घालमेल तुम्ही पाहिली.पण घरघुती गॅसची कोणतीही कमतरता नसल्याचं जिल्हाधिकारी म्हणतायत.ज्याप्रमाणे टंचाईच्या काळात पाणी जपून वापरलं तशीच युद्धाची परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत गॅस जपून वापरण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. बाईट: दिलीप स्वामी,जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर(कोट वर असलेले,2C फिडमध्ये हा बाईट आहे) व्हिओ :०३: हे चित्र झालं घरघुती गॅस मिळवताना सर्वसामान्य नागरिकांचं.पण दुसरीकडे सर्वसामान्यांना घरघुती गॅस मिळत नसताना व्यवसायासाठी मात्र गॅस चोरून लपून मिळत असल्याच समोर आलंय.कारण घरघुती गॅसचा व्यवसायासाठी वापर करणाऱ्या प्रतिष्ठानांवर भरारी पथकाने कारवाई करत मराठवाडयातील 5 जिल्ह्यातून 170 गॅस सिलेंडर जप्त केलेत. मराठवाडयातील कोणत्या जिल्ह्यात किती भरारी पथकं स्थापन करण्यात येऊन किती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले यावर एक नजर टाकूयात ●छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रचंड गॅस टंचाई असताना 11 भरारी पथकं स्थापन करूनही अजून एकही गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेला नाही. ●जालना जिल्ह्यात 8 पथकं स्थापन करण्यात आहेत.आतापर्यंत 59 सिलेंडर जप्त झालेत. ●बिड जिल्ह्यात 19 भरारी पथकं स्थापन ,3 हॉटेलवर फौजदारी कारवाई करण्यात आली. 203 ठिकाणच्या छापेमारीत 28 सिलेंडर जप्त झाले ●परभणी जिल्ह्यात 9 पथकं स्थापन,एका कारवाईत 68 सिलेंडर जप्त करण्यात आलेत. ●लातूर जिल्ह्यात 10 भरारी पथक आहेत.7 हॉटेलमधून 8 सिलेंडर जप्त झाले ●धाराशिव जिल्ह्यात 8 पथक आहेत.81 हॉटेलची तपासणी करत या पथकाने 7 सिलेंडर जप्त केलेत. तर हिंगोलीत 7,नांदेडमध्ये 16, भरारी पथकाची स्थापना करण्यात येऊनही अजून एकही सिलेंडर जप्त झालेला नसला तरी 5 जिल्ह्यातून एकूण 170 सिलेंडर आतापर्यंत या पथकाने जप्त केलेत.त्यामुळे सामान्यांना न मिळणारा गॅस व्यावसायासाठी मिळतो कसा असा प्रश्न उपस्थित झालाय. दरम्यान घरघुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा ईशारा ठिकठिकाणच्या पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलाय. बाईट : सविता चौधर, जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना(माझ्या 2c फिडमध्ये हा बाईट आहे) बाईट : डॉ जगदीश बारदेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी,नांदेड (सतीशने नांदेड हुन पाठवलेल्या 2c फिडमध्ये हा बाईट आहे) व्हिओ:४:एका बाजूला प्रशासन घरघुती गॅस सिलेंडर उपलब्ध असल्याचा दावा करत असलं तरीही प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळीच आहे.त्यामुळे प्रशासनाने भरारी पथकामार्फत व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर कारवाई सुरू केलेली असताना अशाच पद्धतीने कारवाई घरघुती गॅस सिलेंडर मिळण्यासाठी एजन्सी चालकांवर करण्याची हिंमत दाखवली तर सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर लवकर मिळेल हे नक्की नितेश महाजन,झी-२४ तास,छत्रपती संभाजीनगर
217
comment0
Report
Advertisement
Back to top