Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
नाशिक के खड्डे: 77 करोड़ खर्च के बावजूद सडकें डामाडोल!
YKYOGESH KHARE
Sept 22, 2025 14:46:44
Nashik, Maharashtra
Nsk_khaddepkg Feed by 2C Anchor राज्यात सध्या वाईन कॅपिटल असलेलं नाशिक शहर पॉटहोल कॅपिटल म्हणून ओळख बनली आहे. ठीक ठिकाणी पडलेल्या खड्डे सध्या मंदिरांच्या नगरी मध्ये येणारे पर्यटक आणि नाशिककर यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. Vo 1 हे खड्डे आहेत राजीव गांधी महापालिका इमारतीच्या परिसरातील ...अवघ्या दोनशे मीटर अंतरावरील हे खड्डे... जर महापालिका परिसरातील हे खड्डे प्रशासनाला दिसत नसतील तर शहरात काय अवस्था असेल याचा विचार आपण करू शकता... बांधकाम विभाग सर्व काही आलबेल असल्याची भूमिका दाखवत आहे. अखेर गिरीश महाजन यांनी स्वतः पाहणी केली आणि अल्टिमेटम दिलाय Byte गिरीश महाजन vo 2 विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांमध्ये नाशिक महापालिकेने खड्डे बुजवण्यासाठी जवळपास 77 कोटी रुपये खर्च केले आहेत.. मात्र तरीही शहरातील खड्डे मात्र कायम आहेत . महाजनांनी पाच तास बैठक घेत महापालिका बांधकाम विभागाची झाडाझडती घेतली आहे त्यात धक्कादायक रस्ते बांधणीचा गैरव्यवहार समोर आला आहे. एम एस आर डी सी च्या पंधरा अधिकाऱ्यांचे पथक आता या खर्चाच ऑडिट करतेय मात्र तरीही खड्डे कधी बुज विले जातील असा प्रश्न नाशिक कर यांना पडला आहे Byte नाशिककर नाशिककर Vo 3 पर्यटनाची नगरी असलेल्या नाशिकचा विकास या खड्ड्यांमुळे खड्ड्यांमध्येच अडकला आहे आणि त्याबरोबर नाशिककरांचा श्वासही... अनेकांचे मृत्यू होऊनही लक्षात येत नसेल तर राज्य सरकारने महापालिकेच्या कारभाराकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Sept 22, 2025 17:16:11
kolhapur, Maharashtra: भारतासाठी "हिंदू राष्ट्र" या विचाराचा पुरस्कार करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिम विरोधी आहे, या गैरसमजातून बहुतांशी मुस्लिम संघापासून अंतर ठेवून असतात, संघाला जाणून घेण्याचा प्रयत्न ही करत नाही.. मात्र, काही मुस्लिम खुल्या दिलाने संघाच्या शाखेतच जात नाहीत, तर संघाच्या विविध उपक्रमामध्ये ही उत्साहाने सहभागी होतात.. सध्या संघ शताब्दी वर्षाच्या निमित्ताने नागपूरातील वेगवेगळ्या भागात संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन सुरू आहे... त्यामध्ये काही मुस्लिम स्वयंसेवक पूर्ण गणवेशात संघाच्या पथसंचलनात सहभागी होत असल्याचे पाहायला मिळत आहे... संघ जाती धर्माचा भेद कधीच पाळत नाही आणि हे संघाच्या शाखेत गेल्यानंतर आणि संघ स्वंयसेवकांच्या मध्ये वावरल्यानंतरच कळू शकते अशी प्रतिक्रिया संघाच्या गड्डीगोदाम भागात निघालेल्या पथसंचलनात सहभागी मुस्लिम स्वयंसेवकानी दिली आहे.. -------- बाईट मोहम्मद फारूक
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 22, 2025 14:45:41
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त भगतसिंग नगरमध्ये पोलिसांची कारवाई Amb drugs seized Anchor : अंबरनाथमध्ये पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री विरोधात मोठी कारवाई करत तब्बल अडीच लाख रुपयांचा साठा जप्त केला असून दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यात एका महिलेचा देखील समावेश आहे. Vo : अंबरनाथ पश्चिमेच्या भगतसिंग नगरमध्ये अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे एपीआय अविनाश गायकवाड यांनी पथकासह धाड टाकत शरीफ सलीम शेख आणि त्याची पत्नी आसिया शरीफ शेख या दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून १ लाख ६० हजार रुपये किमतीचं एमडी ड्रग, ८० हजार रुपयांचं हेरॉईन, ३३४ बॉटल थीनर सोल्युशन आणि कप सिरपच्या बाटल्या असा अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे मागील काही दिवसात शरीफ शेख याच्यावर झालेली ही तिसरी कारवाई असून तो जामीनावर सुटून आल्यानंतर पुन्हा ड्रग विक्रीत सक्रिय होत असल्याचं समोर आलं आहे. त्याच्यावर यापूर्वीचे तब्बल २० गुन्हे दाखल असून सध्या दाखल झालेला २१ वा गुन्हा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे आता त्याच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं एसीपी शैलेश काळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी सांगितलं आहे. Byte : शैलेश काळे, एसीपी चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
1
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 22, 2025 14:34:24
2
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 22, 2025 14:31:57
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 22, 2025 14:31:38
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- औसा तालुक्यातील लामजना येथे चार तासापासून मुसळधार पाऊस... पावसाचे पाणी शिरले अनेक नागरिकांच्या घरात.... अन्नधान्य सह संसार उपयोगी साहित्याचेही मोठे नुकसान..... 15 ते 20 जणांच्या घरात पावसाचे पाणी घुसल्याची प्राथमिक माहिती... AC ::- औसा तालुक्यातील लामजना गावात गेल्या चार तासांपासून मुसळधार पावसाचा तडाखा सुरू आहे. या पावसामुळे गावातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून, अन्नधान्य व संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.प्राथमिक माहितीनुसार, सुमारे 15 ते 20 घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सकाळपासूनच लातूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 22, 2025 13:48:13
Akola, Maharashtra:Anchor : अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यभरात प्रचंड पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी देशोधडीला लागला आहे. कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर यांसारख्या प्रमुख पिकांची पेरणी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे.दरम्यान, समाज माध्यमांवर एका शेतमजूर महिलेने शेतकऱ्यांची व्यथा मांडणारं गीत गायलं असून ते गीत प्रचंड व्हायरल होत आहे. शेतकऱ्यांच्या वेदना, संकटं आणि असहायता या गीतातून प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत.यामुळे अनेक शेतकरी वर्ग आणि समाजातील विविध घटक या गीताशी भावनिकरित्या जोडले गेले आहेत.शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणी होत आहे.
1
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 22, 2025 13:34:52
Virar, Maharashtra:Date-22sep2025 Rep-prathamesh tawade Loc-virar Slug-VIRAR MAHAKALI Feed send by 2c Type-AVB Slug- विरार मध्ये जगत जननी महाकाली देवी सव्वा किलो वजनी सोन्याचा हार , चांदीचा मुकुट चढवून देवीचा शृंगार साडे बारा फुटांची देवीची मूर्ती भक्तांचे आकर्षण अँकर - विरार पूर्वेच्या कारगिल नगर येथील जगत जननी महाकाली देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्ताने भक्तिमय वातावरण पहायला मिळत आहे... १८ वर्ष जुन्या या देवीच्या मंदिरातील साडे बारा फुटाची भव्य मूर्ती भाविकांचे आकर्षण आहे.. आज नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी या मूर्तीची विधीगत पूजा अर्चना करण्यात आली .. त्याच सोबत देवीला भक्तांनी अर्पित केलेला सव्वा किलो वजनाचा सोन्याचा हार, चांदीचा मुकुट व वेणी चढवून देवीचा शृंगार करण्यात आला.. सकाळपासून देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भक्तांची रीघ पाहायला मिळत आहे.. यंदा नऊ रात्रीचे दहा दिवस विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम मंदिर प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत... बाईट- मनीष राऊत, विश्वस्त.
2
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 22, 2025 13:32:15
Jalna, Maharashtra: FEED NAME | 2209ZT_JALNA_RIVER(3 FILES) जालना : जालन्याच्या विरेगावातील कल्याणी नदीच्या पुरात अडकलेल्या 20 नागरिकांची सुखरूप सुटका... 04 महिला 16 पुरुष आणि 30 शेळ्यांची सुखरूप सुटका अग्निशमन दलाच्या जवानांचे बोटीतून रेस्क्यू अद्यापही सुरु अँकर :जालन्याच्या विरेगाव येथील कल्याणी नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीतून हे रेस्क्यू ऑपरेशन केल. जालना तालुक्यातील विरेगाव येथे कल्याणी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात 30  नागरिक अडकले होते. आज सकाळी हे लोक नदीच्या पात्रालगतच्या शेतात गेले होते. त्याचवेळी अचानक नदीला पूर आल्याने ते पाण्यात अडकले. पाण्याचा जोर जास्त असल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य होत नव्हतं. यावेळी स्थानिकांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर आणि जिल्हाधिकारी अशीमा मित्तल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अग्निशमन दलाला तातडीने कारवाईचे निर्देश दिले. अखेर जवानांनी बोटीद्वारे चार महिला 16 पुरुष आणि 30 शेळ्यांची रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण केले. पुराच्या पाण्यात अडकलेले या भागातील नागरिक सुखरूप बाहेर काढण्यात आले आहेत. याच नदीच्या दुसऱ्या बाजूला पुन्हा सात ते आठ नागरिक सकाळपासून अडकलेले आहेत. आता अग्निशमन दलाचे जवान त्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 22, 2025 13:30:35
Pandharpur, Maharashtra: Anchor - सोलापूर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. केंद्राचं पाहणी पथक येण्याबाबत उद्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर इथली परिस्थिती सादर करणार पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा अतिवृष्टी पाहणी दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला करमाळा माढा अक्कलकोट, दक्षिण सोलापूर ,मोहोळ ,या तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागील आठवडाभरापासून ढगफुटी सदृश्य पावसानं थैमान घातले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे हे या सर्व भागाचे पाहणी करत आहेत. या अतिवृष्टीने झालेलं नुकसान हे प्रचंड आहे. अद्यापही शेतात पाणी आहे. त्यामुळे पंचनामे करण्यास अडचण येत आहेत. ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाणवत आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सोलापूर जिल्ह्यातील शेती, पिकं फळबागा नुकसानीची परिस्थिती मांडून केंद्राचे पाहणी पथक येऊन केंद्राकडून मदत मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे माढा आणि करमाळा तालुक्यातील 26 गावांना फटका बसणार आहे या ठिकाणी एनडीआरएफ च्या टीम तैनात ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्याची माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली आहे ---- Byte - पालकमंत्री जयकुमार गोरे
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 22, 2025 13:30:24
Jalna, Maharashtra:FEED NAME | 2209ZT_JALNA_RANJANI_ANDO(8 FILES) जालना :रांजणी येथील दुधना नदी पात्राकडे शेतकर्यांचे जलसमाधी आंदोलन रांजणीसह चार मंडळांची नावं अनुदान यादीतून वगळल्याने शेतकरी संतप्त अँकर- जालना जिल्ह्यातल्या रांजणी येथील दुधना नदी पात्रात शेतकर्यांनी जलसमाधी आंदोलन केलंय.. अतिवृष्टीग्रस्त अनुदान यादीतून घनसावंगी तालुक्यातील रांजणीसह पानेवाडी आणि चार मंडळातील गावांची नावं वगळण्यात आली. त्यामुळं शासनाच्या या निर्णयामुळे शेतकर्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय. या अन्यायाविरोधात रांजणीसह संबंधित चार मंडळातील शेतकर्यांनी दुधना नदी पात्रामध्ये जलसमाधी आंदोलन केलंय.. प्रशासनाने तातडीने योग्य तो निर्णय घेऊन या गावांचा अतिवृष्टी ग्रस्त यादीत समावेश करावा, तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकर्यांनी दिलाय...
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 22, 2025 13:16:27
Ratnagiri, Maharashtra:Anchor - मनसेमधून हकालपट्टी झालेले रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आणि काही नाराज पदाधिकाऱ्यांनी आता भाजपवासी होण्याचा निर्णय घेतलाय. उद्या प्रदेशाध्यक्ष रविंद चव्हाण यांच्या उपस्थितीत नरिमन पॉईंट येथे हा पक्षप्रवेश होणार आहे. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिळून अंदाजे 400 ते 500 कार्यकर्ते भाजपामध्ये जातील असा दावा या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याचवेळी खेडचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचा रत्नागिरी जिल्ह्यातील मनसेचा चेहरा म्हणून ओळख असलेले वैभव खेडेकर देखील भाजपवासी होणार आहेत. उद्या सकाळी सर्व पदाधिकारी खेडमधून जोरदार शक्ती प्रदर्शन करत मुंबईच्या दिशेने रवाना होतील.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 22, 2025 13:16:17
0
comment0
Report
Advertisement
Back to top