Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411018
मुळा नदी पुल के लिए भूमि अधिग्रहण शुरू, यातायात जाम घटने की उम्मीद
KPKAILAS PURI
Dec 25, 2025 09:22:53
Pimpri-Chinchwad, Maharashtra
पुणे की बानेर, बालेवाड़ी और वाकड क्षेत्रों को जोड़ने वाले मुळा नदी पर बने पुल के लिए आवश्यक भूमि कुछ भू-स्वामियों द्वारा उपलब्ध न कराए जाने के कारण यह पुल अब तक उपयोग में नहीं आ पाया था। इसके चलते स्थानीय नागरिकों को भारी यातायात जाम का सामना करना पड़ रहा था। अब पुणे महानगरपालिका प्रशासन ने जबरन भूमि अधिग्रहण की प्रक्रिया शुरू कर संपर्क मार्ग के विकास कार्य को गति दी है। पुणे और पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाओं ने संयुक्त रूप से वर्ष 2013 में बालेवाड़ी और वाकड को जोड़ने वाले मुळा नदी पुल को मंजूरी दी थी। विभिन्न कारणों से इस पुल का निर्माण कार्य देरी से वर्ष 2018-19 में पूरा हुआ। इस पुल के निर्माण पर लगभग 31 करोड़ रुपये का खर्च आया है। पुल का निर्माण पूरा होने के बावजूद पुणे महानगरपालिका क्षेत्र के बालेवाड़ी इलाके में संपर्क सड़क के लिए आवश्यक भूमि उपलब्ध न होने के कारण पुल का उपयोग नहीं हो पा रहा था। इससे बानेर, बालेवाड़ी और वाकड क्षेत्रों में यातायात समस्या और भी गंभीर हो गई थी। अब महानगरपालिका द्वारा भूमि अधिग्रहण कर संपर्क सड़क का कार्य शुरू किए जाने से यह पुल शीघ्र ही यातायात के लिए खुलने की संभावना है। पुल के शुरू होते ही क्षेत्र में यातायात जाम की समस्या काफी हद तक कम होने की उम्मीद जताई जा रही है.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Dec 25, 2025 10:35:30
Pandharpur, Maharashtra:Anchor-माढ्यातील भुमिअभिलेख कार्यालयात शेतकरी पिता पुत्राचा संताप अनावर झाल्याची घटना घडली आहे. मागील चार वर्षांपासून मोजणीसाठी हेलपाटे मारत असल्यामुळे वैतागलेल्या शेतकरी पिता पुत्राने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. या घटनेत मुलाच्या डोळ्यात पेट्रोल गेल्याने तो जिवाच्या आंकाताने ओक्सा बोक्सी रडत आरडा ओरड करीत होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. कार्यालयातील सीसीटीव्हीमध्ये घटना कैद झाली आहे. माढा तालुक्यातील आकुंभे येथील दोघा शेतकरी पिता पुत्र शेत जमीन मोजणीच्या कामासाठी चार वर्षांपासून कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. मात्र कर्मचारी आर्थिक लाभापोटी काम करत नाहीत, असा आक्षेप नोंदवत ढिसाळ कारभारा विषयी संताप व्यक्त केला. यावेळी भुमि अभिलेखचे उप अधीक्षक जे.सी.साळवे गैरहजर होते.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 25, 2025 10:32:25
Kalyan, Maharashtra:राज्यात महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. विविध ठिकाणी आघाडी-बिघाडी, स्वबळाचा नारा अशी समीकरणं मांडत राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महापालिकेत आपली सत्ता यावी यासाठी सर्वच पक्षांनी मोठी फिल्डिंग लावली आहे. डोंबिवलीच्या नागरिकांचा अखंड पाठिंबा आणि वर्षानुवर्षांची विश्वासार्ह कामगिरी यांच्या बळावर विश्वनाथ राणे जनतेच्या हितासाठी, प्रामाणिक प्रशासनासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी तत्पर आणि सज्ज असल्याचं दिसून येतंय. डोंबिवलीच्या प्रगतीचा वेग कायम ठेवण्याचा त्यांचा निर्धार अधिक मजबूत होताना दिसून येतोय..आज यशोगाथा या कार्यक्रमात कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर विश्वनाथ राणे यांच्याशी संवाद साधणार आहोत... विश्वनाथ राणे १) राजकारणात कसे आलात.. तुमची राजकीय पार्श्वभूमी होती का... काय सांगाल याबाबत २) तुमचा प्रभाग अविकसित होता.. आत मात्र सुंदर केलंय त्यांचा कमग काय? ३) प्रभागात अनेक विकासाभिमुख काम केलंत.. काय सांगाल... ४) तुमच्या प्रभागात पाण्याची समस्या मोठी होती... मात्र तुम्ही योग्य नियोजन केलंय काय सांगाल... 5) २००५ च्या पुरात आणि कोरोना काळात तुम्ही अनेक काम केलंय.. काय सांगाल... 6) तुम्हाला विविध जाती-धर्माच्या लोकांचा तुम्हाला कसा पाठिंबा मिळतो.. 7) २५ वर्ष राजकारणात टिकून आहे हे कसं शक्य झालं... 8) तुम्हाला या राजकीय कामात कोणाचं पाठबळ आहे....
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 25, 2025 09:47:24
Jalna, Maharashtra:जालना : भाजप जालन्यात युतीसाठी सकारात्मक-दानवे युतीसाठी भाजप सेनेत चर्चा झाली,रिपाइंसोबत देखील चर्चा करणार युतीबाबत दोन दिवसांत निर्णय नक्की होईल केवळ पत्र देऊन युती करा म्हणणं योग्य नाही,खोतकरांना दानवेंकडून सल्ला युती होण्याआधी एकमेकांवर आरोप करणं योग्य नाही तसेच महापौर पदाचा उमेदवार युती होण्याआधी जाहीर करणं योग्य नाही युतीसाठी आम्ही प्रयत्न करणार अँकर : भाजप जालन्यात युतीसाठी सकारात्मक असल्याचं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हणटलं आहे.ते जालन्यात बोलत होते.युतीसाठी भाजप शिवसेनेत चर्चा झाली आहे.रिपाइंसोबत देखील चर्चा करणार असल्याचं दानवे म्हणालेत.युतीबाबत दोन दिवसांत निर्णय नक्की होईल असा दावा दानवे यांनी केला आहे.केवळ पत्र देऊन युती करा म्हणणं योग्य नाही असा सल्ला दानवेंनी खोतकरांना दिलाय.युती होण्याआधी एकमेकांवर आरोप करणं योग्य नाही तसेच महापौर पदाचा उमेदवार युती होण्याआधी जाहीर करणं योग्य नसल्याच सांगत युतीसाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचही रावसाहेब दानवे म्हणालेत.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 25, 2025 09:47:08
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात आईवर अत्याचार आणि चिमुरड्याची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा, अहेरी सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल अँकर: विवाहितेवर अत्याचार करताना मध्ये आलेल्या तीन वर्षांच्या चिमुरड्याची तोंड दाबून निर्घृण हत्या करणाऱ्या संजू विश्वनाथ सरकार या आरोपीला अहेरी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने बुधवारी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. तब्बल सात वर्षांनंतर लागलेल्या या निकालाने समाजातील विकृत प्रवृत्तींना जरब बसली असून, पीडित मातेला उशिरा का होईना पण न्याय मिळाला आहे. मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर येथे १९ जून २०१७ च्या मध्यरात्री ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली होती. पीडित महिला आपल्या तीन वर्षांच्या मुलासह घरात असताना, तिचा पती रोजगारासाठी आंध्र प्रदेशात गेला होता. हीच संधी साधून शेजारी राहणाऱ्या संजू सरकार याने मध्यरात्री दोनच्या sुमारास घरात घुसून महिलेवर अत्याचार केला. यावेळी कुशीत झोपलेल्या निष्पाप बालकाला जाग आली आणि तो रडू लागला. या आवाजामुळे आपले पाप उघड होईल या भीतीने नराधम संजूने त्या चिमुरड्याचे नाक आणि तोंड दाबून त्याचा जागीच जीव घेतला. आईने आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी प्रतिकार केला असता, आरोपीने तिच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला मरणासन्न अवस्थेत सोडून पळ काढला होता. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने घडलेला घटनाक्रम सांगितला आणि पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवून आरोपीला जेरबंद केले. अहेरी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रकाश आर. कदम यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. तत्कालीन तपास अधिकारी गजानन टोम्पे यांनी सादर केलेले ठोस पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि पीडितेची साक्ष या खटल्यात अत्यंत कळीची ठरली. हत्या प्रकरणी फाशी, बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल जन्मठेप, तर घरफोडीसाठी १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. यासोबतच पीडित महिलेला विधी सेवा प्राधिकरणाकडून आर्थिक मदत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 25, 2025 09:32:08
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 25, 2025 09:20:59
kolhapur, Maharashtra:नागपुर अकोला, अमरावती आणि चंद्रपूर महापालिका निवडणूकीच्या दृष्टीने आज नागपुरात महत्वाच्या बैठक सुरू आहे... भाजपच्या धंतोली परिसरातील विदर्भ कार्यालयात ह्या बैठका होत आहेत... सध्या अकोला कोअर कमिटीसोबत महसूलमंत्री मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक सुरू आहे.. दुपारनंतर अमरावती आणि संध्याकाळी चंद्रपूर महापालिकेसाठी बैठक होणार आहे.. महायुती करण्याबद्दल आणि तिकीट निश्चितीच्या दृष्टीने ह्या बैठका होत असून त्यामध्ये विद्यमान जिल्हाध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष आमदार माजी आमदार आणि महापालिका हद्दीतील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.. अकोल्याच्या सध्या सुरू असलेल्या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अनुप धोत्रे, अकोला शहराध्यक्ष जयंत म्हसणे, विजय अग्रवाल व इतर पदाधिकारी बैठकीत उपस्थित आहेत...
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 25, 2025 08:46:22
Nanded, Maharashtra:नांदेड जिलेातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार या गावात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडालीये. दोन भावांनी रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली , त्यांच्या आई-वडिलांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आई-वडिलांनी आत्महत्या केली की घातपात झाला याचा तपास सुरु आहे . घटनेचे कारण अस्पष्ट असून आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडला असल्याचा नातेवाईक आणि ग्रामस्थ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. 22 वर्षीय बजरंग रमेश लखे 25 वर्षीय उमेश रमेश लखे या दोन सख्ख्या भावाची मुगट रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे खाली आत्महत्या केली. त्यांचे वडील 51 वर्षीय रमेश होनाजी लखे आणि आई 44 वर्षीय राधाबाई रमеш लखे यांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. लखे कुटुंबात हे चार जनच होते त्यामुळे संपूर्ण कुटुंब या घटनेमुळे समाप्त झाले. उमेश लखे हा मनसेचा मुदखेडचा माजी तालुका उपाध्यक्ष होता. सामाजिक कार्यातही उमेशचा होता सक्रिय सहभाग होता. दरम्यान रमेश लखे यांचे वीस वर्षांपूर्वी हृदयाचे ऑपरेशन झाले होते त्यांची प्रकृती ठीक नसायची. शिवाय कुटुबाची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. श्वविच्छेदन अहवालानंतर मृत्युचे कारण अधिक स्पष्ट होईल. पोलीस सर्व बाजूने तपास करत असल्याचे पोलीस अधीक्षक nowabish कुमार यांनी सांगितले.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 25, 2025 08:32:41
Akola, Maharashtra:अकोला–वाशिम महामार्गावरील अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सावरखेड ट toll नाक्यावर धक्कादायक प्रकार घडला आहे. मालेगाव येथून अकोल्याकडे येणाऱ्या एका_vehicleधारकास शिल्लक_paisांच्या कारणावरून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी लाटाकाठ्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.वाशिम जिल्ह्यातील मालेगाव हे गाव ट toll नाक्याच्या अगदी जवळ असल्यामुळे मालेगाव ते अकोला प्रवासासाठी ट toll आकारणीवरून वारंवार वाद होत असल्याचे सांगितले जाते,याच वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.या सावरखेड टोल नाक्यावर यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्याचे समोर आले असून, येथे शासनाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचा आरोप वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. कोणतेही ठोस नियम न पाळता कंत्राटदार मनमानी कारभार करत असल्याचेही वाहनधारकांचे म्हणणे आहे.दरम्यान, या घटनेची दखल घेत पोलीस अधिक तपास करत असून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Dec 25, 2025 08:24:13
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 25, 2025 08:24:00
0
comment0
Report
christmas
Advertisement
Back to top