Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
नाशिक में महार वतन की 39 एकड़ जमीन कब्जे की खाजी-राजनीतिक गठजोड़ उजागर
YKYOGESH KHARE
Nov 17, 2025 08:49:16
Nashik, Maharashtra
पुण्यातील कोरेगाव पार्कमधील महार वतनाचा ४० एकर जमीन हडपण्यासाठी महसूल यंत्रणेचा बेकायदेशीर कारभाराचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर राज्यभरातील अशा अनेक तक्रारीचा ओघ झी २४ तासकडे सुरू झालाय. आता नाशिकमध्ये महार वतनाच्या जमिनी हडप करण्यासाठी भूमाफियाना मदत करण्यासाठी महसूल महापालिका आणि स्थानिक यंत्रणा कशा एकत्रित याचा पर्दाफाश आपण करणार आहोत ...बघूया ४५ एकर वतनाच्या जमिनीचा नवीन पर्दाफाश हे आहेत आनंद गांगुर्डे..रेल्वेमध्ये नोकरी करत ते आता निवृत्त झाले..स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना दसक गावात सर्वे. नं. 78 आणि 79 मध्ये अडीच ते तीन एकर जमीन शेती करण्यासाठी दिली... मात्र या जमिनीवर नाशिक रोड परिसरातील काही भूमाफियांनी ताबा घेतला...तो सोडविण्यासाठी खंडणी मागण्यात आली मात्र ती देऊ न शकल्याने भूमाफियांनी ही जमीन परस्पर विकली...अवघ्या 100 रुपयांच्या स्टॅम्पवर...सर्वसामान्य निरक्षर गरजू लोकांना गुंठ्याने विक्री करत लाखोंचे व्यवहार करण्यात आले. त्यावेळी गांगुर्डे यांनी तक्रार केली मात्र तलाठी तहसीलदार यांनी लक्ष दिले नाही...नंतर त्यावर बंगले बांधण्यास सुरुवात झाली त्यावेळीही महापालिकेला सूचना देण्यात आली मात्र प्रत्येकाने दुर्लक्षच केले....अखेर गांगुर्डे यांनी विभागीय आयुक्तांकडे पुराव्यासह लेखी तक्रार नोंदविली...मात्र तरीही महसूल प्रशासन जागे झाले नाही...गांगुर्डे यांनी त्यांच्या प्रमाणे 39 शेतीमालकाना जागे करण्याचा प्रयत्न केला, संघटितपणे आंदोलने केली..10 ते 12 आंदोलने नाशिक महापालिकेसमोर आणि विभागीय आयुक्तांकडे करून प्रशासनाला जागविण्यात आटोकाट प्रयत्न केला मात्र आजपर्यंत केवळ कागदी कारवाई झाली आजही ते भूमिहीन आहेत..आता जवळपास 39 जमीन मालकांच्या या जागेवर महापालकींच्या नोंदीनुसार 367 घरे बंगले उभी राहिलीयेत. आबंदात तक्रारदार पीडित. या सर्व करत असताना गांगुर्डे यांनी न्यायालयात तक्रार केली . एकूणच या जागेवरील हस्तांतरण आणि बांधकाम याला स्थगिती मिळविली. त्यावेळी 2018 ला विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी एक दोन घरे पाडण्याचे नाटक करण्यात आले. मात्र लोकांनी विरोध केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे संगत काम बंद केले . त्यामुळे टाळाटाळ आजवर सुरूच राहिलीये . शासनाचा लाखो रुपयांचा नजराण्यापोटी महसूल घोटाळा सुमारे हजार कोटींपेक्षा अधिकचा असण्याची शक्यता असून, याप्रकरणी अनेक परिसरातील तत्कालीन नगरसेवक आणि काही राजकीय व्यक्तींची नावे समोर येतायेत... त्यातील काहींविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. खरतर महार वतनाची २ हेक्टर २० आर शेतजमीन शासनाच्या परवानगीशिवाय विक्री किंवा हस्तांतरण करता येत नाही. बांधकाम सुरू झाल्यापासूनच या विरोधात तक्रारी होत असताना कारवाईवेळी नेहमी राजकीय दबाव आणला जात असे. या साठी माफियांकडून मोठ्या प्रमाणावर खर्चही करण्यात आला. त्यामुळे अधिकारी तुपाशी आणि जामीनमालक आजही उपाशी राहिले आहेत. कुंपणच शेत खात असेल तर दहा बारा वर्षापासून लढणाऱ्या या जमीनमालकांना कोण न्याय देणार हाच खरा प्रश्न आहे.
75
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Nov 17, 2025 10:36:45
Shirdi, Maharashtra:काॅग्रेसचे जेष्ठ नेते आणी केंद्रीय कमेटीचे सदस्य बाळासाहेब थोरात त्यांच्या मतदारसंघातील संगमनेर नगरपालीकेच्या निवडणूकीत स्थानिक आघाडीच्या माध्यमातून निवडणूकीला सामोरे जात आहेत.. त्यामुळे थोरातांच्या मतदारसंघात असलेल्या नगरपालीका निवडणूकीत काॅग्रेसचा पंजा गायब झाला आहे... संगमनेर नगरपालीकेवर अनेक वर्षांपासून काॅग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची एकहाती सत्ता आहे.. यावेळेस मात्र त्यांना काॅग्रेसचे चिन्ह सोडून स्थानिक शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूकीला सामोरे जावं लागत आहे.. काॅग्रेस पक्षातून निलंबित केलेले आमदार सत्यजित तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक आघाडीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली असून महायुतीला शह देण्यासाठी पत्नी मैथीली तांबे यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे तर आई दूर्गाताई तांबे यांचाही अर्ज दाखल केला असून सगळ्या वॉर्डात स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूकीला सामोरे जात आहे.. मात्र एकीकडे काॅग्रेस पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेल्या बाळासाहेब थोरात यांनाच काॅग्रेस पक्षाचं चिन्ह सोडून निवडणूक लढवण्याची वेळ आलीय...
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 17, 2025 10:27:57
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 17, 2025 10:26:01
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल, भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शहराच्या विकासासाठी भाजपला साथ देण्याचे केले आवाहन तर बल्लारपुरातील विकास कामे करण्यासाठी काँग्रेसला संधी देण्याचे काँग्रेस उमेदवाराचे आवाहन अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांचे उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आले. राज्यातील दिग्गज भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उमेदवार रेणुका दुधे आणि पदाधिकाऱ्यांसह रॅलीने जात अर्ज सादर केला. ही नगर परिषद नगरसेवक संख्येच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर परिषद असून शहर न. प. वर भाजपची सत्ता है. विकास कामात सातत्यासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले तर बल्लारपुरातील विकास कामे करण्याची संधी काँग्रेसला देण्याचे आवाहन काँग्रेसच्या नगराध्यक्षपद उमेदवार अलका वाढई यांनी केले. बाईट १) आ. सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते बाईट २) अलका वाढई, काँग्रेस उमेदवार
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 17, 2025 10:09:22
Kalyan, Maharashtra:कल्याण क्राइम ब्रांचच्या पथकांनी गावठी पिस्टल, जिवंत काडतुसेसह, खंजीर, तलवार, चाकू विक्रीसाठी आणणाऱ्या रोशन झा या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण क्राइम ब्रांच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना एक इसम गावठी बनावट चे पिस्तूल तसेच घातक शस्त्र विक्रीसाठी घेऊन आला असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण क्राइम ब्रांचच्या पथकाने डोंबिवली पूर्वेकडील गोकुळधाम टॉवर या इमारतीमध्ये सापळा रचला. सदर आरोपी रोशन झा हा याच इमारतीमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना होती. पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकत 3 गावठी पिस्टल, 3 जिवंत काडतुसे, दोन मॅक्झिन, एक खंजीर, दोन चाकू, दोन तलवार अशी घातक शस्त्र जप्त केली आहेत. या प्रकरणी रोशन झा सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. रोशन याला याआधी देखील उल्हासनगर मधील विविध पोलीस ठाण्यात सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान रोशन झा याला स्थानिक राजकीय नेत्यांचा आश्रय असल्याची देखील माहिती समोर येत आहे. तपास सुरू आहे.
59
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 17, 2025 10:09:00
47
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 17, 2025 09:51:31
34
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 17, 2025 09:46:07
Nanded, Maharashtra:एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाने मुलाने मोठा झाल्यावर आपल्या वडिलांच्या खुणाचा बदला घेतला. नांदेडमधील बळीरामपूर मध्ये ही घटना घडली. बळीरामपूर येथील राष्ट्रपाल कपाळे हा दुकानात बसलेला असताना अज्ञात आरोपीनी धारदार शस्त्रानी वार करून त्याचा खूण केला. कपाळे एका खूण प्रकरणात जामीनावर बाहेर आला होता. 2009 साली कपाळे याने राजू गवळे यांचा खूण केला होता. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक बाब समोर आली. खूण झालेल्या गवळे यांच्या 20 वर्षीय मुलाने त्याच्या मित्रांच्या मदतीने खूण केल्याचे निष्पन्न झाले. तब्बल 17 वर्षानंतर मुलगा नागेश गवळे याने दोन मित्रांच्या मदतीने कपाळे याचा खूण केला.आरोपीनी याबाबत कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
45
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 17, 2025 09:37:55
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात 11 नगरपरिषद आणि एक नगरपंचायत अशी 12 नगरपालिकांची निवडणूक जाहीर झाली आहे... आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक प्रशासकीय कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू आहे.. अद्यापही महायुती असेल किंवा महाविकास आघाडी यांच्याकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही त्यामुळे संभ्रम देखील आहे... कोपरगाव असेल श्रीरामपूर असेल आणि नेवासा तालुक्यात महायुतीतच बंड होण्याची शक्यता आहे... तर दुसरीकडे महाविकास आघाडीत देखील घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकतील.. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अवघ्या काही तासांमध्येच सर्व नगरपालिकांचे चित्र स्पष्ट होईल...कोपरगाव येथील प्रशासकीय कार्यालया बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
117
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 17, 2025 09:23:13
Nagpur, Maharashtra:Ngp Bjp rally live u ने फीड पाठवले ----- चंद्रशेखर बावनकुळे बाईट -- आज आम्ही सर्वच नगरपालिकेत महायुती म्हणून समोर जात आहोत... कामठी मध्ये अजय अग्रवाल( नगराध्यक्ष ) आणि सर्व नगरसेवकांनी फॉर्म भरले आहे.. महायुतीचा विजय होईल.. 51% मत मिळतील -- कामठी येथील जनता विकासाला मत देईल असा मला विश्वास आहे.. धर्मपंथाच्या पलीकडे जाऊन मत देतील -- विदर्भात अनेक ठिकाणी महायुती झाली आहे.... काही ठिकाणी महायुती म्हणून तर काही ठिकाणी मित्रपक्ष म्हणून लढत आहोत... जिथे मित्र पक्षाविरुद्ध लढत आहोत तिथे मनभेद किंवा मतभेद ते होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ -- दोन मुद्दे घेऊन आम्ही चाललो आहे मोदी आणि देवेंद्रजींच डबल इंजिन सरकार... सर्व योजना समाजापर्यंत पोहोचवायचे असल्यास महायुतीचा नगराध्यक्ष होणे गरजेचे आहे... नगरपालिकेचा विकास भाजप, महायुती करू शकते -- काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे पण अर्ज घेण्याचे अखेरच्या दिवसापर्यंत ते अर्ज मागे घेतीला -- गोंदिया भंडारा मध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढत आहे.... on जमीन घोटाळा -- विकास खारगे समिती रिपोर्ट करून आम्हाला देतील 30 दिवसांचा अवधी दिला होता... बारा दिवस झाले 18 दिवस शिल्लक आहे -- on ठाकरे -- ज्या पदाला ज्या व्यक्तीची गरज आहे... त्यावेळेस महाराष्ट्र हा निर्णय घेत असतो कुठलेही सरकार असो... विरोधी पक्षाचे असो ki स्व पक्षाचे असो.... या राज्याची विरासत अशीच आहे... काही विषय भावनिक असतात त्यावर निर्णय होत असतो -- बिहार इफेक्ट महाराष्ट्रातील दिसेल
147
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 17, 2025 09:15:04
Nashik, Maharashtra:पुण्यामध्ये कोरेगाव पार्कमधील महार वतनाचा ४० एकर जमीन हडपण्यासाठी महसूल यंत्रणेचा बेकायदेशीर कारभाराचा पर्दाफाश झाला होता. त्यानंतर राज्यभरातील अशा तक्रारीचा ओघ झी २४ तासकडे सुरू झालाय. आता नाशिकमध्ये महार वतनाच्या जमिनी हडप करण्यासाठी भूमाफियाना मदत करण्यासाठी महसूल महापालिका आणि स्थानिक यंत्रणा कशा एकत्रित होतात हे आपण पाहणार आहोत... बघूया ४५ एकर वतनाच्या जमिनीचा नवीन पर्दाफाश. आनंद गांगुर्डे यांनी रेल्वेमध्ये नोकरी करत ते आता निवृत्त झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना दसक गावात सर्वे क्रमांक ७८ आणि ७९ मध्ये अडीच ते तीन एकर जमीन शेती करण्यासाठी दिली; परंतु या जमिनीवर नाशिक रोड परिसरातील भूमाफियांनी ताबा घेतला. तो सोडविण्यासाठी खंडणी मागण्यात आली मात्र ती देऊ न शकल्याने जमिनी परस्पर विकल्या गेल्या; अवघ्या १०० रुपयांच्या stamp वर सर्वसामान्य निरक्षर गरजू लोकांना गुंठ्याने विक्री करत लाखोंचे व्यवहार झाले. त्यावेळी गांगुर्डे यांनी तक्रार केली परंतु तलाठी-तहसीलदारांनी लक्ष दिले नाही. नंतर त्यावर बंगले बांधण्यास सुरुवात झाली तर महापालिकेला सूचना दिल्या गेली पण दुर्लक्षच झाले. अखेर गांगुर्डे यांनी विभागीय आयुक्तांकडे पुराव्यासह लेखी तक्रार नोंदविली. वाहतूक विभागातील काहीजणांना तक्रार मिळाली असतानाही प्रशासकीय प्रयत्न उलट्याच दिसले. मात्र गांगुर्डे यांनी १० ते १२ आंदोलने नाशिक महापालिकेसमोर आणि विभागीय आयुक्तांकडे करून प्रशासनाला जागविण्यात अयशस्वी झाले. आजपर्यंत केवळ कागदी कारवाईच झाली आणि जमीनमालक आजही भूमिहीन आहेत. जवळपास ३६७ घरं उभी राहिली असून ३९ जमीन मालकांच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर बांधकाम झाले. कायदा सुव्यवस्था आणि शासनाच्या लाखो रुपयांच्या नजराण्यांवर महसूल घोटाळा सुमारे हजार कोटींपेक्षा अधिक असण्याची शक्यता असून, याप्रकरणी राजकीय व्यक्तींची नावे समोर येत आहेत आणि काहींविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. महार वतनाच्या २ हेक्टर २० आर शेतजमीन शासनाच्या परवानगीशिवाय विक्री किंवा हस्तांतरण करता येत नाही; बांधकाम सुरू झाल्यापासूनच विरोध होत असून राजकीय दबावाचा आक्रमण कायम राहिला. माफियांकडून खर्चही करण्यात आला; त्यामुळे शेतमालक आजही उपाशी आहेत. कायदेशीर लढा अधिक दिवस चालू राहणार आहे.
133
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 17, 2025 09:11:01
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मी पण पाटलाचीच होती ना, मग नगरसेवक ऐवजी नगराध्यक्ष पद द्यायचं होत - उज्वला थिटे उज्वला थिटे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनगार लोकशाहीत निवडणूक लढण्याचा अधिकार सर्वांना अनगर परिषदेचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन-तीन दिवसापासून प्रयत्न करत होते. चार दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करता येत नव्हता. त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी माणसे उभं केली होती.. त्यामुळे जाऊ शकत नव्हतो.. काल मी प्रयत्न केला होता मात्र दहा ते बारा़ गाड्या माझ्या मागे फिरत होत्या.. मोहोळचे पोलीस निरीक्षक यांनी आम्हाला पोलीस सुरक्षा दिलं.. आम्ही तिथे गेलो पोहोचलो आणि उमेदवारी अर्ज दाखल केला ऑन नगरसेवक पद अनगर येथे माझा प्रभाग तर अनुचितजाती जमातीसाठी राखीव आहे त्यामुळे मी कशी नगरसेवक होणार राजन पाटील हे सर्वांना सून, मुलगी असं म्हणतात. तर त्यांनी त्यांच्या सुनेचा अर्ज माघार घेऊन मला नगराध्यक्ष करावा मी पण पाटलाचीच होती ना, मग नगरसेवक ऐवजी नगराध्यक्ष पद द्यायचं होतं सुरक्षा यंत्रणा प्रचाराच्या वेळेस मिळेल काही सांगू शकत नाही.. मला कसा प्रचार करता येईल यासाठी प्रयत्न करणार.. राष्ट्रवादी पक्षाकडे चार-पाच दिवसापूर्वी उमेदवारी अर्ज मागितला.. राष्ट्रवादी हा शिष्टPe पक्ष नाही असे राजन पाटील म्हणतात. आता ते शिष्टPe पक्षात गेले आहेत त्यांची शिस्त कशी होती. एका विधवा महिला चार ते पाच दिवस झालं अर्ज भरू देत नव्हते गुंडगिरी आणि दंगलशाही कुठे आहे.. मैं बोलणार उचित नहीं. प्रचारात महिलांच्या अत्याचार, शिक्षणाबद्दल बोलणार.. फुल देणाऱ्या महिलांचं आधार करतंय. आणि त्यांची माफी ही मागते.. अर्ज बाबत जे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे निवडणूक अधिकारी ठरवतील..
116
comment0
Report
Advertisement
Back to top