Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
बेळगांव महापौर के सामने मराठी बनाम कन्नड़ विवाद पर नई बहस
PNPratap Naik1
Mar 28, 2026 06:33:16
Kolhapur, Maharashtra
बेळगाव महानगरपालिकेत मराठी भाषिकांच्या भूमिकेविरोधात नवा ठराव येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कन्नड संघटनांकडून महाजन आयोगाची अंमलबजावणी करून सीमा प्रश्न संपल्याचा ठराव करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावच्या महापौरांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या बेळगाव महानगरपालिकेत भाजपची सत्ता असून महापौर आणि उपमहापौर हे कन्नड भाषिक आहेत. दरम्यान, 2005 साली बेळगाव महानगरपालिकेत सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करण्यात यावा, असा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्या ठरावाला विरोध म्हणून आत्ता कन्नड संघटनांनी तीव्र भूमिका घेतली आहे. दरम्यान कन्नड संघटनांच्या या भूमिकेला महाराष्ट्र एकीकरण समिती त्याचबरोबर ठाकरे शिवसेनेनं तीव्र विरोध केला है. अशा प्रकारचा ठराव महापौरांनी करू नये अन्यथा उद्रेक होईल असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय देवणे यांच्या म्हटले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Mar 28, 2026 07:46:45
Pandharpur, Maharashtra:चैत्र वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांना गॅस सिलेंडर टंचाई, वारकऱ्यांनी तीन दगड गोळा करून स्वयंपाकासाठी पेटवल्या चुली मध्य पूर्व मधील युद्ध परिस्थिती कायम असल्याने गॅस सिलेंडर टंचाई सुरू आहे. याचा फटका आता चैत्र वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांना बसला आहे. चैत्र वारी साठी अनेक दिंड्या आज पंढरपूर मधील भक्ती सागर परिसरात दाखल झाल्या आहेत. या ठिकाणी एक दृश्य दिसत आहे. दिंड्या मधील महिलांनी स्वयंपाकासाठी चुली मांडल्या आहेत. याच चुलीवर त्यांनाच स्वयंपाक सुरू आहे. गॅस टंचाई मुळे सिलेंडर उपलब्ध झाले नाही. त्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी सरपण विकत घेऊन, गोळा करून चुली पेटवण्याची आणि स्वयंपाक करण्याची वेळ वारकऱ्यावर आली आहे.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 28, 2026 07:45:59
Wardha, Maharashtra:तरुणाने शकल लढवत ऑइल शेगडीतून केली गॅस टंचाईवर मात गॅस तुटवड्यावर ऑइल शेगडीचे ग्रामीण जुगाड कारंजा घाडगे येथे तरुणाने केले जुन्या वापरलेल्या ऑइल शेगडीचे जुगाड पर्याय असलेली  शेगडी ठरली वरदान अँकर : गॅस तुटवड्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. गॅस एजन्सीपुढे रांगा लागत असताना वर्ध्याच्या कारंजा घाडगे येथे एका एकोणवीस वर्षाच्या तुरुणाने आपली व्यवसायिक चूल पेटविण्यासाठी वेगळीच शक्कल लढवलीय. जुन्या वापरलेल्या ऑइलवर चालणारी शेगडी तयार करणारे जुगाडू तंत्र या ग्रामीण भागातील तरुणाने वापरून गॅस तुटवड्यामुळे बंद झालेली आपली चहाची टपरी पुन्हा सुरु केलीय. विवो : अमरावती नागपूर मार्गावर कारंजा घाडगे येथील पुलाच्या खाली चहा शिजवीणारा हा आहे रामेश्वर ठाकूर.. नववी पर्यंत गावातच शिक्षण झालेल्या रामेश्वरने एक वर्षापासून येथे चहाचा व्यवसाय सुरु केला. टपरीतून रोजगार मिळवत दोन पैसे हाती येत असताना अचानक गॅस संपली. तुटवड्यामुळे सिलेंडर देखील उपलब्ध झाले नाही. अखेर त्याच्या मित्राच्या साहाय्याने जुन्या जळालेल्या ऑइलपासून इंधन उपलब्ध होऊ शकते ही कल्पना त्याला आली. त्याने लागलीच बॅटरी, मोटारीचा फॅन, फिल्टर , पाईप, नळ आणि एक छोटी टॅंक याचे जुगाड तयार करून ऑइलवर चालणारी शेगडी तयार केली आहे. बाईट : रामेश्वर ठाकूर, कँटीन चालक विवो : या शेगडीवर आता चहा शिजवीला जातोय. एक लिटर जुन्या ऑइलमध्ये दीड तास शेगडी चालते. दिवसभऱ्यात रामेश्वरला तीन लिटर ऑइल लागतं. सर्वत्र हॉटेलं बंद व्हायची वेळ आली असताना रामेश्वरच्या या जुगाडू तंत्राने व्यवसायिक सिलेंडरला पर्याय उपलब्ध करून दिलाय. बाईट :  भैरव कुहीके,कॅन्टीन मालक फायनल विवो : गॅसचा तुटवडा असताना ग्रामीण भागात टाकाऊ ऑइल पासून बेरोजगारीवर मात करणारी ही चूल या चहावाल्याला वरदान ठरलीय.. मिलिंद आंडे, झी 24 तास,वर्धा
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 28, 2026 07:02:13
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर : रूपाली चाकणकर यांनी दिलेल्या राजीनाम्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिक्रिया... # जेव्हा अशा प्रकारचे आरोप होतात तेव्हा राजीनामा दिलाच पाहिजे, पण मी जेव्हा टीव्हीच्या माध्यमातून खरात वरचे सर्व आरोप पाहतो तेव्हा असं वाटतं की त्याला चौकात उभं करून सर्वांनी सुया टोचल्या पाहिजे आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला पाहिजे, अशा प्रकारचे भोंदू बाबा फक्त समाजाला त्रास देत नाहीत तर आमच्या धर्माला देखील बदनाम करतात, ज्या प्रकारे एक दिवसाचा मुख्यमंत्री करता येतं, त्याप्रमाणे एक दिवसाचा कायदा बदला आणि खरातला भर चौकात सुया टोचा, खरात ने छत्रपतींच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे, त्याला शिक्षा दिल्यामुळे देशभरातील भोंदू बाबांना कळेल की तुमचा मृत्यू निश्चित आहे
980
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 28, 2026 06:31:46
1064
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 28, 2026 06:31:26
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील डोंगरी भागातील कला, संस्कृती आणि खेळांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी यावर्षी 'डोंगरी महोत्सवा'चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षीच्या यशस्वी आयोजनानंतर यंदा हा महोत्सव 2 एप्रिल ते 6 एप्रिल असा पाच दिवसांचा असेल अशी माहिती साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आहे दिली. पाच दिवसांमध्ये दररोज सायंकाळी एका विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये पोवाडे, भजनी मंडळ, लावणी महोत्सव आणि मराठी-हिंदी गीतांचा ग्रांड फिनाले. पॅराग्लायडिंग, बोटिंग, हॉर्स रायडिंग आणि उंट सवारी.कृषी प्रदर्शन, पशु-पक्षी प्रदर्शन आणि महिला बचत गटांचा भव्य मेळावा.भव्य फन फेअर आणि खाद्य जत्रा हे सर्व कार्यक्रम या दिवसात होणार आहेत दुर्गम भागातून येणाऱ्या लोकांसाठी विशेष एसटी बसची सोय करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहे
1014
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 28, 2026 06:01:32
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- इराण-अमेरिका- इजरायल युद्ध थांबावं यासाठी चंद्रपुरात तयार करण्यात आले विश्वविक्रमी विश्व शांती चिन्ह. चंद्रपूर येथील सोमय्या ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी केला विक्रम, वर्ल्ड पीस सिम्बॉल तयार करून नोंदविला गेला नवीन गिनीज विश्वविक्रम . अँकर:-- इराण-अमेरिका- इजरायल युद्ध थांबावं यासाठी चंद्रपुरात विश्वविक्रमी विश्व शांती चिन्ह करण्यात आले. चंद्रपूर येथील सोमय्या ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी हा विश्वविक्रमी केला. विद्यार्थ्यांनी "वर्ल्ड पीस सिम्बॉल" तयार करून नवीन गिनीज विश्वविक्रम नोंदवला. 2019 साली 1074 विद्यार्थ्यांनी वर्ल्ड पीस सिम्बॉल तयार करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली होती. चंद्रपुरात आज सोमय ग्रुपच्या वतीने हा रेकॉर्ड मोडला गेला. तब्बल 1381 विद्यार्थी यात सामील झाले. गिनीजच्या अधिकाऱ्यांनी हा विश्वविक्रम झाल्याचे जाहीर करत तसे प्रमाणपत्र आयोजकांना दिले. या विक्रमासह चंद्रपूरकरांच्या नावे चौथा विश्वविक्रम नोंदला गेलाय. आशीष अम्बाडे
1077
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 28, 2026 05:46:11
Bhandara, Maharashtra:जिल्हा परिषदेत निधी वाटप करताना बैठकीत ठरलेल्या निकषांचे पालन न झाल्याने वाद निर्माण झाला आहे. अनेक सदस्यांना अपेक्षित निधी न मिळाल्याने नाराजी पसरली असून महायुतीच्या जिल्हा परिषद सदस्यांवरच अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांनाही निधीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ फेंडर यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला असून जिल्हा परिषद इमारतीतच आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून संबंधित प्रकरणात लवकर तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे.
1079
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Mar 28, 2026 05:45:16
Mumbai, Maharashtra:या टीम इंडिया मध्ये नक्की कोण आहे. टीम इंडिया हा राष्ट्रीय विचार आहे आपले पंतप्रधान राष्ट्रीय विचार करतात का ? त्यांचं कडे टीम आहे का ? हम दो हमारे दो संकट काळात राजकीय मतभेद विसरून सत्ताधारी विरोधक एकत्र येतात यायला पाहिजे. सरकारने टीम इंडिया ढोंग करू नये. यावर संसदेत चर्चा होणं गरजेच होत पण झालं नाही देशातला विरोधी पक्ष या काळात देशाच्या बाजूने आहे. ऑपरेशन सिंदूर मागे घेतलं ट्रम्प ने सांगितलं ते केलं नक्कीच केला पाहिजे. लोकांना दहशती खाली ठेवून काही उपयोग नाही. आपल्या कडे इंधन असेल तर देशाच्या पंतप्रधान सांगितलं तर आपण विश्वास ठेवला पाहिजे. भारत इराण संबंध मुळे गॅस आणि इंधनाचा साठा आहे असं चित्र दिसत आहे. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय... प्रकरण अत्यंत गंभीर... एकट्या चाकणकर आहेत का ? स्वतः दीपक केसरकर म्हणतात मीच का ? 40 आमदार जात होते. 40 आमदार कोण हे मुख्यमंत्री जाहीर केलं पाहिजे. खरात यांना विमान सेवा देणार कोण ? ते दिल्लीत जाऊन काय करायचे हे समोर आलं पाहिजे. तो पंचमहाभूता पैकी एक असावा. त्याला राज्य मान्यता दिली फडणवीसांच्या मंत्रिमंडळात अशी अनेक लोक आहे. जैन समुदायासाठी एक मंत्री विशेष व्यवस्था करत असतील तर बोलण गरजेच नाही. टीम महाराष्ट्र तयार करून प्रमुख विरोधी पक्ष सोबत घेऊन राज्यावरच संकट दूर करण्यासाठी टीम तयार करावी त्यासाठी विरोधीपक्ष नेत्याची निवड केली पाहिजे. ते मुख्यमंत्र्यांनी करावी. किरीट सोमय्याच्या व्हिडिओची सत्यता पडताळणार अजून पडताळत आहे. विरोधकांच्या बाबतीत आधी फाशी म चौकशी.. इथे फक्त चौकशी आप 12 लाख वोट काटो मगर जितेगी ममता दीदी...
1038
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 28, 2026 05:34:09
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANC : छत्रपती संभाजीनगर शहरात पेट्रोल टंचाईमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असताना, या परिस्थितीचा गैरफायदा घेत पेट्रोलचोर सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. सातारा परिसरातील दीपनगर येथील सिल्व्हर इस्टेट अपार्टमेंटमध्ये गुरुवारी मध्यरात्री दुचाकींमधून पेट्रोल चोरीची धक्कादायक घटना घडली. भरवस्तीत असलेल्या या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींच्या पेट्रोल नळ्या कापून अज्ञात चोरट्यांनी इंधनावर डल्ला मारला. सकाळी कामावर जाण्यासाठी घाईत असलेल्या रहिवाशांनी गाड्या सुरू करण्याचा प्रयत्न केला असता गाड्या सुरू होत नसल्याचे लक्षात आले. काहींनी मेकॅनिकला बोलावले, तर काहींनी टाकी तपासली. मात्र गाडीच्या खालच्या बाजूला पेट्रोलच्या नळ्या कापलेल्या आढळल्याने चोरीचा प्रकार उघड झाला. या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण असून, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तीन अज्ञात तरुणांनी ही चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. मात्र तक्रारदार पुढे न आल्यामुळे अद्याप या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
1024
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 28, 2026 05:32:10
1059
comment0
Report
Advertisement
Back to top