Back
हाईकोर्ट तक पहुंची कोल्हापुर की खराब सड़कों की याचिका, नागरिक लामबंद
PNPratap Naik1
Oct 18, 2025 09:02:29
Kolhapur, Maharashtra
असीम सरोदे प्रेस, कोल्हापूर शहरातील रस्त्यांचे शॉट्स. रस्त्यांची स्थिती: कोल्हापूर महानगरपालिका, हायकोर्टाचे शॉट्स, कोल्हापूर शहरातील जनरल शॉट्स. Anc :- दक्षिण काशी म्हणुन कोल्हापूरला ओळखलं जातं. पण याच कोल्हापूर शहरातील नागरिकांना चांगल्या रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. इतकच नव्हे तर जगभरातून येणाऱ्या पर्यटकांचे आणि प्रवाशांचे स्वागत देखील खड्डे करतायत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे रस्त्यांची अक्षरशा चाळण बनली आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी कोल्हापुरकरांनी नाईलाजास्तव आत्ता हायकोर्टाची पायरी चढली आहे.. VO 1:- कोल्हापूरचा बाज भारी...कोल्हापूरचा ऐट भारी...आणि कोल्हापूरच्या रस्त्यावर पडलेले खड्डे तर लईच भारी.. पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचं शहर म्हणुन कोल्हापूरकडं पाहीलं जातं... या शहरातील रांगडी माणसांना महागड्या वस्तु आणि गाड्या खरेदी करण्याचा छंद गेल्या अनेक वर्षापासुन आहे. त्यामुळं कोणतीही नवीन गाडी आली की मुंबईनंतर पहिल्यांदा कोल्हापूरच्या रस्त्यांवर धावताना दिसते...अशा या कोल्हापूर शहरात सध्या ठिक ठिकाणी रस्त्यांना मोठे खड्डे पडलेत. अनेक रस्त्यांची स्थिती तर अक्षरशा चाळणी सारखी झाली आहे. त्यामुळं कोल्हापुर शहरातील सजग नागरिकांनी कोल्हापूरातील रस्ते खड्डे मुक्त व्हावेत यासाठी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केलीय. Byte:- Adv. असीम सरोदे Byte :- उदय नारकर, याचिकाकर्ते VO 2:- कोल्हापूर शहरातील रस्त्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये मंजूर झाले आणि त्यातील अनेक कोटी पाण्यासारखे खर्च झाले देखील. पण रस्त्यांची अवस्था मात्र सुधारलेली दिसत नाही.. अनेक ठिकाणी वर्क ऑर्डर मध्ये ज्या पद्धतीने रस्त्याचे डिझाईन दिलय त्याला देखील ठेकेदारांनी हरताळ फसलाय. याकडे कोल्हापूर महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसतंय.. त्यामुळे रांगडा मातीतील कोल्हापूरकर चांगलेच संतापलेले दिसतात.. कोल्हापुरातील अनेक स्थानिक कलाकारा आपल्या परीने सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील रस्त्याच्या मुद्द्यावर आवाज उठवला.. पण त्या आवाजाला देखील निगरगट्ट प्रशासनाने दात दिली नाही. Byte:- Bharat Daini, कलाकार Byte:- उदय गायकवाड, पर्यावरण अभ्यासक VO 3 :- या सर्व परिस्थितीचा विचार करूनच कोल्हापूरकरांनी शहरातील 77 रस्त्यांच्या सर्वेद्वारे 239 पाणी मुद्दे असणारी जनहित याचिका नाईलास्तव हायकोर्टात दाखल केलीय.. खरंतर जस आहे तस आमचं शहर आहे.. या शहरावर आमचं प्रेम आहे.. या रांगड्या मातीचा आम्हाला अभिमान आहे अशी भावना प्रत्येक कोल्हापूरकरांची .. पण शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा कोल्हापूरकरांना वेदना देत आहे. याचे कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना मात्र चांगलीच चपराक आहे.. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर
5
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowOct 19, 2025 13:43:500
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 19, 2025 13:15:460
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 19, 2025 13:07:424
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 19, 2025 12:36:540
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 19, 2025 12:31:000
Report
KJKunal Jamdade
FollowOct 19, 2025 11:30:242
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 19, 2025 10:46:260
Report
KJKunal Jamdade
FollowOct 19, 2025 10:30:220
Report
KCKULDEEP CHAUHAN
FollowOct 19, 2025 10:25:072
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 19, 2025 10:19:144
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 19, 2025 10:15:260
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 19, 2025 10:04:192
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 19, 2025 10:00:370
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 19, 2025 09:46:110
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 19, 2025 09:32:493
Report