Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar414001
जैन मंदिर ट्रस्ट विवाद: गणेश गोंडाळ बोले- कार्यालय मेरा है, विक्री नहीं
LBLAILESH BARGAJE
Nov 04, 2025 10:19:12
Pune, Maharashtra
अहिल्यानगर येथील शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष किरण काळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी जैन मंदिर ट्रस्टची जागा बळवल्याचा आरोप केला होता. तसेच त्या ठिकाणी त्यांचं संपर्क कार्यालय असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र सध्या त्या जागेवर असलेले भाडेकरू गणेश गोंडाळ आणि श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाचे अध्यक्ष सुभाष मुथ्था यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. गणेश गोंडाळ यांनी या जागेवर आपण भाडेकरू असून तिथे माझ ऑफिस आहे. त्यामुळे ऑफिसवर राष्ट्रवादी पक्षाचा कुठलाही झेंडा किंवा लोगो नाही आमदार संग्राम जगताप माझ्या ऑफिसमध्ये येत असतात असं म्हटलं आहे. तर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथ्था यांनी पुण्यातील किरण काळे यांची पत्रकार परिषद ही राजकीय द्वेषातून असल्याचे म्हटले आहे या जागेवर आमदार संग्राम जगताप यांनी ताबा घेतल्याला जागेच्या विक्रीचा कुठलाही व्यवहार झाला नसून दोन वर्षांपूर्वी या जागेच्या विक्री संदर्भात आम्ही जाहिरात दिली होती मात्र अद्याप ती विकण्यात आली नसल्याच सांगितले आहे. तसेच या जागेवर राष्ट्रवादीचा कार्यालय नसल्याचा खुलासा देखील मुथ्था यांनी केला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Nov 04, 2025 14:34:37
Shirur, Maharashtra:जै शार्प शूटर आपने बोलवले त्यांनी रेखी करून केली. त्यांनी अंदाज बांधल की तो मेल आहे. हा बिबट्या तोच आहे का म्हणजे हल्ला करणारा आहे का याबाबत स्वॅप घेण्यासाठी त्याला माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात पाठवे लागते. बिबट्या जेरबंद करू शकलो नाही तर त्याला शूट एक्झाटच्या ऑर्डर दिल्या जातात. हा बिबट्या तोच आहे हे आपल्याला माहिती नाही. लोकांना शंका असेल की मराठी निवारण केंद्रात हा बिबट्यानेला तर तोच आहे का तर या आधीचे बिबटे सुद्धा त्या ठिकाणी ठेवले आहे. मागील दहा दिवसात नऊ बिबटे आणि हा एक अशी मिळून 10 बिबटे पकडले आहेत. गावकऱ्याला शंका असेल तर ते माणिकडोह निवारण केंद्रात ठेवले आहे. हे पकडले सर्व बिबटे इथे सोडणार नाही. इथे जेवढे ब्युटी पकडणार तेवढे सर्व शिफ्ट करणार आहोत. या ठिकाणी पकडले बिबटे दादाच्या बेचने वन तारामध्ये सोडण्यात येणार. अधिकारी म्हणून मला कायद्याची चौकट आहे त्याचा राग आम्ही समजू शकते. हा बिबट्या ओपन मध्ये फिरत असताना ट्रॅप झाला असता मारला गेला असता तर काही नाही मात्र तो आता जेरबंद झाला आहे. त्याला माणिकडोह निवारण केंद्रात दाखल करणे गरजेचे आहे. भले रोज एका ग्रामस्थानी बिबट्या पाहून येऊद्या तो बिबट्या आहे की नाही. मागचे पकडलेल्या बिबट्यांचे स्वॅप रिपोर्ट अजून आले नाही. उद्या अजून एक शार्प शूटरची टीम येणार आहे. 17 पिंजरे पिंपरखेड मध्ये लावले आहे. बिबटे जास्तीत जास्त पकडायचे असतील तर लोकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. कंट्रोल रूम स्थापन झाली तर अजून जातीचे बिबटे पकडले जातील.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 04, 2025 14:33:48
Dhule, Maharashtra:धुळे शहरातील विश्वकर्मा नगर परिसरात एका अडीच वर्षीय चिमुकलीसोबत लैंगिक छेडछाड केल्याच्या संशयावरून एका ऐंशी वर्षीय वृद्धाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विश्वकर्मा नगरमध्ये एक वृद्ध व्यक्ती लहान मुलीची छेडछाड करत असल्याची तक्रार 112 या हेल्पलाइन क्रमांकावर प्राप्त झाली होती. माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच परिसरातील नागरिकांनी त्या चिमुकलीची सुटका करून संशयित वृद्धाला पकडून ठेवले होते. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी संशयित आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 75(1) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 8 व 12 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संशयिताला ताब्यात घेतले असून, या प्रकरणी लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी दिली आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 04, 2025 14:23:02
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात प्रहार संघटना आक्रमक, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बॅनरवर टोमॅटो फेकून मारत व्यक्त केला निषेध - सोलापुरात प्रहार संघटना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आक्रमक - प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी टमाटे आणि मिरच्यांची माळ घालून अजित पवार यांच्या वक्तव्याचा केला निषेध - तर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक घालण्यात आला - सोलापुरात अजित पवार यांच्या बॅनरवर टमाटे मारून व्यक्त केला रोष - शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी प्रहार संघटनेकडून करण्यात आली.. - प्रहार संघटनेच्या पदाधिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली..
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 04, 2025 14:22:44
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 04, 2025 14:22:18
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर जिल्ह्यात एकूण 11 नगरपरिषद 1) कागल नगरपरिषद - हसन मुश्रीफ यांची प्रतिष्ठा पणाला. स्थानिक आघाड्यांनाच महत्त्व. गेल्या अनेक वर्षापासून हसन मुश्रीफ यांच्या गटाची सत्ता. राजे गट आणि मंडलिक गट यांची ताकद देखील महत्त्वाची. 2) कुरुंदवाड नगरपरिषद :- कुरुंदवाड नगर परिषदेमध्ये पारंपारिक घराणेशाही पाहायला मिळते. माजी नगराध्यक्ष जयराम पाटील, माजी नगराध्यक्ष रामभाऊ डांगे आणि माझे नगराध्यक्ष रावसाहेब पाटील या तीन घराण्याभोवतीच नगरपरिषदेची सत्ता फिरत असते. याही वेळेला या तीन घराण्यामध्येच पुन्हा लढत पाहायला मिळेल. 3) गडहिंग्लज नगरपरिषद : कोल्हापूर जिल्ह्यात जनता दलाचा प्रभाव असणारी नगरपरिषद म्हणून गडहिंग्लज नगरपरिषदेला ओळखले जाते.. राष्ट्रवादी पक्षाची देखील मोठी ताकद पाहायला मिळते. गडहिंग्लज मध्ये हसन मुश्रीफ यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे जनता दल विरुद्ध राष्ट्रवादी अशी प्रमुख लढत इथे पाहायला मिळेल असं दिसतय.. हसन मुश्रीफ यांची प्रतिष्ठा पणाला लागेल. 4) हुपरी नगरपरिषद :- हुपरी नगर परिषदेमध्ये देखील गटातटाच राजकारण पाहायला मिळतं. याही वेळेला अशाच प्रकारचे चित्र पाहायला मिळेल असं दिसतं. हुपरी नगरपरिषदेत भाजपनेते प्रकाश आवाडे यांचा प्रभाव आहे. 5) जयसिंगपूर नगरपरिषद :- जयसिंगपूर नगरपरिषद मध्ये देखील गटातटाच राजकारणच महत्त्वाचे आहे.. यड्रावकर गटाची गेल्या अनेक वर्षापासून नगरपरिषदेवर पकड आहे.. 6) पन्हाळा नगरपरिषद :– पन्हाळा नगर परिषदेवर जनसुराज्य पक्षाचा प्रभाव यापूर्वी पाहायला मिळाला आहे. याही वेळेला हा प्रभाव पाहायला मिळेल असं दिसत असले तरी स्थानिक आघाड्या देखील निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. जनसुराज्य विरुद्ध स्थानिक आघाड्या असे चित्र पाहायला मिळेल.. जनसुराज्याचे नेते विनय कोरे यांची प्रतिष्ठा पनाला. 7) मलकापूर नगरपरिषद : मलकापूर नगरपरिषदेत सध्या जनसुराज्य - भाजपा - दलित महासंघ यांची एकत्रित सत्ता आहे. तर राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी हे विरोधात आहेत. आगामी निवडणुकीत राज्य पातळीवर बदललेली समीकरण पाहता इथली निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी अशी होईल असं दिसतंय. विनय कोरे यांचे प्रतिष्ठा पणाला. 8) वडगाव नगरपरिषद : वडगाव नगर परिषदेमध्ये आघाड्यांच्या मार्फत निवडणूक लढवल्या जातात. परंपरागत यादव आघाडी विरुद्ध महायुती मधील पक्ष अशी निवडणूक इथे पाहायला मिळेल असं दिसतंय. 9) शिरोळ नगरपरिषद :–शिरोळ नगर परिषदेमध्ये देखील स्थानिक आघाड्यांचे राजकारण पाहायला मिळते. मागील निवडणुकीत भाजपाने पक्षीय पातळीवर निवडणूक लढवली होती. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला. 10) हातकणंगले नगरपरिषद :- हातकणंगले नगरपरिषदेमध्ये पक्षीय पातळीवर निवडणुका होण्याची शक्यता आहे.. या ठिकाणी भाजपा, ठाकरे गट, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये लढत पाहायला मिळेल. इथे देखील महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं समीकरण होण्याची शक्यता आहे. 11) मुरगूड नगरपरिषद : मुरगूड मध्ये देखील स्थानिक आघाड्यांना आणि गटाला महत्त्व आहे. पण स्थानिक नेत्यांनी सध्या पक्षाची कास धरल्याने इथली निवडणूक पक्षीय पातळीवर होते की पुन्हा गटातटात होते येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.. हसन मुश्रीफ यांना मुरगुड नगरपरिषद महत्त्वाची.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 04, 2025 13:54:08
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:जयंत पाटलांची राज्य निवडणूक आयोगावर टीका राज्य निवडणूक आयोग राज्य सरकार- सत्ताधारी पक्षाच्या अखत्यारीतील बाहुले झाले आहे,का ? आमचं आंदोलन राज्य निवडणुक आयोगा विरोधात आहे,भाजपा विरोधात नाही, उत्तर मात्र भारतीय जनता पार्टी देत आहे,हे आश्चर्य आहे. निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टीत जरा तरी अंतर ठेवा. एक जुलैची मतदार यादी स्वीकारण्याचा निवडणुका आयोगाचा हट्ट का ? मतदार यादी दुरुस्त करून दुरुस्त झालेल्या याद्या स्वीकारा चार नोव्हेंबर किंवा दहा नोव्हेंबर पर्यंतच्या दुरुस्त झालेल्या याद्या स्वीकारण्यास हरकत काय ? 10 नोव्हेंबर पर्यंतच्या दुरुस्त झालेल्या याद्या स्वीकारायला कोणी बंदी करताय का ? निवडणूक आयोगाला कोणी सांगितला आहे का विधानसभा निवडणुकीप्रमाणे निकाल आणायचं आहे,त्यासाठी याच याद्या स्वीकाराव असे कोणी सांगतय ka ? उद्देश काय हे,निवडणूक आयोग सांगत नाही. मतदार यादी दुरुस्ती चार नोव्हेंबर किंवा दहा नोव्हेंबर पर्यंत सुधारित मतदार यादया स्वीकाराव्यात.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 04, 2025 13:53:39
Kalyan, Maharashtra:डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका परिसरात किरकोळ घरगुती वादातून हुशेन पावटे या पंचवीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत त्याला त्याच्या मित्राने तत्काळ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याची अवस्था गंभीर असल्याचे सांगत त्याला कळवा रुग्णालयात हलवण्याचे सांगितले ॲम्बुलन्स बोलवण्यात आली, मात्र रुग्णासोबत तीन महिला आणि एक पुरुष नातेवाईक बसले असताना, रुग्णवाहिकेत असलेल्या महिला डॉक्टरने “मला माझा स्टाफ सोबत हवा आहे” असं सांगत ॲम्बुलन्समध्ये बसण्यास नकार दिला. या दरम्यान तब्बल दोन तास गोंधळ चालू राहिला. अर्धा तास रुग्णाला ॲम्बुलन्समध्येच ठेवण्यात आलं. नातेवाईक रुग्णाला त्वरित हलवण्याची मागणी करत होते, पण डॉक्टर प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी दुसरे डॉक्टर देऊन रुग्णाला तीन तासांनी कळवा रुग्णालयात हलवण्यात आलं. नातेवाईकांचा आरोप आहे की या विलंबामुळे रुग्णाची तब्येत आणखी बिघडली.दरम्यान, शास्त्रीनगर रुग्णालय प्रशासनानेही भूमिका मांडली आहे — ते म्हणतात, “नातेवाईकांनी अचानक रुग्णालयात गोंधळ घातला, शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. घटनेचा सीसीटीव्ही पाहून कायदेशीर कारवाई केली जाईल.” मात्र एकतर उपचार नाही आणि त्यात डॉक्टरांची मनमानी सुरू असल्याने या डॉक्टरांवरती कारवाई करणार कोण असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांना उपस्थित केला जात आहे
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 04, 2025 13:48:04
Shirur, Maharashtra:पिंपरखेड/शिरूर/पुणे जितेंद्र डूडी जिल्हाधिकारी बाईट शिरूर, खेड आंबेगाव जुन्नर आणि पारनेर नाशिक दौंड अहिलनगर या भागात बिबट्याची संख्या वाढली आहे मागील वीस दिवस तीन जणांवर बिबट्याने हल्ला केल्याने मृत्यू झाला आहे मागील एका महिन्यात काही उपाय योजना केल्या होत्या वनविभागाने बिबट्याला पकडायला 200 पिंजऱ्याची मागणी केली त्यांना DPDC मधून मंजुरी दिली अजून अधिकचे 500 पिंजरे ची मागणी केली पहिल्यांदाच हा निर्णय झालाय की बिबट्याला मारण्याची परवानगी आणली काल शूटर पोहोचले होते त्यांनी एका बिबट्याला पकडले पण आहे आज वनमंत्री याच्या सोबत बैठक झाली या बिबट्यांना पकडून याच भागात सोडलं तर काही उपयोग होणार नाही हे एक मोठ संकट समोर आहे म्हणून या सर्व बिबट्यांना येथून जेरबंद करू त्यांना वनतारा येथे सोडायचे आहे यासाठी वनविभागाला मनुष्यबळ ,कॅमेरा , गण लागतील ते देण्यात येणार आहे प्रत्येक गावात एक पिंजरा लावण्यात येणार आहे यासाठी 500 पिंजरे ,250 कर्मचारी,25 वाहने यासाठी लागणारं नाही यासाठी 11 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे यासाठी निवडणुकांची बाधा येणार नाही नसबंदी करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे बिबट्याला शेड्युल 1 मधून 2 मध्ये - टाकायचे आहे याबाबत आज प्रस्ताव पाठवितात येणार आहे वनविभागाने आमच्याकडे मागण्या ज्या मागण्या केल्या त्या आजच आम्ही पूर्ण करू दिल्यात याबाबत लवकरच रिझल्ट द्यावा लागणार आहे कारण पुढची घटना केव्हा घडेल हे सांगू शकत नाही यासाठी नीती असलेल्या बिबट्यांची संख्या कमी करणे गरजेचे आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या करण्यासाठी आम्ही तयार आहोत येथे प्रत्येक शेतकऱ्यांनी बिबट्या पाहिला त्यामुळे किती पाठवायचे ही संख्या ठरली नाही जे साहित्य दिले आहे त्याचे वापर करून बिबटे पकडायचे आहे नसबंदीची कारवाई ही दीर्घकाराच्या असून शिफ्ट करण्याची ही कारवाई तातडीची आहे महाराष्ट्र मध्ये काम करणारे वन विभागाचे कर्मचारी आहेत त्यांना काही दिवसांसाठी या परिसरामध्ये बिबट्या पकडण्यासाठी आणण्यात येणार आहे बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या नातेवाईकाना सरकारी नोकरी साठी मागणी झाली आहे याबाबत निर्णय घेतले आहे या भागातून जितके जास्त बिबटे या भागातून पकडून बाहेर पाठवण्यात येईल हे काम प्राधान्य करण्याकरता या बिबट्याला नियन्त्रणामध्ये आणणे अवघड आहे जो निर्णय झाला नरभक्षक बिबट्याला ठार करायचं तोला ठार करण्यात येईल मात्र आज पकडलेला बिबट्या नभक्षक नाही आम्हाला याबाबत उत्तर द्यावी लागणार आहे,लोकसाठी जे महत्त्वाचे आहे ते आम्ही करतोय सर्व लोक और लोकप्रतिनिधी संपर्कात आहे या संकटापासून बाहेर पडण्यासाठी लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे ते कमी करण्यासाठी जे नरभक्षक बिबट्य आहे त्यांना मारायचे आदेश दिले आणि बाकीच्या बिबट्या ना शिफ्ट करायच
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 04, 2025 13:45:17
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांचं विधान बालिशपणाचं आहे - मंत्री आशिष शेलार - मंत्री आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर सडकून टीका - ऑन निवडणूक जाहीर : - लोकशाहीमध्ये महत्त्वाचा आणि मजबूत असलेला हा पाया आहे. - यात नागरिकांची सहभागीता मोठी असते. - तीन तारखेला निकाल आहे त्यामुळे विरोधी पक्षांचे तीन तेरा वाजतील. - दोन तारखेला मतदान असल्याने महायुतीचा डबल मताधिक्याने विजय होईल. - ऑन दुबार मतदार : - दुबार मतदानाबाबत आम्हीच सांगत होतो मात्र मोर्चेकडा खोटे नरेटीव करा झालेल्या निवडणुकांवर अप्रत्यक्षरीत्या प्रश्नचिन्ह निर्माण करा. - विधानसभेत झालेल्या विजयाबाबत गैरसमज पसरवा हे धंदे विरोधी पक्षाने बंद केले पाहिजेत. - मतदान केंद्रावर मतदारांना मतदान करण्यासाठी मदत करण्याचे काम केले पाहिजे. - ऑन उद्धव ठाकरे : - उद्धव ठाकरे यांचं विधान बालिशपणाचं आहे. - इतका मोठा नेता अशी हास्यास्पद विधान करतोय. - खालच्या स्तरावर जाऊन बोलणे ही माझी संस्कृती नाही.मात्र विरोधी पक्षात गेल्यामुळे त्यांचा असमंजसपणा वाढला आहे. - देवेंद्रजींनी आदित्य ठाकरे यांना पप्पू म्हंटले आहे. - मात्र एक चांगली सिरीयल आहे तारक मेहता का उल्टा चश्मा. - त्यात एक डप्पू के पापा असं एक पात्र आहे तसं मनसे आणि मविला का हारा चष्मा हे सिरीयल ते चावतात. - त्यामध्ये पप्पू कें पापा हे पात्र उद्धवजींना शोभून दिसेल. - ऑन उत्तम जानकार : - प्रत्येक निवडणुकीत कधी मतदान यंत्र, मतदार यादी, मग निवडणूक आयोग आणि आता हळूहळू मतदारांचीच नाव घ्यायला लागली - या सर्वांवर यांना शंका आहे कारण यांचा पराभव होतोय. - लहानपणी एका खेळात हरायला आलं की आम्ही म्हणायचं, बघ माझी बॅट नव्हती नाहीतर मी जिंकलो असतो. - पण तू हरला आहेस हे मान्य कर ना बाबा. - ऑन शरद पवार : - शरद पवारांनी हा सल्ला उद्धव आणि राज ठाकरे यांना द्यावा. - तुम्ही केवळ भूमिपुत्रांची नावे घेत आहात हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. - तुम्ही मराठी माणसाची नाव घेत आहात पण तुम्ही सर्वकष बोललं पाहिजे. - पवार साहेब तुम्ही आपले सहकार्य उद्धव आणि राज ठाकरे यांच्या कानात काही ना काही सल्ला द्या. - ऑन संदीप देशपांडे : - संदीप देशपांडे यांच्या प्रश्नावर अशीष शेलार म्हणाले, मी केवळ नेत्यांवर प्रतिक्रिया देतो. - ऑन ऑन महायुती वाद : - प्रत्येक पक्षाला वाटतं आपला पक्ष वाढला पाहिजे. - मात्र अंतिम निर्णय फडणवीस शिंदे आणि अजित पवार घेतील. - आम्ही एकत्रित लढणार आहोत, या पलीकडे काही निर्णय करायचा असेल तर चार नेते निर्णय घेतील. - ऑन विरोधक : - रिकाम्या भांड्याला आवाज जास्त असतो. रिकाम्या भांड्याला आवाज जास्त म्हणजे त्यात काही आहे असं होत नाही. - निवडणूक आयोगाकडे तक्रार करणे हा त्यांचा आणि आमचा अधिकार आहे. - विरोधकांकडे टाकतो पण विरोधकांकडे बूथ वर बसायला माणसं नाहीत, काहीच नाही आमच्याकडे ते सर्व आहे. - आमची भूमिका आहे की काही तक्रारी असतील तर आयोगाकडे करू मात्र प्रचलित पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजेत. - तुम्ही मुस्लिम दुबार मतदारांची नावे का घेत नाहीत? त्यांच्याबद्दल चुकी का? - केवळ मराठी भूमिपुत्र हिंदू मतदारांबाबत भूमिका आणि दुटप्पीपणा का मांडता. Byte : आशिष शेलार ( सांस्कृतिक मंत्री)
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 04, 2025 13:44:47
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 04, 2025 13:35:25
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 04, 2025 12:56:20
Bhandara, Maharashtra:भंडारा भाजपच्या वतीने निषेध आंदोलन. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अन्यथा उडवून देण्याची भाषा केली असलेल्या खासदारांवर गुन्हा दाखल करावा. भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे यांनी मुख्यमंत्री, प्रधानमंत्री यांनी शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अन्यथा उडवून देण्याची भाषा केली आहे. या प्रतिक्रिया नंतर राज्यभर तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. भाजपच्या वतीने खासदारांवर टीका होत आहे. दुसरीकडे भंडारा भाजपच्या वतीने निषेध करण्यात आले असून पोलिस स्टेशन मध्ये खासदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपच्या वतीने होत आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 04, 2025 12:56:04
Akola, Maharashtra:अकोला ज़िले में किसानों के साथ मज़ाक ? 3, 5, 8 और 21 रुपए की सहायता राशि के चेक..प्रशासन की सफाई – ‘यह तीसरे चरण की मदद है, किसी को हज़ार से कम नहीं मिले!’ अकोला ज़िले के अकोट तहसील के किसानों के खातों में नुकसान से राहत के नाम पर मदद की रकम जमा की गई है। दिनोडा, नरोडा और कावसा गांव के किसानों को मात्र 3, 5, 8 और 21 रुपए की सहायता राशि उनके बैंक अकाउंट में वितरित किए गए। ‘झी न्यूज ’ ने यह मुद्दा उठाया तो सरकार और प्रशासन हरकत में आया। अब ज़िला प्रशासन यह कह रहा है कि यह सहायता के तीसरे फेज़ के हैं और किसी किसान को एक हज़ार रुपए से कम मदद नहीं दी गई है। अतीवृष्टि की ‘अस्मानी’ मार झेल चुके अकोला ज़िले के किसान अब सरकारी तंत्र की ‘सुल्तानी’ लापरवाही का शिकार हो रहे हैं। दिनो़डा गांव के कई किसानों को केवल 3, 5, 8 और 21 रुपए बैंक खाते में जमा कराए गए । यही स्थिति कावसा, मरोडा और आसपास के अन्य गांवों में भी है। इसे किसानों ने अपमानजनक बताते हुए कुछ किसानों ने दो दिन पहले ही ये चेक ज़िलाधिकारी को वापस कर दिए। इतनी कम राशि में नुकसान भरपाई कैसे हो सकती है यह सवाल किसान पूछ रहे हैं। आदित्य मुरकुटे, युवा किसान। झी न्यूज द्वारा मुद्दा उठाने के बाद प्रशासन जागा और खबरों को गलत साबित करने की कोशिश शुरू हुई। सरकार के सूचना और जनसंपर्क विभाग की आधिकारिक वेबसाइट पर दावा किया गया कि किसान संदीप घुगे को कम राशि मिली, उन्होंने फसल बीमा के लिए रजिस्ट्रेशन ही नहीं किया था। लेकिन यह एक तकनीकी गलती होने की बात सामने आई है। वही अकोला की जिलाधिकारी वर्षा मीणा ने स्पष्ट देते हुए कहा है कि यह नुकसान भरपाई की राशि 2023 की है जिसमें जिन किसानों को 2 , 5 या 8 रुपए कम मिले थे उनकी यह बकाया राशि दी गई है । वर्षा मीना ने कहा कि ऐसा कोई मामला नहीं है और प्रशासन को बदनाम करने की कोशिश हो रही है। वहीं दूसरी और सभी किसानों को 1000 से ऊपर रकम दिए जाने का दवा अकोला के कृषि अधीक्षक ने किया है । मोहन किर्वे, जिला कृषि अधीक्षक , अकोला. ज़िला प्रशासन का दावा है कि अतिवृष्टि से प्रभावित किसानों को कम से कम 1000 रुपए की सहायता राशि दी गई है। लेकिन इस दावे को लेकर कांग्रेस ने सरकार की तीखी आलोचना की है और इसे असंवेदनशील बताया है। जिलाधिकारी और कृषि अधीक्षक की यह मिली भगत होने का आरोप कांग्रेस ने किया है । कांग्रेस प्रदेश प्रवक्ता, अकोला. Final यह कह रहा है कि सरकार और प्रशासन कागज़ी आंकड़े दिखाने में व्यस्त हैं, जबकि ज़मीन पर हक़ीक़त यह है कि लाखों का नुकसान झेल चुके किसानों को एक-अंक या दो-अंक की मदद दी जा रही है। यह व्यवस्था संवेदनहीन और कठोर साबित हो रही है। अब इस मामले में खुद केंद्रीय कृषिमंत्री ने एन्ट्री ली है , जिससे अब इस योजना में कुछ सुधारणा होने की अपेक्षा की जा रही है । जयेश जगड़, झी मीडिया, अकोला
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 04, 2025 12:55:44
Akola, Maharashtra:अकोला जिले के अकोट तहसील के किसानों के खातों में नुकसान से राहत के नाम पर मदद की रकम जमा की गई है। दिनोडा, नरोडा और कावसा गांव के किसानों को मात्र 3, 5, 8 और 21 रुपए की सहायता राशि उनके बैंक अकाउंट में वितरित किए गए। यह मुद्दा उठाने के बाद सरकार और प्रशासन हरकत में आया है। अब जिले प्रशासन यह कह रहा है कि यह नुकसान भरपाई की राशि 2023 की है जिसमें जिन किसानों को 2, 5 या 8 रुपए कम मिले थे उनकी यह बकाया राशि दी गई है। व्यवहार में कहा गया है कि किसानों को 1000 से अधिक रकम दी गई है, लेकिन विपक्ष इसे गलत साबित करने की कोशिश कर रहा है। कुछ किसानों ने चेक वापस कर दिए क्योंकि राशि बेहद कम थी। कृषि विभाग के अधिकारी और जिलाधिकारी ने इस मामले में औपचारिक दावों के बजाय वास्तविक राहत की तस्वीर पर जोर दिया है। अंततः सरकार और प्रशासन कागज़ी आंकड़े दिखाने में व्यस्त हैं, जबकि असल तस्वीर यह है कि लाखों का नुकसान झेल चुके किसानों को एक अंकों या दो अंकों की मदद दी जा रही है। केंद्रीय कृषिमंत्री ने इस मामले में हस्तक्षेप किया है ताकि योजना में सुधार सामने आए।
0
comment0
Report
Advertisement
Back to top