Back
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाज्यांचे दर २४० रुपये किलोवर पोहोचले!
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn vegetable rate hike av
Feed attached
छत्रपती संभाजीनगर मध्ये भाज्या प्रचंड महागल्या आहेत, श्रावण महिन्याआधीच श्रावण घेवडा तब्बल २४० रुपये किलोपर्यंत महागला.तर वांगी, शेवग्याच्या शेंगा, चवळी, गवार या भाज्या खरेदीसाठी १०० ते १६० रुपये मोजावे लागत आहेत. सर्वच भाज्या महागल्याने कुठली भाजी खरेदी करावी असा प्रश्न दररोज गृहिणींना पडत आहे.
मागील जून महिना व आता जुलै मात्र जोरदार पाऊस जिल्ह्यात पडलाच नाही. पावसाने मोठा ताण दिल्याने त्याचा परिणाम फळभाज्यांवर झाला आहे. परिणामी, भाज्यांची आवक कमी झाली आणि जाधववाडी अडत बाजारात जास्त भाव देऊन विक्रेत्यांना भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत. परिणामी, भाजीमंडईत विक्रेत्यांनी भाज्यांचे भाव वाढवून टाकले
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_School
Feed on - 2C
------------------------
Anchor - तब्बल तीस वर्षानंतर वर्गमित्रांची पुन्हा शाळा भरली. राज्याबाहेरून आणि परदेशातूनही आपल्या मित्रांना भेटण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली. नांदेडमध्ये वर्गमित्रांचे हे गेट टुगेदर झाले. जुन्या नांदेड शहरातील प्रतिभा निकेतन आणि प्रज्ञा निकेतनच्या 1994 बॅच ने गेट टुगेदर करण्याचे ठरवले. महिनाभरापासून तयारी सुरु झाली. एक एक करत सर्व मित्रांशी संपर्क करण्यात आला. चाळीस मैत्रिणी आणि पसतीस मित्र गेट टुगेदरसाठी आवर्जून आले. बासमधून सर्व मित्र आपल्या शाळेत दाखल झाले. पुन्हा वर्गात बसून मित्राणी शाळेच्या आठवणी ताज्या केल्या. त्यानंतर गेट टुगेदर कार्यक्रमात त्या बॅचला शिकवणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तब्बल तीस वर्षांनी भेटल्याचा आनंद सर्व मित्रांच्या चेहऱ्यावर बघायला मिळाला.
-----------------------------
0
Share
Report
Beed, Maharashtra:
बीड : "मी आत्महत्या करीन... तुझ्या आईवडिलांनाही मारीन" म्हणतं शाळकरी मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल
Anc : केज तालुक्यातील एका गावात 9 वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत, "तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी आत्महत्या करीन" तुझ्या आई-वडिलांनाही मारीन अशी धमकी देणाऱ्या तरुण निखिल कांबळे वर आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अल्पवयीन शालकरी मुलीचा मागील १५ दिवसांपासून त्या तरुणांकडून दुचाकीवरून पाठलाग सुरू होता, आणि शेवटी ४ जुलै रोजी त्याने धमक्यांचं टोक गाठलं. इतकंच नाही, तर मुलीच्या घरचे त्याला जाब विचारण्यासाठी गेले असता एका महिलेला देखील त्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, या आरोपी निखिल कांबळेचे वडील बाळासाहेब कांबळे याच्या विरोधात देखील २ दिवसांपूर्वीच एका युवतीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0707ZT_CHP_RAIN_ALERT
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा 'ऑरेंज अलर्ट',हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा
अँकर:-- चंद्रपूरसह विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्यामुळे नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने ६ ते ८ जुलै या कालावधीत दोन दिवस चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नदी, नाले व तलाव काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहे.विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान काल रात्रभर शहर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती. आतापर्यंत जिल्ह्यात।वार्षिक सरासरीच्या 23 टक्के एवढाच पाऊस नोंदविला गेला आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0707ZT_WSM_WILD_ANIMALS_PROBLEM
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिमच्या मंगरूळपीर व मानोरा तालुक्यातील शेतकरी वन्य प्राण्यांच्या हैदोसांमुळे त्रस्त झाले आहेत.४०-५०रोहीं व नीलगाईचे कळपांनी शेतात घुसून सोयाबीन, तूर,उडीद, कापसासारखी खरीपची पिकं चरून व तुडवून मोठं नुकसान केलं आहे.काही शेतांतील पिकं पूर्णतः नष्ट झाली आहेत.शेतकरी हवालदिल असून वन विभागाकडे तातडीने वन्य प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.
0
Share
Report
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_POLICE
दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या म्होरक्याला अटक.
पाच दुचाकी जप्त.
धाराशिव च्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
अँकर
धाराशिव= धाराशिव जिल्ह्यात सह परराज्यातून दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मोडक्याला धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्याने या गाड्या महाराष्ट्रासह कर्नाटकच्या भागातून चोरल्याचं तपासात उघड झाला आहे. महादेव उर्फ गगन अरुण शिंदे असं अटक केलेल्या अट्टल चोरट्याचं नाव आहे. त्याने कळंब तालुक्यातील मस्सा गावामध्ये एका शेडमध्ये चोरलेल्या गाड्या लपून ठेवल्याचं देखील उघड झाल आहे. महादेव शिंदे यांच्या अटकेमुळे दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्य टोळी उघड होईल असा दावा पोलिसांनी केलाय.
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम :
File:0707ZT_WSM_DOG_DIES_ELECTROCUTED
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम नगरपालिका क्षेत्रात पथदिवा आणि हायमास्ट खांबांमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने एका भटक्या कुत्र्याचा मृत्यू झाला. नागरिकांनी वेळेवर माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पाहणी करण्यात आली, तेव्हा खांबामध्ये विद्युत प्रवाह असल्याचे स्पष्ट झाले.
गेल्या वर्षीही अशाच प्रकारची घटना घडली होती, मात्र प्रशासनाने कोणतीही दुरुस्ती न केल्यामुळे यावर्षी पावसाळ्यात पुन्हा अपघात घडला.त्यामुळे नागरिकांमध्ये संताप असून, प्रशासन मानवी जीवाला धोका झाल्यावरच जागं होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.तत्काळ उपाययोजना करून अशा धोकादायक घटनांना आळा घालावा,अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.
0
Share
Report
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_HULLADBAJ तीन फाईल आहे
रिपोर्टर :- अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
धक्कादायक, चिखलदऱ्यात पर्यटकांची जीवघेणी फोटोग्राफी; नुसतं धाडस कशाला
अँकर :- गेल्या आठ ते दहा दिवसांपासून चिखलदर्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे पर्यटक चिखदऱ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. सध्या चिखलदरा पर्यटकांनी हाऊसफुल झालं असून काही पर्यटक हुल्लडबाजी करत असल्याच पाहायला मिळत आहे तर काही अती उत्साही पर्यटक या चिखलदऱ्यातील गावीलगड शेजारी असलेल्या पॉईंटवर बॅरिकेट नसलेल्या ठिकाणी टेकडीच्या काठावर जाऊन आपला जीव धोक्यात टाकून जीवघेणी फोटोग्राफी करत आहे. तर काही पर्यटक किल्ल्याच्या भिंतीवर अगदी काठावर जाऊन फोटो काढत आहे त्यामुळे हे नुसतं धाडस कशाला असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी
WKT
0
Share
Report
Buldhana, Maharashtra:
बुलढाणा ब्रेकींग ..
पंढरपूर वरून परतणाऱ्या एस टी बसचा अपघात ..
चिखली जवळ महाबीज कार्यालयासमोर एस टी बस दुभाजकावर आढळून झाली पलटी. .
अपघातात जवळपास 30 प्रवाशी भाविक जखमी ..
जखमीवर चिखली आणि बुलढाणा रुग्णालयात उपचार सुरू ..
बस पंढरपूर वरून खामगाव जात होती ..
बसमध्ये 51 भाविक प्रवास करत होते.
पंढरपूर सोहळा आटोपून भाविक घरी जात असताना घडली घटना ..
अपघातात कोणतीही जीवितहानी नाही ..
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी भाविकांना तत्काळ मदत केलीय ..
0
Share
Report
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ मध्ये सततधार पाऊस सुरू असून घाटंजी तालुक्यात दोघांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. कोपरी येथील वाघाडी नदीच्या पाण्यात एक मृतदेह वाहून जाताना ग्रामस्थांना दिसला, पाण्याच्या जोराच्या प्रवाहामुळे हा मृतदेह बाहेर काढणे शक्य झाले नसून शोध कार्य सुरू आहे. तर शिरोली येथील संभाजी आत्राम या शेतमजुराचा नाल्याच्या पुरात वाहून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह एका झाडाला अडकलेल्या अवस्थेत आढळून आला.
0
Share
Report
Latur, Maharashtra:
लातूर..
स्किप्ट ::- किरकोळ बाजारात भाजीपाला कडाडला...गृहिणीचे बजेट कोलमडले .... पावसाअभावी आवक घटली....
AC ::- लातूर शहरातील महात्मा फुले बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे किरकोळ बाजारपेठेत जवळपास २० टक्क्यांनी भावात वाढ झाली असून, या दरवाढीमुळे किचनचे बजेट कोलमडले आहे. हिरवी मिरची, वांगी, भेंडी, पत्ता कोबी, दोडके, सिमला मिरची आदींचे भाव ८० ते ९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. बटाटयाचे भाव ४० ते ५० रुपये प्रतिकिलो तर कांद्याची ५० रुपये प्रतिकिलो दराने किरकोळ बाजारात विक्री सुरु आहे. तर अजुन काही दिवस अशीच परिस्थिती राहील असा अंदाज व्यक्त केले जात आहेत.
0
Share
Report