Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

बीड कारागृहात झाडांची विनापरवाना कत्तल; अजित पवारांचा वृक्ष संवर्धन प्रश्नात!

MMMahendrakumar Mudholkar
Sept 07, 2025 06:35:05
Beed, Maharashtra
बीड: जिल्हा कारागृह पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; जिल्हा कारागृहात विनापरवाना मोठ मोठ्या झाडांची दिवसाढवळ्या कत्तल पालकमंत्री अजित पवार जिल्ह्यात वृक्ष संवर्धनाची चळवळ राबवत असताना जिल्हा कारागृह प्रशासनाकडून वृक्षांची कत्तल..! Anc: उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून महिनाभरापूर्वीच जिल्ह्यात 30 लाख वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यानंतर वृक्ष संवर्धन चळवळ जिल्हा प्रशासनाकडून राबवली जात आहे. मात्र प्रशासनाच्या जिल्हा कारागृहाकडूनच मोठ मोठ्या झाडांची कत्तल करण्यात आलीय. सामाजिक कार्यकर्त्यांनी दिवसाढवळ्या होत असलेली वृक्षतोड समोर आणली. यावर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांनी यावर कारवाई करत वृक्षांची तोड करून वाहतूक करणारे वाहन जप्त केले आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या वृक्ष लागवडीची जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आली होती. त्यामुळे आता तेच जिल्हाधिकारी या प्रकारावर काही कारवाई करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल..
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Sept 08, 2025 03:06:01
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - जो प्रकार घडला त्याचं समर्थन कोणी करणार नाही पण गैरसमजातून झालेला प्रकार मंत्री जयकुमार गोरे जयकुमार गोरे ऑन धैर्यशील मोहिते पाटील -- ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केला त्यांना माझ सांगणं आहे त्यांनी खुदके निगेबान मे कभी झाँककर देखना चाहिये आपण स्वतः आपल्याकडे बघितलं पाहिजे आपण काय करतोय मी जेव्हापासून पालकमंत्री झालोय तेव्हापासून अवैध वाळू, मुरूम किंवा कुठलाही अवैध व्यवसाय चालू देणारं नाही ही भूमिका मांडली होती ज्यांनी अवैध धंदे केले त्यांच्यावर अधिकाऱ्यांनी कारवाई केली, अजूनही कारवाई चालू आहे 100 टक्के थांबलं असं मी म्हणणार नाही पण बहुतांश ठिकाणी आम्ही आळा घातला आहे अजूनही काही ठिकाणी उपसा सुरु असल्याची तक्रार आहे मी त्याबाबतीत तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे कधी नव्हे ते MPD कायद्याने आपण अशा लोकांवर कारवाई केली अजितदादांच्या बाबतीत त्यांनी स्वतः आपली भूमिका स्पष्ट केली आहे जो प्रकार घडला त्याचं समर्थन कोणी करणार नाही पण गैरसमजातून झालेला प्रकार पण या विषयाचा राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतोय इथं बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभा आहे कुठल्याही बाबतीत कुठल्याही अधिकाऱ्यावर दबाव येणार नाही, दबाव आला तर प्रशासनाच्या पाठीशी मुख्यमंत्री उभे आहेत ऑन पालकमंत्री ips अधिकाऱ्यांच्या पाठशी आहेत का? --- चांगलं काम करणाऱ्या, बेकायदेशीर कामाना आळा घालणाऱ्या, लोकांभिमुख कामं करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यांच्या पाठीशी मी आहे ऑन लक्ष्मण हाके -- ओबीसी समाजाच्या हक्कासाठी जे देवेंद्रजींनी सोसले आहे ते अन्य कोणीही सोसलेले नाही त्यांच्यावर झालेले शाब्दिक, वैचारिक आणि वैयक्तिक पातळीवर झालेले हल्ले असतील किंवा त्यांना टार्गेट केलं गेलं जबादारीने मी सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समजवर कोणतीही गदा येणार नाही, अडचण येणार नाही यासाठी अस्वस्थ केलं ओबीसी, मराठा समजबांना विनंती तुम्ही GR बघावं त्याचे परिणाम बघावे त्यातून आपले मतं बनवावे समाज व्यवस्था बिघडणार नाही, ही व्यवस्था अस्वस्थ होणार नाही अशी विधान कोणी करू नये गोरे ऑन ओबीसी आंदोलन -- आंदोलनाचा अधिकार सर्वांना आहे मात्र सरकार म्हणून आमचे एवढेच सांगणे आहे सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही मराठा समाजाच्या हक्काचे रक्षण करताना ओबीसी समाजाचे हक्काचे रक्षण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि आम्हा सगळ्यावर आहे माननीय मुख्यमंत्री या बाबतीत एकदम ठाम आहे त्यामुळे ओबीसी समाजाने अस्वस्थ्य राहावं बाईट : जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री
1
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 08, 2025 03:05:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn pothole dead av Feed attached देवळाईतील पाणीपुरवठा योजनेसाठी खोदलेल्या खड्यातील पाण्यात बुडून ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता, ठेकेदार आणि मजीप्राच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट आणि मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी  घटनास्थळाची पाहणी करत खड्डे २४ तासांत बुजवा आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करा, असे आदेश पालकमंत्री शिरसाटांनी दिले होते. या आदेशानंतर मजीप्रा आणि संबंधित कंत्राटदार कंपनी जीव्हीपीआरच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर चिकलठाणा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा अधिकाऱ्यांची स्पष्ट नावे किंवा हुद्दा नाही. नेमकी कुणाची जवाबदारी होती याचा नेमका शोध सुरू असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांनी दिली. या प्रकरणी संबंधितांवर कलम १०५, बीएनएस ३ (५) नुसार चिकलठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भागातील नागरिकांनी यापूर्वीही वारंवार संबंधित कंपनीकडे खड्डे बुजवण्याची मागणी केली होती. खड्डयांभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने येथे अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने आणि कंत्राटदाराने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. त्याच निष्काळजीपणामुळे 3 वर्षीय  ईश्वरचा बळी गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे...
2
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 08, 2025 03:04:49
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn shinde daura av Use file shots राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहे या दौऱ्यात ते विविध विभागाच्या विकास कामांची आढावा बैठक घेणाऱ्या आणि सोबतच महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाचा मेळावा सुद्धा घेणार आहे या मेळाव्यात दोन माजी आमदार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.. महत्त्वाचं म्हणजे महिनाभरापूर्वी पाणी योजनेच्या उद्घाटनाला शिंदे आले नव्हते फक्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होते त्यावेळेस शिवसेनेच्या नेत्यांमध्ये कुजबूज होती या योजनेची मंजुरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मिळाली असा त्यांचा दावा होता त्यामुळे शिंदे यांचा हा दौरा महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे...
1
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 08, 2025 03:03:03
Raigad, Maharashtra:
स्लग - कोकण रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी ....... दिवा सावंतवाडी पॅसेंजरला पेण स्थानकात थांबा ....... खासदार धैर्यशील पाटील यांचे प्रयत्न ...... अँकर - कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दिवा सावंतवाडी पॅसेंजर गाडीला आता पेण रेल्वे स्थानकाकात पुन्हा थांबा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील पेण हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने याचा लाभ प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. कोरोना काळात या स्थानकावरील या गाडीचा थांबा बंद करण्यात आला होता. राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन हा थांबा पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 08, 2025 03:01:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn sillod kidnap av photo attached सिल्लोडमध्ये लव्ह स्टोरीचे बिंग फुटू नये म्हणून विद्यार्थ्यांचे अपहरण करियर अकॅडमीच्या संचालकासह चौघांना अटक ANC : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये हिंदवी करिअर अकॅडमीच्या संचालकाचे प्रेम प्रकरण उघड होऊ नये यासाठी संचालकाने एकाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. अमोल गजानन मख असे अपहरण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून याप्रकरणी अकॅडमीचा संचालक दशरथ जाधव, कृष्णा जगताप, गणेश चव्हाण आणि प्रवीण राठोड अशी आरोपींची नावे आहेत. जाधव यांचे अकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर प्रेम जडले. त्यांनी अमोलच्या मदतीने तिच्याशी ओळख करून घेतली होती. अमोलकडे या प्रेमप्रकरणाचे व्हॉइस रेकॉर्डिंग व इतर पुरावे होते. त्यामुळे बिंग फुटेल या भीतीने जाधवने हा अपहरणाचा कट रचला होता. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 08, 2025 03:01:09
Kolhapur, Maharashtra:
Kop Sound FIR Feed:- File Anc:- कोल्हापुरात तब्बल 23 तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत अनेक सार्वजनिक मंडळानी ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे शहरातील तब्बल 41 मंडळांवर पोलिसांनी खटले दाखल केलेत.. विसर्जन मिरवणुकीत 41 मंडळांनी मोठ्याने साऊंड सिस्टिम लावल्याने भक्तांना कानठाळ्या बसून हृदयाची धडधड वाढली होती, त्यामुळे पोलिसांनी आवाजाचे नमुने घेऊन सार्वजनिक मंडळांवर ध्वनी प्रदूषण उल्लंघनाचे गुन्हे दाखल केले आहेत, त्यामुळे पदाधिकारी आणि साऊंड सिस्टिम मालकांना हे प्रकरण भोवणारे आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 08, 2025 03:00:15
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_aropi_arest मोबाईल चोराला अटक अँकर नाशिक शहरात रस्त्यावर चालत असणाऱ्या व्यक्तींचे दुचाकी वर येऊन मोबाईल इस्कॉन येणाऱ्या चोरट्याला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली... या संशयताकडून तीन मोबाईल आणि एक दुचाकी असा एक लाख पंधरा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे... गणेश पाटील असं अटक केलेल्या संशयीता च नाव आहे.. हा संशयित रस्त्यावर चालत असणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी वर येऊन मोबाईल हिसकावून पळ काढत होता.... याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता... मुंबई नाका पोलीस याबाबत तपास करत असताना गोपनीय माहिती च्या आधारे या संशयताला महामार्ग बस स्थानकाच्या परिसरात अटक करण्यात आली आहे....
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 08, 2025 02:46:31
Kolhapur, Maharashtra:
Kop Mahadik On Gokul Feed:- File Anc:- कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा उद्या होणार आहे. या सभेमध्ये विरोधी संचालिका शौमिका महाडिक ह्या सत्ताधारी व्यासपीठावर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेली चार वर्षे या ना त्या कारणाने गोकुळच्या कारभारावर विरोधी संचालिका शौमिका महाडिक ह्या गोकुळच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जाब विचारत होत्या, पण मधल्या काळात गोकुळ चेअरमन निवडणुकीत महायुतीचे अध्यक्ष म्हणून मंत्री हसन मुश्रीफ याचे चिरंजीव नावेद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली, त्यामुळे महायुती म्हणून विरोधी संचालिका शौमिका महाडिक ह्या उद्या होणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत व्यासपीठावर दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे, दरम्यान शौमिका महाडिक यांनी आज पत्रकार बैठक घेत आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
4
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 08, 2025 02:46:18
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 0809_BHA_AAROPI_ACTION FILE - 2 VIDEO भंडाऱ्यातील दुहेरी हत्याकांडातील चारही आरोपींवर अखेर मोक्का..... पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती..... संघटित गुन्हेगारीविरुद्ध 2023 नंतरची दुसरी कारवाई...... तर 11 आरोपी तडीपार ANCHOR :- भंडारा शहरात सुमारे 25 दिवसांपूर्वी घडलेल्या टिंकू खान दुहेरी हत्याकांडात अटक केलेल्या चारही आरोपींवर अखेर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातच जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी या कारवाईचे संकेत दिले होते. मोक्का लावण्यात आलेल्या आरोपींमध्ये बाबा मस्तनशाह वॉर्ड, भंडारा येथील साहिल शाकीर शेख (23) व त्याचा भाऊ फैजान शाकीर शेख (25) यांच्यासह या खून प्रकरणात सहभागी असलेला प्रीतम विलास मेश्राम (33, नांदोरा) आणि आयुष मुन्ना दहीवाले (19, ठाणे, पेट्रोल पंप) यांचा समावेश आहे. तर 11 आरोपींना तडीपार करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ही कारवाई करणे गरजेचे असल्याचं पोलीस अधिक्षक यांनी सांगितले आहे... BYTE :- नुरुल हसन, जिल्हा पोलिस अधीक्षक
5
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 08, 2025 02:46:09
Lasalgaon, Maharashtra:
अँकर :- पंजाबमध्ये आलेल्या भीषण पुराच्या संकटात आता लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. तब्बल 40 टन कांदा ज्याची बाजारमूल्य पाच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे हा पंजाबमधील पूरग्रस्तांना पाठवण्यात आला नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांनी एकत्र येत समाजकार्याचा आदर्श घालून दिला आहे पूरग्रस्त पंजाबकरांसाठी तब्बल 40 टन कांद्याचे योगदान देण्यात आले आहे या कांद्याची किंमत सुमारे पाच लाख रुपये हुन अधिक आहे लासलगाव येथून हा कांदा थेट 1600 किलोमीटर पंजाबला रवाना करण्यात आला वाहतूक खर्चाची जबाबदारी मनमाड येथील गुरुद्वारा गुप्तसर साहेब व पंजाबी शीख बांधवांनी घेतली आहे यासाठी दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे व्यापारी आणि सिख बांधवांच्या या उपक्रमामुळे 'मानवतेचे नाते' अधिक दृढ झाले आहे पूरग्रस्तांना मदतीचा हात देताना महाराष्ट्र–पंजाब या दोन्ही राज्यांतील सामाजिक ऐक्याचं दर्शन घडत आहे लासलगाव कांदा व्यापाऱ्यांचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे बाईट :- प्रवीण कदम (पदाधिकारी, लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशन )
5
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 08, 2025 02:46:01
Raigad, Maharashtra:
स्लग - क्षत्रिय मराठा को-ऑप क्रेडिट सोसायटीची महाड शाखा सुरू ....... मंत्री भरत गोगावले आणि प्रविण दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन ......... अँकर - मध्य कोकण क्षत्रिय मराठा को-ऑप क्रेडिट सोसायटीची शाखा महाडमध्ये सुरू झाली आहे . मंत्री भरत गोगावले आणि आ. प्रविण दरेकर यांच्या हस्ते फित कापुन हा शुभारंभ करण्यात आला. मुंबईमध्ये सुरु झालेल्या या पतसंस्थेची रायगड जिल्ह्यातील ही दुसरी शाखा आहे. या संस्थांच्या माध्यमातुन शेतकऱ्याला मदत होईल, नोकरी करण्यासाठी चाकरमानी पुण्यामुंबईत जातो, तो न जात नोकऱ्या देणारा होईल, यासाठी प्रयत्न राहणार असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे. बाईट - प्रविण दरेकर
4
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 08, 2025 02:45:52
Nashik, Maharashtra:
Nsk_trimbak Feed by 2C Anchor चंद्रग्रहणाच्या निमित्ताने त्रंबकेश्वर मंदिर हे रात्री ग्रहण काळामध्ये उघडे ठेवण्यात आले होते. त्यामुळे रविवारच्या निमित्ताने अनेक भाविकांना दर्शन घेता आले. याग्रहण काळात पूजाविधी करून महाधिदेवांची पालखी काढण्यात आली. Byte कैलास घुले विश्वस्त
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 08, 2025 02:45:44
Kolhapur, Maharashtra:
Kop Gokul Sabha Feed:- File Anc:- कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची सर्वसाधारण सभा उद्या 9 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या सभेसाठी सभासदांकडून विविध विषयांवरील लेखी प्रश्न दाखल झाले आहेत. गोकुळ दूध संस्थेने संघाच्या वार्षिक अहवालात दिलेल्या हिशोबा संदर्भात सभासदांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दूध संकलन, म्हैस दुधातील वाढ, सौर प्रकल्पातून झालेली बचत, वाहतूक खर्च आणि शासनाच्या चाचणी अहवालातील ताशेरे या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी संघाकडे लेखी मागणी केली आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या शेवटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नासंदर्भात नेमकं सत्ताधारी कशाप्रकारे उत्तर देतात यावरच गोकुळची सर्वसाधारण सभा कशी चालणार हे स्पष्ट होणार आहे.
3
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 08, 2025 02:31:20
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 0809_BHA_ACCIDENT FILE - 2 IMAGE भरधाव कारची ई-रिक्षाला धडक... 9 महिला मजूर जखमी... साकोली जवळील महामार्गावरील घटना Anchor : शेतात निंदणाचे काम आटोपून निघालेल्या महिला मजुरांच्या ई-रिक्षाला भरधाव कारने धडक दिली. त्यात ९ महिला मजुर जखमी झाले. सदर अपघात काल सायंकाळी साकोली जवळ महामार्गावर घडला. मोहघाटा येथील महिला मजुर हे साकोली शेतशिवारात पोद्दार शाळेजवळ एका शेतात निंदणाच्या कामाला आले होते. दिवसभर काम आटोपून सायंकाळी गावाकडे ई-रिक्षाने निघाल्या. त्यावेळी नागपुरकडे जाणारी कारने ई-रिक्षाला धडक दिली. त्यात रिक्षामधील चालकासह ९ महिला मजुर जखमी झाले. अपघात घडताच नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर जखमींना भंडाऱ्याला हलविण्यातआले आहे.
2
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 08, 2025 01:30:31
Ambernath, Maharashtra:
वॉटर सप्लायच्या व्हॉल्व्ह वर पडून गाईचा मृत्यू जीवन प्राधिकरण विभागाचा अनागोंदी कारभार   सुरक्षा जाळी नसल्याने घडली दुर्दैवी घटना Amb cow accident Anchor अंबरनाथ मध्ये जीवन प्राधिकरण विभागाच्या अनागोंदी कारभांमुळे एका गाईचा मृत्यू झाला आहे. जावसई परिसरातील महादेव नगर मधील रस्त्याच्या बाजूला जीवन प्राधिकरण विभागाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह आहे , या व्हॉल्व्ह भोवती कुठलीही संरक्षक जाळी नसून त्या बाजूला तीन ते चार फूट खोल खड्डा आहे.  रात्रीच्या सुमारास एक गाईंचा कळप या रस्त्यावरून जात असताना अचानक गाईचा तोल जाऊन  व्हॉल्व्हच्या खड्ड्यात पडली तो  व्हॉल्व्ह तिच्या पोटात घुसला त्यामुळे या गाईचा तडफडून मृत्यू झाला, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या या अनागोंदी कारभारणामुळे या गाईचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे, या उघड्या व्हॉल्व्ह मुळे अजून कोणती दुर्दैवी घटना घडू शकते असा नागरिकांचे म्हणणे आहे. चंद्रशेखर भुयार ,अंबरनाथ
11
comment0
Report
Advertisement
Back to top