Back
नाशिक में काका-पुतण्या पकड़े, तीन लाख की 9 चोरीयां उजागर
SGSagar Gaikwad
Sept 10, 2025 03:20:21
Nashik, Maharashtra
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_aropi_arest
दुचाकी चोर काका-पुतण्यांना ठोकल्या बेड्या
अँकर
नाशिक शहर परिसरात दुचाकी चोरणाऱ्या काका पुतण्याला नाशिकच्या उपनगर पोलिसांनी अटक केली आहे या संशयीत्यांकडून तीन लाख रुपया किमतीच्या चोरीच्या नऊ दुचाकी हस्तगत केल्या आहे... वडनेरदुमाला भागातून चोरी केलेल्या दुचाकीचा तपास करत असताना एका संशयास्पदरित्या दुचाकी घेऊन फिरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला गुन्हे शोध पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीमध्ये मिळालेल्या धक्कादायक माहितीवरुन काकाने त्याला हाताशी धरून नाशिक शहरातील विविध ठिकाणाहून तसेच घोटी, इगतपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतूनदेखील दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.पोलिसांनी वडनेर दुमाला परिसरात सापळा रचला. संशयित सलिम हुसेन पठाण यास ताब्यात घेत अटक केली. यांच्यासोबत त्याने नाशिकरोड, उपनगर, इंदिरानगर, मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत तसेच घोटी, इगतपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून नऊ दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे...
बाईट- किशोर काळे पोलीस उपायुक्त नाशिक
11
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowSept 10, 2025 08:05:33Nashik, Maharashtra:
Nashik breaking
हेमंत गोडसे माजी खासदार byte points
- आज नाशिक इलेक्ट्रॉनिक टेस्टिंग लॅब उद्घाटन होत आहे
- 5 वेगवेगळ्या प्रकारचे टेस्टिंग होणार आहे
- 2013 मध्ये तत्वतः मान्यता मिळाली आहे
- माझ्यामुळे झालं भुजबळ यांना म्हणायचे सवय आहे
- माझ्यामुळे झालं असं ते नेहमी म्हणतात
- छगन भुजबळ कॅबिनेट मंत्री असताना देखील त्यांना ते घेता आला नाही
- गावकऱ्यांना विश्वासात घेऊन मी ती जागा टेस्टिंग लॅब साठी दिला
- छगन भुजबळ यांचा आम्ही निषेध करतो
- नाशिक मधील फ्लाय ओव्हर देखील आमच्यामुळे झाला असे ते नेहमी सांगत असतात
- उगाच कुठल्याही कामाचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका
- तिथल्या अधिकारयांना आणि स्थानिक लोकांना तुमच्या भाषणात विचारा हा प्रकल्प कोणी आणला
- मला निमंत्रण नसल्याने मी आजच्या कार्यलमला जाणार नाही
- टेस्टिंग लॅब ची जागा ते आपल्या शिक्षण संस्थासाठी घेत होते
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 10, 2025 08:05:21Akola, Maharashtra:
Anchor : अतिवृष्टीमुळे अकोला जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. त्यानुसार आता पंचनाम्याला सुरुवात झाली असून मुंडगाव येथील तलाठी वाळके हे गुडघाभर पाण्यातून शेतकऱ्यांच्या बांधावर पंचनामा करण्यासाठी पोहोचले. प्रतिकूल परिस्थितीतही महसूल विभागाने थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामा सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांनी दिलासा व्यक्त केला आहे.
0
Report
PNPratap Naik1
FollowSept 10, 2025 08:05:06Kolhapur, Maharashtra:
Kop Mahadik Ekakki PKG
Feed:- Live U
Anc:- कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक कुटुंबीयांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गोकुळमध्ये महायुतीचे चेअरमन असताना वार्षिक सभेत सर्वपक्षीय संचालक व्यासपीठावर आणि शौमिका महाडिक मात्र एकाकी पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे जिल्ह्याचा राजकारणात महाडिक वरचढ ठरवू नये यासाठी सर्वजणच प्रयत्न करतात का ? असं चित्र कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या दिसू लागला आहे.
GFX In
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक कुटुंबीयाना एकाकी पाडण्याचा प्रयत्न ?
गोकुळ वार्षिक सभेच्या निमित्ताने महाडिक यांची गोची करण्याचा प्रयत्न
एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असणाऱ्या महाडिक यांना महाविकास आघाडी सोबतच महायुती मध्येच अंतर्गत विरोध होतोय ?
GFX Out
VO 1:- एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर तब्बल 18 वर्षे महादेवराव महाडिक यांची एक हाती सत्ता होती. महाडिक यांची एकहाती असणारी सत्ता उलथवून लावण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी विशेष करून सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी पूर्ण ताकत लावून जिल्ह्यातील आर्थिक नाड्या एक एक करून काढून घेतल्या. तेव्हापासून महत्त्वाच्या सत्ता केंद्रात येण्यासाठी महादेवराव महाडिक यांच्यासह भाजप राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यासह शौमिका महाडिक प्रयत्नशील आहेत. पण महाडिक कुटुंबीयांना प्रत्येक सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वपक्षीय म्हणजेच महायुतीतील घटक पक्ष देखील प्रयत्न करतायेत का ? अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे.
Byte:- गुरुबाळ माळी, ज्येष्ठ पत्रकार
VO 2:- माजी आमदार महादेवराव महाडिक हे नेहमीच शोले मधील शिक्याचा उदाहरण देत चित भी मेरी और पट भी मेरा अशा भूमिकेत कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात तब्बल 18 वर्ष निर्विवाद वावर होता.. त्यामुळे महाडिक यांच्याकडे सत्ता गेली की ते कोणाला विचारणार नाही या भूमिकेतून कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक यांना बाजूला करण्याचे सूत्र बांधलं जातंय का ? अशी चर्चा देखील सुरू आहे. सहकार असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये पक्षीय पातळीवरच्या निवडणुका यापूर्वी होत नव्हत्या.. गटतट, पॅनल या माध्यमातूनच समविचारी पक्ष एकत्र येत या निवडणुका लढवत होत्या. पण गोकुळ अध्यक्षपद निवडीच्या निमित्ताने मात्र महायुती म्हणून गोकुळ मधली सत्ता महायुतीकडेच पाहिजे ही भूमिका महाडिक कुटुंबीयांची मांडली. पण गोकुळ मध्ये सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी अध्यक्ष जरी महायुतीचा असला तरी सत्ता ही राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीकडे असल्याची भूमिका उघडपणे मांडली होती, त्यामुळंच गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने शौमीका महाडिक ह्या एकाकी पडल्याचे पाहायला मिळाले. गोकुळच्या व्यासपीठावर महाविकास आघाडी बरोबरच जिल्ह्यातील महायुतीचे घटक पक्ष असणारे राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप मध्ये पक्षप्रवेश केलेले संचालक अमरीश घाडगे हे देखील व्यासपीठावर होते.. यावरूनच काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी महाडिक यांना डिवचले आहे.
Byte:- आमदार सतेज पाटील, सत्ताधारी नेते गोकुळ
VO 3:- कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या सर्व महाडिक कुटुंबीय भाजपात आहेत. पण महाडिक गट म्हणून जिल्ह्यात त्यांची ताकद आहे. त्यामुळेच एकदा का महाडिक यांच्या हातात सत्ता गेली तर ते कोणालाच विचारणार नाहीत अशी भीती महायुती मधीलच घटक पक्षांना वाटू लागली आहे अशी चर्चा राजकारणाच्या वलयात पाहायला मिळत आहे.. त्यामुळेच आगामी गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक असो वा सहकारातील निवडणूक महाडिक कुटुंबीयांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न यापुढे देखील केल जाईल अस राजकीय जाणकारांना वाटतय..
प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 10, 2025 08:04:57Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - नर्तिकेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडच्या तरुणाची सोलापुरात गोळ्या झाडून घेत आत्महत्या ( PKG )
- नर्तिकेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडच्या तरुणाची सोलापुरात आत्महत्या की हत्या?
- गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच असणाऱ्या गोविंद बर्गे या 34 वर्षीय तरुणाची पिस्टलने गोळ्या झाडून घेत आत्महत्या
- नवीन घर नावावर कर अन्यथा दुष्कर्मचा गुन्हा दाखल करण्याची देण्यात आली धमकी ?
- बार्शी तालुक्यातील वैराग मध्ये नर्तिकेच्या घरासमोरच सर्व प्रकार घडल्याने सर्वत्र एकच खळबळ
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय. वैराग तालुक्यातील सासुरे गावात गोविंद बर्गे 34 वर्षीय माजी उपसरपंचाने पुजा गायकवाड नामक नरतिकेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कला केंद्रात झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन प्रेम संबंध ठेवून वेळोवेळी पैसे, सोने - नाणे लुबाडण्यात आल्याचा आरोप देखील नर्तिकेवर होतोय. मूळचे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच असणारे गोविंद बर्गे यांचे बीड जिल्ह्यातील नवीन घर नावावर करण्याचा तगादा लावण्यात आला होता. नर्तिकेच्या प्रेमात वेडा झालेल्या या विवाहित तरुणाने गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र गोविंद बर्गे याने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलाय.
बाईट -
नातेवाईक
बाईट -
नातेवाईक
गेल्या दीड वर्षांपासून पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांची मैत्री होती आणि याच मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. गोविंद ने तिला पावणे दोन लाखांचा मोबाईल ही भेट दिला होता याशिवाय तो तिला नियमित दागिनेही देत होता. घटनेची माहिती मिळताच वैराग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट दिलीय.
बाईट -
अशोक सायकर ( पोलीस उपाधीक्षक, बार्शी )
पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर गोविंद बर्गे हा मृत अवस्थेत कार मध्ये आढळून आला. गोविंद बर्गे याने जर आत्महत्या केली असेल तर कारची चावी त्याच्याजवळच असताना गाडी लॉक झाली कशी ? गोविंद बर्गे यांनी स्वतः पिस्टलने स्वतःवर गोळ्या झाडल्या तर ती पिस्टल त्याच कारच्या स्टेरिंग वर संशयास्पदरित्या कशी दिसली ? नर्तिका पूजा गायकवाड हिच्या सोबत सदैव असणारी त्याची मावशी तर या प्रकरणाची मास्टरमाईंड नाही ना ? गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेला संशय.... असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली हे त्यांचा घातपात झालाय हे येणाऱ्या काळातच समजणार आहे. नर्तिका पुजा गायकवाड हिला वैराग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतल असून पुढील तपास सुरू आहे.
End P2C
( गोविंद बर्गे याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली हे येणाऱ्या काळात लवकरात समोर येईल )
अभिषेक आदेप्पा, सोलापूर प्रतिनिधी
0
Report
AKAMAR KANE
FollowSept 10, 2025 08:02:03kolhapur, Maharashtra:
Ngp Ravishankar Byte
live u ने फीड पाठवले
--------
नागपूर
बाईट-- अध्यात्म गुरु
* श्री श्री रविशंकर,
*नेपाल में हिंसा मैं कोई अंतरराष्ट्रीय षड्यंत्र भी हो सकता है, युवाओं में फ्रस्ट्रेशन बढ़ता गया.. यह एक बात... जब भी कोई उसमे असामाजिक तत्व घूस जाते है..
नागपुर पहुंचने पर श्री श्री रविशंकर ने नागपुर एयरपोर्ट पर मीडिया से बातचीत करते हुए कहा कि
किसान आत्महत्या कर रहे हैं, यह बहुत दर्द की बात है की किसान आत्महत्या कर रहे हैं, उनका आत्म बल छीड होता जा रहा है यही कारण है, कैसे-कैसे मुसीबत से हम निकले हैं ऐसी हरकतें कभी हुई नहीं है , मगर यहां विदर्भ में एक पैटर्न बन गया,
कुछ साल पहले 370 गांव में हमने पदयात्रा की , हमने उनको समझाया, 10 साल के बाद दोबारा करनी पड़ेगी, किसानों को, ठेकेदारो और व्यापारी है उनको आत्म बल की जरूरत है, आध्यात्म की जरूरत है ,इसलिए आध्यात्म के तीन दिन का शिबीर यहां चल रहा है, साथ ही साथ सोमनाथ जी को भी हम लेकर आए हैं, 1000 साल पहले जो हमारा ज्योतिर्लिंग ध्वस्त हुआ था, उसकी पिंड जो है, दक्षिण भारत के जो ले गए थे, अब इस पिंड को लेकर हम यहां हैं, जनता ही उसका दर्शन करें, अध्यात्म के मार्ग पर चले, ईश्वर पर विश्वास रखें, आत्महत्या जैसे नौबत की कोई जगह नहीं है,
on नेपाल
नेपाल पर बोलते हुए श्री श्री रविशंकर ने कहा कि नेपाल में बहुत से मेरे भक्त हैं, लगातार उनके संपर्क में हूं ,युवाओं में फ्रस्ट्रेशन बढ़ता चला गया ,युवाओं को कोई प्रवेश नहीं दे रहे थे, जब भी कोई आंदोलन हो जाता है असामाजिक तत्व उसमे घुस जाते हैं, इसमे कोई अंतरराष्ट्रीय षड्यंत्र भी हो सकता है,
उप राष्ट्रपति को बहुत-बहुत बधाई देता हूं,
संघ के 100 साल हो रहे हैं ,संघ का मुख्य स्थान है ये ,यह मैं बहुत ज्यादा हर्षित हूं, आज मोहन भागवत का जन्मदिन भी है, उनको बधाई दे रहा हूं,
श्री श्री रविशंकर से जब यह पूछा गया कि मोहन भागवत ने कहा है कि ना वह रिटायर हो रहे हैं ना उन्होंने किसी को रिटायर होने की बात कही है इस पर उन्होंने हाथ जोड़कर आगे बढ़ गये,
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 10, 2025 08:01:54Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn divisonal commissioner byte
Feed by tvu
हैदराबाद गॅजेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी सरकारची चांगलीच लगबग सुरू आहे यात आता पुढील दोन दिवसात तलाठी, ग्रामसेवक , सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यासाठी खास प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल अशी माहिती विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिली आहे.. सोबतच लोकांनी कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करावे कारण ही प्रक्रिया अर्जानूरूप चालते असेही त्यांनी सांगितले.. 17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिवशी प्रमाणपत्र पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्याचं धोरण सरकारनं ठरवलंय मात्र लोकांनी अर्ज केल्यावरच ही प्रक्रिया सुलभ होईल त्यामुळे लोकांनी तहसीलदाराकडे अर्ज करावे असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे..
Byte जितेंद्र पापळकर, विभागीय आयुक्त मराठवाडा
0
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 10, 2025 08:01:47Nashik, Maharashtra:
nsk_godsebyte
feed by live u 51
anchor आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक मध्ये सी पी आर आय लॅबच भूमिपूजन होत आहे या लॅब साठी माजी खासदार हेमंत गोडसे यांनी जागा मिळवून देत लॅब मंजूर केली होती मात्र त्यांना साधे निमंत्रणही नसल्यामुळे त्यांनी छगन भुजबळ हे खोटे श्रेय घेत असल्याचे आरोप केले आहेत त्यांचा निषेध व्यक्त करत भुजबळ यांनी विकास कामे करताना कसा स्वार्थ साधून घेतला याबाबतचे पुरावे दिले.
byte हेमंत गोडसे माजी खासदार
0
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 10, 2025 08:01:37Nashik, Maharashtra:
nsk_godseonthakre
feed by 2C
anchor *ऑन ठाकरे बंधू भेट*
- याबाबत महायुतीच्या नेत्यांनी सांगितले आहे
- दोन्ही भाऊ एकत्र आले तर संपूर्ण महाराष्ट्राला आनंद आहे
- काम कोण करत आहे नागरिकांना माहिती
- येणाऱ्या निवडणूकीत लोकं विचारपूर्वक मतदान करतील
- राज्यस्तरीय प्रशासकीय काम अडतात तेव्हा काम समजून पर्याय काढणे महत्वाचे आहे
- काम करणारे लोक आहेत त्यांना निवडून
- प्रत्येक पक्षश्रेष्ठीची क्वालिटी वेगळी असते
- आम्ही काम घेऊन गेलो तर शिंदे साहेब यांचे काम कौतुकास्पद आहे
- जनतेला वेळ देतात आणि तातडीने सोडविता
- ते मार्ग काढून देतात
- प्रत्येक क्षेत्रात विकासाची स्पर्धा आहे
- संघटन कौशल्य मध्ये खूप फरक आहे
- नेतृत्व करणारा माणूस काम करणारा असेल तर लोक सोबत राहतात
0
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 10, 2025 07:34:52Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
4 FILES
SLUG NAME -SAT_NAIKAVADI
सातारा - साताऱ्यात 10 सप्टेंबर 1944 रोजी क्रांतिकारी डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी सातारा जिल्हा कारागृह फोडले होते या दिवसाला आज 81 वर्ष पूर्ण झाली असून क्रांतिकारी डॉ नागनाथ अण्णा हे प्रती सरकारच्या चळवळीमध्ये पुन्हा सहभागी झाले होते. या स्मृती पित्यर्थ आज सातारा जिल्हा कारागृहाच्या समोर असणाऱ्या स्मृती स्तंभाला स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयां कडून पुष्पांजली वाहण्यात आली. यावेळी कारागृह पोलिस अधीक्षक शामकांत शेडगे याबरोबर ज्येष्ठ नागरिक,स्वातंत्र्यसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आताच्या नवीन पिढीला त्या काळात स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले देशासाठीचे योगदान स्मरणात राहावे यासाठी हा दिवस दरवर्षी साताऱ्यामध्ये साजरा केला जातो.
बाईट:वैभव नायकवडी (नागनाथ आण्णा नायकवडी याचे चिरंजीव)
2
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 10, 2025 07:34:41Nashik, Maharashtra:
Nashik break
- *नाशिक मध्ये महायुतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर*
- इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब उदघाटन सोहळ्यापूर्वी वाद विकोपाला
- *शिंदे सेनेचे नेते माजी खासदार हेमंत गोडसे आणि मंत्री छगन भुजबळ आमने सामने*
- भुजबळ आणि गोडसे यांच्यात टेस्टिंग लॅब हून श्रेयवाद उफाळला
- भुजबळांकडून वर्तमान पत्रात जाहिराती देऊन भुजबळांचा पाठपुरावा असा उल्लेख तर हेमंत गोडसे यांच्या फलकावर हेमंत गोडसे यांचा पाठपुरावा असा उल्लेख
1
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 10, 2025 07:34:32Raigad, Maharashtra:
स्लग - रायगड जिल्ह्यात साखर चौथीच्या गणेशोत्सवाची धूम ....... जिल्ह्यात ९१८ ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना .......
अँकर - अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता झाली असतानाच रायगड जिल्ह्यात आजपासून साखर चौथीच्या गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे. अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या पहिल्या संकष्टी चतुर्थीला या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. दीड दिवसांच्या मुक्कामासाठी आज ९१८ ठिकाणी बाप्पांचे आगमन झालं. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उत्तर रायगडात मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होतो. अलीकडे दक्षिण रायगड मध्ये देखील याचं लोण पोहोचलं आहे. याला गौरा गणपती असेही म्हटले जाते.
4
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 10, 2025 07:32:09Manmad, Maharashtra:
अँकर-महाराष्ट्र शासनाने विधान सभेत जनसुरक्षा कायदा संमत केला मात्र त्याला अनेक राजकीय पक्षांनी विरोध केला असून,या कायद्यामुळे लोकशाही चा आवाज बंद करण्याचा प्रयत्न असल्याने हा कायदा रद्द करावा यासाठी मनमाड येथे तलाठी कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटातर्फे निदर्शने करत घोषणाबाजी करण्यात येऊन आंदोलन करण्यात आले
0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 10, 2025 07:31:24Latur, Maharashtra:
लातूर PKG....
( यात महत्वाचे डॉक्युमेंट असाइनमेंट नंबर वर टाकला आहे यामध्ये पंकजा मुंडे यांचा बाईट आणि व्हिज्युअल्स वापरावे. )
AC ::- लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील पणगेश्वर साखर कारखान्याच्या विक्रीच्या निर्णयावरून शेतकरी आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गोपीनाथ मुंडेंनी तारलं… पण पंकजा मुंडेंनी साखर कारखाना विक्री करून आम्हाला फसवलं" अशी भावना आता व्यक्त केली जात आहे. VO 01 ::- पानगाव आणि पाथरवाडी येथील शेतकऱ्यांनी आपल्या 120 एकर जमीन पणगेश्वर साखर कारखान्यासाठी दिली. दिवंगत गोपीनाथ मुंडें यांच्या शब्दावर, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतला गेला. या कारखान्याची जबाबदारी प्रज्ञाताई गोपीनाथ मुंडे या चेअरमन म्हणून सांभाळत होत्या. सुरुवातीला कारखाना चालूही झाला… मात्र आता कोणतीही पूर्वसूचना न देता कारखाना विक्रीचा निर्णय घेण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पानगावसह आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी या कारखान्यासाठी दिल्या होत्या. लोकनेत्याच्या स्वप्नासाठी आम्ही जमिनी दिल्या, मात्र त्या स्वप्नाचा शेवट विक्रीने झाला. आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि कारखाना विकला गेला. मंत्री पंकजा मुंडे यांनी आमचा विश्वास घात केलाय अशी भावना कर्मचारी आणि शेतकऱ्याने बोलून दाखवली आहे.... बाईट ::- शेतकरी बाईट ::- शेतकरी VO 02 ::- पन्नगेश्वर साखर कारखाना तेवीस वर्षांनंतर दिवाळखोरीत गेला आणि त्याची विक्री झाली. विमल अॅग्रो कंपनीने विकत घेतलेल्या या कारखान्याच्या हंगामावेळी हा प्रकार उघड झाला. यामुळे शेतकरी व कर्मचाऱ्यांची देणी कोण फेडणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. हा कारखाना काही काळ यशस्वीरित्या सुरु होता. मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर कारखान्याच्या व्यवस्थापनावर परिणाम झाला आणि तो हळूहळू मोडकळीस आला. पंकजा मुंडेंनी कारखाना पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न केले, पण आर्थिक तोट्यामुळे किंवा व्यवस्थापन अडचणीमुळे तो यशस्वी झाला नाही. अखेर, मंत्री असतानाच त्यांनी हा कारखाना विक्री केला.या घटनेवर शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत मंत्री असताना पंकजा मुंडेना कारखाना विकावा लागतो, हे दुर्दैव नाही का? आमच्या जमिनी दिल्या, पण आमच्याच परवानगीशिवाय हा निर्णय घेतला गेला. असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत... बाईट ::- शेतकरी बाईट ::- शेतकरी VO 03 ::- हा प्रकल्प केवळ एक उद्योग नव्हता, तर शेकडो कुटुंबांच्या आर्थिक भविष्याशी जोडलेला होता. कारखान्यामुळे रोजगार, स्थानिक विकास आणि ऊस उत्पादकांसाठी एक स्थिर बाजार निर्माण झाला होता. त्यामुळे या विक्रीमुळे अनेकांची जीवनशैली आणि अर्थव्यवस्था डगमगली आहे. या प्रकरणात पंकजा मुंडेंनी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही शेतकरी करत आहेत. तसेच, जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला किंवा पर्यायी मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. ............
वैभव बालकुंदे
ZEE 24 तास लातूर...
0
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 10, 2025 07:30:32Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_ObsceneMessege
Feed on - 2C
-- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- --
Anchor - बदली केल्याच्या रागातून जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याने रात्री 2 वाजता महिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या मोबाईलवर आणि विभाग प्रमुखांच्या व्हाट्सअप ग्रुपवर अश्लील आणि धमकी देणारा मेसेज पाठवला. रात्री 2 वाजता हा प्रताप करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबीत करण्यात आले आहे. आनंद सावंत असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. आनंद सावंत हा नांदेड जिल्हा परिषदेत कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याची बदली दुसऱ्या विभागात करण्यात आली. दुसऱ्या विभागात बदली केल्याच्या रागातून रात्री 2 वाजता सावंत याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप मेसेज पाठवला. राजकीय भाष्य करून असभ्य आणि अश्लील भाषेत धमकीचा मेसेज केला. विभाग प्रमुखांच्या ग्रुपवरही सावंत याने मेसेज केला. याची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आनंद सावंत याचे निलंबन केले. एका अधिकाऱ्याने चक्क रात्री 2 वाजता महिला मुख्याधिकाऱ्यांना अश्लील भाषेत धमकीचा मेसेज पाठवल्याने नांदेडमध्ये खळबळ उडालीये.
-- -- -- -- -- -- -- -- -- --
0
Report
KJKunal Jamdade
FollowSept 10, 2025 07:16:23Shirdi, Maharashtra:
Rahuri News Flash
big Breaking
नगर मनमाड महामार्गावर रस्त्याच्या कामासाठी नागरिक आक्रमक...
रस्ता कृती समितीच्या वतीनं सुरू आहे रास्ता रोको आंदोलन...
*रास्ता रोको आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांमध्ये काहीसा गोंधळ...*
*आंदोलनादरम्यान आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांचे वाहन अडविले...*
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचं शासकीय वाहन आंदोलकांनी अडवले...
बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी जिल्हाधिकारी यांचे वाहन दुसऱ्या मार्गाने वळविले...
अहिल्यानगरहून शिर्डीकडे निघाले होते जिल्हाधिकारी....
0
Report