Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे ७५ मुलींचा भवितव्याचा प्रश्न उभा

VKVISHAL KAROLE
Jul 13, 2025 04:33:04
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn vidya deep update Feed attached मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहरातील विद्यादीप बालगृहाची मान्यता रद्द केल्यानंतर आता संस्थेत राहणाऱ्या ७५ मुलींच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बालगृहात निराधार आणि गुन्ह्यातील पीडित मुली राहतात. ३० जूनला ९ मुलींनी पलायन केले होते. यानंतर विविध संघटना आक्रमक झाल्या होत्या. हा प्रश्न अधिवेशनात चर्चेला आला. मात्र आता या ठिकाणच्या ७५ मुलींचे तत्काळ पुनर्वसन कसे करावे हा प्रश्न निर्माण झालेला असताना त्यांना हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शहरात मुलींसाठी ३ संस्था आहेत. यापैकी बीड बायपासच्या संस्थेत १०० मुलींची मान्यता आहे. मात्र, ५९ मुली सध्या वास्तव्यास आहेत. वाळूजच्या संस्थेला ३० मुलींचीच मान्यता आहे. त्यामुळे एवढ्या मुलींना कुठे ठेवावे हा प्रश्न आहे. बालकल्याण समितीने यावर तोडगा काढत निराधार मुलींच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांना मुली घेऊन जाण्यास सांगितले. यानंतर उर्वरित मुलींना इतरत्र हलवण्यात येईल.
7
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top