Back
डॉ. आंबेडकर विद्यापीठातील पीएचडी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अडचणी!
VKVISHAL KAROLE
Aug 23, 2025 03:17:31
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn uNivarsity av
Feed attached
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएचडी प्रवेशासाठी घेतलेल्या 'पेट' परीक्षेला आता वर्ष होत आले आहे. 'आरआरसी' समोर सादरीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यात पात्र ठरलेल्या ३,८२५ विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य मात्र अद्याप सुरू झालेली नाही. संशोधन सुरू करण्यासाठी प्रोव्हिजनल लेटर अद्याप या विद्यार्थ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे कोर्स वर्कही झालेले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यासही अडचणी येत आहेत. ही प्रक्रिया विलंबाने होत राहिल्यास संशोधन वेळेत कसे पूर्ण करणार, असा सवाल विद्यार्थी संघटनांनी केला आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर करावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलीय...
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowAug 23, 2025 06:05:00Nashik, Maharashtra:
Nashik breaking
anchor राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकांसाठी चार सदस्यीय प्रारुप प्रभागरचना जाहीर झाली आहे. सन २०११ च्या लोकसंख्येनुसार १२२ सदस्य संख्या कायम राहिली असून चार सदस्यीय प्रभाग पध्दत आणि प्रभागरचनेच्या प्रक्रियेत कुठलाही बदल न झाल्याने २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच प्रभागरचना ‘जैसे थे’ राहिली आहे.गतप्रभागरचनेप्रमाणेच चार सदस्यीय २९ तर प्रभाग क्र.१५ आणि १९ हे तीन सदस्यीय दोन प्रभाग राहणार आहेत.दरम्यान, राज्य शासनाने जारी केलेल्या सुधारीत कार्यक्रमानुसार या प्रभागरचनेवर ४ सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना मांडता येणार आहेत.
3
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 23, 2025 06:01:41Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2308ZT_CHP_FLOOD_VISIT
( single file sent on 2C)
टायटल :---- पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार देवराव भोंगळे मैदानात, चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गावांची केली पाहणी
अँकर :---- चंद्रपूर जिल्ह्य़ात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. या पावसाचा मोठा फटका कोरपना तालुक्याला झाला. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी कोरपना तालुक्यातील विरुर गाडेगाव, अंतरगाव, पिपरी, शेरज बु. आदी पूरग्रस्त गावांना भेट देऊन शेतीचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहिले. शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ शासनास सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 23, 2025 06:00:53Nashik, Maharashtra:
nsk_rada
feed by 2C
video. 4 image 2
Ac
नाशिकच्या नांदूर नाका परिसरात पायावरून दुचाकी गेल्याने वादाचे कारण ठरत दोन गटात फ्रीस्टाइल हाणामारी झाली यामध्ये दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे पायावरून दुचाकीची चाक गेल्याच्या कारणातून निमसे आणि धोत्रे गटांमध्ये वादाची ही ठिणगी पडली आणि या हाणामारीत धोत्रे गटातील दोघांवर चोपर ने वार करत डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार काल सायंकाळी नाशिकच्या नांदूर नाका परिसरात घडलाय यामध्ये राहुल धोत्रे आणि अजय हे दोघं गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान या फ्रीस्टाइल हाणामारीचा सीसीटीव्ही समोर आलाय दोन्ही गटाचे 15 ते 20 जण जमा होऊन ही हाणामारी झाली या हाणामारीत चॉपर चाकू हॉकी स्टिक चा वापर करण्यात आलाय दोन्ही गटात विरोधात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहे
0
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 23, 2025 05:48:15Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2308ZT_WSM_HIGHWAY_CRACK
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: अकोला–आर्णी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए वरील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील हिसई–वानोजा दरम्यानचा रस्ता अक्षरशः जीवघेणा ठरत आहे.या ठिकाणी रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या असून त्या इतक्या खोल व रुंद आहेत की दुचाकींसह लहान चारचाकी वाहनांची चाके त्यामध्ये अडकण्याचा धोका निर्माण झाला आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून या भेगांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली असून,आता या भेगांमध्ये झुडपेही उगवू लागली आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची अवस्था दुर्गम रस्त्यासारखी झाली आहे. दरम्यान, अपघाताचा धोका वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नागरिकांनी महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
3
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 23, 2025 05:46:43Bhandara, Maharashtra:
गोंदिया जिल्हा पोलिसांच्या वतीने सायकल थॉन स्पर्धेचे आयोजन शेकडो लोकांनी घेतला सहभाग
Anchor :- फिटनेस की डोज आधा घंटा रोज या टॅगलाईन खाली फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह या उपक्रमा अंतर्गत गोंदियात पहिल्यांदाच पोलीस विभागाच्या वतीने सायकल थॉनचे आयोजन करण्यात आले असून प्रथम द्वितीय आणी तिसरा क्रमांक पटकविणाऱ्या स्पर्धाकला पोलिस विभागाच्या वतीने प्रसस्थी पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक गौरख पोलिस उप अधीक्षक अभय डोगरे यांच्या सह गोंदिया जिल्यातील उप विभागीय पोलिस अधिकारी आणी पोलिस निरीक्षकांनी देखील सायकल चालवत हेल्थ इज वेल्थ तसेच पर्यावरण सौरक्षणाचा संदेश दिला.
BYTE -:- गौरख भामरे पोलीस अधीक्षक गोंदिया
0
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 23, 2025 05:45:55Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2308ZT_CHP_CHAMELEON
( single file sent on 2C)
टायटल :--- चंद्रपूर जिल्ह्यात दुर्मिळ रंग बदलणारा सरडा आढळला, गावातील तरुणांनी दिले जीवनदान
अँकर :-चंद्रपूर जिल्ह्यात दुर्मिळ रंग बदलणारा सरडा आढळून आला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील धाबा गावात हा सरडा थेट वीज तारांवर चढला होता. दोन दिवस तो तारांवरच अडकून होता. अखेर गावातील प्रफुल चापले या तरुणाने धाडस दाखवत सरड्याला बांबूच्या सहाय्याने खाली काढले आणि खुल्या जागेत सोडले. परिसरातील रंगानुसार आपला रंग बदलणारा हा सरडा आता दुर्मिळ असून तो अभावानेच आढळत असल्याचे पर्यावरण प्रेमींनी मत आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 23, 2025 05:32:50Bhandara, Maharashtra:
लाखनी शहरात काढण्यात आली मारबत
Anchor :- पारंपरिक सणांमध्ये मारबात काढण्याला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी पोल्याच्या पाळव्याला ही अनोखी मिरवणूक काढली जाते. मारबात म्हणजे समाजातील वाईट प्रथा, दुष्ट शक्ती व अनिष्ट गोष्टींचे प्रतीक. मोठ्या जल्लोषात, ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथे मिरवणुक काढण्यात आली. या सोहळ्याला सांस्कृतिक वैशिष्ट्य मानले जाते. "वाईटाचा नाश आणि चांगल्याचा विजय" हा संदेश देणारा मारबात उत्सव, दरवर्षी पोल्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा होतो.
3
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 23, 2025 05:32:29Raigad, Maharashtra:
स्लग - वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी ए आय तंत्रज्ञानाची मदत ......
मुंबई गोवा महामार्गावर पोलिस प्रशासन सज्ज ....
चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी पोलिसांनी कसली कंबर ........
अँकर - मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे.या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाहनांची हालचाल, गर्दीचे ठिकाण, कोंडी होण्याची शक्यता याचा अंदाज घेऊन त्वरित उपाययोजना करता येणार आहेत
माणगावमध्ये नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना माणगावमध्ये वाहतूक कोंडीचा त्रास अधिक होऊ नये यासाठी माणगाव पोलिस सज्ज झाले आहेत. यासाठी 15 पोलिस अधिकारी, 120 कर्मचारी, 30 वाहतूक कर्मचारी, 30 होमगार्ड आणि 30 अपदा मित्र अशी मोठी टिम माणगावमध्ये तैनात करण्यात आली आहे तर या व्यतिरिक्त क्रेन, ॲम्ब्युलन्स देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत. वाहतुक कोंडी होऊ नये आणि झाल्यास ती लगेच सोडवली जावी यासाठी ए आय देखील वापर मुंबई गोवा महामार्गावर केला जाणार आहे.
बाईट - निवृत्ती बोराडे, पोलिस निरिक्षक माणगाव
2
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 23, 2025 05:31:56Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2308ZT_CHP_GHODAZARI
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात मागील काळातील संततधार पावसाने घोडाझरी सिंचन प्रकल्प वाहतोय ओसंडून, ड्रोन मध्ये मनोहारी दृश्य कैद
अँकर :- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव हा मागील काही दिवसा पासून ओसंडून वाहत आहे. जिल्ह्यात दोन मोठी धरणे आहेत. त्या पैकी घोडाझरी हे एक मोठं धरण आहे. या धरणाचे मनमोहक दृश्य केशव कुंभलकर या युवकाने ड्रोनद्वारे टिपले आहे. तिन्ही बाजूला असलेल्या नैसर्गिक टेकड्यांमध्ये बांध घालून इंग्रजांनी १९०५ मध्ये या तलावाची निर्मिती केली. निसर्गाने या तलावावर नैसर्गिक सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे. निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक वर्षभर येथे गर्दी करीत असतात. चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर पूर्व विदर्भातील पर्यटकही येथे येतात. सध्या मात्र वर्षा सहलीचे हे केंद्र पर्यटकांसाठी नागपूर ते बंद ठेवण्यात आले आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
ABATISH BHOIR
FollowAug 23, 2025 05:31:28Kalyan, Maharashtra:
न्यूज फ्लॅश..
कल्याण निक्की परिसरातील धक्कादायक घटना..
सकाळी सातच्या सुमारास मुलाला शाळेत सोडून परतणाऱ्या दुचाकीस्वार महिलेला ट्रक ची धडक धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू..
ट्रक चालक पसार,
ट्रक चालकाचा पोलिसाकडून शोध सुरु.
महिलेची ओळख पटली असून रिंकू आरव असे महिलेचे नाव
खडकपाडा पोलिसांनी ट्रक घेतले ताब्यात.
4
Report
KJKunal Jamdade
FollowAug 23, 2025 05:30:40Shirdi, Maharashtra:
Anc - गणरायाचे लवकरच आगमन होणार असून मुर्तीकारांची उत्सवमुर्ती बनवण्याची लगबग सुरू आहे.. तीन दिवसावर आलेल्या गणेशउत्सवासाठी लागणा-या मूर्त्यांवर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथिल कारागीर अखेरचा हात फिरवत आहेत..
लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत आतुरतेने ज्याची सर्वजण वाट पाहत असतात त्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे..राहता तालुक्यातील मूर्तीकारांची मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याची लगबग बघायला मिळतेय.. या वर्षी पंधरा दिवस अगोदरच गणपती आल्याने मोठी कसरत करावी लागत असून मोठ्या मुर्तीना मागणी वाढली त्यातच कच्चा मालाच्या किमतीत वीस ते पंचवीस टक्के वाढ झाल्याने गणेशमूर्ती महागणार आहेत.. गणपती मूर्ती कारखान्याहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
wkt kunal jamdade
1
Report
SNSWATI NAIK
FollowAug 23, 2025 05:01:25Navi Mumbai, Maharashtra:
Story slug - म्हाडा कॉलनी मधील घरांना गळती
म्हाडा कॉलनी के घर मे लिकेज
FTP slug - nm mhada home
Shots- video and photo
Reporter- swati naik
Navi mumbai
Anchor - शीळफाटा येथील भंडार्ली गोटेघर येथे नवीन म्हाडा वसाहत बनवली आहे , या वसाहती मद्ये पहिल्याच पावसात घरांना गळती लागली आहे , पाच हजार घरांची कॉलनी असून येथे सुखसुविधा चा अभाव असून नवीन घरांना गळती लागल्याने सदनिका धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून,
बि जी शिर्के कंपनी ने हे बांधकाम केले असून ,घरांची दुरुस्ती करून देण्याची मागणी राहिवाशियानी केली आहे।
Gf-
===========
8
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 23, 2025 04:46:23Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या दिग्रस शहरातील अत्यंत वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे, त्यात साचलेले पावसाचे पाणी आणि अर्धवट सोडलेल्या कामामुळे हा मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. दिग्रस आर्णी ह्या मार्गावरून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, शालेय विद्यार्थी, पादचारी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. गेल्या चार महिन्यांपासून येथील काम ठप्प आहे. संबंधित यंत्रणा, प्रशासन आणि कंत्राटदार जबाबदारीपासून हात झटकत आहेत. सहा महिन्यांपूर्वी मानोरा चौक ते आर्णी बायपास मार्गाचे कामाला सुरुवात झाली, त्यानंतर तीन महिन्यांपासून काम ठप्प आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचा हा मतदारसंघ असून त्यांनी या समस्येकडे लक्ष द्यावी अशी मागणी दिग्रस करांनी केली आहे.
7
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 23, 2025 04:35:00Ambegaon, Maharashtra:
Feed 2C
Slug: Ambegaon Dimbhe Dam Nature
File:02
Rep:Hemant Chapude(Ambegaon)
Anc: सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील डिंभे धरण परिसरातील निसर्ग वैभव बहरलं असून उंच कड्याच्या डोंगरावरून खळखळून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे ,डिंभे धरणाचा हिरवागार निसर्गमय परिसर मन प्रसन्न करून टाकतोय याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
Wkt: हेमंत चापुडे (प्रतिनिधी)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
5
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 23, 2025 04:34:45Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
feed attached
*पोळ्यानिमित्त अनोखी परंपरा,एक एक बोटाने उचलला तब्बल 100 किलोचा दगड,
राज्यभरात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला मात्र छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पोळा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. पोळा सणानिमित्त एक घर पाडळी येथील बुरा दिन बाबा यांच्या प्रसिद्ध दर्ग्यासमोर 100 किलो वजनाचा दगड आहे. हा दगड बारा जणांनी एक एक बोट लावून उचलत पोळा सण साजरा केला. अनेक वर्षांची ही परंपरा आजही सुरू आहे. या परंपरेतील वैशिष्ट्य म्हणजे बारापेक्षा एक व्यक्ति देखील अधिक झाला तर दगड उचलला जात नाही असे या गावचे ग्रामस्थ सांगतात. ग्रामस्थांनी दगड उचलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
7
Report