Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

भंडारा दौरे में रूपाली चाकणकर ने महिलाओं को दिया प्रेरणादायक मार्गदर्शन

PTPRAVIN TANDEKAR
Sept 18, 2025 03:16:31
Bhandara, Maharashtra
भंडाऱ्यात राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केले मार्गदर्शन.... ANCHOR :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भंडारा जिल्हा दौरा दरम्यान राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची सार्वजनिक वाचनालय भंडारा येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसह असंख्य महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. दरम्यान शाल श्रीफळ देऊन चाकणकर यांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान महिलांची स्फूर्ती वाढवण्याकरिता लाडल्या बहिणींशी संवाद साधत मार्गदर्शनही केले. मार्गदर्शन करताना महिलांना अडीअडचणीच्या वेळी लाडक्या भावाने दिलेले दीड हजार कामात येतात. आणि म्हणून ते दीड हजार रुपये महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. मात्र विरोधक अजूनही ती योजना बंद व्हावी यासाठी लागलेले आहेत आणि विविध प्रयत्न करत आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी विरोधकांवर केली आहे. Stand mic :- रूपाली चाकणकर, महिला प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Sept 21, 2025 15:46:19
Yavatmal, Maharashtra:AVB Anchor : बंजारा समाजाचे संत जगद्गुरु सेवालाल महाराज यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील सेवा नगर येथे असलेल्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार आज उघडकीस आला. विटंबनेनंतर बंजारा समाज संतप्त झाला आहे. दरम्यान पोलिसांनी इथे आरोपीला अटक केली आहे. दिग्रस पोलीस स्टेशन अंतर्गत सेवानगर पासून तीन किलोमीटर अंतरावर पावणे तीनशे वर्षांपूर्वी सेवालाल महाराज यांनी देह त्यागला होता. त्यावेळी त्यांच्या अंत्ययात्रे दरम्यान जिथे खांदेपालट झाला त्या सेवानगर येथे सेवालाल महाराजांचा पुतळा आहे. ह्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे समजतात मोठ्या संख्येने बंजारा समुदाय सेवा नगर मध्ये पोहोचला. दरम्यान महंत सुनील महाराज यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली, पोलिसांनी लागलीच अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला व काही तासातच दिग्रस येथील रहिवासी गब्बर शहा या आरोपीला अटक केली आहे. दारूच्या नशेत त्यांनी हे कृत्य केले असून त्याच्यासोबत आणखी एक आरोपी होता. सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने आरोपीने ही विटंबना केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. बाईट : सुनील महाराज : महंत
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 21, 2025 15:31:34
Junnar, Maharashtra:Feed 2C Slug: Junnar Kolhe Modi File:01 Rep: Hemant Chapude(Junnar) खा.अमोल कोल्हे byte on PM नरेंद्र मोदी भाषण - GST चे नवे दर लागू करणे म्हणजे देर आये दुरुस्त आये अशी गत - GST संकल्पना म्हणजे वन नेशन वन टॅक्स अशी होती मग एवढे स्लॅब करण्याची गरज काय होती - महागाई नियंत्रण करण्यात सरकारला येत असलेलं अपयश झाकण्याचा प्रयत्न यातून झालाय का - यातून नागरिकांना थोडीशी सवलत मिळेल त्याबाबत या गोष्टीचे स्वागत केलं पाहिजे पण यात अजून बरंच काही करणे गरजेचे आहे - महाराष्ट्रासारख्या प्रगत राष्ट्रात दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय, देशाचे परराष्ट्र संबंधात प्रचंड अस्वस्थता असताना GST चा उत्सव कसा साजरा करायचा - महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकरी आत्महत्या असेल, महाराष्ट्रातील आताची ओल्या दुष्काळाची परिस्थिती असेल, अमेरिकेसोबतच्या पर राष्ट्र धोरणात अपयश आलंय, अमेरिकेने व्हिजा वर लादलेले निर्बंध असतील, त्यामुळे आयटी क्षेत्रावर निर्माण झालेल्या ढग असतील या परिस्थिती उत्सव कसा साजरा कार्याचा Byte: डॉ अमोल कोल्हे (खासदार शिरूर लोकसभा) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Sept 21, 2025 15:20:46
Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकिंग SLUG- 2109_WARDHA_WISHBADHA - वर्ध्याच्या नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा ? - उलट्या व मळमळ झाल्यानं 19 विद्यार्थ्यांवर शाळेतच करण्यात आले उपचार - दोन विद्यार्थ्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले उपचार - जिल्हा आरोग्य अधिकारी स्वप्नील बेले यांची माहिती अँकर : वर्ध्याच्या सेलू काटे येथील नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडलाय. तब्बल 19 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची आरोग्य अधिकाऱ्याची माहिती आहे. 19 विद्यार्थ्यांना अचानक  उलट्या, हगवण होत असल्यानं विद्यार्थ्यांवर शाळेतच उपचार करण्यात आले.  नवोदय विद्यालयातील अन्न व पाण्याचे घेण्यात आले नमुने घेण्यात आले. दोन विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून त्यांना पालकानी घरी नेलेय. जिल्हा आरोग्य अधिकारी स्वप्नील बेले यांनी नेमका प्रकार कशामुळे घडला याबाबत मात्र अद्याप स्पष्ट केले नाही.मात्र विषबाधा अन्नातून विषबाधा झाल्याची शंका वर्तविली झाली आहेय..
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 21, 2025 14:46:06
Ambernath, Maharashtra:बदलापुरात चोरट्यांचा धुमाकूळ , धारदार शस्त्र घेतलेली चोरांची टोळी सीसीटिव्हीत कैद bdl theft cctv anchor बदलापूर शहरातील वालीवली परिसरातील जलाराम सोसायटीत दरोडा टाकायला आलेली चोरांची टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, धक्कादायक म्हणजे या चोरांच्या हातात धारदार शस्त्र होती , या टोळीतील सदस्यांनी इमारतीतील एक बंद असलेलं घर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र घरात काही न सापडल्याने हे या टोळीने बाजूच्या इमारतीतही घरफोडीचा प्रयत्न केला, हे चोर हातात शस्त्र घेऊन इमारतीत जाताना आणि बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. अशाप्रकारे धारदार शस्त्र घेऊन चोरांची टोळी ही रात्री फिरत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे, आता पोलीस यावर काय कारवाई करतात हे पाहणं लागणार आहे. चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 21, 2025 14:45:34
Kalyan, Maharashtra: कल्याण मध्ये नशेखोरांचा वाढला उच्चान, रात्री घरात येणाऱ्यांना पाठवावी लागते ओळख.. नागरिकांन मध्ये भीतीच वातावरण. नशेखोरांवर पोलिसांन कडून कारवाईची मागणी.. Anc..रात्री अपरात्री लोकांच्या घरांच्या खिडक्या तोडणे, घरांवर दगडफेक करणे, रस्त्यात महिला दिसली की तिची छेड काढणे. नशेखोरांनी नेतिवली परिसरात हैदोस घातला आहे. नशेखोरांपासून नागरीक त्रासले आहे. शिवेसना शिदे गटाच्या पदाधिकारी संदीप माने यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. मात्र वारंवार तक्रार करुन देखील ठोस कारवाई केली जात नसल्यााने नागरीकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. vo...कल्याण पूर्व परिसरात नशेखोरांनी हैदास घातला आहे. कल्यामचे डीपीसी अतुल झेंडे यांनी या नशेखाेरांच्य विरोधात मोठी मोहिम सुरु केली होती. पोलिसांची दहशत या नशेखाेरांमध्ये पसरली होती. अनेक नशेखाेरांच्या मुसक्या आवळून त्यांची जेलवारी करण्यात आली होती. पुन्हा नशेखोरांनी डोके वर काढले. कल्याण पूर्वेतील नेतिवली परिसरात नशेखोरांनी काही दिवसापासून हैदास घातला आहे. रात्री अपरात्री लोकांच्या दार ठोठावतात. रस्त्यावरील महिलांची छेड काढतात. तसेच घरांच्या खिडक्यांची तोडफोड करणे. घरावर दगड फेकले जाता. हे सगळे प्रकार या नशाखोरांकडून केले जाता. दोन दिवसापूर्वी तर या नशेखारांनी कहरच केला. एका घराची लाईट कापली. हे घर चार दिवस अंधारात होते. परिस्थिती ही आहे की, जेव्हा एनडीटीव्हीचे प्रतिनिधी एका घरासमोर गेले असता. त्यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी संदीप माने यांच्यासह गेले. घरातील भाडोत्री जोपर्यंत त्याची खात्री झाली नाही की त्याचा मालक दार ठोठावत आहे. तोपर्यंत त्याने त्याचे दार उघडले नाही. अखेरीस भाडोत्रीने मालकास मोबाईल केला. मालक आल्याची खात्री केली. तेव्हा कुठे त्याने दार उघडले. इतकी दहशत नशेखोरांची असल्याचे या घटनेतून उघड झाले आहे. या प्रकरणी संदीप माने यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. हैदोस घालणाऱ्या नशेखोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा. पूर्वीही या प्रकरणी पोलिसांकडे माने यांनी तक्रार केली होती असा आरोप केला माने यांनी केला आहे यामुळे नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण आहे मात्र पोलिसांकडून याबाबत ठोस कारवाई करण्यात आली नस्लयाचे माने यांनी सांगितले. byte.. रहिवासी byte..संदीप माने शिवसेना विभाग प्रमुख
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 21, 2025 14:18:59
2
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 21, 2025 14:01:53
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_WineMart Feed on - 2C -------------------------- Anchor - वाईन मार्ट दारू खरेदी करून पैसे न देता दोघांनी वाईन मार्ट मध्ये तोडफोड करत कर्मचाऱ्यांना बेदम मारहान केली. नांदेड शहरातील श्याम टॉकीज जवळील वाईन मार्ट मध्ये काल रात्री ही घटना घडली. घटनेचे cctv फुटेज समोर आले आहेत. नांदेड वाईन मार्ट मध्ये दोघांनी दारू विकत घेतली पण फोन पे वर फेक आय ऍप वारून पैसे दिल्याचे दाखवले. पैसे न देता परत जात असताना कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले. पण दोघांनी सरळ लाकडी दांडके घेऊन मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना मारहान करण्यास सुरुवात केली. वाईन मार्ट मध्ये घुसून दारूच्या बाटल्या फेकून मारल्या. दहा मिनिटे त्यांचा हैदोस सुरु होता. मारहान करून दहशत करून दोघेजण पसार झाले. घटनेत वाईन मार्ट मधील दोन कर्मचाऱ्यांचे डोके फुटले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. ----------
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 21, 2025 13:30:29
Thane, Maharashtra:भिवंडीत पुन्हा यूपी एटीएसची छापेमारी; फिलिस्तानमध्ये पैसे पाठविणाऱ्या तिघांना अटक... ॲंकर... उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकानं (यूपी एटीएस) शनिवारी उशिरापर्यंत छापेमारी करत भिवंडीतील विविध भागातून तीन तरुणांना अटक केली. या तरुणांनी अंदाजे ३ लाख रुपये गोळा करून ती रक्कम फिलिस्तीन देशात पाठवल्याचा आरोप आहे. या तिघांवर संशयास्पद कारवायांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. तपास यंत्रणांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.. मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन (२२ वर्षे, रा. सहारा अपार्टमेंट्स, ताहेरा मॅरेज हॉलजवळ, भिवंडी ) अबू सुफियान तजम्मुल अन्सारी (२२ वर्षे, रा. गुलजार नगर, भिवंडी ) जैद नोटियार अब्दुल कादिर (२२ वर्षे रा. वेताळ पाडा, भिवंडी) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. भिवंडीतून उत्तरप्रदेश राज्यात लाखाची रक्कम फिलिस्तीन (पॅलेस्टाईन) देशात पाठवली जात असल्याचं तपासात समोर आलं होतं. त्यानंतर शुक्रवारी भिवंडीत दाखल झालेल्या यूपी एटीएसच्या एक पथकानं तपास सरू केला. दिवसभर या तरुणांवर पाळत ठेवून शनिवारी दुपारच्या सुमारास भिवंडी शहरातील गुलजार नगर भागातील एका इमारतीत पथकान अचानक छापेमारी केली. यावेळी पथकानं अबू सुफियान तजम्मुल अन्सारी या तरुणाला राहत्या घरातून ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांच्याकडं चौकशी केली असता त्यानं इतर दोन साथीदार मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन आणि जैद नोटियार अब्दुल कादिर या दोघांची नावे सांगितली. पथकानं दोघांनीही शांतीनगर आणि निज्मापुरा पोलिसांच्या मदतीनं ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं. त्यांच्यावर रक्कम गोळा करून दहशतवाद्यांना विदेशांना पाठविल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला. शनिवारी, रात्री उशिरा या तिन्ही तरुणांना उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकानं पुढील तपासासाठी लखनौच्या एटीएस कार्यलयात नेल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्याच आठवड्यात अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाका परिसरामधून आफताब कुरेशी या संशयित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी गेल्याच आठवड्यात अटक केली होती. त्यावेळीही स्थानिक हिल लाईन पोलिसांकडून आफताबचं घर शोधून काढण्यात आलं. त्याला अटक करून दिल्लीत पुढील तपासासाठी नेण्यात आलं. आता, त्या पाठोपाठ भिवंडीतील या तिघांवर देशविघातक संशयास्पद कारवायांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. तपास यंत्रणांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी नवरात्री आणि दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सर्तक होऊन ठिकठिकाणी छापेमारी करीत होते. त्यावेळी देशविघातक आणि दहशतवादी कृत्यांना अर्थसहाय्य केल्याचा आरोप असलेल्या पीएफआय संघटनेच्या 3 पदाधिकाऱ्याना भिवंडी शहरातून ताब्यात घेण्यात आले. ठाणे एटीएसच्या अधिकाऱ्यांसह विविध गुन्हे शाखेच्या पथकानं त्यांना सापळा रचून ताब्यात घेतलं होतं. तर भिवंडी तालुक्यातील पडघा गावाच्या हद्दीतून आयसीसीच्या आठ ते दहा दहशतवाद्यांना काही महिन्यापूर्वीच अटक करण्यात आली होती. एकंदरीतच भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात दहशतवाद्यांसह पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्यासह देश विघातक कारवाईचं कनेक्शन उघड झालं आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासह मुंबईच्या सुरक्षेच्या दुष्टीनं ही बाब धोक्याची असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहे. जूनमध्ये भिवंडी तालुक्यातील पडघा येथील बोरिवली गावात असलेल्या दहशतवादी साकिब नाचनच्या घरावर महाराष्ट्र एटीएसनं छापा होता. भिवंडी ग्रामीण पोलिसांच्या मदतीनं मध्यरात्रीनंतर छापा टाकून कारवाई केली होती. साबिक नाचनचा मुलगा अकिब नाचनवर एनआयएनं कारवाई करून अटक केली होती.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 21, 2025 13:00:16
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 21, 2025 12:45:09
0
comment0
Report
Advertisement
Back to top