Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005

कोल्हापूरमध्ये पावसाने केला कहर, 45 बंधारे पाण्याखाली!

PNPratap Naik1
Aug 19, 2025 03:02:08
Kolhapur, Maharashtra
Kop Rain Update Feed :- 2C Anc :- कोल्हापूर जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील 45 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गगनबावडा, राधानगरी तालुक्यासह तुळशी, कुंभी, पाडगाव, चिकोत्रा, घटप्रभा, धामणी धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. राधानगरी धरणाचे सहा दरवाजे उघडले असून त्यातून साडेअकरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी आपले पात्र सोडले असून अनेक नद्यांचे पाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. कोल्हापूर - गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावरती मांडूकली जवळ रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कोल्हापूर - राजापूर हा राज्य मार्ग देखील नदीच्या पाण्यामुळे बंद झाला आहे.
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Aug 19, 2025 04:46:39
Kalyan, Maharashtra:
मध्य रेल्वे दुसऱ्या दिवशी लोकल सेवा विस्कळीत; मुसळधार पावसामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक अनिश्चित काळासाठी वीस ते पंचवीस मिनिटं उशिराने सुरू. कल्याण रेल्वे स्टेशन हा मुख्य रेल्वे स्टेशन एक्सस्प्रेस गाड्या उशिराने असल्याने रेल्वे प्रवासी ताटकळत.. कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही मार्गावरील लोकल 20-25 मिनिटे उशिराने कालही सकाळ-संध्याकाळच्या गाड्या उशिराने धावल्यानं चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले होते आज नियोजित वेळेवरती लोकल गाड्या येतील अशी अपेक्षा होती मुंबई मध्ये मुसळधार व मात्र तांत्रिक अडचण आणि पावसामुळे आज सकाळपासून उशिरा सुरू असलेल्या या लोकल ट्रेनचा प्रवाशांना फटका वेळेत लोकल न धावल्याने प्रवाशांमध्ये व सकाळी कामाला जाणाऱ्या चाकरमानांची कल्याण स्थानकावर गर्दी. Wkt... आतिश भोईर
0
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 19, 2025 04:33:02
Nagpur, Maharashtra:
Ngp Water lodging live u ने फीड पाठवले -------- नागपूर - - नागपूरसह परिसरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे विमानतळकडे जाणाऱ्या मुख्य मार्ग हॉटेल pride समोर परिसरात सकाळी साचलं होते पाणी - विमानतळावर येणारऱ्या एका मार्गावर साचलं पावसाचं पाणी - पावसाच्या पाण्यातून वाहनं विमानतळावर येत आहे.. त्यामुळे त्यांची तारांबळ होतं होती - काल रात्री मुसळधार पाऊस झाल्याने श हरातील सखल भागात साचलं होते पाणी
1
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Aug 19, 2025 04:32:37
Palghar, Maharashtra:
पालघर मध्ये मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत. नद्यांच्या पूर आला असून धरणक्षेत्रातही चांगला पाऊस पडत आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील यांनी.
4
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 19, 2025 04:32:30
Kalyan, Maharashtra:
कल्याण डोंबिवली मध्ये सकाळ भागामध्ये पाणी सातारा सुरुवात.. कल्याणच्या मुख्य रस्त्यावरील पाणी साचल्याने वाहतूक कोंडी Anc.. कल्याण आणि डोंबिवली परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती तर एक तासापासून मुसळधार पावसामुळे अनेक सकळ भागातील रस्त्यावरती पाणी साचायला सुरुवात झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक, आंबेडकर रोड,स्टेशन परिसर या ठिकाणी देखील पाणी साचलेला आहे याचा परिणाम वाहतूक वर ही देखील झाला आहे कल्याणचा भिवंडी, शिळफाटा रोड हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावरील देखील वाहतूक संत गतीने सुरु आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी Wkt... आतिश भोईर कल्याण
2
comment0
Report
SNSWATI NAIK
Aug 19, 2025 04:32:23
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - नवी मुंबई मद्ये पावसाचा जोर वाढला wkt FTP slug - nm rain wkt shots - rain reporter- swati naik navi mumbai anchor - नवी मुंबई मद्ये देखील पावसाची संततधार सुरू असून पहाटे पासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे , गेल्या 24 तासात 185 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे याबाबत आढावा घेतला आहे आमच्या प्रतीनेधी स्वाती नाईक यांनी । बाईट- wkt -//---------
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Aug 19, 2025 04:31:55
Virar, Maharashtra:
Date-19aug2025 Rep-prathamesh tawade Loc-virar Slug-VIRAR NALA WKT Feed send by 2c Type-WKT Slug- विरार मध्ये नाल्यात प्लास्टिक कचऱ्याचा खच महानगरपालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल साचलेल्या प्लास्टिक मुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळे नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्याने जनजीवन विस्कळीत अँकर - विरार पूर्वेच्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा खच साचल्याने असल्याने नाल्यातील पाणी रस्त्यावर येऊ लागले आहे .. त्यामुळे पालिकेच्या नालायक सफाईचा दावा फोल ठरताना दिसत आहे... नाल्यांत साचलेल्या प्लास्टिक कचऱ्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडखळला असून, त्याचा परिणाम रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून दिसून येत आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी कोट्यवधी खर्च करून नालेसफाई केल्याचे आश्वासन पालिकेकडून दिले जाते, मात्र प्रत्यक्षात महानगर पालिकेच्या या निष्काळजीपणामुळे पावसाळ्यातील त्रास अधिकच वाढला आहे..पालिकेच्या नाले सफाईचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी...
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 19, 2025 04:17:28
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1908ZT_CHP_RAIN_CONTINUE ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार, चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका कायम अँकर:--- चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात  पावसाची संततधार सुरू आहे. एकीकडे वर्धा नदीला पूर आला असताना जोरदार पावसाने चंद्रपूरकरांच्या चिंता वाढविल्या आहेत. विशेष म्हणजे अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात गेले 3 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे इसापूर धरणातुन मोठ्या प्रमाणात पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणाचे पाणी पैनगंगा नदीतून वर्धा नदीत आल्याने वर्धा, इरई आणि झरपट नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मात्र या सर्व परिस्थितीत दिलासादायक बाब म्हणजे सध्या इरई धरणातून पाण्याचा विसर्ग बंद आहे. इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यास इरई नदीमुळे चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
4
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 19, 2025 04:17:18
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यावर अतिवृष्टी आणि पुराचा मोठा तडाखा बसलाय.. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जिल्ह्यात दोन दिवसांत म्हणजेच १७ आणि १८ ऑगस्ट रोजी बरसलेल्या पावसामुळे घरांचा आणि शेतपीकांच मोठा नुकसान झाला आहे. Vo 1 : प्राप्त माहितीनुसार तब्बल ३८९ घरांची पडझड झाली आहे. यामध्ये ८ घरे पूर्णतः तर ३८१ घरे अंशतः कोसळली आहेत.याशिवाय, ५९ हजार २८९ हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे.अकोला, मूर्तिजापूर आणि पातूर या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे पातूर तालुक्यातील ९ गावांचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला असून पंचनामे करून नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. Byte : शेतकरी
1
comment0
Report
SKSACHIN KASABE
Aug 19, 2025 04:17:08
Pandharpur, Maharashtra:
19082025 slug - PPR_DOLBI_DEATH file 02 ---- Anchor - दहीहंडीचा उत्सव झाला मात्र त्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या एका नागरिकांचा डॉल्बीच्या आवाजाने मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. काल रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडी उत्सव निमित्त कर्ण कर्कश आवाजात डॉल्बी लावले होते. त्यावेळी या गोंधळात एक अनोळखी व्यक्ती चक्कर येऊन पडला. त्यास सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेई पर्यंत त्याचा मृत्यू झाला आहे. पंढरपूर मध्ये सलग दोन दिवस जोरदार आवाजात डॉल्बी लावून दहीहंडी उत्सव साजरे होत आहेत. त्याचा एक बळी गेला आहे
4
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 19, 2025 04:17:01
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 1 FILE SLUG NAME _SAT_PATAN_BRIDGE कराड-सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरण 100% भरण्याच्या उंबरठ्यावर आले आहे. त्यामुळे 53 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जात आहे त्याचबरोबर या भागात सुरू असलेल्या पावसामुळे कोयना नदीवरील जुना संगमनगर धक्का पूल आणि मुळगावचा पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच निसरे आणि तांबवे येथील बंधारे सुद्धा पाण्याखाली गेले आहेत. या परिसरात पाऊस वाढल्याने प्रशासनाकडून सूचना दिल्या जात आहेत.
8
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 19, 2025 04:15:34
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1908ZT_JALNA_KASURA_RIVER(4 FILES) जालना : परतूर तालुक्यातील कसुरा नदीला तिसऱ्यांदा पूर शेगाव - पंढरपूर दिंडी महामार्गावरील श्रीष्ठी येथील पुलावर पाणी कसुरा नदीला पूर आल्याने दिंडी महामार्गावर जीवघेणा प्रवास अँकर : जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातल्या कसूरा नदीला यंदा तिसऱ्यांदा पूर आलाय..या पुरामुळे शेगाव - पंढरपूर दिंडी महामार्गावरील श्रीष्ठी येथील पुलावरून पाणी वाहत असून या पुलावरून वाहनचालकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.. दरम्यान काही गावांचा संपर्क तुटलाय असून, या पुरामुळे शेतीपिकांचेही मोठं नुकसान झालं आहे.
5
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 19, 2025 04:15:27
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE SLUG NAME - SAT_KOYNA सातारा - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरणातून केला जाणारा विसर्ग अजून वाढवण्यात आला आहे.धरणाचे सर्व दरवाजे 8 फुटांपर्यंत उघडून 51200 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे .कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये असा एकूण 53300 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सध्या धरणात 98.57 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
3
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 19, 2025 04:05:03
Parbhani, Maharashtra:
अँकर- मागील चार दिवसांपासून परभणी जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस पडला. प्रशासकीय अहवालानुसार जिल्ह्यातील 12 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालीय. यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तात्काळ पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकयांमधून केली जात आहे.
3
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 19, 2025 04:04:56
Shirur, Maharashtra:
Feed 2C Slug: Ranjangaon Ganpati Shinde File:01 Rep: Hemant Chapude(Shirur) Anc: राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अष्टविनायक महागणपती रांजणगाव चरणी नतमस्तक होत लाडक्या बाप्पाची आरती केली, या वेळी शिंदे यांनी लाडक्या बाप्पाकडे पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया रांजणगाव पुणे...
2
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 19, 2025 04:04:30
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1908ZT_JALNA_NIMNA_DUDHNA(2 FILES) जालना :परतुरच्या निम्न दुधना प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडले.. निम्न दुधना प्रकल्पात 70 टक्के पाणीसाठा दूधना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.. अँकर : जालन्यातील परतुर येथील निम्न दुधना प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आलेत.. गेल्या चार दिवसांपासून जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय.. त्यामुळे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झालीय.. प्रकल्पात एकूण जिवंत साठा 70 टक्कयांवर पोहोचला असून,प्रकल्प परिसरातील बाधित जमिनीचे भूसंपादन होईपर्यंत प्रकल्पात 75 टक्के पेक्षा जास्त पाणी साठवण्यास मनाई आहे..त्यामुळे प्रकल्प प्रशासनाने पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला असून, निम्न दुधनाचे सहा दरवाजे उघडण्यात आलेत.. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन निम्न दुधना प्रशासनाच्या वतीने करण्यात आलय..
6
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top