Back
डोंबिवलीत २०९ घरांवर रेल्वेची नोटिसा, रहिवाशांचा आक्रोश!
ABATISH BHOIR
FollowJul 22, 2025 05:37:05
Kalyan, Maharashtra
डोंबिवलीत '६५ अनाधिकृत इमारतीं'नंतर आता २०९ हून अधिक घरांवर रेल्वेची टांगती तलवार!.
२०९ घरांना रेल्वेच्या नोटिसा, रहिवाशांचा 'आम्ही अतिक्रमणदार नाही' म्हणत आक्रोश...पुनर्वसन किंवा मोबदल्याची मागणी, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा.
डोंबिवली पश्चिमेकडील गणेशनगर आणि भगवान काटेनगर परिसरातील सुमारे २०९ घरांना रेल्वे प्रशासनानं कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत.
रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत ९ डिसेंबर रोजी रहिवाशांना या नोटिसा मिळाल्या आहेत. यामुळं रहिवाशांच्या पायाखालची जमीनच सरकली असून, त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे.
सर्व राजकीय नेत्यांची भेट घेऊन सुद्धा कोणीही दखल घेत नाही..
आम्ही रेल्वे कोर्टामध्ये लढा देत आहोत तरीसुद्धा रेल्वे कडून एकूण ४१० घर आहे त्यापैकी २०९ जणांना नोटीसा देण्यात आलेले आहे
दखल घेतली नाही तर कुटुंबासहित सामूहिक आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असा इशारा दिला आहे.
Byte...रहिवाशी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 22, 2025 11:40:45Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Nagpur
Slug - 2207_NGP_KADU_121
FILE - 1 VIDEO
121 बच्चू कडू
माणिकराव कोकाटे यांनी सरकारला भिकारी म्हटला आहे.. त्यामुळे ही वास्तविकता असावी, या भीकारीच्या रांगेत कोण आहेत. मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, सर्व सरकार या रांगेत आहे. माणिकराव कोकाटे यांनी कृषी विभागाची वास्तविकता मांडली आहे. तर रम्मी खेळामुळे किती लोकांचं बळी गेलं आहे...
माणिकराव कोकाटे बेताल वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना सरकार कसं काय पचवून घेत माहिती नाही... आणि त्यांनी सरकारला भिकारी म्हटलं आहे. त्यामुळे तुमच्या आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. सरकार भिकारी म्हणजे राज्य भिकारी आणि माणिकराव यांनी एका शब्दात राज्याची गरिमा काढली...
4
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 22, 2025 11:39:01Nashik, Maharashtra:
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_protest
*नाशिक ब्रेकिंग...*
- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फोटोला जोडे मारून शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन...
- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करण्याची शरदचंद्र पवार पक्षाची मागणी...
- नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शहर शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी...
- विधिमंडळात माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळतानाचा व्हिडिओ नंतर विरोधकांकडून कोकाटे यांच्या विरोधात निदर्शने...
2
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 22, 2025 11:38:12Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_wada_Collapse
जुने नाशिक परिसरात असलेल्या चौक मंडईतील जुना वाडा कोसळल्याची घटना
अँकर
नाशिक शहरातील जुने नाशिक परिसरात असलेल्या चौक मंडईतील जुना वाडा कोसळल्याची घटना घडली आहे या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसून परिसरातील नागरिकांच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जवळपास पाच ते सहा वाहने याखाली दबली गेल्याने मोठा आर्थिक नुकसान नागरिकांचा झाल आहे.. शहरातील जुन्या वाड्यांना महापालिकेकडून नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत मात्र पुन्हा एकदा या धोकादायक आणि जुन्या वाड्यांचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आलाय.
1
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 22, 2025 11:37:24Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2207ZT_CHP_NCP_SP_PROTEST
( single file sent on 2C)
टायटल:-- रमी प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्या, चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे केली निदर्शने
अँकर:-- विधिमंडळात बसून असलेल्या व रमी खेळणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय व संसदीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राज्यभर या प्रकरणावर टीकेची जोड उठत आहे. चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांप्रती संवेदनशील नसलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा आंदोलन कार्यकर्त्यांनी मागितला. हे सरकार शेतकरी हिताचे नसल्याची बाब आंदोलकांनी बोलून दाखविली.
बाईट १) बेबीताई उईके, शहर अध्यक्ष, रा. कॉ. शरद पवार गट
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
5
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 22, 2025 11:37:03Ratnagiri, Maharashtra:
अनिल परब अर्धवट वकील
योगेश कदम सभागृहात नसताना आरोप केले गेले, 35 ची नोटीस न देताच मंत्र्यावर आरोप हेच पहिल्यांदा चुकीचं- रामदास कदम
अनिल परब यांच्यावर हक्कभंग दाखल होणार-
योगेश कदम यांना राजकारणातून उध्वस्त करण्याचा पाप अनिल परब आणि उद्धव ठाकरे यांनी दापोलीत केले
अनिल परबानी मुख्यमंत्र्यांना भेटावस आणि जे काय आहे ते दाखवावे
हिम्मत असेल तर राजीनामा घेऊन दाखवच, रामदास कदम यांचं अनिल परब यांना आव्हान
आम्ही डान्सबार फोडणारे चालवणारे नाही - रामदास कदम
मंत्री झाल्यापासून योगेश कदमानी स्वतः डान्सबार बंद केलेत, म्हणून यांना हे सगळं खटकतंय -
आम्ही लोकांनाचे संसार उध्वस्त करणारे नाहीत संसार बसवणारे आहोत
कदम फॅमिला कसं बदनाम करता येईल, त्यांना कसं संपवता येईल याचा विडा उद्धव ठाकरेंनि उचलला आहे - ramdas kadam
4
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 22, 2025 11:10:05Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2207ZT_JALNA_BORDIKAR(10 FILES)
जालना : मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र योजनेचा शुभारंभ...
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम...
एका महिन्यात एक लाख आणि वर्षभरात आठ लाख मोतीबिंदू ऑपरेशन करण्याचं टारगेट आम्ही ठेवलं आहे; बोर्डीकर यांची प्रतिक्रिया...
लाडकी बहीण योजना फक्त गरजू लाडक्या बहिणींसाठी आहे; बोर्डीकर यांची प्रतिक्रिया...
अँकर : जालन्यात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र योजनेचा शुभारंभ करण्यात आलाय. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आहे. एका महिन्यात एक लाख आणि वर्षभरात आठ लाख मोतीबिंदू ऑपरेशन करण्याचं टारगेट आम्ही ठेवलं आहे अशी प्रतिक्रिया बोर्डीकर यांनी यावेळी दिली. दरम्यान, राज्यातील सुमारे 10 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज बाद झाले असून त्यांचा योजनेचा लाभ बंद झाला आहे. त्या विषयावर पण बोर्डीकर यांनी आपली प्रतिक्रिया देत लाडकी बहीण योजना फक्त गरजू लाडक्या बहिणींसाठी आहे असं म्हटलंय.
Byte मेघना बोर्डीकर, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
3
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 22, 2025 11:09:41Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- किरण काळे बलात्कार गुन्हा
फीड 2C
Anc:-
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे यांच्या विरोधात अहिल्यानगरच्या कोतवाली बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय..काळे यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. एकवीस वर्षीय विवाहित महिलेच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय..पीडित महिला आणि तिचा पती यांच्यात होणारे सततचे वाद मिटवण्यासाठी पीडिता ही किरण काळे यांच्या संपर्कात आल्यानंतर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय...पीडित महिलेला मदत करण्याचे आमिष दाखवून शिवसेना UBT शहर प्रमुख किरण काळे यांनी वारंवार बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आलाय. काळे यांना आज कोर्टात करण्यात येणार असून पोलीस कस्टडी मागण्यात येणार असल्याचं पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी सांगितला आहे
बाईट:- अमोल भारती, पोलीस उपाधीक्षक
Anc:-
अहिल्यानगरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किरण काळे यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर आरोप केले आहे. गेल्या आठ दिवसात किरण काळे यांनी चारशे कोटींचा घोटाळा बाहेर काढला, त्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यात अटक केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी संग्राम जगताप यांचे नाव घेत टीका केली आहे. तर याला आमदार संग्राम जगताप यांनी प्रत्युत्तर देत राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. नेमका काय घोटाळा झाला आहे हे संजय राऊत यांनी समजून घेतलं पाहिजे त्यांनी जे आरोप केले आहे त्याप्रकरणी आम्ही कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे संग्राम जगताप यांनी म्हटल आहे. तर गुन्हा खरा की खोटा हे पोलीस तपास करतील असं संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे.
बाईट:- संग्राम जगताप, आमदार राष्ट्रवादी AP
11
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 22, 2025 11:09:29Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2207ZT_WSM_MUNDAN_ANDOLAN
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील वाकद गावाला जोडणाऱ्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीची अनेक वेळा निवेदनातून रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज प्रशासनाच्या निषेधार्थ वाशिम जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर गावातील नागरिकांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मुंडन करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं.आठ वर्षांपूर्वी झालेल्या या रस्त्याची मागील काही वर्षात साधी डागडूजी करण्यात आली नसल्यामुळे या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली.
9
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 22, 2025 11:08:43Bhandara, Maharashtra:
नागपूर
संत बाबा ताजुद्दीन यांचा वार्षिक उर्स ताजबाद शरीफ येथे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट कार्यालयातून दरबारी शाही संदल काढण्यात आला आहे. हा संदल ताजबागच्या बुलंद द्वार येथून न निघाल्यानंतर उमरेड मार्गापासून अशोक चौक, इतवारी, गांधीबाग या मार्गाने काढण्यात आले आहे... या मार्गावर वाहतूक कोंडी सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांचं चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
BYTE - लोहित मतानी,
5
Report
PNPratap Naik1
FollowJul 22, 2025 11:01:20Kolhapur, Maharashtra:
Kop Ajit Powar
Feed :- 2C
Anc :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे... कोल्हापुरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा सप्ताह पाळला जात आहे. या सेवा सप्ताहाची सुरुवात आज करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाने करण्यात आली.. यावेळेस अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं साकडे देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंबाबाई चरणी घातल...
7
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 22, 2025 10:36:59Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2207_BHA_NANA_BYTE
FILE - 5 VIDEO
नाना पटोले ऑन उपराष्ट्रपतींचा अवमान
ANCHOR :- काल उपराष्ट्रपती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्या पदाची गरिमा सुद्धा बीजेपी ठेवू शकत नाही हे आपण सातत्याने पाहीलय. राष्ट्रपतींना बोलावलं गेलं नाही. ते प्रमुख असतात त्यांच्या आदेशाने हे सभागृह चालत पण त्याच्यातही त्यांच्या सहभाग नाही, आणि काल जे जेपी नड्डा भाजपचे मंत्री आहेत त्यांनी ज्या पद्धतीने उपराष्ट्रपती यांचा अवमान केला त्याच्यामुळे दुखी आणि कष्टी मनाने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बीजेपी हे संविधानिक व्यवस्थेला मानत नाही हे आता उघड झाले आहे........
बाईट :- नाना पटोले (१:०८)
...................
नाना पटोले ऑन जन सरक्षा कायदा
ANCHOR :- हे बिल सरकारच्या बहुमताच्या आधारावर मंजूर झाले असले तरी या बिलाला आजही आमचा विरोध आहे. परवा मी राज्यपाल महोदयांना भेटलो आणि सांगितलं की हे बिल आपण वापस पाठवा आणि पुन्हा याच्यावरती चर्चा झाली पाहिजे जवळपास 14 हजार लोकांनी याच्यावर ऑब्जेक्शन नोंदवला आहे. मग राज्यातील इतक्या लोकांनी याच्यावर ऑब्जेक्शन नोंदवल्यानंतर या बिलाची गरज नव्हती....... जन सुरक्षा कायदा हा जनतेच्या सुरक्षेसाठी नाही तर स्वतः सरकारच्या सुरक्षेसाठी आहे असं आमच मत आहे. आपल्या राज्यात केंद्राचे असो किंवा राज्याचे कायदे असो त्याला नक्षल मुव्हमेंटच्या विरोधात तयार केलेले कायदेच सक्षम आहेत पण हा जनसुरक्षा कायदा सरकारने जनतेच्या संरक्षणासाठी नाही तर स्वतःच्या आणि मूठभर उद्योगपती जे सरकारचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आणला आहे.
बाईट - नाना पटोले (१:३१)
....
....
....
नाना पटोले ऑन सुप्रीम कोर्ट स्टेटमेंट ऑन ईडी
ANCHOR :- सुप्रीम कोर्टाने सुद्धा तीच भूमिका मांडली आहे त्याच्यामुळे आमचे नेते राहुल गांधी यांनी सातत्याने ईडीला घाबरले नाही. देशाच्या एकात्मतेसाठी, संविधानासाठी, कल्याणासाठी गांधी परिवारचे आजही लढाई चाललेली आहे. सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने फटकारले त्यावरून हि वस्तुस्थिती आता जनतेच्या समोर आली आहे........... ((सुप्रीम कोर्टाने ईडीला फटकारले त्यावर नाना पटोले बोलत होते))
बाईट :- नाना पटोले (०:३४)
....................
*हे सरकार गँग ऑफ वासेपूर आहे*
ANCHOR :- हा जो त्यांच्या सरकार मधला गॅंगवार सुरू आहे तो सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे येथे आता चार-पाच नाव नाही तर सर्वांचाच हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे एकाच नाव घेण्यापेक्षा हे सरकारच जबाबदार आहे सर्व व्यवस्थेला आणि हे सरकार सर्व लोकांना समर्थन करत आहे त्यामुळे सरकार जबाबदार आहे. ही पूर्ण जणू वासेपुरची गॅंग आहे आणि महाराष्ट्राला लुटायसाठी हे एकत्रित आले आहेत त्यांना या जनतेशी घेणेदेणे नाही. मुंबईच्या रेल्वे मध्ये जो पासपोर्ट झाला होता तो फक्त मुंबईवर नव्हता या देशावर हल्ला होता. असे असताना गेले 19 वर्षे त्याला जेलमध्ये ठेवलं आणि काल कोर्टाने सांगितलं की याच्या विरोधात पुरावे नाहीत. सरकारकडून बाजूच मांडली गेली नाही. त्यामुळे या सगळ्या स्फोट प्रकरणी सगळे आरोपी निर्दोष सुटावे ही गंभीर बाब आहे. केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार असताना अशा या देशावर हल्ले करणाऱ्या आतंकवाद्यांना समर्थन करत करतायेत का? अशी भावना जनतेच्या मनात तयार झाली आहे.
बाईट - नाना पटोले ऑन महायुती सरकार(२:३०)
....................
*नाना पटोले ऑन कृषिमंत्री कोकाटे*
ANCHOR :- यांना जनाची आणि मनाची लाज नाही, मंत्र्यांनी मान्य केले पाहिजे तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. विधान परिषदेमध्ये रमी गेम खेळताना ते दिसत आहेत. सगळ्यांना तो कुठलाही एडिट केलेला व्हिडिओ नाही. या लोकांना शेतकऱ्याची काळजीच नाही. फक्त कृषिमंत्रीच नाही तर फडणवीस सरकारनेच राजीनामा देण्याची वेळ आली आहे कारण की ते शेतकरी विरोधी आहेत. शेवटच्या दिवशी एक कमिटी तयार करण्याचे निवेदन करतात. मोठ्या उद्योगपतींचे कर्जमाफ करतात तेव्हा कुठली कमिटी तयार बसवता तुम्ही?? जो शेतकरी पोशिंदा आहे आमच्या सर्वांचा बाप आहे त्याच्यासाठी हे लोक खोटे बोलतात आहेत. आणि म्हणून अशा नालायक सरकारला आता लोकांनीच एकजुटीने येऊन या सरकारला खुर्ची खाली ओढलं पाहिजे हे जनतेला आव्हान करतो.
बाईट - नाना पटोले (१:३०)
13
Report
MAMILIND ANDE
FollowJul 22, 2025 10:35:25Wardha, Maharashtra:
वर्धा ब्रेकिंग
SLUG - 2207_WARDHA_MOTI_WKT
- वर्ध्यात मोतीबिंदू विरहित शिबिराला नागरिकांची पाठ
- नागरिकांची गैरसोय झाल्याने परतले नागरिक घराच्या रस्त्याने
अँकर - वर्ध्याच्या सेवाग्राम येथे चरखाभवन येथे मोतीबिंदू विरहित शिबिरात नागरिकांची सकाळपासून गैरसोय होत असल्याने नागरिकांनी या कार्यक्रमाला पाठ दाखविली असून मंडपातून अर्ध्या पेक्षा नागरिकांची संख्या परतीच्या दिशेने घरी जात आहेय... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री,हे अजून पर्यंत पोहचले नाही.. मंत्री आले नसल्याने आम्ही सकाळी 9 वाजतापासून आले आहेय.. परंतु सोय केली नाही अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहेय..परत जाणाऱ्या नागरिकांसोबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी..
बाईट- wkt, मिलिंद आंडे
6
Report
PNPratap Naik1
FollowJul 22, 2025 10:35:15Kolhapur, Maharashtra:
Story :- Kop Benade Murder
Feed -2C
Anc - कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील रांगोळी ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे यांच्या खून प्रकरणात सीसीटीव्ही फुटेच्या आधारे पोलिसांनी तपासात गती घेतली आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांच्या अटकेत पाच आरोपी असून आणखीन तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. आज अखेर पोलिसांच्या अटकेत आठ आरोपी आले आहेत.. आणखी तीन आरोपीच्या शोधात पोलीस असल्याचे देखील कळतंय..लखन बेनाडे खून प्रकरणात पोलिसांनी कर्नाटकातील नद्यांमध्ये मृतदेहाची आणि खुना मध्ये वापरलेल्या शस्त्राची शोध मोहीम अद्याप सुरु ठेवली आहे.. दरम्यान बेनाडेला ज्या ठिकाणी मारले, त्याचा खून केला, त्या ठिकाणी आणखीन कोण कोण होते, त्यांना हत्यार कुणी पुरवली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
Byte- सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक राजारामपुरी पोलीस ठाणे
7
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 22, 2025 10:35:03Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरात कृषिमंत्री माणिकराव कोकाटें विरोधात प्रहार संघटना आक्रमक
- *सोलापुरात प्रहार संघटना कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात आक्रमक*
- *कृषी अधीक्षक कार्यालयात गळ्यात पत्त्याची माळ घालून पत्ते खेळत आंदोलन*
- *कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेवर शाई फेकत केले आंदोलन*
- नालायक कृषी मंत्री विधी मंडळात पत्ते खेळत बसतो
- इकडे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याबाबत कृषिमंत्री काहीही करत नसल्याचा आरोप
बाईट -
अजित कुलकर्णी ( शहराध्यक्ष, प्रहार संघटना )
9
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 22, 2025 10:31:15Akola, Maharashtra:
2 फाईल्स आहेत..AVB
Anchor : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात कामकाज सुरू त्यांना मोबाईलवर ' रमी ' खेळतानाच्या व्हिडिओ नंतर राजकीय चर्चांना उधाण आलाय..या नंतर आता विरोधकांकडून कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहेय..कृषिमंत्र्यांचा रमी खेळतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ याबाबत कुणी समर्थन करणार नसल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहेय.. तर कृषीमंत्र्यांनी खरंच मोबाईलवर रमी गेम खेळला असला तर ते स्वतःहून राजीनामा देतील असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं आहेय.. या व्हिडिओवर अमोल मिटकरी यांनी काही शंका सुद्धा उपस्थित केल्या आहेत.. हा व्हिडिओ पत्रकार गॅलरीतून पत्रकार किंवा एखाद्या पाहुण्याने हा व्हिडिओ काढला असल्याचा संशय सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहेय..ज्यांनी व्हायरल केला त्यांनाही दोष नाही मात्र विधानपरिषदेच्या गॅलरीमधुन zoom करून अशा प्रकारचे व्हिडिओ विरोधकांना कुणी दिले ? सोबतच चित्रीकरण नियमाच्या पायमल्ली चे काय ? हे प्रश्न अनुत्तरीत असल्याचा मिटकरी यांनी म्हंटलंय..
Byte : अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार
13
Report