Back
वाशिममध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धाड: १२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
GMGANESH MOHALE
Jul 25, 2025 11:00:53
Washim, Maharashtra
वाशिम:
File:2507ZT_WSM_GAME_PARLOR_POLICE_ACTION
अँकर : वाशिमच्या मंगरूळपीर शहरातील भगतसिंह चौक व मरीमाता मंदिर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या पथकाने काल रात्री टाकलेल्या धाडीत एकूण १२ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या कारवाईत १९ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा १८८७ मधील कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील मरीमाता मंदिराजवळील टिनशेडवर छापा टाकून ६ लाख ३० हजार ४०० रुपये, तर राजधानी गेस्ट हाऊसमधून ६ लाख १२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.धाडीत जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाईल फोन व इतर साहित्याचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित सर्व १९ जणांना अटक केली असून, मंगरूळपीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई SDPO नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पोलिसांच्या या तत्परतेमुळे शहरात पुन्हा एकदा अवैध जुगार अड्ड्यांवर वचक बसला आहे.
बाईट:नवदीप अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 26, 2025 06:49:54Beed, Maharashtra:
बीड: मंत्री पंकजा मुंडेंच्या दीर्घायुष्यासाठी 11 हजार अथर्वशीर्ष आवर्तन
Anc: नेत्यांचा वाढदिवस म्हटलं तर कार्यकर्त्यांकडून मोठी बॅनरबाजी आणि डामडौल हमखास पहायला मिळतो. मात्र बीड मध्ये मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या महिला पदाधिकारी संगीता धसे यांनी 11 हजार अथर्वशीर्ष अवर्तनाचा धार्मिक कार्यक्रम राबविला.. सकाळी 21 पुजाऱ्यांच्या हस्ते अथर्वशीर्षाला सुरुवात झाली.. सर्वेश्वर गणपती मंदिरात पंकजा मुंडेंच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून बीडवरील संकट दूर व्हावे. असे साकडे देखील घालण्यात आले.
0
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 26, 2025 06:48:46Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_KOYNA_DISCHARG
सातारा - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर पुन्हा वाढल्याने धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी 11 वाजल्यापासून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 4 फूट उघडून 16565 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.कोयना धरणाचा पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे. असा एकूण 18665 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
2
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 26, 2025 06:31:37Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn beaten update
संभाजीनगरच्या शिंदे कुटुंबीय मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल होऊन दोन दिवस उलटले , घटना होऊन 4 दिवस उलटले मात्र अजूनही पोलिसांना आरोपी सापडलेले नाही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे दोन पथक सुद्धा गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र आरोपी अजून पोलिसांना सापडले नाहीयेत या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली होती तिच्या गुप्तांगावर सुद्धा मारहाण करण्यात आली होती, इतकं सगळं असूनही संभाजीनगर पोलीस मात्र हातावर हात ठेवून बसले आहेत का अशा पद्धतीच्या चर्चा आता सुरू झालेले आहेत या संदर्भात आता अंबादास दानवे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे पोलिसांनी याबाबत गंभीर गुन्हे दाखल न केल्यास पोलिसांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे
Byte अंबादास दानवे , विरोधी पक्ष नेते
कालचा डीसीपी byte पण वापरा
1
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 26, 2025 06:30:55Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवत कंत्राटी पद्धतीने भरती केल्याचा आरोप माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी केला आहे, आणि या संदर्भात धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांना भेटून यासंदर्भातील निवेदन दिले आहे. धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी अंपळकर यांना या संदर्भात चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले असल्याचे अंपळकर यांनी स्पष्ट केले आहे. धुळे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात आली, यामध्ये 43 वर्षांच्या आतील महिला कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने भरती करावे असे आदेश असताना, 43 वर्षांच्या पुढील वय असलेल्या महिलेची भरती या प्रक्रिया दरम्यान करण्यात आली असल्याचा दावा माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी केला असून, या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश धुळे महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत.
byte - कल्याणी अंपळलकर, माजी उपमहापौर
प्रशांत परदेशी, धुळे.
3
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 26, 2025 06:22:21Dhule, Maharashtra:
ANCHOR - साक्री शहराच्या विकासासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र झाले असून, साक्री नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या उषाबाई अनिल पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी नगराध्यक्षा जयश्री पवार यांची या बिनविरोध निवड सोहळ्याला असलेली अनुपस्थीती सर्वाना खटकली. अध्यक्षपदाचा राजीनामा जयश्री पवार यांनी दिल्यानंतर नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी नगरपंचायतीच्या सभागृहात सभा झाली. भाजपाच्या नगरसेविका उषा पवार यांची नगराध्यपदी बिनविरोध निवड झाली. भाजपाच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार उषा पवार यांना भाजपसह शिवसेना शिंदे गटाचे ५ नगरसेवक आणि काँग्रेसच्या एका नगरसेविकेने पाठींबा दिला आहे. बिनविरो निवड झाल्याचे जाहीर होताच. भाजप कार्यकर्त्यांसह नवनिर्वाचीत नगराध्यक्षा उषा पवार यांच्या समर्थकांनी ढोल, ताशे वाजवून जल्लोष केला. साक्री शहराचा विकास करण्यासाठी विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आले हे सुखद चित्र असून कमी कालावधीतही साक्री शहरात जास्तीत जास्त विकास करु असे आश्वासन नगराध्यक्षा उषा पवार यांनी दिले आहे.
प्रशांत परदेशी, धुळे.
6
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 26, 2025 06:21:12Dhule, Maharashtra:
ANCHOR - मंत्री पदाची साडेसाती जाण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनी देवाची शरण घेतली आहे. राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यां दौऱ्यात कोकाटे देशातील एकमेव शनि देवाचे साडेसाती मुक्त स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनिमांडळ येथील शनी मंदिरात पूजेसाठी पोहचले. याठिकाणी त्यांनी विधिवात पूजा करीत शनिदेवाची आर्टि केली. कोकाटे यांनी दर्शन घेऊन पूजा अर्चा करत संकट दूर कारण्याचं साकळ घातल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेली विरोधकांच्या आरोपांच्या साडेसाती पासून मुक्ती मिळावी म्हणून मंत्री कोकाटे दर्शन घेतले, असंही बोललं जाताय. शनी मंदिरात जाऊन शनि देवाची विधिवत पूजा करत विरोधकांच्या साडेसातीतून मुक्ती मिळावी म्हणून साडेसाती मुक्ती ठिकाणाला भेट देत कोकाटे यांनी पक्ष विस्ताराच्या दौऱ्यात शनड देवाची पूजा करीत साडेसाती घालवण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
4
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 26, 2025 06:17:18Niphad, Maharashtra:
अँकर :- चांदवड मार्गे निफाड येथे कोंबड्यांचे खाद्य घेऊन जाणारा ट्रक निफाड तालुक्यातील खानगाव नजीक येथे रात्री साडेदहाच्या सुमारास वळणावर पलटी झाल्याची घटना घडली आहे हा ट्रक पलटी होत दुकानाच्या शेटरला जाऊन धडकला मात्र रात्रीची वेळ असल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही पण यात दोन दुकानाचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे
8
Report
APAMOL PEDNEKAR
FollowJul 26, 2025 06:17:02Mumbai, Maharashtra:
संजय राऊत
*ऑन अजित पवार*
* या सरकारमध्ये न्यायालय सुद्धा त्यांचीच आणि चौकशी समिती सुद्धा त्यांची त्याच्यामुळे कोणाला क्लीन चीट दिलेली आहे मिळणार आहे हे आधीच ठरलेले असते त्याविषयी न बोललेलं बरं
* धनंजय मुंडे यांना क्लीन चीट देण्याचा काम कोण करत आहे मला माहित नाही सरकार कोणाचं ज्या प्रकरणात त्यांना जावं लागलं तो विषय गंभीर आहे घाई घाईने एखाद्या मंत्र्याला परत मंत्रिमंडळात घेणे अद्याप खटल्याचा संपूर्ण निकाल लागायचा आहे बीडचा देशमुख प्रकरणात एवढी घाई का झाली आहे अजित पवार यांना
* माणिकराव कोकाटे यांना पदावरून काढायला तयार नाहीत रमी खेळत आहेत कृषी मंत्री याला काढायचं त्याला घ्यायचं त्याला काढायचं संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करून ते री शफल करणं गरजेचं आहे देवेंद्र फडणवीस जय भ्रष्ट मंत्री आहेत जे भ्रष्टाचाराचे संबंधित त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले जे मंत्री लेडीज बार चालवतात डान्सबार चालवतात असे मध्ये आपल्या कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत आणि आपण नैतिकतेच्या गप्पा मारत मुंबईपासून दिल्लीपर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरत आहात ही अत्यंत गंभीर गोष्ट
* महाराष्ट्रामध्ये अमित साळुंखे यांचा विषय सुमित फॅसिलिटी मी वारंवार सांगत आहे इतर सुद्धा लोक बोलत आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने कानाचे पडदे साफ केले पाहिजे विरोधी पक्ष बोलत आहे ते गांभीर्याने घ्या नाहीतर एक दिवस झारखंडचे पोलीस येथील आणि एखाद्या मंत्र्याला किंवा खासदाराला अटक करून घेऊन जातील इतका गंभीर प्रकरण आहे
* सुमित फॅसिलिटी हा विषय वाटतो तेवढा सोपा नाही महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार ही कंपनी काय आहे कोणाची आहे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन उपमुख्यमंत्री यांचे बाळराजे त्यांचे एक मेडिकल फाउंडेशन चालवत आहेत फार मोठी सामाजिक सेवा वगैरे करत आहेत या मेडिकल फाउंडेशन मधून झो पैसा आहे तो भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे कारण हा अमित साळुंखे यांच्या सुमित फॅसिलिटी ला मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम गैर मार्गाने शिंदे पिता पुत्रांनी केलं
* मध्य घोटाळा समोर आला त्या व्यक्तीला अटक केली त्यानंतर 800 कोटीचा टेंडर ॲम्बुलन्स 108 क्रमांकाचे त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला सगळ्यांनी तेव्हा सांगितलं आता हळूहळू या सुमित फॅसिलिटीला शेंदे पिता पुत्रांनी कशी मदत केली टेंडर साठी कॉन्टॅक्ट साठी नव्या कंपनींना कल्याण डोंबिवली मधून घनकचरा कॉन्ट्रॅक्ट नियमबाह्य पद्धतीने घाई घाईने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पुत्रान यात सुमित फॅसिलिटीला दिलं साडेआठशे कोटी रुपयांचा हे सगळे 800 कोटी रुपयांचा वर हे नाव जरी सुमित फॅसिलिटी अमित साळुंखे जरी असल्या तरी याच्यामध्ये नक्की कोण आहे कंपनी मूळची कोणाची आणि एवढी धडाधड कॉन्ट्रॅक्ट कशाप्रकारे मिळत गेली कल्याण डोंबिवली पुणे दारू घोटाळा हे सगळे सूत्रधार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत आणि हा सगळा मध्य घोटाळ्याचा पैसा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन मध्ये येते आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य हे ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालतं
* ही अत्यंत गंभीर गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना हे कळत नसेल तर त्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्राचे आपण मुख्यमंत्री आहोत हे विसरून जायला पाहिजे बाकी इतरांना ते ज्ञान शिकवतात नैतिकतेवर संस्कार सुसंस्कृतपणा स्वच्छ कारभार सहन करणार नाही पाहून घेऊन मग घ्या पाहून
* हजारो कोटीचे घोटाळे या सुमित फॅसिलिटी च्या माध्यमातून शिंदे पिता पुत्र यांनी केले म्हणून त्यांची सध्या धावा धाव चालू आहे कल्याण डोंबिवली मधील महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन साडेआठशे कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट आणि त्यातून मिळालेले लाभ हे कोणाच्या खात्यात गेले कोणाकडे गेले ब्लॅक अँड व्हाईट त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी निष्पक्ष पद्धतीने एसआयटी स्थापन करायला पाहिजे त्यांना एसआयटी स्थापन करण्याचा छंद आहे ते एसआयटी पुढे काय होतं आम्हाला माहित नाही पण इथे एक एसआयटी स्थापन करायची त्याला काळ मर्यादा मग ॲम्बुलन्स घोटाळा असेल 800 कोटीचा त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनाचे काम असेल साडेआठशे कोटीच्या टेंडर सुमित फॅसिलिटी ला मिळालेला आहे हा दारू घोटाळा पुण्यापर्यंत पोहोचला आहे झारखंडचा आणि त्या व्यक्तीला अटक झाली आणि अटक झाल्यावर हे प्रकरण आता इडी कडे जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे त्याची सुतळा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत टेंभी नाकापर्यंत जाईल याची मला खात्री आहे म्हणून सावध रहा
*ऑन देवेंद्र फडणवीस दिल्ली दौरा*
* देवेंद्र फडणवीस यांचा सरकार हे कॅरेक्टरलेस सरकार आहे चारित्रहीन सरकार आहे हा शब्द वापरायला महाराष्ट्राच्या बाबतीत आमची जीभ झाझावत नाही आणि याला जबाबदार स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब
* त्यांचा मधल्या काळात वाढदिवस झाला त्यांचा गुणांचा गौरव करणाऱ्या संविन निघाल्या त्यात शरद पवार यांच्यापासून माननीय उद्धव ठाकरे यांच्या पासून अनेकांनी त्यांच्यावर फुल उधळली त्या फुलांचा जर वास सुकला नसेल तर त्यांनी आपण चारित्रवान आहोत आणि मी चारित्र्यवान सरकार चालवत आहे त्यासाठी त्यांनी काम करावे लागेल
* त्यांचे कॅबिनेट मंत्री डान्स बार चालू आहे छम छम छम छम ते डान्सबार आमच्या आर आर पाटील यांनी बंद केले होते तुम्ही नाही आर आर पाटील यांनी बंद केले होते लेडीज बार डान्स बार ही संस्कृती आर आर पाटील यांनी बंद केले होते ते तुमच्या गृहराज्यमंत्री यांनी परत आणली स्वतः गृहराज्यमंत्री चालवत आहेत देवेंद्रजी एक त्यांच्या मंत्री सिगरेटच्या धूर सोडत खाटेवर बसला आहे चड्डीवर आणि पैशाच्या उघड्या बॅगा ठेवल्या आहेत ते दाखवत आहे आम्ही किती पैसे लुटमार केले दुसरा मंत्री टॉवेलवर मारामारी करतो तर तिसरा मंत्री रमी खेळत आहे हे तुमच्या मंत्री मंडळाचे कॅरेक्टर याच्यावर जरा अभ्यास करा तुमच्यावर जी स्मरणिका लिहिली आहे त्याच्यावरचे लेख वाचा फुल उधळलेली आहेत ती प्लास्टिकची आहेत का खरी आहेत ते पहा हे समजून घ्या आणि स्वराज्य चालवा सरकार चालवा राजाला एक उत्तम आणि आदर्श सरकार जे तुमच्या लेखात लिहिले आहे अनेकांनी त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करा
*ऑन राजीनामे आणि खाते बदल*
* फडणवीस यांच्या मंत्री मंडळातले 75 टक्के मंत्री हे युजलेस आहेत ते मंत्री म्हणून काम करत नसून ते दरोडेखोर म्हणून काम करत आहेत 75 टक्के मंत्री युजलेस आहेत त्यांना मंत्रिमंडळाचे आणि आपल्या कामाचं भान नाही लुटमार करण्यासाठी त्यांना शपथ दिली आहे
* फडणवीस यांच्याकडे या मंत्र्यांच्या काय रिपोर्ट आहे विरोधी पक्ष जेव्हा सांगतो तेव्हा ते दुर्लक्ष करत आहेत ते कोणाला घाबरत आहेत का? त्यांचे काही सिक्रेट पवार आणि शिंदे यांच्यात आहे का काय आहे आम्हाला कळलं पाहिजे या महाराष्ट्राला त्यांचे काही सिक्रेट किंवा तुमच्या जवळच्या लोकांचे सिक्रेट लोकांकडे आहेत का हे पाहणे गरजेचे आहे नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा चारित्र्यवाण माणूस हे सगळं सहन करतो याची कार्यक्षमतेवरती शरद पवार आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी तारीफ ते तारीफ केली आहे असा माणूस हे सगळं सहन करतो आपल्या मंत्रिमंडळात हे मला धकाधक वाटत आहे
*ऑन मंत्रिमंडळ लेटर युद्ध*
* हे सर्व संकेत आहेत संजय शिरसाठ यांना गाशा गुंडाळावा लागणार हे सांगते
* मुख्यमंत्री यांच्या सूचना शिवाय माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाहीत मला माधुरी मिसळ माहित आहे पुण्यातील अनेक वर्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते आमदार आहेत नगरसेविका पण होत्या मुख्यमंत्री यांच्या सूचने शिवाय त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं वाटत नाही संजय शिरसाठ यांना गाशा गुंडाळावा लागणार असेही चिन्ह आहेत
*ऑन मराठी चित्रपट*
* मराठी सिनेमांना जे शो आहेत नियम आहेत त्याचे पालन होत नाही आणि हिंदी सिनेमा हा मराठी सिनेमांच्या बोकांडी बसतो मराठी निर्माते सुद्धा गुंतवणूक करतात मराठी कलाकार सुद्धा त्या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत करतात तंत्रज्ञ असतील बॅकस्टेज आर्टिस्ट दिग्दर्शक कलाकार या सगळ्यांचे मेहनत तुम्हाला अशा तऱ्हेने खाली उतरता येणार नाही सरकार जर मराठीच्या बाबतीत खरोखर प्रेमी असेल तर त्यांनी अशा प्रकारचे कृत्य होऊ देऊ नये हा विषय एका चित्रपटाचा नाही संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीचा दादासाहेब फाळके या मराठी माणसाने सेनेसृष्टी या देशांमध्ये उभे केले त्यांच्या महाराष्ट्रात मराठी सिनेमांची दादागिरी चालत नाही हिंदी सिनेमांची दादागिरी चालते हे गंभीर गोष्ट आहे
*ऑन फोन टॅपिंग हिंदी*
* फोन टॅपिंग मामला हा महाराष्ट्रात नवीन नाही हे जे सरकार बनली आहे ते फोन टॅपिंग ने बनली आहे जेव्हा आमच्या सरकारने याबाबत एसआयटी स्थापना केली होती
* महाराष्ट्राचे डीजी मोठमोठे अधिकारी त्याच्यात समाविष्ट होते पण त्यांची चौकशी फडणवीस यांनी थांबवली
10
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 26, 2025 06:03:06Beed, Maharashtra:
बीड : एनसीसी कॅडेट्सचा पथनाट्यातून पर्यावरण रक्षणाचा जागर
Anc : बीडच्या बलभीम महाविद्यालयात एनसीसी गर्ल्स युनिटच्या वतीने पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी रॅली आणि पथनाट्य सादर करण्यात आले. 'विकसित भारत' उपक्रमाअंतर्गत आयोजित या कार्यक्रमात प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट करत झाडे लावा, पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यात आला. प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे, ही या पथनाट्याची मुख्य भावना होती. परिसरात जनजागृती घडवणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
6
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 26, 2025 06:00:32Beed, Maharashtra:
बीड : श्रावणात श्रृंगेरी देवीच्या गडावर निसर्गाने पांगरला हिरवा शालू..!
Anc : श्रावण महिन्याच्या आगमनानंतर आष्टी तालुक्यात सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे निसर्गानेही हिरवळ पांघरली आहे. प्रति महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बालाघाट आणि त्यातील श्रृंगेरी देवीच्या गडावर धुक्याची नजाकत त्यातच हिरव्या डोंगरांची मोहकता पाहता पाहता डोळ्यांचे पारणे फिटते आहे. डोंगररांगा धुक्याने व्यापलेल्या, निसर्ग मनमोहक सौंदर्याने नटलेले हे नयनरम्य क्षण भर पावसात पर्यटकांना खुणवताना दिसत आहेत.
9
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 26, 2025 06:00:19Dhule, Maharashtra:
Anchor - कृषी मंत्री तथा पालकमंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आहेत. गेल्या दोन दिवसापासून ते खान्देश दौऱ्यावर असून, टिकेचा भडीमार होतं असतांना ते पक्ष विस्ताराच्या कार्यक्रमाणा उपस्थितीत नोंदवात आहेत. नंदुरबारचा पालकमंत्री असल्याने नंदुरबार मध्ये शेतकरी मेळावा आपण आल्याचं कोकाटे यांनी स्पष्ट केले असून, अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त सप्ताह असल्याने कार्यक्रम मी जाणीवपूर्वक आलो आहे, असे संगत आपण मुंबई सविस्तर बोलू असं सूचक विधान कोकाटे यांनी केले आहे. हे सर्व कार्यक्रम आटोपून मी मुंबईला जाईल आणि सविस्तर चर्चा करेल असं कोकाटे यांनी सांगत अजित पवार यांचा कानमंत्र अमलात आणत जास्त बोलणे टाळले आहे.
byte - माणिकराव कोकाटे, कृषी मंत्री
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
8
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 26, 2025 05:50:45Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2607ZT_CHP_RAIN_DAY_TWO
( single file sent on 2C)
टायटल :--- चंद्रपूरमध्ये पावसाचा रेड अलर्ट, 50 टक्के वार्षिक सरासरी ओलांडली, नदी-ओढे दुथडी भरून वाहतायत, चंद्रपूरकरांना हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा
अँकर :--- चंद्रपूर जिल्ह्यात पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. कालपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला असून आतापर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या ५० टक्के पावसाची नोंद झाली आहे. शहरातील तसेच ग्रामीण भागांतील नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. सध्या पुरजन्य परिस्थिती नसली तरी हवामान विभागाने संततधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील २४ तासांत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, आज सकाळपासून अनेक नागरिकांनी रेनकोट, छत्रीचा वापर करतच घराबाहेर पडत आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 26, 2025 05:50:32Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_RIVER_FLOOD चार फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
संततधार पावसाने चांदुर बाजार तालुक्यातील मेघा नदीला पूर; नदीकाठील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
अँकर :– अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून संतधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या पावसाने शेतकरी सुखावला आहे. तर काही शेतकऱ्यांना हा पाऊस सुखद असला तरी काही शेतकऱ्यांची पिक पाण्याखाली गेली आहे. अशातच चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा येथून वाहणाऱ्या मेघा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतीय भागात मागील 24 तासांपासून जोरदार पावसाची बॅटिंग सुरू असल्याने मेघा नदीला पूर आला आहे. सध्या मेघा नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठील गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी सुखावला आहे.
12
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 26, 2025 05:48:50Akola, Maharashtra:
5 फाईल्स आहेत..AVB
Anchor : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील गट ग्रामपंचायत मौजे चोहगाव येथील 15 वित्त आयोगात खरेदी केलेल्या वस्तूसाठी ग्रामसेवकांनी स्वतःच्या दुकानाचे बिल लावून बोगस खरेदी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी तक्रारीतून केलाय.. यामध्ये स्ट्रीट लाईट खरेदी 1 लाख 5 हजार रुपये, डस्टबिन खरेदी 2 लाख 98 हजार 992 आणि इतर बोगस साहित्य 10 लाख 60 हजार अशी साहित्यांची खरेदी करण्यात आलीय.. मात्र यामधील कोणतेही साहित्य गावात आणले नाही. यासर्व गैर कारभाराची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवक व इतर कर्मचारी यांच्यावर योग्य कारवाही करावी अशी मागणी गट ग्रामपंचायत चोहगाव, सायखेड येथील समस्त गावकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे, येणाऱ्या काळात याबाबत कोणतीही ठोस निर्णय न झाल्यास समस्त गावकरी हे पंचायत समिती बार्शीटाकळी येथे आमरण उपोषण करतील असा इशारा देण्यात आला आहे.
Byte : अक्षय राठोड, ग्रामस्थ
12
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 26, 2025 05:48:21Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - चांदोली धरण क्षेत्रात पुन्हा अतिवृष्टी, धरण 80 टक्के भरले,10 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग,वारणा नदी काठी सतर्कतेचा इशारा..
अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढलाय.गेल्या दोन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू झाली आहे.गेल्या 24 तासात 38 मिलिमीटर इतके पावसाची नोंद झाली आहे,त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाली असून धरणातुन वारणा नदीत 10 हजार 260 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. संततधार पडणारया पाउसामुळे चांदोली
धरण 80 टक्के भरले आहे,34.40 टीएमसी साठवण क्षमता असणारया धरणात आता 28.77 टीएमसी इतका पाणीसाठा झालाय. धरण क्षेत्रात पाण्याची होणारी आवक लक्षात घेता धरणातुन सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग आणखी वाढविण्यात आल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे, त्यामुळे वारणा नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे,असा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
14
Report