Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Mumbai City400003
संजय राऊत: फडणवीस सरकारचा भ्रष्टाचार उघड!
APAMOL PEDNEKAR
Jul 26, 2025 06:17:02
Mumbai, Maharashtra
संजय राऊत *ऑन अजित पवार* * या सरकारमध्ये न्यायालय सुद्धा त्यांचीच आणि चौकशी समिती सुद्धा त्यांची त्याच्यामुळे कोणाला क्लीन चीट दिलेली आहे मिळणार आहे हे आधीच ठरलेले असते त्याविषयी न बोललेलं बरं * धनंजय मुंडे यांना क्लीन चीट देण्याचा काम कोण करत आहे मला माहित नाही सरकार कोणाचं ज्या प्रकरणात त्यांना जावं लागलं तो विषय गंभीर आहे घाई घाईने एखाद्या मंत्र्याला परत मंत्रिमंडळात घेणे अद्याप खटल्याचा संपूर्ण निकाल लागायचा आहे बीडचा देशमुख प्रकरणात एवढी घाई का झाली आहे अजित पवार यांना * माणिकराव कोकाटे यांना पदावरून काढायला तयार नाहीत रमी खेळत आहेत कृषी मंत्री याला काढायचं त्याला घ्यायचं त्याला काढायचं संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करून ते री शफल करणं गरजेचं आहे देवेंद्र फडणवीस जय भ्रष्ट मंत्री आहेत जे भ्रष्टाचाराचे संबंधित त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले जे मंत्री लेडीज बार चालवतात डान्सबार चालवतात असे मध्ये आपल्या कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत आणि आपण नैतिकतेच्या गप्पा मारत मुंबईपासून दिल्लीपर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरत आहात ही अत्यंत गंभीर गोष्ट * महाराष्ट्रामध्ये अमित साळुंखे यांचा विषय सुमित फॅसिलिटी मी वारंवार सांगत आहे इतर सुद्धा लोक बोलत आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने कानाचे पडदे साफ केले पाहिजे विरोधी पक्ष बोलत आहे ते गांभीर्याने घ्या नाहीतर एक दिवस झारखंडचे पोलीस येथील आणि एखाद्या मंत्र्याला किंवा खासदाराला अटक करून घेऊन जातील इतका गंभीर प्रकरण आहे * सुमित फॅसिलिटी हा विषय वाटतो तेवढा सोपा नाही महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार ही कंपनी काय आहे कोणाची आहे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन उपमुख्यमंत्री यांचे बाळराजे त्यांचे एक मेडिकल फाउंडेशन चालवत आहेत फार मोठी सामाजिक सेवा वगैरे करत आहेत या मेडिकल फाउंडेशन मधून झो पैसा आहे तो भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे कारण हा अमित साळुंखे यांच्या सुमित फॅसिलिटी ला मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम गैर मार्गाने शिंदे पिता पुत्रांनी केलं * मध्य घोटाळा समोर आला त्या व्यक्तीला अटक केली त्यानंतर 800 कोटीचा टेंडर ॲम्बुलन्स 108 क्रमांकाचे त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला सगळ्यांनी तेव्हा सांगितलं आता हळूहळू या सुमित फॅसिलिटीला शेंदे पिता पुत्रांनी कशी मदत केली टेंडर साठी कॉन्टॅक्ट साठी नव्या कंपनींना कल्याण डोंबिवली मधून घनकचरा कॉन्ट्रॅक्ट नियमबाह्य पद्धतीने घाई घाईने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पुत्रान यात सुमित फॅसिलिटीला दिलं साडेआठशे कोटी रुपयांचा हे सगळे 800 कोटी रुपयांचा वर हे नाव जरी सुमित फॅसिलिटी अमित साळुंखे जरी असल्या तरी याच्यामध्ये नक्की कोण आहे कंपनी मूळची कोणाची आणि एवढी धडाधड कॉन्ट्रॅक्ट कशाप्रकारे मिळत गेली कल्याण डोंबिवली पुणे दारू घोटाळा हे सगळे सूत्रधार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत आणि हा सगळा मध्य घोटाळ्याचा पैसा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन मध्ये येते आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य हे ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालतं * ही अत्यंत गंभीर गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना हे कळत नसेल तर त्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्राचे आपण मुख्यमंत्री आहोत हे विसरून जायला पाहिजे बाकी इतरांना ते ज्ञान शिकवतात नैतिकतेवर संस्कार सुसंस्कृतपणा स्वच्छ कारभार सहन करणार नाही पाहून घेऊन मग घ्या पाहून * हजारो कोटीचे घोटाळे या सुमित फॅसिलिटी च्या माध्यमातून शिंदे पिता पुत्र यांनी केले म्हणून त्यांची सध्या धावा धाव चालू आहे कल्याण डोंबिवली मधील महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन साडेआठशे कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट आणि त्यातून मिळालेले लाभ हे कोणाच्या खात्यात गेले कोणाकडे गेले ब्लॅक अँड व्हाईट त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी निष्पक्ष पद्धतीने एसआयटी स्थापन करायला पाहिजे त्यांना एसआयटी स्थापन करण्याचा छंद आहे ते एसआयटी पुढे काय होतं आम्हाला माहित नाही पण इथे एक एसआयटी स्थापन करायची त्याला काळ मर्यादा मग ॲम्बुलन्स घोटाळा असेल 800 कोटीचा त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनाचे काम असेल साडेआठशे कोटीच्या टेंडर सुमित फॅसिलिटी ला मिळालेला आहे हा दारू घोटाळा पुण्यापर्यंत पोहोचला आहे झारखंडचा आणि त्या व्यक्तीला अटक झाली आणि अटक झाल्यावर हे प्रकरण आता इडी कडे जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे त्याची सुतळा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत टेंभी नाकापर्यंत जाईल याची मला खात्री आहे म्हणून सावध रहा *ऑन देवेंद्र फडणवीस दिल्ली दौरा* * देवेंद्र फडणवीस यांचा सरकार हे कॅरेक्टरलेस सरकार आहे चारित्रहीन सरकार आहे हा शब्द वापरायला महाराष्ट्राच्या बाबतीत आमची जीभ झाझावत नाही आणि याला जबाबदार स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब * त्यांचा मधल्या काळात वाढदिवस झाला त्यांचा गुणांचा गौरव करणाऱ्या संविन निघाल्या त्यात शरद पवार यांच्यापासून माननीय उद्धव ठाकरे यांच्या पासून अनेकांनी त्यांच्यावर फुल उधळली त्या फुलांचा जर वास सुकला नसेल तर त्यांनी आपण चारित्रवान आहोत आणि मी चारित्र्यवान सरकार चालवत आहे त्यासाठी त्यांनी काम करावे लागेल * त्यांचे कॅबिनेट मंत्री डान्स बार चालू आहे छम छम छम छम ते डान्सबार आमच्या आर आर पाटील यांनी बंद केले होते तुम्ही नाही आर आर पाटील यांनी बंद केले होते लेडीज बार डान्स बार ही संस्कृती आर आर पाटील यांनी बंद केले होते ते तुमच्या गृहराज्यमंत्री यांनी परत आणली स्वतः गृहराज्यमंत्री चालवत आहेत देवेंद्रजी एक त्यांच्या मंत्री सिगरेटच्या धूर सोडत खाटेवर बसला आहे चड्डीवर आणि पैशाच्या उघड्या बॅगा ठेवल्या आहेत ते दाखवत आहे आम्ही किती पैसे लुटमार केले दुसरा मंत्री टॉवेलवर मारामारी करतो तर तिसरा मंत्री रमी खेळत आहे हे तुमच्या मंत्री मंडळाचे कॅरेक्टर याच्यावर जरा अभ्यास करा तुमच्यावर जी स्मरणिका लिहिली आहे त्याच्यावरचे लेख वाचा फुल उधळलेली आहेत ती प्लास्टिकची आहेत का खरी आहेत ते पहा हे समजून घ्या आणि स्वराज्य चालवा सरकार चालवा राजाला एक उत्तम आणि आदर्श सरकार जे तुमच्या लेखात लिहिले आहे अनेकांनी त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करा *ऑन राजीनामे आणि खाते बदल* * फडणवीस यांच्या मंत्री मंडळातले 75 टक्के मंत्री हे युजलेस आहेत ते मंत्री म्हणून काम करत नसून ते दरोडेखोर म्हणून काम करत आहेत 75 टक्के मंत्री युजलेस आहेत त्यांना मंत्रिमंडळाचे आणि आपल्या कामाचं भान नाही लुटमार करण्यासाठी त्यांना शपथ दिली आहे * फडणवीस यांच्याकडे या मंत्र्यांच्या काय रिपोर्ट आहे विरोधी पक्ष जेव्हा सांगतो तेव्हा ते दुर्लक्ष करत आहेत ते कोणाला घाबरत आहेत का? त्यांचे काही सिक्रेट पवार आणि शिंदे यांच्यात आहे का काय आहे आम्हाला कळलं पाहिजे या महाराष्ट्राला त्यांचे काही सिक्रेट किंवा तुमच्या जवळच्या लोकांचे सिक्रेट लोकांकडे आहेत का हे पाहणे गरजेचे आहे नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा चारित्र्यवाण माणूस हे सगळं सहन करतो याची कार्यक्षमतेवरती शरद पवार आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी तारीफ ते तारीफ केली आहे असा माणूस हे सगळं सहन करतो आपल्या मंत्रिमंडळात हे मला धकाधक वाटत आहे *ऑन मंत्रिमंडळ लेटर युद्ध* * हे सर्व संकेत आहेत संजय शिरसाठ यांना गाशा गुंडाळावा लागणार हे सांगते * मुख्यमंत्री यांच्या सूचना शिवाय माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाहीत मला माधुरी मिसळ माहित आहे पुण्यातील अनेक वर्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते आमदार आहेत नगरसेविका पण होत्या मुख्यमंत्री यांच्या सूचने शिवाय त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं वाटत नाही संजय शिरसाठ यांना गाशा गुंडाळावा लागणार असेही चिन्ह आहेत *ऑन मराठी चित्रपट* * मराठी सिनेमांना जे शो आहेत नियम आहेत त्याचे पालन होत नाही आणि हिंदी सिनेमा हा मराठी सिनेमांच्या बोकांडी बसतो मराठी निर्माते सुद्धा गुंतवणूक करतात मराठी कलाकार सुद्धा त्या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत करतात तंत्रज्ञ असतील बॅकस्टेज आर्टिस्ट दिग्दर्शक कलाकार या सगळ्यांचे मेहनत तुम्हाला अशा तऱ्हेने खाली उतरता येणार नाही सरकार जर मराठीच्या बाबतीत खरोखर प्रेमी असेल तर त्यांनी अशा प्रकारचे कृत्य होऊ देऊ नये हा विषय एका चित्रपटाचा नाही संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीचा दादासाहेब फाळके या मराठी माणसाने सेनेसृष्टी या देशांमध्ये उभे केले त्यांच्या महाराष्ट्रात मराठी सिनेमांची दादागिरी चालत नाही हिंदी सिनेमांची दादागिरी चालते हे गंभीर गोष्ट आहे *ऑन फोन टॅपिंग हिंदी* * फोन टॅपिंग मामला हा महाराष्ट्रात नवीन नाही हे जे सरकार बनली आहे ते फोन टॅपिंग ने बनली आहे जेव्हा आमच्या सरकारने याबाबत एसआयटी स्थापना केली होती * महाराष्ट्राचे डीजी मोठमोठे अधिकारी त्याच्यात समाविष्ट होते पण त्यांची चौकशी फडणवीस यांनी थांबवली
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UPUmesh Parab
Jul 26, 2025 15:02:44
Oros, Maharashtra:
अँकर ---- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून वंचित समाजाच्या लोकांच्या अडीअडचणी दूर जाणून घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असंख्य वंचित समाज बांधवांनी या जनता दरबारात हजेरी लावत आपल्या समस्या मांडल्या. मंत्री नितेश राणे यांनी त्या समस्या जाणून घेत त्याचे निवारण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील पहिला वंचित समाजाचा मेळावा भरवून सिंधुदुर्ग जिल्ह्याने आदर्श राज्यासमोर ठेवला असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. Byte --- पालकमंत्री --- नितेश राणे
0
Report
JMJAVED MULANI
Jul 26, 2025 15:00:18
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG BARAMATIFORAM FILE 5 BYTE 1 एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या वतीने बारामतीत दोन दिवस ‘हॅपी स्ट्रीटस बारामती’ चे आयोजन,,,,,,,,, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा अजित पवार ANCHOR:- नागरिकांनी मोकळ्या हवेत, मोबाईलपासून दूर राहत खेळ, संगीत, कला आणि पर्यावरणाच्या माध्यमातून वेगळा आनंद अनुभवावा, या उद्देशाने एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने दोन दिवस ‘हॅपी स्ट्रीट बारामती’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेय. याचे उद्घाटन खासदार सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थित करण्यात आले. शनिवारी संध्याकाळी चार ते रात्री दहा, रविवारी सकाळी सहा ते दहा या वेळेत विद्या कॉर्नरनजिक जळोची कॉर्नर ते गदिमा पर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा हॅपी स्ट्रीट उपक्रम आयोजित केला आहे दोन्हीही दिवसांचा हा उपक्रम नागरिकांना विनामूल्य अनुभवता येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा आर्ट, म्युझिक, नेचर अँड सफारी, गेम्स, हेल्थ अँड फिटनेस आणि पर्यावरण असे विविध झोन तयार करण्यात आला आहे. आर्ट झोनमध्ये मेंदी, टॅटू, फेस पेंटिंग, पोर्ट्रेट, कॅरिकेचर, कॅलिग्राफी, वारली पेंटिंग यांचा समावेश आहे. सफारी झोनमध्ये नक्षत्र उद्यान परिसरात घोडेस्वारी, उंट सफारी, बैलगाडीतून फेरफटका मारता येईल,. हेल्थ अँड फिटनेस झोनमध्ये योगा, मल्लखांब व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात येत आहेत गेम झोनमध्ये पारंपरिक व आधुनिक खेळांचा संगम असलेले विविध खेळ मोफत खेळता येणार आहेत. यात सापशिडी, लगोरी, लुडो, गोट्या, कॅरम, बुध्दीबळ, बलून शूट, बास्केटबॉल, आर्चरी यांचा समावेश आहे.
0
Report
AAASHISH AMBADE
Jul 26, 2025 14:48:00
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2607ZT_CHP_RAIN_CONTINUE ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार, जिल्ह्यातील आठ पैकी चार मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले, चिमूर आणि नागभीड या दोन तालुक्यात घरे ढासळण्याच्या घटना, पुढील 24 तासातही चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची शक्यता अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची सततधार सुरूच आहे.  जिल्ह्यातील आठ पैकी चार मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, इरई या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सततच्या पावसाने चिमूर आणि नागभीड या दोन तालुक्यात घरे ढासळल्याच्या घटना झाल्या आहेत. पुढील 24 तासातही चंद्रपूर जिल्ह्यात हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. अतिवृष्टीमुळे बंद झालेल्या जिल्हयांतर्गत रस्त्यांची संख्या  15  झाली आहे. सध्या परीस्थिती सामान्य आहे. आकस्मिक स्थितीवर नियंत्रण ठेवण्याकरीता सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेले आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
4
Report
UPUmesh Parab
Jul 26, 2025 14:17:54
Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग -- पालकमंत्री नितेश राणे पत्रकार परिषद मुद्दे ऑन रत्नागिरी जिल्हा स्थानिक स्वराज्य निवडणुका -- स्वबळावर लढावं म्हणून कार्यकर्त्यांचा दबाव वाढत चालला आहे. कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या मतांचा आदर केलाच पाहिजे. रत्नागिरी मध्ये आमचा एकही विधानसभा जिल्हा परिषदचा लोकप्रतिनिधी नाही. सावंतवाडी जिल्हाप्रमुखांनी तर आपली 60 टक्के ताकद असल्याचे जाहीर केलेय त्यामुळे आमची ताकद आजमावयाची संधी मिळाली पाहिजे. लोकसभेच्या वेळी रत्नागिरीमध्ये तिन्ही मतदार संघात आमची पिछेहाट होती शिंदे गटाची मते आम्हाला मिळाली नाही. दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे मैत्री पूर्ण लढू ऑन लाडकी बहीण योजना --- अशा चुका कोणी केल्या असतील तर आमच्या अदिती तटकरे ताई त्या चुका सुधारतील. On कोकण रेल्वे रोरो सेवा --- केंद्राकडे बाजू मांडून ती गाडी आपल्या कोकणात कशी थांबेल यासाठी प्रयत्न करू मार्ग काढू ऑन संजय राऊत मंत्री टीका --- सर्किफिकेट देणाऱ्या माणसाच चारित्र्य काय आहे. खिचडी चोरीत भ्रष्टाचार केल्या प्रकरणी तो आणि त्याच कुटुंब आरोपी आहे. भांडुपच्या ४२० नी घरात बसून हवेत गोळीबार करू नये ऑन राहुल गांधी --- कोणाचा तमाशा झालाय हे भारताच्या जनतेला माहीत आहे. सर्वात लोकप्रिय पंतप्रधान म्हणून मोदी साहेब उच्चांक गाठत आहेत तर दुसऱ्या बाजूला सर्वात जास्त निवडणुका हरण्यात राहुल गांधी उच्चांक गाठत आहे. कोणी कोणावर टिपणी करावी ह्याला मर्यादा राहिल्या पाहिजेत. वैभव नाईक / विनायक राऊत गटबाजी -- निष्ठावान विरुद्ध ब्लॅकमेलर असा सध्या सुरू आहे. उपरकर आणि वैभव नाईक हे बंटी बबली आहेत. पक्षप्रमुखांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला जायला वेळ नसेल नाईक निवेदन देत बसले होते. विनायक राऊत यांच्या पराभवात वैभव नाईक यांची भूमिका काय होती ते राऊत ना समजलं असेल . अजून कपडे फाडणं बाकी आहे. वैभव नाईक यांनी उबाठा ही नाईक प्राइवेट लिमिटेड कंपनी केली आहे. ऑन कार्यकर्ते धमकी --- कार्यकर्त्यांना धमकावून महायुती टिकेल का ?? उबाठा पक्षाला टार्गेट कराव.. शिवसेनेचे कार्यकर्ते आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत मात्र आम्हाला वातावरण बिघडवायचं नाही ऑन उदय सामंत ( संख्याबळ ) --- ते एवढे ताकतीचे लोक असतील तर आम्ही काय गोटया खेळत आहोत का ?? एवढे मातब्बर असतील तर त्यांनी एकट लढाव..आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि कोण आलं तर सोडत नाही byte --- नितेश राणे, पालकमंत्री सिंधुदुर्ग feed on desk
9
Report
PPPRAFULLA PAWAR
Jul 26, 2025 14:17:49
Raigad, Maharashtra:
स्लग - अलिबाग जवळ समुद्रात मच्छीमार बोट बुडाली ...... पाच खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा ...... उर्वरित तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरू ....... 5 खलाशांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू ......... मासेमारीवरील बंदी उठण्यापूर्वीच बोटी समुद्रात ......... अँकर - अलिबागजवळ खांदेरी किल्ल्याजवळ एक मच्छीमार बोट बुडाली असून त्यावरील 5 खलाशांनी पोहत समुद्र किनारा गाठला आहे. त्या पाचही जणांना अलीबागच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत . बोटीवर एकूण आठ खलाशी होते. उर्वरित तीन खलाशांचा शोध सुरू आहे. आज सकाळी 7 वाजता करंजा येथील मच्छीमार बोट समुद्रात मासेमारी साठी निघाली. सकाळी आठ वाजता खांदेरी किल्ल्याजवळ आली असता ही बोट लाटांच्या जोरदार माऱ्याने बुडाली. बोटीवरील 5 खलाशांनी खवळलेल्या समुद्रात तब्बल 9 तास पोहून ते दिघोडी किनाऱ्यावर लागले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात आणले. मासेमारीवरील बंदी उठायला आणखी आठवडा बाकी असतानाच मच्छीमार बोटी समुद्रात गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
10
Report
GDGAJANAN DESHMUKH
Jul 26, 2025 14:16:02
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी जिल्ह्यात आज सकाळ पासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून यामुळे सखल भागात पाणी साचलय, अनेक दिवसापासून शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. आज झालेल्या या पावसामुळे पिकांना पोटभर पाणी मिळणार असून जिल्ह्यातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पिंगळी लिमला रोडवरील ओढ्याला पूर आल्याने नागरिकांचा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून प्रवास सुरु आहे. पुलाच्या पलीकडे महामंडळची बस सुद्धा अडकून पडलीय. तर सेलू तालुक्यातील वालूर मोरेगाव मार्गावरील साळेगाव परिसरातील खडकी आणि हातनूर येथील भट्टी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग दोन तासापासून वाहतुकीसाठी बंद पडलाय... बाईट- नागरिक
8
Report
MNMAYUR NIKAM
Jul 26, 2025 14:15:20
Buldhana, Maharashtra:
बुलढाणा ब्रेकींग .. महिला पुरात वाहून जाताना युवकांनी वाचविले .. लोणार तालुक्यातील सावरगाव तेली येथील घटना .. शेतातून घरी परतत असताना घडली घटना .. पावसामुळे सावरगाव तेली नदीला आला पूर .. यशोदा चव्हाण महिलेचे नाव .
8
Report
AAASHISH AMBADE
Jul 26, 2025 14:01:53
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2607ZT_CHP_TALAV_BREAKK ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या शिरपूर गावात शिरले तलावाच्या सांडव्याचे पाणी,  चिमूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शिरपूर गावाजवळ असलेला तलाव झाला ओव्हर फ्लो   अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या सिरपूर गावात तलावाच्या सांडव्याचे पाणी शिरले आहे.  चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे.  सततच्या पावसामुळे शिरपूर गावाजवळ असलेला तलाव ओव्हर फ्लो झाला. तलावाच्या सांडव्याचे पाणी गावात शिरल्याने घरांना फटका बसलाय.सध्या महसूल प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. प्रभावित गावकऱ्यांना आणि त्यांचं सामान सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
11
Report
PPPRASHANT PARDESHI
Jul 26, 2025 13:32:16
Dhule, Maharashtra:
ANCHOR - मुंबई आग्रा महामार्गावर धुळ्याच्या शिरपूर नजीक असलेल्या पळासनेर जवळ ट्रॉला आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. स्पीड ब्रेकर जवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे मोठा ट्रॉला थेट सफरचंदाने भरलेल्या ट्रकवर आदळल्याने हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शिरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची तीव्रता CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघातांनंतर सर्वत्र पळापळ झाली. अपघाताच्या आवाजाने कणखल्या बसल्या होत्या. मालवाहतूक वहाणामाचा हा अपघात झालायने मोठी जीवित हानी टाळली. यां मार्गांवर अनेक सुरक्षा उपाय करणे गरजेचे आहे. प्रशांत परदेशी, धुळे.
13
Report
AKAMAR KANE
Jul 26, 2025 13:16:41
kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ जोडला आहे --=---- नागपूर साउंड बाईट - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री. नागपुरात 300 स्टेडियम खेळासाठी उभारायचे माझी खूप इच्छा आहे...पण मागील चार वर्षांच्य जीवनातील अनुभवातून एवढं लक्षात आलंय की, सरकार म्हणजे निक्कमी यंत्रणा आहे... (सरकार बहुत निकम्मी चीज होती है)... अशा शब्दात गडकरी यांनी सरकारी यंत्रणेवर टीका केली...एनआयटी, महापालिका, किंवा इतर शासकीय यंत्रणांवर कामाचा पद्धतीवर बोलताना यांच्याकडे चालती गाडी पंचर करायचा अनुभव आहे...असा खरमरीत टोला गडकरींनी प्रशासकीय यंत्रणेचा कामावर लगावला... - सुरेश भट सभागृहात आयोजित खेळावर आधारित करिअर या विषयावर व्याख्यानावर नितीन गडकरी बोलत होते...
14
Report
GMGANESH MOHALE
Jul 26, 2025 13:16:25
Washim, Maharashtra:
वाशिम : File:2607ZT_WSM_ADANA_DAM_GATES_OPENED रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर: वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या सांतधार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठ प्रकल्प असलेल्या अडाण धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.सध्या धरण 64 टक्के भरलं असून पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे 3 दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले असून, यातून 29.91 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काल धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले होते. आता तिसरा दरवाजा उघडण्यात आल्यानं अडाण नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
11
Report
KJKunal Jamdade
Jul 26, 2025 12:46:47
Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash Big Breaking संत युवराज पुन्हा बरळले... गुन्हा दाखल झाल्यानंतरही हिंदू सेनेचे संत युवराज वक्तव्यावर ठाम... साई बाबांविषयीच्या वक्तव्यावर ठाम असल्याचा व्हिडिओ केला व्हायरल... मी केवळ साई मूर्ती गटारात फेकण्याचे विधाना मागे घेतोय.. ज्यांना पूजा करायची त्यांनी घरात आणि शिर्डीच्या साई मंदिरात जाऊन करावी... सनातन हिंदू मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटवणारच... ब्राम्हण सभा, बजरंग दल, शिवसेना, करणी सेना, सनातन धर्म सभा आपल्यासोबत असल्याचा दावा...
14
Report
DPdnyaneshwar patange
Jul 26, 2025 12:35:37
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव DHARA_R3_CRIME शंभर रुपयांच्या बॉण्डवर दत्तक करार करत दहा हजार रुपयाला मुलाची विक्री ? धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथील धक्कादायक घटना, सोलापुरातील दांपत्याला मुलाची विक्री केल्याचा आरोप चिमुकल्या मुलाची आई , तिच्या मामी यांनी चाळीसगाव इथ आपल्या नातवाची विक्री केल्याचा आजीचा गंभीर आरोप , गुन्हे दाखल करण्याची मागणी चिमुकल्या मुलाच्या आईच चाळीस गावातील व्यक्तीसोबत दुसरे लग्न , पहिल्या पतीचे निधन झाले असून दुसरे लग्न करायचे आहे त्यामुळे पहिल्या पतीपासून झालेलं मूल दत्तक देत असल्याचा दत्तक करारात उल्लेख चिमुकल्या मुलाची आई आणि सावत्र वडिल यांनी दत्तक करार करत मुलाची विक्री केल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप सुनेने नातवंडाला न दिल्याने मुलाच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचाही आजीचा आरोप सून आणि नातू घरातून गायब झाले असल्याची मिसिंग तक्रार आजीने यापूर्वीच धाराशिवच्या मुरूम पोलिसात दिली होती, त्यानंतर सुनेचा दुसरा लग्न आणि नातवाला विक्री केल्याचं समजल आजीने सांगितलं सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने चिमुकल्या मुलाला ताब्यात घेत बालकल्याण समितीसमोर हजर केल , धाराशिव येथील सरकारी रुग्णालयात चिमुकल्या मुलावर उपचार सुरू दत्तक करार करत ज्यांना मुलाची विक्री केली त्या ठिकाणी मूल जुलाब आणि तापीने फणफणलेल्या अवस्थेत आढळल्याची सामाजिक कार्यकर्त्यांची माहिती मुलगा दत्तकप्रक्रिया बेकायदेशीरपणे झाली असल्याचा बालकल्याण समितीचा प्राथमिक निष्कर्ष, गुन्हा नोंद करण्याच्या सूचना बालकल्याण समितीने धाराशिव येथील सह्याद्री अंकुर शिशुगृहात बाळाला दाखल करण्याच्या सूचना दिल्या मात्र गालफुगी ताप आणि जुलाब असल्याने सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची शिशुग्रह चालक डॉक्टर दापके यांची माहिती चिमुकल्या मुलावर धाराशिव येथे उपचार सुरू, सामाजिक कार्यकर्ते आणि मुलाला दत्तक घेणाऱ्या महिलेमध्ये धाराशिवच्या सरकारी रुग्णालयासमोर शाब्दिक बाचाबाची Byt: लता तळभंडारे , चिमुकल्याची आजी Byt: सत्यभामा सौंदरमल, सामाजिक कार्यकर्त्या Byt: डॉ. दिग्गज दापके, सह्याद्री अंकुर शिशुग्रह - *लहान मुलाचा व्हिडीओ ब्लर करावा*
12
Report
PNPratap Naik1
Jul 26, 2025 12:18:13
Kolhapur, Maharashtra:
Kolhapur Breaking आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केलेल्या पोलीस कॉन्स्टेबल कडून 30 हजार रुपयांची खंडणी उकळण्या प्रकरणी दोन पोलिसांवर गुन्हा दाखल. पोलीस अधीक्षक कार्यालयातील हेड क्लार्क आणि शहर वाहतूक शाखेतील महिला पोलीस कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल. हेड क्लार्क संतोष मारुती पानकर याला शाहूपुरी पोलिसांनी केली अटक. तर महिला पोलीस कर्मचारी धनश्री जगताप हिच्यावर गुन्हा दाखल दोन पोलिसांवरच खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस दलात खळबळ.
14
Report
GDGAJANAN DESHMUKH
Jul 26, 2025 12:16:19
Parbhani, Maharashtra:
हिंगोली अँकर - हिंगोली जिल्ह्यात सकाळ पासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे, त्यामुळे ओढे नदी नाले खळखळून वाहत आहेत, या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील भंडारी गावाजवळ असलेल्या ओढ्याला पूर आल्याने वाहतूक बंद पडलीय, या रस्त्यावरून सायंकाळच्या सुमारास सेनगाव हिंगोली या शहरात कामानिमित्त गेलेल्या अनेक नागरिकांना गावाकडे जाता येत नाहीये. तर शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी आणि त्यांची बस अडकून पडलीय... सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी ताटकळलेत. परिणामी काही गावांचा संपर्क तुटलाय...
14
Report
Advertisement
Back to top