Back
हैदराबाद गजट के बाद कुणबी प्रमाणपत्र का नया फॉर्मूला सामने
VKVISHAL KAROLE
Sept 10, 2025 03:20:59
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn reservation issue av
हैदराबाद गॅझेट काढल्यानंतर कुणबी प्रमाणपत्र नक्की कसे देणार याबाबत चर्चा सुरू होती याबाबत आता राज्य सरकारने मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत कार्यपद्धती निश्चित केलेली आहे त्यानुसार आता तातडीने काम सुरू करा असा राज्य सरकारने संबंधित यंत्रणांना सांगितला आहे याबाबत स्थापन केलेली तीन सदस्यांची कमिटी स्थानिक चौकशी अहवाल सुद्धा दाखल करणारे त्याचा प्रोफार्मा सुद्धा सरकारने जाहीर केलेला आहे ...
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची कार्यपद्धती...हैद्राबाद गॅजेट अनुसार...
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक 02.09.2025 अन्वये पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांना सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात आलेली आहे.
समिती सदस्य
- 1. ग्राम महसूल अधिकारी
2. ग्रामपंचायत अधिकारी
3. सहाय्य कृषी अधिकारी
1. शासन निर्णय दिनांक 02/09/2025 अन्वये नागरीक कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी खालील कागदपत्रासह तहसिल कार्यालयातील शासन निर्णय दिनांक 25/01/2024 अन्वये गठीत केलेल्या तालुकास्तरी समितीकडे अर्ज सादर करतील.
1...अर्जदार हा मराठा समाजातील भुधारक, भूमीहिन, शेतमजुर किंवा बटईने शेती करत असलेल्या जमीनीची मालकी असल्याचा पुरावा सादर करेल.
2... वरील अ प्रमाणे पुराव नसल्यास त्यांनी 13 ऑक्टोबर, 1967 पूर्वी त्यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करेल.
3..अर्जदाराच्या गावातील/कुळातील नातेसंबधातिल व्यक्तींना कुणती जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व अर्जदार यांनी, त्यांचे नातेसबंधातील / कुळातील असुन कुणबो असल्याचे संबधीत नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र सादर करेल.
4...अर्जदाराकडे अर्जाच्या पृष्ठत असणारे इतर पुरावे सादर करु शकतील.
* असा अर्ज तालुकास्तरीय समितीकडे प्राप्त झाल्यानंतर तालुका स्तरीय समिती अर्जदार यांचे अर्जाची छाननी करील व शासन निर्णय दिनांक 02/09/2025 अन्वये गावपातळीवर गठीत समितीस चौकशीसाठी पाठविल.
* गाव पातळीवर गठीत स्थानिक समिती अर्जदार यांची गावातील वयस्कर जेष्ठ, पोलिस पाटील अशा नागरीकासमक्ष चौकशी करुन अहवाल तालुकास्तरीय समितीकडे सादर करील.
** तालुकास्तरीय समिती, गाव पातळीवर गठीत समितीने सादर केलेल्या चौकशी अहवालाचे अवलोकन करुन सदर अर्जावर शिफारस करील व त्यानुसार अर्जदाराच्या अर्जावर विहित कार्यपध्दतीने सक्षम प्राधिकारी यांच्या मार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात यईल.
15
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowSept 10, 2025 08:02:03kolhapur, Maharashtra:
Ngp Ravishankar Byte
live u ने फीड पाठवले
--------
नागपूर
बाईट-- अध्यात्म गुरु
* श्री श्री रविशंकर,
*नेपाल में हिंसा मैं कोई अंतरराष्ट्रीय षड्यंत्र भी हो सकता है, युवाओं में फ्रस्ट्रेशन बढ़ता गया.. यह एक बात... जब भी कोई उसमे असामाजिक तत्व घूस जाते है..
नागपुर पहुंचने पर श्री श्री रविशंकर ने नागपुर एयरपोर्ट पर मीडिया से बातचीत करते हुए कहा कि
किसान आत्महत्या कर रहे हैं, यह बहुत दर्द की बात है की किसान आत्महत्या कर रहे हैं, उनका आत्म बल छीड होता जा रहा है यही कारण है, कैसे-कैसे मुसीबत से हम निकले हैं ऐसी हरकतें कभी हुई नहीं है , मगर यहां विदर्भ में एक पैटर्न बन गया,
कुछ साल पहले 370 गांव में हमने पदयात्रा की , हमने उनको समझाया, 10 साल के बाद दोबारा करनी पड़ेगी, किसानों को, ठेकेदारो और व्यापारी है उनको आत्म बल की जरूरत है, आध्यात्म की जरूरत है ,इसलिए आध्यात्म के तीन दिन का शिबीर यहां चल रहा है, साथ ही साथ सोमनाथ जी को भी हम लेकर आए हैं, 1000 साल पहले जो हमारा ज्योतिर्लिंग ध्वस्त हुआ था, उसकी पिंड जो है, दक्षिण भारत के जो ले गए थे, अब इस पिंड को लेकर हम यहां हैं, जनता ही उसका दर्शन करें, अध्यात्म के मार्ग पर चले, ईश्वर पर विश्वास रखें, आत्महत्या जैसे नौबत की कोई जगह नहीं है,
on नेपाल
नेपाल पर बोलते हुए श्री श्री रविशंकर ने कहा कि नेपाल में बहुत से मेरे भक्त हैं, लगातार उनके संपर्क में हूं ,युवाओं में फ्रस्ट्रेशन बढ़ता चला गया ,युवाओं को कोई प्रवेश नहीं दे रहे थे, जब भी कोई आंदोलन हो जाता है असामाजिक तत्व उसमे घुस जाते हैं, इसमे कोई अंतरराष्ट्रीय षड्यंत्र भी हो सकता है,
उप राष्ट्रपति को बहुत-बहुत बधाई देता हूं,
संघ के 100 साल हो रहे हैं ,संघ का मुख्य स्थान है ये ,यह मैं बहुत ज्यादा हर्षित हूं, आज मोहन भागवत का जन्मदिन भी है, उनको बधाई दे रहा हूं,
श्री श्री रविशंकर से जब यह पूछा गया कि मोहन भागवत ने कहा है कि ना वह रिटायर हो रहे हैं ना उन्होंने किसी को रिटायर होने की बात कही है इस पर उन्होंने हाथ जोड़कर आगे बढ़ गये,
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 10, 2025 08:01:54Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn divisonal commissioner byte
Feed by tvu
हैदराबाद गॅजेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी सरकारची चांगलीच लगबग सुरू आहे यात आता पुढील दोन दिवसात तलाठी, ग्रामसेवक , सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यासाठी खास प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल अशी माहिती विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिली आहे.. सोबतच लोकांनी कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करावे कारण ही प्रक्रिया अर्जानूरूप चालते असेही त्यांनी सांगितले.. 17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिवशी प्रमाणपत्र पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्याचं धोरण सरकारनं ठरवलंय मात्र लोकांनी अर्ज केल्यावरच ही प्रक्रिया सुलभ होईल त्यामुळे लोकांनी तहसीलदाराकडे अर्ज करावे असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे..
Byte जितेंद्र पापळकर, विभागीय आयुक्त मराठवाडा
0
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 10, 2025 08:01:47Nashik, Maharashtra:
nsk_godsebyte
feed by live u 51
anchor आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक मध्ये सी पी आर आय लॅबच भूमिपूजन होत आहे या लॅब साठी माजी खासदार हेमंत गोडसे यांनी जागा मिळवून देत लॅब मंजूर केली होती मात्र त्यांना साधे निमंत्रणही नसल्यामुळे त्यांनी छगन भुजबळ हे खोटे श्रेय घेत असल्याचे आरोप केले आहेत त्यांचा निषेध व्यक्त करत भुजबळ यांनी विकास कामे करताना कसा स्वार्थ साधून घेतला याबाबतचे पुरावे दिले.
byte हेमंत गोडसे माजी खासदार
0
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 10, 2025 08:01:37Nashik, Maharashtra:
nsk_godseonthakre
feed by 2C
anchor *ऑन ठाकरे बंधू भेट*
- याबाबत महायुतीच्या नेत्यांनी सांगितले आहे
- दोन्ही भाऊ एकत्र आले तर संपूर्ण महाराष्ट्राला आनंद आहे
- काम कोण करत आहे नागरिकांना माहिती
- येणाऱ्या निवडणूकीत लोकं विचारपूर्वक मतदान करतील
- राज्यस्तरीय प्रशासकीय काम अडतात तेव्हा काम समजून पर्याय काढणे महत्वाचे आहे
- काम करणारे लोक आहेत त्यांना निवडून
- प्रत्येक पक्षश्रेष्ठीची क्वालिटी वेगळी असते
- आम्ही काम घेऊन गेलो तर शिंदे साहेब यांचे काम कौतुकास्पद आहे
- जनतेला वेळ देतात आणि तातडीने सोडविता
- ते मार्ग काढून देतात
- प्रत्येक क्षेत्रात विकासाची स्पर्धा आहे
- संघटन कौशल्य मध्ये खूप फरक आहे
- नेतृत्व करणारा माणूस काम करणारा असेल तर लोक सोबत राहतात
0
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 10, 2025 07:34:52Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
4 FILES
SLUG NAME -SAT_NAIKAVADI
सातारा - साताऱ्यात 10 सप्टेंबर 1944 रोजी क्रांतिकारी डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी सातारा जिल्हा कारागृह फोडले होते या दिवसाला आज 81 वर्ष पूर्ण झाली असून क्रांतिकारी डॉ नागनाथ अण्णा हे प्रती सरकारच्या चळवळीमध्ये पुन्हा सहभागी झाले होते. या स्मृती पित्यर्थ आज सातारा जिल्हा कारागृहाच्या समोर असणाऱ्या स्मृती स्तंभाला स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयां कडून पुष्पांजली वाहण्यात आली. यावेळी कारागृह पोलिस अधीक्षक शामकांत शेडगे याबरोबर ज्येष्ठ नागरिक,स्वातंत्र्यसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आताच्या नवीन पिढीला त्या काळात स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले देशासाठीचे योगदान स्मरणात राहावे यासाठी हा दिवस दरवर्षी साताऱ्यामध्ये साजरा केला जातो.
बाईट:वैभव नायकवडी (नागनाथ आण्णा नायकवडी याचे चिरंजीव)
0
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 10, 2025 07:34:41Nashik, Maharashtra:
Nashik break
- *नाशिक मध्ये महायुतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर*
- इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब उदघाटन सोहळ्यापूर्वी वाद विकोपाला
- *शिंदे सेनेचे नेते माजी खासदार हेमंत गोडसे आणि मंत्री छगन भुजबळ आमने सामने*
- भुजबळ आणि गोडसे यांच्यात टेस्टिंग लॅब हून श्रेयवाद उफाळला
- भुजबळांकडून वर्तमान पत्रात जाहिराती देऊन भुजबळांचा पाठपुरावा असा उल्लेख तर हेमंत गोडसे यांच्या फलकावर हेमंत गोडसे यांचा पाठपुरावा असा उल्लेख
0
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 10, 2025 07:34:32Raigad, Maharashtra:
स्लग - रायगड जिल्ह्यात साखर चौथीच्या गणेशोत्सवाची धूम ....... जिल्ह्यात ९१८ ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना .......
अँकर - अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता झाली असतानाच रायगड जिल्ह्यात आजपासून साखर चौथीच्या गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे. अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या पहिल्या संकष्टी चतुर्थीला या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. दीड दिवसांच्या मुक्कामासाठी आज ९१८ ठिकाणी बाप्पांचे आगमन झालं. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उत्तर रायगडात मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होतो. अलीकडे दक्षिण रायगड मध्ये देखील याचं लोण पोहोचलं आहे. याला गौरा गणपती असेही म्हटले जाते.
0
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 10, 2025 07:32:09Manmad, Maharashtra:
अँकर-महाराष्ट्र शासनाने विधान सभेत जनसुरक्षा कायदा संमत केला मात्र त्याला अनेक राजकीय पक्षांनी विरोध केला असून,या कायद्यामुळे लोकशाही चा आवाज बंद करण्याचा प्रयत्न असल्याने हा कायदा रद्द करावा यासाठी मनमाड येथे तलाठी कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटातर्फे निदर्शने करत घोषणाबाजी करण्यात येऊन आंदोलन करण्यात आले
0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 10, 2025 07:31:24Latur, Maharashtra:
लातूर PKG....
( यात महत्वाचे डॉक्युमेंट असाइनमेंट नंबर वर टाकला आहे यामध्ये पंकजा मुंडे यांचा बाईट आणि व्हिज्युअल्स वापरावे. )
AC ::- लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील पणगेश्वर साखर कारखान्याच्या विक्रीच्या निर्णयावरून शेतकरी आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गोपीनाथ मुंडेंनी तारलं… पण पंकजा मुंडेंनी साखर कारखाना विक्री करून आम्हाला फसवलं" अशी भावना आता व्यक्त केली जात आहे. VO 01 ::- पानगाव आणि पाथरवाडी येथील शेतकऱ्यांनी आपल्या 120 एकर जमीन पणगेश्वर साखर कारखान्यासाठी दिली. दिवंगत गोपीनाथ मुंडें यांच्या शब्दावर, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतला गेला. या कारखान्याची जबाबदारी प्रज्ञाताई गोपीनाथ मुंडे या चेअरमन म्हणून सांभाळत होत्या. सुरुवातीला कारखाना चालूही झाला… मात्र आता कोणतीही पूर्वसूचना न देता कारखाना विक्रीचा निर्णय घेण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पानगावसह आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी या कारखान्यासाठी दिल्या होत्या. लोकनेत्याच्या स्वप्नासाठी आम्ही जमिनी दिल्या, मात्र त्या स्वप्नाचा शेवट विक्रीने झाला. आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि कारखाना विकला गेला. मंत्री पंकजा मुंडे यांनी आमचा विश्वास घात केलाय अशी भावना कर्मचारी आणि शेतकऱ्याने बोलून दाखवली आहे.... बाईट ::- शेतकरी बाईट ::- शेतकरी VO 02 ::- पन्नगेश्वर साखर कारखाना तेवीस वर्षांनंतर दिवाळखोरीत गेला आणि त्याची विक्री झाली. विमल अॅग्रो कंपनीने विकत घेतलेल्या या कारखान्याच्या हंगामावेळी हा प्रकार उघड झाला. यामुळे शेतकरी व कर्मचाऱ्यांची देणी कोण फेडणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. हा कारखाना काही काळ यशस्वीरित्या सुरु होता. मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर कारखान्याच्या व्यवस्थापनावर परिणाम झाला आणि तो हळूहळू मोडकळीस आला. पंकजा मुंडेंनी कारखाना पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न केले, पण आर्थिक तोट्यामुळे किंवा व्यवस्थापन अडचणीमुळे तो यशस्वी झाला नाही. अखेर, मंत्री असतानाच त्यांनी हा कारखाना विक्री केला.या घटनेवर शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत मंत्री असताना पंकजा मुंडेना कारखाना विकावा लागतो, हे दुर्दैव नाही का? आमच्या जमिनी दिल्या, पण आमच्याच परवानगीशिवाय हा निर्णय घेतला गेला. असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत... बाईट ::- शेतकरी बाईट ::- शेतकरी VO 03 ::- हा प्रकल्प केवळ एक उद्योग नव्हता, तर शेकडो कुटुंबांच्या आर्थिक भविष्याशी जोडलेला होता. कारखान्यामुळे रोजगार, स्थानिक विकास आणि ऊस उत्पादकांसाठी एक स्थिर बाजार निर्माण झाला होता. त्यामुळे या विक्रीमुळे अनेकांची जीवनशैली आणि अर्थव्यवस्था डगमगली आहे. या प्रकरणात पंकजा मुंडेंनी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही शेतकरी करत आहेत. तसेच, जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला किंवा पर्यायी मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. ............
वैभव बालकुंदे
ZEE 24 तास लातूर...
0
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 10, 2025 07:30:32Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_ObsceneMessege
Feed on - 2C
-- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- --
Anchor - बदली केल्याच्या रागातून जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याने रात्री 2 वाजता महिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या मोबाईलवर आणि विभाग प्रमुखांच्या व्हाट्सअप ग्रुपवर अश्लील आणि धमकी देणारा मेसेज पाठवला. रात्री 2 वाजता हा प्रताप करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबीत करण्यात आले आहे. आनंद सावंत असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. आनंद सावंत हा नांदेड जिल्हा परिषदेत कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याची बदली दुसऱ्या विभागात करण्यात आली. दुसऱ्या विभागात बदली केल्याच्या रागातून रात्री 2 वाजता सावंत याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप मेसेज पाठवला. राजकीय भाष्य करून असभ्य आणि अश्लील भाषेत धमकीचा मेसेज केला. विभाग प्रमुखांच्या ग्रुपवरही सावंत याने मेसेज केला. याची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आनंद सावंत याचे निलंबन केले. एका अधिकाऱ्याने चक्क रात्री 2 वाजता महिला मुख्याधिकाऱ्यांना अश्लील भाषेत धमकीचा मेसेज पाठवल्याने नांदेडमध्ये खळबळ उडालीये.
-- -- -- -- -- -- -- -- -- --
0
Report
KJKunal Jamdade
FollowSept 10, 2025 07:16:23Shirdi, Maharashtra:
Rahuri News Flash
big Breaking
नगर मनमाड महामार्गावर रस्त्याच्या कामासाठी नागरिक आक्रमक...
रस्ता कृती समितीच्या वतीनं सुरू आहे रास्ता रोको आंदोलन...
*रास्ता रोको आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांमध्ये काहीसा गोंधळ...*
*आंदोलनादरम्यान आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांचे वाहन अडविले...*
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचं शासकीय वाहन आंदोलकांनी अडवले...
बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी जिल्हाधिकारी यांचे वाहन दुसऱ्या मार्गाने वळविले...
अहिल्यानगरहून शिर्डीकडे निघाले होते जिल्हाधिकारी....
0
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 10, 2025 07:01:28Nashik, Maharashtra:
nsk_teacherscam
feed by 2C
अँकर - मालेगाव शिक्षक घोटाळा प्रकरणात मध्यरात्री धडाकेबाज कारवाई झाली आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षकांचा समावेश आहे. यापूर्वी शिक्षण संस्था चालकासह तिघांना अटक करण्यात आली होती. आता या अधिकाऱ्यांवर दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस शिक्षक भरती घोटाळ्यातील या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
byte बाळासाहेब पाटील एस पी नाशिक
2
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 10, 2025 07:01:20Mumbai, Maharashtra:
अँकर -- दादर पश्चिम येथील कबूतर खाना पूर्णतः प्लास्टिकच्या कापडाने झाकून ठेवला आहे.यामुळे या ठिकाणी कबुतरही या ठिकाणी येत नाहीत.झाकून ठेवल्याने कोणीही कबुतरांना खाद्य देत नसल्याने कबुतरांचा वावर या ठिकाणचा बंद झाला आहे.या ठिकाणी पोलिसांचाही बंदोबस्त दिवसरात्र तैनात करण्यात आला आहे.परिसरातील काही इमारतींवर मात्र अनेक कबूतर अजूनही दिसतात.या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी
Wkt
मनोज कुळकर्णी
Feed send TVU ४८
Slug -- Kabutarkhana Wlt
1
Report
AKAMAR KANE
FollowSept 10, 2025 07:00:50kolhapur, Maharashtra:
Ngp Chavhan Byte
live u ने फीड पाठवले
-------
नागपूर
रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष..
श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमासाठी आलो आहेय..
कालच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली आहे, विजय कसा झाला यांची चर्चा न करता, विजय चांगल्या मताने झाला याचा आनंद आहे, भाजपचा या
On ठाकरे गट मत फुटले
मतदान गुप्त असते, गुप्त मतदान प्रक्रिया ही त्यासाठी आहे, यात प्रत्येकाचा मतदानाचा अधिकार योग्य उमेदवाराला देणं गरजेचं असते... त्यामुळे या सगळ्यांनी NDA च्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मतदान केलं, त्याचा सर्वांच अभिनंदन....
0
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 10, 2025 06:50:11Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Job_Frod
Feed on - 2C
-------------------------------
Anchor - चांगली नोकरी मिळेल या अपेक्षेने एजंट कडून परदेशात जात असाल तर सावधान. एका एजंट कडून युवक कंबोडिया देशात गेला. पण तिथे गेल्यावर त्याचे अपहरण करून त्याला मारहान करून कुटुंबीयांकडून खंडणी मागण्यात आली. युवकाचे एक बोट छाटण्यात आले. खंडणी देऊनही सुटका झाली नाही. अखेर पोलीस आणि विदेश मंत्रालयाने मदत केल्यानंतर युवकाची सुटका झाली.
Vo - विदेशात चांगली नोकरी मिळेल असे स्वप्न पाहून नांदेडमधील युवक समीर मेहबूब शेख हा एका एजंट कडून कंबोडिया देशात गेला. पण तिथे गेल्यावर त्याची फसवणूक झाली. अनेक प्रयत्नानंतर कसेबसे समीर जिवंत मायदेशी परतला. सोशल मिडीयाच्या माध्यमातून समीरची एका एजंट शी ओळख झाली. एक वर्ष फार्मसी शिकलेल्या समीर ला कंबोडिया मधील एका फार्मा कंपनीत एक लाख रुपये महिना पगाराची नोकरी लावण्याचे अमिष एजंट ने दाखवले. फेब्रुवारी महिन्यात समीर कंबोडिया मध्ये पोहोचला. एजंट ने सांगितलेल्या ठिकाणी तो पोहोचला पण त्याला नोकरी मिळाली नाही. बसल्या ठिकाणी दोन महिने त्याला चाळीस हजार रुपये पगार देण्यात आला. त्यानंन्तर एका गँगने समीरला ऑनलाईन स्कॅम करण्यास सांगितले. समीरला मारहान करून त्याचे व्हिडीओ कुटुंबाला पाठवून 50 लाख रुपये मागण्यात आले. समीरला मारहान न करता सुरुवातीला खोटे व्हिडीओ कुटुंबाला पाठवण्यात आले. पण पैसे पाठवण्यात न आल्याने समीरला लाईव्ह व्हिडीओ कॉल वर मारहान करत त्याचे एक बोट छाटण्यात आले. मुलाचे बोट छाटल्याने कुटुंब प्रचंड दहशतीत आले. कुटुंबाने कसेबसे पैसे जमा करत दहा लाख रुपये अपहरणकर्त्यांनी सांगितलेल्या अकाउंटवर पाठवले. त्यानंतरही मात्र समिरची सुटका काही झाली नाही.
Byte - समीर
Vo - पैसे पाठवूनही मुलाची सुटका होत नसल्याने वडिलांनी ही माहिती सामाजिक कार्यकर्ते आणि नातलगाना दिली. पोलीस अधीक्षकांना घडलेला प्रकार सांगण्यात आला. पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, स्थानिक आमदार, खासदारांनी लक्ष घालत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयापर्यंत विषय पोहोचवला. वेळोवेळी पाठपुरावा केला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने कंबोडिया मधील भारतीय दुतावासाशी संपर्क केला. त्यानंतर कंबोडिया पोलीसांनी समीर ची सुटका केली. काही दिवसांपूर्वी समीर सुखरूप मयदेशी परतला.
Byte - मेहबूब शेख - समीर चे वडील
Byte - शेख असलम - नातलग
Vo - चांगली नोकरी मिळेल या आशेने कोणत्याही एजंटच्या फसव्या अमिषाला बळी न पडता पूर्ण खात्री केल्यानंतरच परदेशात नोकरीला जावे हे या घटनेवरून समोर आले.
---------------------
मारहान व्हिडिओत युवकाचा चेहरा दाखवू नये. युवकाची तशी विनंती आहे. त्यानंतरच त्याने व्हिडीओ दिले.
3
Report