Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

शेतकऱ्याचा नांगर घेऊन विधान भवनाकडे मोर्चा, सरकारला ऐकवणार आवाज!

VAIBHAV BALKUNDE
Jul 07, 2025 04:01:32
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- खांद्यावर नांगर... एका शेतकऱ्याचा थेट विधान भवनाकडे मोर्चा... अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी...  शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी खांद्यावर नांगर घेऊन विधान भवनाकडे पाई चालत निघाला... AC ::- अहमदपूर तालुक्यातील हाडोळतीतील अंबादास पवारांनी बैल नसल्याने स्वतः खांद्यावर जू घेऊन शेती केली... आणि आता त्याच तालुक्यातील धानोऱ्यातून आणखी एक शेतकरी थेट विधान भवनाच्या दिशेनं पाई चालत निघालाय... फरक इतकाच आहे की या वेळी खांद्यावर जू नाही, तर नांगर आहे... शेतकरी सहदेव होणाळे यांनी कर्जमाफीसाठी खांद्यावर नांगर घेऊन पायी मुंबईकडे कूच केलीय. सरकारकडून आश्वासनांपलीकडे काहीच मिळत नाही, म्हणून हा 'खांद्यावरचा लढा' सुरु असल्याचं ते सांगतायत. दरम्यान, या शेतकऱ्याशी राज्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी थेट फोनवरून संवाद साधला... आणि सुरू असलेल्या अधिवेशनात तुमचा प्रश्न आम्ही मांडणार, असं आश्वासनही दिलं. लातूरच्या मातीतून पुन्हा एकदा शेतकऱ्याचा हंबरडा निघतोय... आता प्रश्न एवढाच आहे कि सरकार केव्हा ऐकणार ?" बाईट ::- सहदेव होणाळे बाईट::- अमित देशमुख ( साऊंड बाईट शेतकऱ्यांना फोनवर बोलताना ) 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement