Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूर में किसानों का आक्रोश: सदाभाऊ खोत पर सवालों की बरसात

VBVAIBHAV BALKUNDE
Sept 28, 2025 09:38:01
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज ‌‌.. { प्लिज इनपुट विडीओ मध्ये 1.43 सेकंदाचा तो विडीओ आहे.... } स्किप्ट ::- निलंग्यात शेतकऱ्यांचा संताप उफाळला, सदाभाऊ खोत यांना धरलं धारेवर...आम्ही नसतो तर शेतकऱ्यांचा आवाज कोण उठवणार ?... खोतांचा शेतकऱ्यांना प्रतिप्रश्न..... AC ::- लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाला आहे. नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आज आमदार सदाभाऊ खोत हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. पाहणी दौऱ्यावेळी निलंग्यात शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांना चांगलंच धारेवर धरलं. आम्ही डोळे झाकून निवडणूक दिलो, पण तुम्ही मित्रपक्षात गेल्यामुळे आम्हाला कुणाकडे जावं हेच कळत नाही… तुमच्यावरच आमच्या अपेक्षा आहेत," असं शेतकऱ्यांनी थेट खोतांसमोर सांगितलं. या नाराजीत उत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी हि शेतकर्यांना समजून काढण्याचा प्रयत्न केला आहे. विधान परिषदेवर आमच्यासारखे दोन-चार लोक आहेत म्हणूनच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठतो. खरं तर जर शेतकऱ्यांनी आपलेच प्रतिनिधी निवडून दिले असते तर अजून ताकदीनं आवाज उठला असता. पण वास्तव असं आहे की सरकार जातीवर ठरतात आणि जातीवरच निवडून येतात असं विधान केले आहे.... साऊंड बाईट ::- सदाभाऊ खोत
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Sept 28, 2025 13:00:43
0
comment0
Report
SKShubham Koli
Sept 28, 2025 12:47:31
Thane, Maharashtra:Thane flash *ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ byte pointer* ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला... आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. उद्या ऑरेंज अलर्ट आहे. परवा येल्लो अलर्ट आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी सूचना दिल्यानंतर आज दुपारी बैठक देखील पार पडली... ५ जिल्हा संदर्भात बैठक घेण्यात आली. ठाणे जिल्ह्यातला विशेष आढावा घेतला आणि काल १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज पावसाचा रेड अलर्ट चा इशारा आहे. मुरबाड आणि ठाणेतालुक्यामध्ये तालुका मध्ये सगळ्या टीमला सूचना देण्यात आलेले आहे. सगळ्यात टीम फिल्डवर असून सतर्क आहे. काल झालेल्या मुरबाड मध्ये पावसामुळे शेत जमीन ला नुकसान होण्याची शक्यता आहे. आजच्या पावसाचा आढावा घेऊन काल त्यावर पंचनामे करण्यात येईल असे आदेश देखील देण्यात येणार आहे. तानसा सह सगळ्याच धरणातले मॉनिटरिंग सह भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडलेले आहेत. ठाणे ग्रामीण येथे तीन ठिकाणी पूल पाण्याखाली गेलेला आहे. तिथे देखील टीम काम करत आहे. NDRF काय तो ची टीम कल्याण मध्ये सतर्क आहे. सगळ्या प्रकारची टीम अलर्ट मोडवर आहे. दोन ते तीन दिवसापासून पावसामुळे आमची टीम सतर्क आहे. *ऑन उल्हास नदी अफवा* सर्वच नद्यांची धोका पातळी आणि इशारा पातळीच्या खाली सगळ्या नदी आहे. भातसा चे दरवाजे उघडलेले आहेत. त्याच्यानुसार पाणीची पातळी किती वाढू शकते त्यानुसार त्या क्षेत्रामध्ये किती पाऊस आहे. त्याची सूचना आणि माहिती देतो. अधिकृत माहिती संकेत स्थळ असतील माहिती जनसंपर्क कार्यालयाचे फोन नंबर देखील देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत ,तलाठी यांच्याशी संपर्क साधून इथल्या कार्यालय वर संपर्क साधून या अधिकृत माहिती वर विश्वास ठेवा. जुने फोटो असतील व्हिडिओ असतील ते बघून कोणीही पाणी होऊ नाही. इशारा पातळी आणि धोका पातळी याबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येईल.. ४२ गावाची देखील आम्ही यादी काढलेली आहे. त्वरित त्या ठिकाणी टीम पोहोचशील आणि माहिती देतील. सातगाव मध्ये भातसाचा दरवाजा उघडल्यानंतर काही शिफ्टिंग ची आवश्यकता पडते का ? महसूल सोबत जे काही सगळे टीम्स आहेत. आवश्यकता पडली तर स्थलांतर देखील आम्ही तात्पुरता करू.. सर्व ठिकाणी नदीकाठची जी गाव आहे. तिथे मॉनिटरिंग देखील करण्यात येत आहे. शिफ्टिंग ची आवश्यकता पडली तर आधीच आपण शिफ्टिंग करून घेऊ.. आज रात्रीच्या वेळेस जर पाऊस झाला तर तेही शिफ्टिंग साठी सतर्क टीम ठेवण्यात आलेले आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. NDRF आणि ठाण्यात टीडीआरएफ ची टीम याअगोदर देखील होती आणि ते देखील सतर्क आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 28, 2025 12:47:19
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 28, 2025 12:45:07
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 28, 2025 12:34:56
Dhule, Maharashtra:ANCHOR - धुळे जिल्ह्यात पाऊसाने कहर केला आहे. सततच्या पाऊसामुळे पिकांची नाही भरून निघणारी हानी झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात लोहगाव, वसमाने परिसरात भेट देऊन अति पाऊसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. केळी, पपई, कापूस, ऊस, मका, या पिकांचे कापणीला आले असताना प्रचंड नुकसान झाले आहे. अद्यापही पाऊस थांबलेला नाही. हातादोंडाशी आलेला घास हिरवाला गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यांना धीर देत पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शासन शेतकऱ्यांना सर्वोतोपारी मदत करेल असे आश्वासन दिले. यावेळी सोबत जिल्हा कृषी अधीक्षक सूरज जगताप, तहसीलदार संभाजी पाटील उपस्थित होते. कृषी आणिअहसून यंत्रनेला तात्काळ सर्व पंचनामे वेळेत करण्याचे आदेश पालकांमंत्री रावल यांनी यावेळी दिले. byte - जयकुमार रावल, पालकमंत्री, धुळे. प्रशांत परदेशी, धुळे.
1
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 28, 2025 12:33:22
Pandharpur, Maharashtra:28092025 Slug - PPR_VITTHAL_SAMITI FILE 01 ----- Anchor - गोर गरीब शेतकरी कष्टकरी जनतेचा देव विठू माऊलीचा पूर बाधित आणि अतिवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीवर मायेचा हात, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती एक कोटी रुपयांची मदत पूर बाधित अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना देणार राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहेत. या परिस्थितीत मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील सर्व देवस्थानांना केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देत तसेच सामाजिक उत्तरदायित्व व मानवतावादी भूमिकेतून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपयांची मदत व त्याचबरोबर पुरग्रस्त नागरिकांना श्रींच्या प्रसादरूपाने महावस्त्रे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगीतले. मंदिर समिती कडून पुरग्रस्त नागरिकांना फुड पॅकेट वाटप करत आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, लाडूप्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे. मंदिर समितीकडून यापूर्वीही राज्यावर आलेल्या आपत्तीच्या काळात मदत केली गेली आहे. विशेष म्हणजे सन 2013, 2015, 2018 व 2020 या काळातही मंदिर समितीमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत करण्यात आली होती ----- Byte - गहिनीनाथ महाराज औसेकर, सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 28, 2025 12:33:04
Thane, Maharashtra:भिवंडीमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सखल भागात साचले पूराचे पाणी.. ॲंकर.. काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. अंजूर फाटा, मुख्य बाजारपेठ आणि तीन बत्तीसह आसपासच्या परिसरात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. ज्यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पूराचे पाणी दुकानात शिरत असल्याने दुकानदारांचे नुकसान होत आहे. असाच जर का पाऊस सुरू राहिला तर दुकानात पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात दुकाने लावलेले दुकानदार काळजीत आहेत. गिर्‍हाईक तर ह्या पाण्यातून येऊ शकत नाही पण पाणी वाढलेच तर मालाचे काय आणि कसे करायचे. त्याच बरोबर खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांना मनपा आयुक्त व अतिदक्षता विभागाने सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाण्याची धोक्याची पातळी वाढल्यास नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. अशा प्रकारची सूचना प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 28, 2025 12:31:16
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील उमई-जांभा रोडवर आज सकाळी भीषण घटना घडली. दिपक वानखडे (वय ४२) या व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली असून श्रीराम वानखडे हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे उमई व जांभा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, गजानन मानकर (वय ३५) या युवकाने जुन्या वादातून ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या एका तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. Byte : श्रीधर गुट्टे, पोलिस निरीक्षक.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 28, 2025 12:16:20
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन येथे सुरू असलेल्या आरसीसीपीएल सिमेंट कंपनीविरोधात भूमिपुत्रांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत शिवसेना यु बी टी चे आमदार संजय देरकर व शिवसैनिकांना कंपनी कार्यालयावर धडक दिली. पोलिसांचा बंदोबस्त झूगारून शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. रोजगाराच्या संधी, स्थानिकांना न्याय्य मोबदला, पर्यावरणीय प्रश्न तसेच इतर स्थानिक सुविधा या मागण्यांकडे आरसीसीपीएल कंपनीकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या आंदोलनात महिलांसह तरुण व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मागण्या पूर्ण न झाल्यास संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top