Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

कल्याण डोंबिवलीतील कर्मचाऱ्यांचा लढा, 15 ऑगस्टला मिळणार नियुक्ती पत्र!

ABATISH BHOIR
Jul 31, 2025 10:16:30
Kalyan, Maharashtra
कल्याण डोंबिवलीतील 27 गावातील त्या कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश 15 ऑगस्ट रोजी केडीएमसी नियुक्ती पत्र देणार शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या केडीएमसी आयुक्तांसोबत बैठकीत निर्णय Anchor :- कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावातील कामगार मागील 10 वर्षापासून पालिकेच्या सेवेत कार्यरत असून या कामगारांना कायम करण्याबाबत राज्य शासनाने आदेशित केले आहे. मात्र तरीही या कामगारांची प्रतीक्षा कायम असून प्रशासनाकडून कामगारांची पोलीस पडताळणी आणि आरोग्य तपासणी पूर्ण होताच या कामगारांना टप्प्य टप्प्याने नियुक्ती पत्र दिली जातील. पहिली टप्प्यातील नियुक्तीपत्र १५ ऑगस्ट रोजी देणार असल्याचे आश्वासन पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आमदार राजेश मोरे यांना दिले. आज आमदार मोरे यांनी विविध विषयावर पालिका आयुक्तांची भेट घेत सकारात्मक चर्चा केली. ग्रामीण भागात दळणवळणाच्या सुविधा नसल्याने विद्यार्थ्याचे हाल होत असून या गावातून शाळेच्या वेळामध्ये बस सुविधा सुरु करण्याची मागणी मान्य करत कामगार आणि बसेस कमी असल्या तरीही काही प्रमाणात या मार्गावर बसेस चालविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. तर ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्या बरोबरच स्मार्ट सिटी मधील बंद असलेले कॅमेरे सुरु करावेत, गावामध्ये पथदिवे बसवावेत. हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने, आणि हेल्थ सेंटर सुरु करावेत, सणाचा पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, मंडपांसह कमानी शुल्क देखील माफ करावे, ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अमृतच्या जलकुंभाचे काम पूर्ण करत या जलकुंभातून पाणी पुरवठा सुरु करावा, ग्रामीण भागातील भूयारी गटारांची कामे सुरु करावीत, डोंबिवली स्थानक परिसरातील चिमणी गल्लीतील पार्किंग तातडीने सुरु करण्याची मागणी आमदार मोरे यांनी केली. दरम्यान याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी आमदारांना दिले. त्याच बरोबर पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्याबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. Byte :- राजेश मोरे ( आमदार कल्याण ग्रामीन शिवसेना )
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Aug 01, 2025 07:05:08
kolhapur, Maharashtra:
नागपूर Ngp CM bhagwat program - कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यालयाच्या अभिनव भारती आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिसरातील डॉ. केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवनाचे लोकार्पण - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले - या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित आहेत... तसेच मंत्री चंद्रकांत पाटील हे सुद्धा उपस्थित आहे.... live फ्रेम -------- देवेंद्र फडणवीस (भाषण) डॉ पंकज चांदे आणि श्रीकांत जिचकार यांनी हे संस्कृत विद्यापीठ करता खूप मेहनत घेतली -- इमातील हेडगेवार यांचे नाव दिले.. ज्या विचारला 100 वर्ष होत असताना हे कार्य होतेये --संस्कृत ही ज्ञान भाषा... ज्ञानाचा खजिना आहे.. ही भाषा अजून समृद्ध झाले पाहीजे.. ती पुढच्या पिढीला गेली पाहिजे.. जगातील सगळ्यात समृद्ध भाषा.. अनेक देशात संस्कृतवर सशोधन होतंय... अनेक क्षेत्रात भारताने जी प्रगती केली ते संस्कृतमध्ये आहे ------------ -- जगातल्या सगळ्या संस्कृती नष्ट झाल्या... फक्त भारतीय संस्कृती राहिली.. त्यातील सगळ्यात मोठा घटक संस्कृत भाषा आहे -- देशात 20 संस्कृत विद्यापीठ... आपल्याला गुरुकुल पद्धत ठेवताना... त्याच बरोबर त्याकरता पायाभूत सुविधा आवश्यक आहे.. आम्ही इथे आंतरराष्ट्रीय दर्जाच विद्यापीठ करू -- संस्कृत भाषेच्या प्रचार करता या विद्यापीथठाच योगदान असेल. .-- मला वाटतं मानवाक्य म्हणून संस्कृत मर्यादित नको -- इंडो युरोप भाषेत संस्कृतचे अंश आहे -- माझीखंत आहे मी संस्कृत बोलू शकलो नाही .. माझी आई mA संस्कृत होती --मी संस्कृत शिकण्याचा प्रयत्न करेल ----------------------- सरसंघचालक मोहन भागवत (भाषण) -- आज परिस्थिती सांगते आणि देशाचे सूत्रसंचालक सांगतात सगळ्याच एकमत आहे भारताला आता आत्मनिर्भर व्हावे लागेल.. आपल्या बळावर.. ते वाढले पाहिजे प्रत्येक बळामागे अस्मिता असते.. त्यामगे चित्त असते -- भारताची स्व हहा परंपरेत... इसवीसन 1 ते 1600 पर्यंत... भारत सर्वात सगळ्याबाबतीत अग्रेसर.. -- सत्वच विस्म रण झाले आपली घसरण सुरु झाली.. आणि परकीय आक्रमण चे भक्ष्य झालो -- आणि शेवटचे परकीय आक्रमक असे होते की त्यांनी आपल्या बुद्धीला गुलाम करण्याची पद्धत विकसित केली.. त्यामुळे स्व निर्भर व्हायच असेल तर सत्व कळलं पाहिजे --आपला 'स्व' भाव भाषेतून प्रगट होत असतो --जसा समाजाचा भाव तशी भाषा -- ग्लोबल मार्केट मध्ये वसुदेव कुटूंबम म्हणतो कारण तो आपला स्वभाव --- आपली भाषा विकसित झाली ती संस्कृतवर -- संस्कृत घरोघरी पोहचवणे -- संस्कृत भाषा राजश्रीत व्हायला हवी.. आणि होतेय.. संस्कृत बोलाचालीची भाषा व्हायला हवी -- संस्कृत ज्याला येते तो इतर भाषा लवकर शिकु शकतो -
0
Report
AKAMAR KANE
Aug 01, 2025 07:04:16
kolhapur, Maharashtra:
Ngp Cm byte live u ने फीड पाठवले --===---- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दीक्षाभूमी चौक, नागपूर येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. ------ बाईट देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, बाईट (pointer) - अण्णाभाऊ साठे हे एक असं नाव आहे ज्यांनी आपल्या लेखणीने अनेकांच्या रक्तात स्फुलिंग जागृत करण्याचं काम केलं.... - जगाच्या अनेक देशांमध्ये त्यांचे साहित्य वाचल्या जातं प्रकाशित केल्या जाते... - संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी आपल्या गीतांनी या चळवळीला आगीचा स्वरूप करून दिलं...खऱ्या अर्थाने वंचितांचा आवाज समाजात पोहोचवण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी केलं. - पृथ्वी हे सेश नागाचा डोक्यावर नाही, तर कामगारांच्या तळहातावर असल्याचा संदेश देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो आहे. - वंचितांच्या विकासाचा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे असा संकल्प करतो...
0
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 01, 2025 07:03:17
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 1 FILE SLUG NAME -SAT_TORAN_MARNE सातारा - साताऱ्यातील बिदाल येथे पारंपरिक बैलांची तोरण मारण्याची ४४ वी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. रिमझिम पावसात, हलगी-फटाक्यांच्या गजरात झालेल्या या स्पर्धेत ८४ बैलांनी सहभाग घेतला. यापैकी ३६ बैलांनी १४ फुटांचे, तर १० बैलांनी १६ फुटांचे तोरण मारले. मात्र, १८ फुटांचे तोरण कोणालाही मारता आले नाही, त्यामुळे प्रथम क्रमांकाची रक्कम १० जणांत, तर द्वितीय बक्षीस २६ जणांत विभागून देण्यात आले. स्पर्धाला बैल मालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
0
Report
UPUmesh Parab
Aug 01, 2025 07:03:03
Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग- कोकण रेल्वेच्या विविध समस्या संदर्भात प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज सिंधुदुर्गनगरी रेल्वेस्थानकाच्या आवारात जनआंदोलन छेडण्यात आले. प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आज हे आंदोलन छेडण्यात आले. कोकण रेल्वे मार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक्सप्रेस गाड्यांना नसलेले थांबे, उपलब्ध न होणारी ऑनलाईन तिकिटे, गणपती सणात उपलब्ध नसलेली तिकिटे, गाड्यांची नसलेली उपलब्धता, निवारा शेड आणि प्रवाशांना रेल्वेस्थानकांवर उपलब्ध नसणाऱ्या सोयीसुविधा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले. बाईट- प्रकाश पावसकर अध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती, सिंधुदुर्ग
0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 01, 2025 07:02:44
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला शहरातील बेताल वाहतूक व्यवस्थेला ताळ्यावर आणण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी मुख्य रस्त्यालगत ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांचे स्थानांतरण करण्याचा निर्णय घेतला आहेय..शहरातील खुले नाट्यगृहाजवळील राखीव जागा बघता महापालिका प्रशासनाशी समन्वय राखत १ ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहेय...पोलिस अधीक्षकांच्या रोखठोक भूमिकेमुळे वाहतूक कोंडीपासून अकोलेकरांची सुटका होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहेय.. रस्त्यालगतचे फेरीवाले, लघु व्यावसायिकांना खुले नाट्यगृहालगतच्या मोकळ्या मैदानावरील हॉकर्स झोनमध्ये स्थानांतरणाचा निर्णय घेतला आहे मात्र आता या नियमाचे कितपत पालन होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेय..
0
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 01, 2025 07:02:36
Ratnagiri, Maharashtra:
Anchor - जवळपास दोन महिन्यानंतर ताजे फडफडीत मासे खाण्यासाठी उत्सुक असलेल्या खवय्यांना आणखीन काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण आज अर्थात एक ऑगस्टपासून तांत्रिकदृष्ट्या मासेमारीला सुरुवात होते. पण सध्याची परिस्थिती वादळी आहे. समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे मासेमारीसाठी बोटी समुद्रात पाठवता येणार नाहीत किंवा त्या जाणार नाहीत. परिणामी आता ताजे फडफडीत मासे मिळण्यासाठी आणखीन काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. खवळलेला समुद्र आणि जून, जुलैमध्ये माशांच्या प्रजननाचा काळ यामुळे ही मासेमारी विशेषता बंद असते. लोकेशन - मिरकरवाडा, रत्नागिरी
0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 01, 2025 07:01:01
Raigad, Maharashtra:
स्लग - मुंबई गोवा महामार्गावर अपघात ..... अँकर - मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी एसटी बस आणि ट्रक यांची समोरासमोर ठोकर होऊन अपघात झाला. यात ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे . त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रकचा समोरचा भाग एसटी बसमध्ये घुसला होता. तो बाहेर काढून ट्रक चालकाला बाहेर काढण्यात आले.
0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 01, 2025 06:51:20
Raigad, Maharashtra:
स्लग - रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या चिखलात बसून आंदोलन ...... कर्जत तालुक्यातील रस्त्यातील खड्डे बुजवण्याची मागणी ...... अँकर - कर्जत तालुक्यातील सर्व रस्ते खड्डे मुक्त करावेत या मागणी साठी सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी अनोखं आंदोलन सुरू केलं आहे. कर्जत कोंदीवडे मार्गावरील तमनाथ इथं रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात बसून ते आंदोलन करताहेत. खड्ड्यात साचलेल्या चिखलात त्यांनी बस्तान मांडलं आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतोय त्याकडे यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचा कदम यांचा आरोप आहे.
1
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 01, 2025 06:48:16
Solapur, Maharashtra:
सोलापुर ब्रेकिंग – सरसंघचालक मोहन भागवत को पकड़कर लाने का आदेश मिला था - महबूब मुजावर ( Mobile Whatsup Live For Hindi & Dibet Show ) मालेगांव बम विस्फोट की जांच के दौरान मुझे मोहन भागवत को पकड़कर लाने का आदेश दिया गया था। मुझे राज्य में किसी भी अधिकारी को जांच के लिए चुनने की पूरी छूट दी गई थी। लेकिन मैंने वह आदेश नहीं माना, इसलिए मुझ पर झूठा केस डाला गया। उस समय एटीएस प्रमुख परमबीर सिंह मेरे सीनियर थे। सात–आठ साल बाद मैं इस केस से बेकसूर साबित हुआ, ऐसा भी महबूब मुजावर ने कहा। Whatsup Live - महबूब मुजावर – मालेगांव बम विस्फोट मामले के रिटायर्ड एटीएस (ATS) अधिकारी।
4
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 01, 2025 06:48:11
Beed, Maharashtra:
बीड: परळीजवळ शिवशाही - ॲपेरिक्षाचा अपघात, रिक्षाचालकाचा मृत्यू... संतप्त जमावाकडून बसवर दगडफेक Anc- बीडहून नांदेड कडे निघालेल्या शिवशाही बस आणि ॲपेरिक्षाचा भीषण अपघात झाला. अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाला आहे. घटना परळीच्या पांगरी गावाजवळ घडली आहे. शेतात मजूर सोडून परतत असताना ॲपेरिक्षाला शिवशाही बसने जोराची धडक दिली यात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाल्याने जमाव संतप्त झाला. जमावाकडून शिवशाही बसवर दगडफेक देखील करण्यात आली. घटनेनंतर तब्बल दीड तास वाहतूक ठप्प होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आहे.
1
Report
AAASHISH AMBADE
Aug 01, 2025 06:48:02
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- ( 3 file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूरच्या व्हॉईस ऑफ मेलोडी ऑर्केस्ट्राचा सुवर्ण महोत्सव, एकाहून एक सरस गाण्यांनी साजरा झाला सुवर्णमहोत्सव, जुन्या जाणत्या आणि नव्या गायकांनी देखील सादर केली गीतं, विदर्भभर गाजलेल्या या ऑर्केस्ट्राने गाजविलेल्या सुवर्णकाळाची  अँकर:--चंद्रपूरच्या व्हॉईस ऑफ मेलोडी ऑर्केस्ट्राचा सुवर्ण महोत्सव सुरेल कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. शहरातील प्रियदर्शिनी सभागृहात आयोजित कार्यक्रमात एकाहून एक सरस गीतं सादर करण्यात आली. या वाद्यवृंदात काम केलेल्या जुन्या जाणत्या आणि नव्या गायकांनी देखील उत्तमोत्तम गाणी सादर केली. विदर्भभर गाजलेल्या या ऑर्केस्ट्राने गाजविलेल्या सुवर्णकाळाची आठवण उपस्थितांना या निमित्ताने झाली. व्हॉईस ऑफ मेलोडी या ऑर्केस्ट्रा ने चंद्रपूर व अन्य जिल्ह्यात संगीताचे असंख्य यशस्वी कार्यक्रम दिले आहेत. हा ऑर्केस्ट्रा आपल्या गाण्यांची विशेष शैली व सुमधुर सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमात ऑर्केस्ट्राच्या वरिष्ठ सदस्य आणि  कलाकारांचा सत्कार करण्यात आला. जन समर्थन लाभलेल्या एखाद्या ऑर्केस्ट्राने गाठलेल्या या टप्प्याचे कौतुक करण्यासाठी सभागृह तुडुंब भरले होते. बाईट १) बंडू देठे, ऑर्केस्ट्रा संयोजक ----------गाण्याचे अंश------- आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर  
4
Report
PNPratap Naik1
Aug 01, 2025 06:20:52
Kolhapur, Maharashtra:
Kop Jotiba Pedha Feed :- 2C Anc :- दख्खनचा राजा जोतिबा डोंगरावर असणाऱ्या चोपडाई देवीच्या श्रावण षष्ठी यात्रेत तब्बल 400 किलो वजनाचा भेसळयुक्त पेढा, बर्फी आणि हलवा जप्त करण्यात आलाय. अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. जोतिबा डोंगरावर वारंवार भेसळयुक्त पेढे सापडत असल्याने भक्तांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं यावरून सिद्ध होत आहे. सांगली जिल्ह्यातील डफळापुर इथल्या उत्तम शिंदे यांच्याकडून खरेदी केलेला पेढा, बर्फी आणि हलवा सदाशिव वारेकर गणेश वारेकर पोपट वाडेकर आणि फारुख वझरवाट यांनी श्रावण षष्ठी यात्रेनिमित्त विक्रीसाठी आणला होता. त्या मालाची विक्री शंभर रुपये पाव किलो प्रमाणे सुरू होती. यावेळी जोतिबा डोंगरावरील माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांना हा माल भेसळुकत असल्याचा संशय आला, त्यांनी तात्काळ अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाला यासंदर्भात माहिती दिली. यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने हा माल जप्त करून तपासणी केली. त्यावेळी हा सर्व माल भेसळयुक्त असल्याचे स्पष्ट झाले. अन्न आणि औषध प्रशासनाने याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून उर्वरित भेसळयुक्त पेढे आणि बर्फी ट्रॉलीने भरून डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकण्यात आला. जप्त केलेल्या पेढे बर्फीच्या बॉक्सवर कोणतीही उत्पादन तारीख किव्हा एक्सपायर डेट नव्हती. पण या घटनेच्या निमित्ताने जोतिबा डोंगरावर वारंवार स्वतःच्या फायद्यासाठी व्यापारी भेसळयुक्त पेढे बर्फी आणि खवा विक्रीसाठी आणून भक्तांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून आल आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने फक्त जुजबी कारवाई करून गप्प बसू नये तर डोंगरावर मॉक ड्रिल राबवत भेसळयुक्त पेढे, बर्फी आणि खवा विक्री करणाऱ्या व्यापारांच्या कठोर करणे अपेक्षित आहे, अन्यथा भेसळयुक्त प्रसाद भाविकांच्या जीवावर बेतायला वेळ लागणार नाही. Byte :- सुनील नवाळे माजी ग्रामपंचायत सदस्य
7
Report
DPdnyaneshwar patange
Aug 01, 2025 06:02:12
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव DHARA_TULJA_MANDIR आज पासून 10 ऑगस्ट पर्यंत तुळजाभवानी देवीचं धर्मदर्शन बंद. व्हीआयपी आणि पेड दर्शन ही बंद. मंदिराच्या जीर्णोद्धार कामामुळे देवीचं धर्मदर्शन बंद. भक्तांना घेता येणार फक्त देवीच मुखदर्शन पुरातत्व विभाग आणि मंदिर संस्थान चा निर्णय. अँकर धाराशिव_ महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या भक्तांसाठी आता एक महत्त्वाची बातमी. आज पासून पुढील दहा दिवस म्हणजे दहा ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चे धर्म दर्शन बंद असणार आहे. भक्तांना आई तुळजाभवानीच फक्त मुखदर्शन घेता येईल. त्याचबरोबर व्हीआयपी व पेड पास दर्शन देखील बंद करण्यात आल आहे. प्रसिद्धी पत्र काढून मंदिर संस्थांन ने ही माहिती दिली आहे. तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याला तडे गेल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे . नवरात्र उत्सवापूर्वी हे काम पूर्ण करण्याचं मंदिर संस्थांनच नियोजन आहे. पुरातत्त्व विभाग आणि मंदिर संस्थान कडून ाभार्‍याला प्लास्टर करण्याच काम सध्या सुरू आहे. त्यामुळे भक्तांना देवीचे धर्म दर्शन बंद करण्यात आले आहे . देवीच्या अभिषेक व इतर नित्य पूजा सुरूच राहतील.
6
Report
AKAMAR KANE
Aug 01, 2025 06:00:30
kolhapur, Maharashtra:
नागपूर Ngp CM bhagwat program - कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यालयाच्या अभिनव भारती आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिसरातील डॉ. केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवनाचे लोकार्पण - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले - या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित आहेत... तसेच मंत्री चंद्रकांत पाटील हे सुद्धा उपस्थित आहे.... live फ्रेम
9
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 01, 2025 05:48:16
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ जिल्हा काँग्रेस अंतर्गत उफाळलेल्या दुफळीबाबत तोडगा काढण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समन्वयक म्हणून माजी मंत्री सुनील केदार यांची नियुक्ती केली आहे. केदार लवकरच यवतमाळ मध्ये येऊन काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नाराज नेते व पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून घेणार आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आदिवासी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे, आदिवासी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वसंत पुरके, वामनराव कासावार आदींवर स्थानिक नेत्यांनी हल्लाबोल करून हे नेते पराभूत काँग्रेसला नेस्तनाबूत करायला निघाले आहेत असा घणाघात केला होता. या नेत्यांचे चेहरे जनतेला पसंद नाही, पाडापाडीचे व गद्दारी करण्याचे राजकारण ज्यांनी केले ते काम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवरच पराभवाचे खापर फोडत आहेत, त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळीच या नेत्यांना लाथ मारून हाकलावे, अन्यथा पक्षात मोठा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही स्थानिक नेत्यांनी दिला होता. साउंड बाईट : देवानंद पवार
9
Report
Advertisement
Back to top