Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

जायकवाडी धरणाचा साठा ५१% - २ वर्षांसाठी पाण्याची चिंता मिटली!

VISHAL KAROLE
Jul 07, 2025 02:32:29
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
csn jayakwadi av 'जायकवाडी'चा साठा ५१ टक्के संभाजी नगरला २ वर्षे पुरेल पाणी ५ वर्षांत प्रथमच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरले अर्धे धरण. जायकवाडी धरणात पाण्याची आवक १६ हजार २९५ क्युसेकच्यावर सुरू असल्याने 'नाथसागरा'चा जलसाठा ५१ टक्के झाला आहे. मागील बारा दिवसांपूर्वी धरणाचा साठा २९ टक्के होता. मागील पाच वर्षांत जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रथमच धरणाचा साठा ५१ टक्क्यांवर गेला आहे, या पाण्यामुळे उद्योग व पिण्याचा पाणी प्रश्न २ वर्षे तर सिंचनाचा एक वर्षांचा पाणीप्रश्न मिटलाय, १९८३ पासून जायकवाडीच्या पाण्याची टक्केवारी १८ वेळा ९० टक्क्यांपुढे, तर ८ वेळा शंभर टक्के झाली .. २००६ मध्ये तर धरणातून अडीच लाखाहून अधिक क्युसेकने गोदावरीत पाणी सोडावे लागल्याने मराठवाड्यातील अनेक भागांत महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. मागील वर्षी साठा आजच्या दिवशी ४.२२ टक्के होता. तर, यंदा ५१ टक्क्यांवर गेला आहे. सध्याची आवक लक्षात घेता धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement