Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना जिल्ह्यात अतिवृष्टीने शेती पिकांचं नुकसान, शेतकऱ्यांची मदतीची मागणी!

NMNITESH MAHAJAN
Aug 19, 2025 04:02:42
Jalna, Maharashtra
FEED NAME : 1908ZT_JALNA_RAIN_UPDT(10) जालना :जिल्ह्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टी शेती पिकांचं नुकसान, पंचनामे करण्याची मागणी जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी जोरदार पाऊस जोरदार पावसामुळं पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ अँकर:  जालना जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला असून जिल्ह्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टी झालीये.. मागच्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 35.90 मिमी पावसाची नोंद झालीये. या बदनापूर तालुक्यात सर्वाधिक 53.40 मिमी पाऊस झालाय. तर घनसावंगीतही 48.80 पावसाची नोंद झालीये. त्याचबरोबर जिल्ह्यातील वीरेगाव, वडिगोद्री, बदनापूर, शेलगाव आणि रोषणगाव  या पाच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून शेती पिकांचं नुकसान झालं आहे.दरम्यान नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीये. बाईट- शेतकरी बाईट-शेतकरी
8
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Aug 19, 2025 06:03:07
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - कृष्णा नदीची पाणी पातळी 19 फुटांवर जिल्हाधिकारयांनी नदीकाठाची केली पाहणी.. अँकर - कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि कोयना धरणातून सुरू असलेले विसर्ग यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे,सांगली कृष्णा नदीची पाण्याची पातळी सध्या 19 फुटांवर पोहोचली आहे.या पार्श्वभूमीवर सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी कृष्णा नदीची पाहणी केली आहे. आयर्विन पूल येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पाहणी करत प्रशासनाकडून संभाव्य पूर परिस्थितीचा आढावा देखील घेतलाय,त्याचबरोबर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,सध्याची परिस्थिती पाहता महापालिका क्षेत्रातील नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी,असा आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडून करण्यात आले असून पूर परिस्थिती उद्भवल्यास प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 19, 2025 06:01:50
Beed, Maharashtra:
बीड : माजलगाव धरण ५६ टक्क्यांवर, आवक कायम राहिल्यास रविवारपर्यंत ८० टक्के भरण्याची शक्यता..! Anc- गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे माजलगाव धरणातील पाणीपातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे. आज मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत धरण ५६ टक्क्यांवर भरले असून सध्या दहा हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. सततच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा जलद गतीने वाढत आहे. आवक याच वेगाने कायम राहिल्यास रविवार पर्यंत धरण ८० टक्क्यांवर पोहोचेल असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे. धरणातील वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे बीड आणि माजलगावसह २२ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला आहे.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 19, 2025 06:01:35
Ratnagiri, Maharashtra:
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कोकणातील नेते प्रशांत यादव आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत.. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. प्रशांत यादव आपल्या हजारो समर्थकांसह, शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह सकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्यासह कोकणातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे.. प्रशांत यादव यांचा गत निवडणुकीत थोड्या मतांनी पराभव झाला होता. जवळपास 90 हजार मतं त्यांनी घेतली होती. त्यामुळे यादव यांच्या पक्ष प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपला बळकटी मिळणार आहे..
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 19, 2025 06:01:21
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1908ZT_CHP_TEMPLE_THEFT ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर शहरातील घनदाट वस्तीतल्या मध्यवर्ती भागातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात धाडसी चोरी, चोरट्यांनी रात्री खिडकी तोडून आत केला प्रवेश, एक दानपेटीच पळवून नेली, तर दुसऱ्या दानपेटीला फोडून आतील रक्कम लांबविली      अँकर:--चंद्रपूर शहरातील घनदाट वस्तीतल्या मुख्य मार्गावरील मध्यवर्ती भागातल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरात धाडसी चोरी उजेडात आली आहे. चोरट्यांनी रात्री खिडकी तोडून आत प्रवेश केला. मंदिरातील एक दानपेटीच पळवून नेली, तर दुसऱ्या दानपेटीला फोडून आतील रक्कम लांबविली आहे. पुजारी सकाळी मंदिरात पोचताच हा प्रकार उघडकीस आला. पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. श्वानपथक घटनास्थळी पोचले असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. बाईट १) कैलास सोमाणी, मंदीर ट्रस्टी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Aug 19, 2025 06:01:05
Pimpri-Chinchwad, Pune, Maharashtra:
pimpri death kailas puri Pune 19-8-25 feed by 2c Anchor - .... पिंपरी चिंचवडच्या निगडी प्राधिकरण येथे बीएसएनएल चेंबरमध्ये गुदमरून तीन कामगारांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने लक्ष घातले असून याप्रकरणी जिल्हा प्रशासन, पोलीस, बीएसएनएल आणि महापालिका आयुक्तांनी येत्या तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगानं दिलेत. बीएसएनएल केबल तपासणीसाठी 15 ऑगस्ट ला हे तीन कामगार प्राधिकरणातील भेळ चौकात चेंबर मध्ये उतरले असता त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अनुसूचित जाती आयोगाकडे चौकशीची मागणी केल्यानंतर आयोगाने या प्रकरणी तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Aug 19, 2025 06:00:57
Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात गेल्या दोन तासापासून जोरदार पावसाला सुरुवात Ulh rain Anchor उल्हासनगरात सकाळी नऊ वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून , शहरातून वाहणारा वालधुनी नाला तुडुंब भरून वाहत आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानकाबाहेरील पूलही पाण्याखाली  जाण्याची शक्यता असून पूल खालून फक्त एक फुटावरून पाण्याचा प्रवाह वाहत आहे. .वालधुनी नदी तुडुंब वाहत असल्याने शहरातील सकल भागात पाणी साठण्याची शक्यता आहे मात्र  अजून कुठेही पाणी भरल्याची माहिती नाहीये चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Aug 19, 2025 06:00:41
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_YASHOMATI दोन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 तुम्ही पालकमंत्री आहात तर लोकांची काळजी करा; काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका शेतकऱ्यांच्या नुकसानीवरून यशोमती ठाकूर आक्रमक; शेती बांधावर जाऊन यशोमती ठाकूर कडून नुकसानीची पाहणी अँकर :– अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालं आहे, सोयाबीन, कपाशी, तूर यासह पिकांना मोठा फटका बसला आहे. उभे पीक आडवे झाल्याने शेतकरी हतबल झाला असून या संदर्भात काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी तिवसा तालुक्यात शेती बांधावर जाऊन पाहणी केली असून यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला यानंतर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. पालकमंत्री दहीहंडीमध्ये येतात पण साध कलेक्टरला नुकसान भरपाई बाबत विचारत नाही बैठका घेत नाही या गोष्टी सहन कशा काय करायच्या. वोट चोरी करूनच तुम्ही लोक सत्तेत आले आहेत हे आता सिद्ध झाल आहे तुम्ही पालकमंत्री आहात लोकांची काळजी करा असा टोला यशोमती ठाकूर यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला आहे. बाईट :– यशोमती ठाकूर, काँग्रेस नेत्या
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Aug 19, 2025 06:00:27
Virar, Maharashtra:
Date-19aug2025 Rep-prathamesh tawade Loc-virar Slug-VIRAR HOUSE WKT Feed send by 2c Type-pkg Slug- विरार एम बी इस्टेट परिसरात तळमजल्यावर राहणाऱ्या नागरिकांचे हाल तळमजल्यावरील घरांमध्ये झरे व पावसाचे पाणी साचले वयोवृद्ध नागरिकांचे खाण्यापिण्याचे हाल अँकर - विरार पश्चिमेच्या एमबीइस्टेड परिसरातील सोसायटीमध्ये गुडघाभर पावसाचे पाणी साचले आहे.. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, मीटर बॉक्स मध्ये पावसाचे पाणी शिरल्याने येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे... तळमजल्यावरील सर्वच घरात जमिनीतून निघणारे झरे व पावसाच्या पाण्याने दुकानदार , नागरिकांचे हाल होत असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.. आहेत तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Aug 19, 2025 05:47:14
Kolhapur, Maharashtra:
Kop Rain Update @10am Feed :- 2C Anc : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढून कोल्हापूर आणि गगनबावडा या राज्यमार्गावर पाणी आल्याने मांडूकली गावाजवळ बॅरॅकेट्स लावून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. कोल्हापूर आणि कोकणाला जोडणारा गगनबावडा हा मुख्य मार्ग समजला जातो. पण आता याच मार्गावर पाणी आल्याने कोकणाकडे जाणारा एक रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. तर दुसरीकडे राधानगरी तालुक्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे परिणामी. निपाणी - देवगड राज्यमार्गवर पुराचे पाणी आले आहे. राधानगरी मधील फेजीवडे जवळ हे पुराचे पाणी आले असून पाण्यातून वाट काढत संथ गतीने वाहतूक सुरू आहे. कोल्हापुर आणि निपाणीमधून फोंडाघाट मार्गे कोकणात होणारी दुसऱ्या मार्गाची वाहतूक देखील मंदावली आहे. या मार्गांवर पाणी वाढल्यास हा मार्ग देखील वाहतुकीला बंद होण्याची शक्यता आहे.
2
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 19, 2025 05:18:53
Nagpur, Maharashtra:
Ngp Jaiswal patole byte live u ने फीड पाठवलं ----------------------------- नागपूर - नाना पटोले : लोकशाही वाचवायची असेल तर निवडणूक आयोगावर महाभियोग आणावाच लागेल. एकदम न्यायालयात जाणार नाही. आधी जनतेकडे जाऊ. त्याची सुरुवात राहुल गांधींनी बिहार येथून केली आहे. ......------------------- नाना पटोले यांचा बावनकुळे यांना सवाल, मतदार याद्या तुमच्याकडे तरी आहेत काय. स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आधी याद्या तपासून घ्या हा सल्ला बावनकुळे यांनी दिला असला तरी अंतिम याद्याच नसल्याने तपासायच्या कशा असा सवाल पटोले यांनी केला आहे आणि बावनकुळे यांचा अभ्यास कमी आहे, त्यांनी आधी अभ्यास करावा असा सल्ला दिला आहे. आता पूर्वी सारखी पद्धत राहिली नाही. अंतिम याद्या फायनल होऊन मग जिल्हाधिकाऱ्यांकडे येतात, याची त्यांनी माहिती घ्यावी असे पटोले म्हणाले आहेत.
10
comment0
Report
UPUmesh Parab
Aug 19, 2025 05:18:49
Oros, Maharashtra:
अँकर ----- मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसलाय. कोकण रेल्वे मार्गांवरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या एक्सप्रेस तसेच पॅसेंजर गाड्या उशिराने धावत आहेत. कोकण कन्या - 2 तास 15 मिनिट मेंगलोर मुंबई - 3.38 रत्नागिरी दिवा - 1.10 गरीब रथ - 2.34 मंगला एक्सप्रेस - 1.00 spl उदना एक्सप्रेस - 3.29 जबलपूर सुपरफास्ट 1.00 या गाड्या उशिराने धावत आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी
4
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 19, 2025 05:15:53
Nagpur, Maharashtra:
Ngp Jaiswal patole byte live u ने फीड पाठवलं ------ नागपूर - आशिष जयस्वाल, राज्यमंत्री, सह पालक मंत्री, गडचिरोली On Gadchiroli ऑरेंज अलर्ट आज पावसाचा इशारा दिला आहे. *राज्यात सरकार प्रशासन सारे अलर्ट मोड वर आहे. स्वतः CM लक्ष ठेवून आहेत.*
4
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 19, 2025 05:03:40
Ambegaon, Maharashtra:
Feed 2C Slug: Ambegaon Ganesh Murti File:02 Rep: Hemant Chapude(Ambegaon) Anc: गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपण असून उत्तर पुणे जिल्ह्यात घरगुती गणपती तसेच मंडळाच्या गणपती मुर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असून यंदा कच्चा मालाच्या वाढलेल्या किंमती मुळे गणेश मुर्तींच्या किंमतीत ३० टक्यांनी वाढ झालीय,कारखान्यात ६ इंचापासून ९ फुटापर्यंतच्या मुर्ती बनवल्या गेल्या असून POP मुर्ती वरील बंदी उशीरा उठल्याने मुर्ती बनवण्यासाठी कमी वेळ मिळाल्याने याचा हि फटका मुर्ती कारांना बसलाय, असं असलं तरी गणेश मुर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी पाहायला मिळतीय.. Byte: श्रीधर राजगुरू(मुर्तीकार) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया आंबेगाव पुणे...
8
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 19, 2025 05:03:28
Nagpur, Maharashtra:
Ngp Bawankule byte live u ने फीड पाठवले ------- नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे : ऑन पूर परिस्थितीने नुकसान : आपत्ती व्यवस्थापन निधीतून रक्कम काढण्याचे आणि ज्यांची घरं वाहून गेली त्यांना तातडीने मदत करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आजच्या कॅबिनेट बैठकीत सविस्तर चर्चा होऊन आवश्यक निर्णय घेतले जातील. ऑन तहसीलदार गाणे, कारवाई आणि सामन्यातून कारवाईवर टीका : कारवाई करण्याचा विषय आहे कारण, कासी ज्युडिशियल authority असताना अधिकाऱ्याने खुर्चीवरून गाणे म्हणणे, ऑर्केस्ट्रा करणे योग्य आहे काय. माझ्याकडे महसूल मंत्री म्हणून कासी ज्युडिशियल अपील असतात, अशावेळी *उद्या समजा मी अधिकृत खुर्चीवर बसून गाणे म्हटले, ऑर्केस्ट्रा केला तर चालेल काय?* त्यांनी बाहेर कुठेतरी हॉल घ्यायला पाहिजे होता, कार्यक्रम करायला पाहिजे होता. ते न करता, एकदा रिलीव्ह झाल्यानंतर पुन्हा परत येऊन त्या खुर्चीवर बसून गाणे म्हटले हे शोभले नाही. ऑन 36 पैकी 15 जिल्ह्यात पुढील दोन दिवस रेड किंवा ऑरेंज अलर्ट असल्याबद्दल.. प्रशासन अलर्ट मोड वर आहे, सर्व सूचना दिल्या आहेत, स्वतः मुख्यमंत्री वॉर रूम द्वारे परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.
6
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 19, 2025 05:00:15
Yavatmal, Maharashtra:
AVB यवतमाळच्या उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार किसन वानखेडे यांना पूरग्रस्त भागाची पाहणी करताना सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पैनगंगा नदीकाठच्या सावळेश्वर, चातारी, सिंदगी, बोरी, माणकेश्वर आदी गावे बाधित करून प्रस्तावित सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू आहे. आमदार किसन वानखेडे यांनी विधिमंडळ अधिवेशनात या प्रकल्पाला मान्यता देऊन काम सुरू करण्याची मागणी केली होती, त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील 50 गावांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे या जलविद्युत प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवित शेतकऱ्यांनी सावळेश्वर येथे आमदार किसन वानखेडे यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी "जान देंगे मगर जमीन नही देंगे" अशा घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांचा आक्रोश पाहता आमदार किसन वानखेडे देखील नरमले आणि मी तुमच्या सोबत आहे असे सांगून त्यांनी वेळ निभविली. बाईट : किसन वानखेडे : आमदार
3
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top