Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

गोंदिया: मुसळधार पावसाने शेतीला दिले तडके, शेतकऱ्यांची मदतीची मागणी!

PTPRAVIN TANDEKAR
Jul 28, 2025 02:15:30
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Gondia Slug - 2807_GON_PADDY_CROP FILE - 8 VIDEO झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेती पाण्याखाली..... शेतीला तड्याचे स्वरूप... शेतकऱ्याची धान पीक खराब होण्याच्या मार्गावर.... पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी.... Anchor:- गोंदिया जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस बरसला . पावसाने उसंती घेतली आहे. दोन दिवस आलेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील अनेक रोड रस्ते हे पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद होते. अनेक भागात शेत हे पाण्याखाली आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले, तर शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे. शेतकऱ्यांनी लावलेले धान पीक हे पाण्याखाली आल्यानंतर संपूर्ण धान पीक सडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबारी होण्याच्या मार्गावर आहेत. शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करत आहेत. BYTE :- दिलिप लांजेवार (शेतकरी) BYTE :- उमेंद्र तुपकर (शेतकरी) BYTE :- सोनबा गौतम (शेतकरी)
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Jul 28, 2025 07:34:24
Pandharpur, Maharashtra:
28072025 Slug - PPR_MADHA_MARAHAN file 02 ----- Anchor - माढ्याच्या चिंचोलीत शेतातील रस्त्याच्या कारणावरुन दोन गटात मारहाण-पोलिसांत १३ जणांविरोधात गुन्हा-घटनेचे व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल शेतातील रस्त्यावर टाकलेला मुरुम काढण्याच्या कारणावरून माढ्याच्या चिंचोलीत दोन गटात मारहाण झाल्याची घटना घडली असून परस्पर विरोधी माढा पोलिसांत तक्रार दाखल झाल्याने १३ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही गटाचे मारहाण केल्याचे समोर आले असून सोशल मिडीयावर व्हायरल झालेत.
3
Report
SKSudarshan Khillare
Jul 28, 2025 07:33:15
Manmad, Maharashtra:
अँकर :-श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी मनमाडच्या नागापूर येथील महादेव नागेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळी असून द्रविड काळात हे मंदिर उभारण्यात आले होते औरंगजेबाच्या काळात जेव्हा मंदिरे उध्वस्त करण्यात येत होती तेव्हा गावातील लोकांनी हे मंदिर जमिनीत पुरुन टाकले असल्याची आख्यायिका आहे पौराणिक मंदिर असल्यामुळे दर्शनासाठी येथे श्रावण महिण्यात शनिवारी आणि सोमवारी भाविकांची प्रचंड मोठ्या गर्दी होते आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्याने पंचक्रोशीतील भाविकांची दर्शनासाठी सकाळ पासून मोठी गर्दी उसळी आहे.दर्शन घेताना भाविक जोरदार पावसासाठी महादेवाला साकडे ही घालत आहे. भाविकासाठी आमदार सुहास कांदे आणि नागपूर ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले
3
Report
SNSWATI NAIK
Jul 28, 2025 07:31:40
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - सायन- पनवेल मार्गावर भाजी चा ट्रक पलटी सायन - पनवेल मार्ग पर ट्रक अपघात FTP slug - nm sion - panvel truck accident shots- reporter - swati naik navi mumbai anchor- पनवेल सायन मार्गावर भाजीचा ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती, खारघर ते बेलापूर दरम्यान मुंबई च्या लेनवर ट्रक पलटी झाला ,चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला ,मुख्य मार्गावर ट्रक पलटी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती,यावेळी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली।ट्रक बाजूला काढण्याचे काम सुरू gf - -------------------------------
0
Report
SMSarfaraj Musa
Jul 28, 2025 07:21:55
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचा मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते उद्घाटन,555 बैलगाडी शर्यतीत सहभागी.. अँकर - सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस व नागपंचमी निमित्ताने "देवाभाऊ केसरी" बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व आमदार गोपीचंद पडळकरांच्या हस्ते या बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन पार पडले.बैलगाडी शर्यतीमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातुन 555 बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग घेतला असून प्रथम क्रमांकाला 5 लाख 55 हजार 555 रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. बैलगाडीच्या शर्यतींचा थरार पाहण्यासाठी लाखो बैलगाडी शौकीनांनी नांगोळीच्या ऐतिहासिक मैदानावर हजेरी लावली आहे.
2
Report
VKVISHAL KAROLE
Jul 28, 2025 07:18:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn arrest  break छत्रपती संभाजी नगरच्या सातारा परिसरातील महिलेला मारहाण प्रकरणात आरोपी लंके दांपत्याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे,  त्यांच्या शोधासाठी दहा पथक लावण्यात आली होती,  पोलिसांचा त्यांना शोधण्याचा कसोशीने  प्रयत्न सुरू होता अखेर संभाजी नगर जिल्ह्यात ग्रामीण भागात हे कुटुंब लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली आहे आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.. शिकवणीत मुलींचा  वादातून लंके कुटुंबीयांनी शिंदे कुटुंबातील  महिलेला अमानुष मारहाण केली होती या मारहाणी ची माहिती पुढ आल्यानंतर लंके कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता...
5
Report
SMSarfaraj Musa
Jul 28, 2025 07:18:22
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचा मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते उद्घाटन,555 बैलगाडी शर्यतीत सहभागी.. अँकर - सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस व नागपंचमी निमित्ताने "देवाभाऊ केसरी" बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकरांच्या हस्ते या बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन पार पडले.बैलगाडी शर्यतीमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातुन 555 बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग घेतला असून प्रथम क्रमांकाला 5 लाख 55 हजार 555 रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. बैलगाडीच्या शर्यतींचा थरार पाहण्यासाठी लाखो बैलगाडी शौकीनांनी नांगोळीच्या ऐतिहासिक मैदानावर हजेरी लावली आहे.
6
Report
PPPRAFULLA PAWAR
Jul 28, 2025 07:16:01
Raigad, Maharashtra:
स्लग - बोट दुर्घटनेतील बेपत्ता तिघांचे मृतदेह सापडले .... शनिवारी अलिबाग जवळ समुद्रात बुडाली होती मच्छीमार बोट ..... अँकर - अलिबाग जवळच्या समुद्रात झालेल्या बोट दुर्घटनेतील बेपत्ता तीन मच्छीमारांचे मृतदेह सापडले आहेत. अलीबागच्या सासवणे, किहीम आणि दिघोडी किनारी हे मृतदेह आढळून आले. नरेश शेलार, धीरज कोळी आणि मुकेश पाटील अशी मृतांची नावे आहेत पोहून किनाऱ्यावर आलेल्या 5 मच्छीमारांची प्रकृती स्थिर आहे. उरण तालुक्यातील करंजा येथील तुळजाई या मच्छीमार बोटीला शनिवारी सकाळी खांदेरी किल्ल्याजवळ जलसमाधी मिळाली होती.
6
Report
SKSudarshan Khillare
Jul 28, 2025 07:15:30
Yeola, Maharashtra:
अँकर:- नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील प्रसिद्ध असे चंद्रेश्वरी मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी बघावस मिळाली नाशिक मुंबई महामार्गावर असलेल्या या मंदिरात अति प्राचीन असे नागेश्वर मंदिर असून या ठिकाणी महिला भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती
5
Report
LBLAILESH BARGAJE
Jul 28, 2025 07:03:41
Pune, Maharashtra:
अहिल्यानगर येथील शनिशिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांची गळफास घेऊन आत्महत्या शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सकाळी उघडकीस आली. नितीन शेटे यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.या घटनेमुळे शनिशिंगणापूर गावात शोककळा पसरली आहे. तपास पूर्ण झाल्यावरच आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट येईल...
8
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Jul 28, 2025 07:03:24
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 2807ZT_MAVAL_GHORADESHWAR Total files : 01 Headline : संत तुकाराम महाराजांच्या साधना स्थळी असलेल्या घोरवडेश्वर शिव मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त शृंगार आरती Anchor: घोरवडेश्वर डोंगरावर श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवभक्तांचा उत्सव पहायला मिळाला. यावेळी हर हर महादेवच्या गजरात आसमंत दुमदुमला. मावळ तालुक्यातील पांडवकालीन श्रीक्षेत्र घोरवडेश्वर डोंगरावर, श्री संत तुकाराम महाराजांच्या साधनास्थळी, श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी शृंगार आरती संपन्न झाली. शंकर भोलानाथांच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. डोंगररांगांमध्ये “हर हर महादेव” च्या घोषात वातावरण भक्तिमय झालं होतं.
5
Report
MNMAYUR NIKAM
Jul 28, 2025 07:03:01
Buldhana, Maharashtra:
बुलढाणा ब्रेकिंग *खामगाव बंदच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, सकाळपासूनच शहरात कडकडीत बंद...* *गाय चोरीच्या संशयावर तरुणाला बेदम मारहाण झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ पुकारला बंद...* Anchor - गाय चोरीच्या संशयावरून एका तरुणाला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुलढाण्याच्या खामगाव शहरात घडली होती, या घटनेच्या निषेधार्थ आज खामगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते, या आवाहनाला विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे, तर बंद ला व्यावसायिकांचा आणि शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याच पाहायला मिळत आहे.. आज सकाळपासूनच खामगाव शहरातील सर्वच दुकाने आस्थापणे बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवण्यात येत आहे.. आरोपीला तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे...
7
Report
GDGAJANAN DESHMUKH
Jul 28, 2025 06:50:07
Parbhani, Maharashtra:
अँकर- हिंगोलीच्या औंढा नागनाथ तहसिल कार्यालयाला लेट लतीफ अधिकारी कर्मचाऱ्यांचा संख्या वाढलीय,शासनाने गतिमान प्रशासन व्हावे यासाठी सकाळी पावने दहा ते सायंकाळी सव्वा सहा वाजेंपर्यंतची वेळ कर्मचारी अधिकार्यांना बंधनकारक केली आहे,अधिकार्यांना कामाचा ताण पडू नये म्हणून पाच दिवसांचा आठवडा केलाय,तरीसुद्धा लेट लतीफ कर्मचारी वेळेत कार्यालयात पोहोचायला तयार नाहीत,औंढा नागनाथ तहसिल कार्यालयात साडे दहा वाजेपर्यंत ही कोणतेच महत्वाचे अधिकारी आले नव्हते,यामुळे नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागतोय. घडीमध्ये 10.25 वाजले तरी औंढा तहसिलमध्ये दोन तीन शिपाया शिवाय कुणीच आलं नव्हतं,अनेक कार्यालय सुद्धा आम्हाला बंद दिसून आलीय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी... wkt गजानन
9
Report
PTPRAVIN TANDEKAR
Jul 28, 2025 06:49:38
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 2807_BHA_BDCC_RESULT FILE - 3 VIDEO भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निकाल जाहीर...... नाना पटोले यांच्या पॅनलचा दारुण पराभव..... ANCHOR :- भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये नाना पटोले यांच्या पॅनलचा दारुण पराभव झालाय. तर महायुतीची सहकार पॅनलचा विजय झाला असून तेरा उमेदवार निवडून आले आहेत. तर नाना पटोळे यांच्या परिवर्तन शेतकरी पॅनल मधून फक्त तीन उमेदवार निवडून आले. त्यामुळे नाना पटोले यांना स्वतःच्या जिल्ह्यातच पराभवाच्या सामना करावे लागले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ..... ..... .....
7
Report
AKAMAR KANE
Jul 28, 2025 06:47:26
kolhapur, Maharashtra:
2c ला बाईट जोडला आहे ----- नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस On गोर्यनटाल प्रवेश भाजप त्यांच्या काही अडचणी आहेत कशामुळे ते प्रवेश करत आहेत हे मला माहित नाही.. त्यांच्याशी भेटून आम्ही चर्चा करून त्यांना सांगितलं. तीनदा आमदार राहिलेले आहेत मंत्री राहिले आहेत पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांचे नाव काँग्रेस पक्षामुळे आहे. पक्षाने त्यांना लौकिक मिळून दिला. संकटावेळी पक्षासोबत उभे राहणार हे आवश्यक आहे मात्र अशावेळी पक्ष सोडून जाणे म्हणजे पक्षाला कमकुवत करणे आहे स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडून जाणे हे चुकीचे आहे... भाजप हा पक्ष फोडत आहे त्यामुळे जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल... *ऑन कोकाटे भेट अजित पवार* कोकाटे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. सरकारची बदनामी झाली. शेतकऱ्या संदर्भात वादग्रस्त विधान केलं असेल. विधान भवनात रमी खेळताना व्हिडिओ असेल.. जनतेच्या मनात सरकार बद्दल घृणा निर्माण झाली आहे.. शेतकऱ्यांच्या मनात असंतोष निर्माण झालेला आहे.. सरकारने कोकाटेचा राजीनामा घेतला तर बरं होईल आम्ही त्याचे अभिनंदन करू.....सरकार बेशरम बनत असेल तर *On नागपूर बार वायरल व्हिडिओ* सरकार एवढा भ्रष्ट झाला आहे. खालीपर्यंत भ्रष्टाचार सुरू आहे.साधा बाबू सुद्धा फाईल पुढे सरकवण्यासाठी पैसे घेतल्याशिवाय फाईल सारख वाटत नाही. महाराष्ट्रात कोणावर धाक राहिलेला नाही ... केवळ मंत्रालयातच भ्रष्टाचार आहे असं नाही तर ... ग्रामीण भागात सुद्धा सामान्य माणसाची लूट होत आहे... चिरीमिरी घेतल्याशिवाय यांचे भागत नाही... बियर बार मध्ये दारू पिताना सुद्धा आनंद घेत टेबलच्या खालून सुद्धा पैसे घेत दुहेरी आनंद घेत आहे... पैसा आणि नशेच्या आनंद ही सरकार घेत आहे आणि सामान्य माणसाची लूट महाराष्ट्रात सुरू आहे. (On वर्धा भाजप बैठक ) चरखा चलाने से कोई गांधी नही बनता.. विचारधारा त्यांच्यात असली पाहिजे... त्यांची विचारधारा गांधीचा खून करणाऱ्यांची बरोबरची आहे.. बैठक घेतल्याने काही फरक पडत नाही.
7
Report
PPPRASHANT PARDESHI
Jul 28, 2025 06:36:35
Dhule, Maharashtra:
ANCHOR - नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्यवस्थेच्या वाघाने काढणारे असून एक घटना समोर आली आहे. बांबूच्या झोळीतून गर्भवती महिलेची 8 किलोमीटर जीवघेणा प्रवास करावा लागला आहे. अक्कलकुवा तालुक्यातील केवडी गावातील हा धक्कायादायक प्रकार आहे. केवडी गावापासून पांढरामाती गावापर्यंत रस्त्यापर्यंत जायला जोड रस्ता नसल्याने रुग्णाचे हाल होतं आहेत. सोतीबाई कालूसिंग तडवी वय 30 या गर्भवती महिलेच नाव असून, त्यांना हा जीवघेणा प्रवास करण्याची वेळ आली आहे. स्थानिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. मुख्य रस्त्याला रुग्णवाहिका उपलब्ध असल्याने गर्भवती महिलेचे प्राण वाचले असून, जोड रस्त्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. यां महिलेला वेळीच उपचारासाठी दाखल केल्याने मोठा अनर्थ टळला असून, गर्भवती महिला आणि नवजात बालकाची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे. दुर्गम भागातील रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एक ऐरणीवर आला असून, अनेकांना या आधी आपला जीव गमवावा लागला अशी माहिती सांगण्यात येतात. BYTE :- अशोक तडवी, ग्रामस्थ प्रशांत परदेशी, नंदुरबार.
13
Report
Advertisement
Back to top