Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली पण टिकवू शकले नाहीत!

HPHARSHAD PATIL
Aug 15, 2025 16:03:13
Palghar, Maharashtra
पालघर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली मात्र ती त्यांना टिकवता आली नाही . राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच पालघर मध्ये मोठ वक्तव्य . पालघर मधील दुर्वेश येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलताना गणेश नाईक यांच मोठ वक्तव्य . लॉटरी प्रत्येकाला लागत नाही. मात्र लागलेल्याने ती योग्य टिकवली पाहिजे , अस सांगत गणेश नाईक यांचा एकनाथ शिंदे यांना चिमटा .
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Aug 15, 2025 16:16:00
Nagpur, Maharashtra:
Ngp women Dahihandi live u ने फीड पाठवले ----------- नागपुरातही दहीहंडी उत्सव मोठ्या धडाक्यात साजरा होतोय... बडकस चौक मित्रपरिवार तर्फे आयोजित दहीहंडीमध्ये महिला पथकांनीही मोठ्या उत्साहात सहभागी घेतला... केवळ नागपूरच नव्हे तर नागपूर बाहेरच्या जिल्ह्यातील पथकही सहभागी झाले होते.. जय भोले भंडारा महिला दहीहंडी पथकाने महिलांची दहीहंडी फोडली.. त्यांनी चार थर लावले होते.... यावेळी गोविंदा आणि हजारो नागरिक या दहीहंडीमध्ये सहभागी झाले होते
14
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 15, 2025 16:02:58
Raigad, Maharashtra:
स्‍लग - रायगड पोलीसांच्या ओखळपत्रांचे डिजीलॉकरव्दारे प्रमाणीकीकरण ........ देशपातळीवरील पहिलाच प्रयोग ..........आता तोतया पोलीसांकडून होणारी फसवणूक टळणार ........ न्यायसारथी या चॅट बोट उपक्रमाचीही सुरुवात .......... अँकर - रायगड पोलीस दलाने आधुनिकीकरणाच्‍या दृष्‍टीने महत्‍वाचे पाऊल उचलले आहे. रायगड पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रांचे डिजीलॉकर मध्ये प्रमाणीकीकरण करण्यात आले आहे. राष्ट्रीय पातळीवर डिजीलॉकरचा वापर करून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्य़ा ओळखपत्रांचे प्रमाणीकीकरण करणारे, रायगडचे पोलीस दल देशातील पहिले आणि एकमेव आहे. यामुळे तोतया पोलीसांकडून होणारी फसवणूक टळणार आहे न्यायसारथी या कृत्रिम बुध्दीमत्तेवर आधारित चॅट बोट उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. तक्रार दारांना या चॅट बोट प्रणालीच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती आधारे मार्गदर्शन करून तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला जाणार आहे. मंत्री आदिती तटकरे यांच्‍या हस्‍ते आज या दोन्‍ही उपक्रमांचा शुभारंभ करण्‍यात आला. बाईट – आदिती तटकरे, मंत्री
12
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 15, 2025 16:02:40
Manchar, Maharashtra:
Feed 2C Slug: Manchar Walse Old File:01 Rep: Hemant Chapude(Manchar) *अनेक देश म्हातारे होत चालले असुन अनेक देशात तरुण पिढीच नाही* Anc :- आपल्या देशाच्या लोकसंख्येपैकी पन्नास टक्के तरुण असून, जगातील अनेक देश म्हातारे होत चालले असुन अनेक देशात तरुण पिढीच नसल्याचा दावा माजी मंत्री दिलीप वळसेपाटलांनी केलाय Vo :- यावर बोलताना आपल्या देशातील या प्रचंड तरुण शक्तीला काम देण्यासाठी तांत्रिक शिक्षणाची गरज आहे. रस्ते, लाईट, गटर या मागण्या पूर्ण होतीलच, मात्र गाव पातळीवर ग्रामदैवतांच्या मंदिराची कामे, भजन-कीर्तन, पूजन आणि बैलगाडा शर्यतीसोबतच कुटुंबाचे खरे कल्याण करायचे असेल तर शिक्षणाचे मंदिर उभारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दिलीप वळसेपाटील यांनी निसगुडसर येथे म्हटले... Sound Byte- दिलीप वळसेपाटील (माजी मंत्री) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया मंचर पुणे...
14
comment0
Report
KJKunal Jamdade
Aug 15, 2025 16:02:08
Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash *अभिनेत्री खासदार कंगना राणावत साई दरबारी...* साईबाबांच्या धूप आरतीला हजेरी लावत घेतले समाधीचे दर्शन... *राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे देखील कंगना राणावत यांच्यासोबत...* दोघींनीही साईबाबांच्या आरतीला लावली हजेरी... माध्यमांचे कॅमेरे बघून उर्वशीने कंगना राणावत पासून राखले अंतर... *फिल्म इण्डस्ट्रीवाल्यांनी माझी इमेज खराब केली होती...* *मात्र झाशीची राणी चित्रपट माझ्यासाठी पुनर्जन्मासारखा ठरला...* साई दर्शनानंतर कंगना राणावत यांची प्रतिक्रिया.... *राजकीय विषयांवर भाष्य करण्यास मात्र नकार...* *कंगना राणावत बाईट पॉईंटर -* *ऑन साई दर्शन -* परिवारातील सदस्य आणि मित्र परिवारासोबत दर्शनाला आले... पूर्वीची शिर्डी आणि आजची शिर्डी यात खूपच बदल झालाय... *प्रधानमंत्र्यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा प्रत्यय साई दरबारी येतोय...* *सकारात्मक ऊर्जा घेऊन इथून जात आहे...* *ऑन ऐकतिहासिक चित्रपट -* झाशीच्या राणीच्या भूमिकेमुळे देशाच्या स्वातंत्र्याबाबत खूपकाही शिकायला मिळाले... *फिल्म इण्डस्ट्रीवाल्यांनी माझी इमेज खराब केली होती...* *मात्र झाशीची राणी चित्रपट माझ्यासाठी पुनर्जन्मासारखा ठरला...* भारतीय वीरांगणांवर आणखी चित्रपट बनायला हवे...
12
comment0
Report
KPKAILAS PURI
Aug 15, 2025 16:01:49
Pune, Maharashtra:
pimpri death kailas puri Pune 15-8-25 feed by 2c Anchor - पिंपरी चिंचवडच्या निगडी प्राधिकरण परिसरातील एका बीएसएनएलच्या 'इन्स्पेक्शन चेंबर'मध्ये काम करताना गुदमरून ३ कंत्राटी कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सेक्टर २७ मधील प्लॉट नंबर ६५ समोर, रस्त्याच्या कडेला घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तिनही कामगार ऑप्टिकल फायबरच्या कामासाठी चेंबरमध्ये उतरले होते. मयत कामगारांची नावे दत्ता होलारे, लखन धावरे आणि साहेबराव गिरसेप अशी आहेत. हे तिघेही बीएसएनएलच्या आकुर्डी कार्यालयासाठी कंत्राटी पद्धतीने काम करत होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कामगार रस्त्यावरील एका निरीक्षण कक्षात काम करण्यासाठी उतरले होते. मात्र, चेंबरमध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्याने किंवा विषारी वायूमुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे. या दुर्घटनेमागे नेमके काय कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. बाईट - भोजराज मिसाळ, पोलिस निरीक्षक
14
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 15, 2025 14:32:55
Kalyan, Maharashtra:
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागणीसाठी खोणी ग्रामस्थांचे कल्याण तहसील कार्यालयाबाहेर आमरण उपोषण जोपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा दिली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार सरपंच हनुमान ठोंबरे यांचा इशारा Anchor :- डोंबिवली जवळील खोणी गावातील ग्रामस्थांनी खोणी गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागणीसाठी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच आमरण उपोषण सुरू केले आहे . कल्याण तहसील कार्यालय बाहेर कोणी गावचे सरपंच ग्रामस्थांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच आमरण उपोषण सुरू केले खोणी तसेच आजूबाजूच्या 20 ते 25 गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा नाही 25 ते 30 हजार नारिकांची लोकवस्ती असून सुद्धा प्राथमिक आरोग्य सकेंद्रासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेकदा जागा मागितले मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप कोणी गावचे सरपंच होऊ हनुमान ठोंबरे यांनी केलाय . जोपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा दिली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचे देखील हनुमान ठोंबरे यांनी स्पष्ट केले . Byte.. हनुमान ठोबरे सरपंच
14
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 15, 2025 14:17:01
Shirur, Maharashtra:
Feed 2C Slug: Bhimashankar Traffic File:03 Rep: Hemant Chapude(Bhimashankar) ब्रेक भिमाशंकर/पुणे - बारा ज्योतिर्लिंग भिमाशंकर मध्ये भाविकांची मांदियाळी - 15 ऑगस्ट आणि सलग सुट्ट्या आल्याने भाविकांची मोठी गर्दी - १० किलोमीटर पर्यंत दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा - दर्शनासाठी भाविकांची मोठ मोठ्या रांगा... प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया भिमाशंकर पुणे...
13
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Aug 15, 2025 14:16:49
Buldhana, Maharashtra:
बुलढाणा ब्रेकींग .. गावठाण रस्त्यासाठी आडोळ खुर्द ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन .. आंदोलन कर्ते विनोद पवार यांनी घेतली जलसमाधी . पोलिसांसमोरच पूर्णा नदीत मारली उडी .. विनोद पवार गेले नदीच्या पाण्यात वाहून. . जिगाव प्रकल्पामध्ये आडोळ गावाचे होत आहे पुनर्वसन . शेकडो ग्रामस्थ जिगाव प्रकल्पावर पोहचले .. मोठा पोलिस बंदोबस्त . . प्रशासनाने अचानक गावठाण रस्ता बदलल्याने ग्रामस्थ झाले आक्रमक ..  जिगाव प्रकल्पात जवळ जलसमाधी आंदोलन करणारे दोन आंदोलन वाहून गेले.  एकाला पोलिसांनी वाचवलं दुसरा अद्याप बेपत्ता.   Anchor -   पश्चिम विदर्भातील महत्त्वकांक्षी असलेल्या जिगाव प्रकल्पात अनेक गावं पुनर्वसित झाली आहेत त्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आडोळ या गावाचं पुनर्वसनासाठी पुनर्वसन विभागाने रस्ता प्रस्तावित केला होता व तो गावकऱ्यांना मान्य होता मात्र नंतर पुनर्वसन विभागाने तो रस्ता रद्द करून नवीन रस्त्याचा प्रस्ताव गावकऱ्यांसमोर ठेवला मात्र नवीन रस्ता गावकऱ्यांना मान्य नसल्याने त्यांनी आज जुन्या रस्त्याच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन पुकारलं होतं आज पूर्णा नदीला मोठा पूर आलेला असल्याने या ठिकाणी आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट होऊन दोन आंदोलनकर्त्यांनी पूर्ण नदीच्या पुरात उड्या घेतल्या मात्र त्यातील एक विनोद पवार नामक आंदोलक वाहून गेल्याने या ठिकाणी जमा आक्रमक झालेला आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोठा फौज फाटा घेऊन या ठिकाणी पोहोचले आहेत... 
14
comment0
Report
PNPratap Naik1
Aug 15, 2025 13:47:34
Kolhapur, Maharashtra:
Story :- Kop Kurundwad Paani Feed :- 2C Anc:- कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड शहराला नळ पाणीपुरवठा मंजूर करा, या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीचे साखळी उपोषण सुरू आहे. त्याला आज स्वातंत्र्य दिनी 115 दिवस पूर्ण होतात, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, प्रशासन याकडे दुर्लक्ष केले असून आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमची दखल घेऊन नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करावा अशी मागणी आंदोलकांनी ककेलीय. कुरुंदवाड शहराला स्वच्छ मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी 2014 मध्ये 14 कोटींचे नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. त्यानंतर या योजनेचे 14 टक्केच काम तीन वर्षात झाले त्यानंतर ही योजना रखडली आहे. Byte :- प्रफुल्ल पाटील, आंदोलक Byte :- राजू आवळे, आंदोलक
14
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 15, 2025 13:16:36
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1508ZT_CHP_BJP_CM_RAKHI ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर मतदार संघातल्या भाजप महिला आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ३० हजार राख्या पाठवून दिला विश्वासाचा संदेश   अँकर:-- भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर महिला आघाडीच्या वतीने आज शहरातील  जैन भवन येथे रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात चंद्रपूर मतदारसंघाच्या वतीने पालकमंत्री प्रा. अशोक उईके यांच्या मार्फत तब्बल ३० हजार राख्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आल्या. भगिनींनी मुख्यमंत्री यांच्याप्रती असलेला विश्वास, प्रेम आणि संरक्षणाची भावना या उपक्रमातून व्यक्त केली. कार्यक्रमाला आदिवासी विभाग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके, चंद्रपूर मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांची मंचावर उपस्थिती होती. मुख्यमंत्री स्वतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहेत. राज्य सरकार महिलांच्या शिक्षण, आरोग्य, स्वावलंबनासाठी विविध उपक्रम राबवत आहेत असे पालकमंत्री यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात लहान मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनी राखी बांधून सणाचे महत्त्व अधोरेखित केले.  अल्पसंख्यांक महिला आघाडीच्या वतीने ही 2 हजार राख्या मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आल्यात.   बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
14
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Aug 15, 2025 13:16:17
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_RAIN_LOSS दहा फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; रस्त्याला नदीचे स्वरूप, जीव वाचवण्यासाठी गावातील नागरिक चढले घरांच्या स्लॅपवर कपाशी, सोयाबीन, तूर पिक पूर्ण पाण्याखाली, शेतकरी हवालदिल अँकर :– अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे त्यामुळे चांदूर बाजार तालुक्यातील माधान गावातील रस्त्याला मोठ्या प्रमाणात नदीचे स्वरूप आले आहे. अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने घरातील जीवनाशक वस्तू व अन्न धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जीव वाचवण्यासाठी गावातील नागरिक घरावरील स्लॅपवर चढले असून गावात सर्वदूर पाऊस झाल्याने पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कपाशी, सोयाबीन, तूर पिक पूर्ण पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
14
comment0
Report
SMSarfaraj Musa
Aug 15, 2025 13:15:28
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - शक्तीपीठ करायचा असेल तर,आधी राजीनामे द्या आणि शक्तीपीठ मुद्द्यावर निवडणूक जिंकून दाखवा - विशाल पाटलांचा महायुतीला आव्हान.. अँकर - शक्तिपीठ महामार्ग करायचा असेल तर आधी राजीनामे द्या,निवडणूक जिंकून दाखवा आणि मगच शक्तीपीठ करा,असे आव्हान अपक्ष खासदार विशाल पाटलांनी महायुती सरकारला दिले आहे.मतदान विरोधात जाईल म्हणून शक्तिपीठ करणार नाही,अशी घोषणा निवडणुकीपूर्वी केलं आणि निवडून आल्यावर आता शक्तिपीठ करणारच,अशी भूमिका घेतली जात आहे. मग जमिनी घेणारच असाल,तर राजीनामे द्या आणि शक्तीपीठ करणारच या मुद्द्यावर निवडणूक लढवून जिंकून दाखवा,असे आव्हान खासदार विशाल पाटलांनी महायुती सरकारला केला आहे.सांगलीच्या बुधगाव मध्ये पार पडलेल्या शक्तिपीठ बाधित शेतकरी मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. साउंड बाईट - विशाल पाटील - खासदार, अपक्ष.
14
comment0
Report
SMSarfaraj Musa
Aug 15, 2025 13:03:32
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - यापुढे शक्तीपीठसाठी मोजणी झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकू - राजू शेट्टी. अँकर - यापुढे शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींची मोजणी करण्याचा प्रयत्न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकू,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टींनी दिला आहे.स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा महामेळावा सांगलीच्या बुधगाव मध्ये पार पडला.यावेळी खासदार विशाल पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.या निमित्त बोलताना राजू शेट्टींनी शक्तीपीठ महामार्गाचा घाट सरकार भांडवलदारांच्या साठी घालतोय,मात्र यापुढे या शक्तीपीठला तीव्र विरोध केला जाईल,रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शक्तीपीठ विरोधात लढू,असं देखील राजू शेट्टींनी यावेळी स्पष्ट केले आहे. बाईट - राजू शेट्टी - माजी खासदार.
14
comment0
Report
MKManoj Kulkarni
Aug 15, 2025 13:03:01
Mumbai, Maharashtra:
अँकर -- छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावरील ५.२५ किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्र, चार पादचारी भुयारी मार्गचे  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालं.आज  शुक्रवार  १५ ऑगस्ट  रोजी सायंकाळ पासून विहार क्षेत्र आणि भुयारी मार्ग मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला. मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पावरील ५.२५ किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्र आहे.विहार क्षेत्रात जाण्यासाठी भुयारी मार्गात जाण्यासाठी पायऱ्या तसेच उतार मार्ग (रॅम्प) ची व्यवस्था आहे. तसेच सायकलस्वार व दिव्यांग येथे सहज प्रवेश करू शकतात. विहार क्षेत्रावर सायकल ट्रॅकसह दिव्यांगांसाठी व्हिलचेअर सुविधा करण्यात आली आहे. नागरिकांसाठी विरंगुळा तसेच शारीरिक तंदुरुस्तीच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने विहार क्षेत्रावर विविध सोयीसुविधा दिल्या आहेत. विहार क्षेत्रावर सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. निसर्गसौंदर्यचा आनंद घेण्यासाठी   आसनव्यवस्थेचीही सोय करण्यात आली आहे. ठिकठिकाणी हिरवळ विकसित करण्यात आली आहे.तसेच विविध प्रकारची फुलझाडे, शोभेची झाडे लावण्यात आली आहे.मुंबईकरांना हे पाहून आनंद झाला आहे.  याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी  Wkt n Tiktak  मनोज कुळकर्णी  Feed send TVU ५० Slug -- costal Warali Sea face Opening 
14
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top